()॥५॥४/८॥२5७/१|_
(3२,७२२
0[)_192300
२०) 7१०० हि.
॥४७04/॥५]
0ए7--391--29-4-72--10,000.
0911411. 11 "1-17२५७॥६ 1.11२.1२३₹
(,81] 1४0 णि न 0 ९८658101 1४० 8७6
(81 1४०. 5887 & ७४०. 4 12
जोशी] चोर महोदरश॥ सटी
लो»अकप॒ ६६1२५९
॥॥15 9007 510प0 ७0 लपता ला 07 ७र्टण€ ॥12 र 1१2 1131717600 1९1090.
॥॥॥0०/
[11८
तीर्थरूप महाराष्ट
[ भाग दुसरा ]
छेखक
पं, महादेवशास्त्री जोकी
द्वितीयावृत्ति
(सन १९५४ )
ज्ञानराज प्रकाशन,
४२१ शनिवार पेढ, पुणे,
मल्य ३ रुपये
प्रकाशक !
सो.-सुधा महादेव जोशी,
सानराज प्रकाशनाकरितां,
४२१ शनिवार पेठ, पुरणे २.
सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.
मुद्रक !
श्रीपाद जगन्नाथ गानू ,
राजगुरु प्रेस,
४०५ नारायण पेठ,
पुरणे २.
मावंदें
तीथंरूप महाराष्ट्राचा हा दुसरा भाग रतिकांच्या सेवेसाठी सादर करतांना
मला अपूर्व भानंदाचा अनुभव घडत आहि. कोणत्याहि कार्याढा हातच घालूं
नये हे पहिलं बुद्धिलक्षण आणि घातलाच तर त्याचा शेवट गांठणें ह दुसरें
बुद्धिलक्षण. देवयोगानें या पुस्तकाच्या बाबतींत मी दुसऱ्याचा धनी झालों
आहे. यशाच्या सीमेत पाऊल पडले कीं कष्टसुद्धा सुखरूपच होतात.
गेलीं दीड-पावणेदोन वर्षं मी मद्वाराष्ट्रांतल्या ताथंक्षेत्रांचा नियत यात्रिक
होतो. जेव्हां तनाने नतेन तेव्हां मनानें. एक क्षेत्र पाहून आणि लिहून झालें
कीं ' ततः किम् हा प्रश्न पुढे आणायचा. कोणत्या तरी नव्या यात्रेचा
संकल्य करायचा. प्रस्थानापूर्वी त्य़ा क्षेत्राविषयी मिळेल ती मादहती गोळा
करायची, मग यात्रा करायची. मिळवलेळे ज्ञान त्या त्या ठिकाणी समक्ष
ताडून पहायचे. अधिकाचा संग्रह करायचा, आणि परत आल्यावर लेख
लिहून “ प्रसाद ? ला द्यायचा. एवढ्या उद्योगांत पंधरावीस दिवस सहज
निघून जायचे कीं लगेच पुढच्याचा वेध. माझ्या वाड्ययीन जीवनांतला द्दा
एक यज्ञ आहे या भावनेने मा प्रस्तुत लेखमाठळेकडे पहात होतो. हें एक
पुण्य्रत म्हणून मी स्वीकारले होतें. श्रीहरीच्या कृपेनें आज ते पूर्ण झालं
आहि. शिरावरचा भार उतरला आहे. त्यामुळे आज मला होणारे समाधान
अनिर्वचनीय आहे.
पंढरीहून प्रारंम करायचा आणि आळंदीळा येऊन यात्रा समाप्त करायची
असें मीं मुळांतच ठरवून टाकळे होतं. पहिल्या भागांत मीं मोरगांवपर्यंत
येऊन मुक्काम केला होता, त्यापुढर्ची क्षेत्रे या भागांत आढी आहेत. मला
वाटतें, मद्दाराष्ट्राची प्रासिद्ध, प्रातिनिधिक आणि सवांच्या मनीमुखीं असलेलीं
क्षेत्रे एवढ्याने पूर्ण झालीं आहेत.
मीं या दोन्ही भागांत जी क्षेत्रविधयक माहिती दिळी आहे ती मला
अनेक ग्रंथांना शरण जाऊन मिळवावी लागली आहे, क्षेत्रस्थ उपाध्यायांना
शरण जाऊन कांह्दी उपयोग झाला नाही. क्षेत्रत्थ लोकच क्षेत्रापासून फार
दूर आहेत असं मळा आढळून आलें. त्यांना आपल्या क्षेत्राचे यथावत् ज्ञान
नाहीं आणि करून घेण्याची जिज्ञासाहि नाह्दी. एखार्दे मंदिर वा स्थळ
वेगळ्या बांधणीचे, वेगळ्या तऱ्हेचे दिसल कीं मी त्यांना विचारीत होतों.
(२)
६ हे कधी आणि कोणीं निर्माण केलें £ ? त्यावर मला ठराविक उत्तर
मिळायचे, ' अनादिकालापासूनचें आहे. पुढें बोलणेंच खुंटले.
आज आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाची सर्वच अंगे मलिन
आणि शिथिळ झालीं आहेत. तीर्थक्षेत्रांनाहि हवे मालिन्य बाधल्यावांचून
राहिळे नाहीं. कुठल्याहि क्षेत्रांत चळा; उपाध्यायवर्गीत धार्मिकता आणि
शुचिता यांचा अभाव दिसतो. पूजक आणि सेवकवर्ग भ्रद्धाहीन बनला
आहे. मंदिरांतले पूजोप्चार नेमून दिलेल्या पद्धतीने द्ोतात ; पण त्यांत
भक्तिभावाचा जिव्हाळा दिसत नाही. सर्वत्र लोभाचे प्राबल्य, सेवेपेक्षां धंदा
हीच भावना. यात्रेकरू हे सर्व पहातात, सोततात, कधीं मनांत तर कर्धी
जनांत चडफडतात ; पण एकदां विरस झाला तरी पुन्हा येतात. तिथल्या
माणसांविषयी तिरस्कार उत्पन्न झाला तरी त्यांना क्षेत्रांचा आणि देवाचा
अनादर कधींच वाटत नाहीं. जनतेची श्रद्धा अभंग आहे म्हणूनच क्षेत्रं ही
क्षेत्रं म्हणून अजून टिकली आहेत. आज शतकानुशतकॅ जनतेनें या श्रद्धेचे
जतन केलें हा तिचा मोठेपणा,
पण क्षेत्रस्थांनीं आपलाहि कांही मोठेपणा दाखवायला नको का! जिथें तिथें
पुढें होणारा हात आवरून त्यांना तो पटवतां येईल. यात्रिकांची श्रद्धा टिकेळ
कशी आणि वाढेल कशी, याचा त्यांनी आतां मात्र शकय तितक्या लवकर
विचार करायला हवा. तीर्थस्थान हीं घमांचे वसोटे झालीं पाहिजेत. तिथें
स्थलशुद्धि, आचारशुद्धि आणि भावशुद्धि ही मूर्तमंत दितळी पाहिजेत. तिथें
येणारा यात्रिक जुलमाचा रामराम करायला आला असेल, अश्रद्ध घेऊन
आला असेल, तर तो भ्रद्धावंत होऊन परत गेला पाहिजे, मुळांतच सश्रद्ध
असेल त्याला तिथे आत्मसंतोष लाभला पाहिजे. परत जातांना “अद्यमे
सफलं जन्म ' असे कृतार्थतेचे उद्गार त्याच्या तोंडून निघाळे पाहिजेत.
त्याच्या दानबुद्धीला मिक्षुकांच्या आग्रह्वाने नव्हे; तर स्वयंप्रेरणेने अंकुर फुटले
पाहिजेत. आमची क्षेत्रे जेव्हां खच्छता, सेवा, आतिथ्य, भक्ति आणि ज्ञान
यांचीं आगरें बनतील तेव्हांच हे घडेल. तेव्हांच तिथें देवाचा खरा अधिवास
होईल.
क्षेत्रांची पुनर्घटना करण्याच्या कार्मी तिथल्या निःस्वार्थी, प्रातेष्ठित,
विचारवंत ळोकांनी पुढाकार घ्यायळा हवा. त्या त्या देवस्थानाच्या पंच
(३)
संडळींनी ह्या उपक्रम करायला हवा. क्षेत्रांत गेल्यावर यांत्रेकरूंचा मुख्य
संबंध येतो तो उपाश्यायवर्गाशी, या वगौत आज अध्ययनदि नाही आणि
कृत्याचे सांगोपांग ज्ञानहि नाई. द्दी परिस्थति प्रथम बदलायला हवी. उपाध्याय
ह्वा सत्पात्र आहे अशी यात्रेकरूची भावना झाली कीक्षेत्राचें निम्मे पाविज्प परत
आलें अर्स समजावें. क्षेत्रे शुद्ध, स्वच्छ आणि निमळ राखली जावी. पुराणां-
तरीं ज्याचे नांव एखाद्या क्रषि-मुनीशी निगाडत आहे अशीं कांही
तीर्थ आणि कुंड आज अनेक क्षेत्रांतून दुर्गधे, घाण पाण्याची डबकी
होऊन पडली आहेत आणि मोडकळीसहि आलीं आहेत. त्यांचा पुन-
झुद्धार व्हावा. त्या त्या ता्थस्थळांची माहिती देणाऱ्या पाट्या जागोजाग
लावाव्या. कोणत्याहि तीर्थकुंडांतळें पाणी दूषित होणार नादीं याची दक्षता
घ्यावी. बेळ, तुळशी, वड, ओदुंबर, नाना प्रकारची फुल्झाडे इत्यादि
वनस्पति सभोवती लावून, वाढवून जल-स्थले सुशोभित करावी.
क्षेत्रांतली प्रसिद्ध आणि दर्शनीय स्थान, त्यांचे पोराणिक आणि
शेतिह्ाततिक महत्त्व, त्यांची दिशा, परितरांतली प्रेक्षणीय स्थळें, गांवापासून
त्यांचं अंतर, क्षेत्रांतळे अवइग्र कर्तव्य अते धार्मिक विधी, धर्मशाळा वगेरे
मुक्कामाच्या जागा, वाहनांची व्यवस्था, वैद्यकीय मदत मिळण्याची जागा,
सावधागिरीच्या पूचना इत्यादि माहितीचे नकाशासद्दित छोटेत॑ पुस्तक त्या
त्या नगरपालिकेने छापून अल्प मोलांत विक्रीस ठेवावें. नगरपालिका यात्राकर
चसूळ करतात त्यांतून त्यांना यात्रेकरूंची एवढी सोय करणें जड वाटूं नये.
प्र्येक क्षेत्रांत माह्दितगार स्थळदर्शंक असावे. त्या कामाबद्दल यात्रेकरू
कडून त्यांनीं किती वेतन घ्यावें तें ठरवून दिळेळें असावे. एखादं प्रेक्षणीय
स्थळ गांत्रापासून थोडं दूर असेळ तर आपला उपाध्याय किल्येकदां त्याचा
नामनिर्देशहि करीत नाद्दी, सांगितल तर दाखवायला जाण्याचे भ्रम घ्यावे
लागतील म्हणून तो टाळाटाळ करतो. हातांत माहितीचे पुस्तक असेल
आणि मार्गदर्शक मिळणे दकय असेल तर उत्सांद्दी यात्रेकरू त्याचा फायदा
'घेऊं शकतील.
पंचामृतपूजा, मदह्दापूजा, महानेवेद्य, एकादष्णी, लघुरुद्र, पालखी, अनुष्ठान,
इत्यादि धार्मेक कृत्यांना किती द्रव्य द्यावे लागेळ त्याचा एक ठळक तक्ता
देवस्थानांत दर्शनी भागांत लावलेला असावा. या बाबर्तात आणि देवस्थान
(४)
स्वच्छ, सुंदर राखण्याच्या बाबतींत गोमंतकांतल्या शांतादुर्गा, मंगेश,
नागेश इत्यादि देवस्थानांची दीक्षा घेण्याजोगी आहे.
क्षेत्रांत येणारा यात्रेकरू जेणेकरून अधिक स्वावलंबी होईळ, त्याला
दगदग कमी पडेल, त्याची यात्रा सुखावह होईल आणि त्याच्या मनाला
प्रसाद नि संतोष लाभेळ या दृष्टीने त्या त्या क्षेत्राच्या सुधारणेची दिशा
आंखावी एवढें सांगितले म्हणजे अधिक तपशील वाढविण्याचे कारण नाही.
ही ठेखमाला मीं खंड पडूं न देतां लिहिली हं खरे; पण ती अखंडित
छापली जाणेंद्दि आवश्यक होत. ते कार्य माझे मित्र आणि 'प्रसाद! चे
संपादक श्री. य. गो, जोशी यांर्नी पार पाडळे याबद्दल त्यांना शतशः
घन्यवाद ! त्यांच्या उदार सहकार्यामुळेंच ' तीर्थरूप महाराष्ट्रा! चे दोन भाग
लागोपाठ प्रसिद्ध होऊं शकले.
राजगुरु प्रेसनें छपाई सुघक करून दिली. पुण्यांतळे सुप्रसिद्ध चित्रकार
श्री. ग. वि. देशपांडे यांनीं सुंदर चित्रांनी ' तीर्थरूप मद्दाराष्टर' शोभविला.
श्री. गणपतराव मोघे यांनी चित्रांचे ठसे करून दिले. श्री. दलाल यांनी
मुखपृष्ठ दर्शनीय केळं. या सवीचे मी मनःपूवक आभार मानतो.
यात्राप्रसंगी निरनिराळ्या क्षेत्रांतल्या उपाध्यायांनी आणि तिथल्या अनेक
आतिथ्यशीळ सदग्रहस्थांनीं मळा जी बहुमोळ मदत केली तीबद्दल मी
त्या सवोचे नामनिर्देश न करतां पण अत्यंत कृतरतेनं आभार मानतो.
रसिक वाचकांनी, वृत्तपत्रांच्या संपादकांनी आणि बहुसंख्य विद्दजनांनी
पहिल्या भागाचे उदार आणि सप्रेम स्वागत केळ, मी त्या सर्वांचा क्रणी
आहे. हा दुसरा भागहि त्यांना तसा आणि तितकाच प्रिय होईल अशी,
मी आज्या करतो. आणि शोवटी--
“ टति विद्यातपोयोनिरयोनारवेष्णुराडितः
वाग्यक्षेनार्चितो देवः प्रीयतां मे जनादन! ”
पुणे,
विजयादशमी, | -ऱमहादेवशासत्री जोशी
शके १८५२३.
णच
9) ज्यांनीं आणि मीं परस्पर-संगतींत सुखांचा गुणाकार
] आणि दु:खांचा भागाकार केला ते माझे
अलिबाग येथीळ परममित्र
श्री. रामचंद्र वामन दातार, बी. ए.
यांस सादर सप्रेम समपैण.
र -“" लेखक
अनुक्रम
१ महारिमार्तड ... 2
२ परशुरामक्षेत्र ... १९
३ तुळजाभवानी ०. उेढ
४ भीमादंकर ,... "३७
५ वेरुळचा घष्णेश्वर अड. रे
६ गोकणे-महाबळेश्वरर .... ८८
७ रामटेक ,... १७३
८ नाथांचे पेठण %& - ऐरर
९ ५ धन्य देहू गांव-' ....' १२९
१० आळंदीची वारी ,... १४२३
चुकीची दुरुस्ती
' भीमाशंकर ? या ळेखाचा क्रमांक वस्तुतः ४ असायला हवा ; पण तो
३ पडला आहे.
१ मल़लारि मातेण्ड
-*..५-»५---६-५८-८--/८--/ “-“-2-- “५/-/-* २-५ “फी “टी -“-7५-/-->-*५-/--*
2--.-पपसलआाप्पपपपि-नपश?ॅऑिसरर?0ॉ”ॅॅसॅत१ण्0ा
इजा बिजञा अन् तिजा' असे म्हणतात. एखाद्या कार्याला दोनदां
मुहूर्त लागला नाही तर तिसऱ्या खेपेततद्वि कांही तरी आडमेळें येतें अशी
भाविक समजूत. पण आमचे दोन बेत फतले तरी तिसऱ्या बेताला कोजागिरी
पौर्णिमेनंतर एके दिवशी सकाळीं साडेनवाच्या सुमारास आम्ही विनात्रास
नेजुरीच्या स्थानकावर उतरलॉ. आमचे पाय शाबूत नसतील या कल्पनेने
फक्त एक मेळ गांवांत जाण्यासाठी छकडेवाल्यानें तोंडमर भाडे सांगितलें.
भंडाराचा आडवा नाम लावून पुढें आलेल्या एका भटजीबुवांनी फक्त
खाळच्या देवाची भेट करून आणण्यासाठी दोन * गोप्रदार्ने ) मागितली.
पण आम्हांला तर तेवढ्यावरच न थांबतां तिथून वरच्या कडेपठारावर जायच
होते आणि त्यासाठी कोण्यातरी मार्गदरशांकाचीहि गरज होती. अखेर आम्हांला
भेटला छबन. तो तिथल्या गुरवाचा मराठी सातवी शिकणारा सोळा
वर्षांचा मुलगा. शाळेंतल्या विद्यार्जनापेक्षां आम्हांला हिंडवून आणण्याचा ह्वा
व्यवसायच त्याळा ' तूत दान मद्वापुण्य ? ठरणार होता.
स्टेशनापासून एक मेळ चाळून आम्ही गांवाच्या सीमेत पाय ठेवला,
नगरपालिकेच्या दवाखान्यावरून पुढें उभ्या रस्त्याला लागलां, एका बाजूच्या
भिंतीला दोन नवी चार्के टेकून ठेवलेली दिसली; तो बहुधा गराडीकारखाना
असावा. पुढे एका घरावर वाचनालयाची पाटी दिसली; पण तें होते
शिवणकामाचें दुकान. भंडार विकत घेण्यासाठीं आम्ही एका दुकानापुढे
थांबलो, त्याच्या वरच्या बाजूला पंधरवड्याच्या शिध्यासाठी स्रीपुरुषांची
तळपत्या उन्हांतळी रांग पाहिळी. भंडार म्हृणजे हळदीची पूड. पंढरपुरी
बुक्क्याचे, करवीरांत कुंकवाचे, त्ते इथ इळरदाचे माह्वात्म्य. भेडार कागदां-
तून मिळत नाही ; तो खोबऱ्याच्या वार्टीतून ध्यावा लागतो. कदाचित्
भंडाराबरोबर खोबरेंद्दी खपावें म्हणून संगनमताने सर्वे दुकानदारांनी
अमलांत आणलेली ही युक्तिद्दी असूं शकेल.
शु ४१५ शशी (च > शी ते
- तोथरूप महाराष्ट
केक ७४४ ४८” “0 /0-” “0.
चढत चढत गडाषालच्या महाह्वारापयैत आम्ही गेलां आणि पापाण
नंदीच्या पाठीकडून उजव्या हाताला वळला. छबन म्हणाला, ' आधीं रानच्या
रस्त्याने कडेपठारावर जाऊं आणि मा तिथून खालच्या गडावर येऊं.
ह कि ल्ल
१.4: (हला 0 नी
> 2222 1 च्याच र
जेजुरीगड
मीं म्हटले, ' जसं तुला सोयीस्कर वाटेळ तसं, ' मटकी, हुलगे याच्या
शेंतांतून आमची पायवाट जात होती. मधूनच ती एखाद्या निर्जळ ओइळांत
शिरे, मधूनच वर येई आणि पुन्हा खाली जाई. डोंगराच्या पायथ्याशी कांही
पडके दगडी 'चोथरे, गतवैेभवाची खंत करीत आयुष्य कंठणारी कोणत्या
तरी देवाची उघडी पडलेली एक पाषाणमू्त, तिच्यावर भक्तिप्रेमाची
सावली करणारे मोजकेच एकदोन वृक्ष आणि त्यांच्याजवळच एंक ' बाव?
आणि ' ढोपर्री कोपरी ? पुढे सरकायचा प्रयत्न करणारा म्हातारा; कृशांग
जलप्रवाह, हे सगळें पाहून मला वाटटे, प्राचीन काळची धर्मपुत्र लवादि
सात क्त्षांची तपोभूमे तर ही नसेल !
होय. याच भागांत त्यांचे आश्रम होते. इथेंच त्यांनीं ' जपतपसाधन
मांडल होते. इथंच भिजवून वृक्षशाखांवर वाळत टाकलेल्या त्यांच्या वल्कलां-
तून जलधारा गळत होत्या. याच डोंगरावर त्यांचे छात्रगण कंदमुळे खणायला
जात होते. इथूनच यश्धूमाचे लोट उठून आकांत पांगत होते. इथेच
क्रषिकन्या फुलझाडे शिंपून धाढवीत होत्या. इथेच अश्वत्थ-ओदुंबरांना बांघ-
लेल्या पारांवर वेदघोष आणि शास्त्रचर्चा गाजत होत्या. पण अश्या या शांत,
निवेर आश्रमस्थानावर माणि-मल्ल या दोन देत्यांची धाड पडली आणि एका
घटकेत सगळें उद्ध्वस्त झाल.
द्
मलछारि मातण्ड ३
(र). (सल लह हेलन आ नेर “४/0१/%. “१ “स्ट <<
हिरण्याक्ष-दहिरण्यकशिपु, रावण-कुंभकणं, सुंद-उपसुंद या जशा प्रमत्त
देत्यांच्या जोड्या तशीच द्दी माणि-मलछांची जोडी होती. त्यांचे फक्त परस्परां-
वर प्रेम होते आणि बाकीच्या सगळ्या जगाशी वैर होतं. स्वार्थासार्ठी,
किंबहुना आपला बलकंडू शमविण्यासाठी ते या प्रांतांतल्या निरागस जनतेचे
काळ झाले होते. धर्मपुत्र लवादि मुनींवर तर त्यांचा विशेष डोळा, कारण ते
पुण्यमा्ग वाढवीत होते आणि देवांचे सामर्थ्य चढवीत होते. जेव्हां हा
छळवाद असह्य झाला तेव्हां ते आपले गाऱ्हाणे घेऊन विश्वसष्ट्या त्रह्मदेवा-
कडे गेळे. तो म्हणाळा, “ आपल्या हातून हे काम रेटायचं नाहीं. तुम्ही
चैकुंठपतीला गळ घाला. ! ते विष्णूकडे जातांच त्यानें त्यांना केलासाची वाट
दाखविली. केलासनाथाने मात्र त्यांचं गाऱ्हाणे ऐकलं आणि त्यांना अभय-
वचन दिले.
आणि मग. देत्यनिदोलनासाठी मार्गशीष शुद्ध षष्टी रविवारी महारुद्र
मातड-भेरवाच्या रूपार्ने इर्थ अवतरला. तो येतांच त्याचा साह्यकारी म्हणून
सगळ स्वर्गच खालीं उतरला. गणपाति मोरगांवी करा नदीचा किनारा
संभाळून बसला. ' पुरंदर ! इंद्राने सातवडच्या पर्वतश्रेणीवर मोचे लावले.
आसमंतांतल्या शिवारांतून देवसेनेचे तळ पडले. देत्यांची चहूं बाजूनी कोडी
झाली. आणि मग...
पण एवढ्यांत माझी विचारमाळिका एकदम तुटली. माझ्या पायांजवळच्या
एका बतकर झुडुपांतून एक लद्दानत्ते पांखरूं फरदिशी उडाळें आणि जमि-
नींत तिरकतत घुतणाऱ्या तीरासारखं मागच्या एका दुसऱ्या झुडुपांत शिरळे.
तो लावा पक्षी होता. जाणाऱ्या माणस्ताचा पाय जवळजवळ अंगावर पडे-
पर्यत दह्वाळायचे नाही ह्या त्याचा जातिस्वभावच.
आतां आम्ही कडा चढूं लागला होतो. आमच्या डाव्या हाताच्या डोगरा-
वर ओहोळांच्या चऱ्या इकडून तिकडून निघाल्या होत्या, मर्धेच एकत्र
येऊन एंकमेकींत गुंतल्या ह्वोत्या आणि पुन्हा विलग होऊन पायथ्याळा
उतरल्या होत्या. चढतांना ळागळेला श्बास थांबविण्यासाठी मी एका
ठिकाणीं उभा राहिला, इतक्यांत सोंदर्यदर्शनाताठी भकेळेली माझी दृष्टि दूर-
वरच्या क्षितिजरेषेपयेत मिरमिरून आढी, पण ' माकड गेलें लुटी अन्
आणल्या दोन मुठी ' इतकीतुद्धां तिळा प्रात्ति झाढी नाही. सगळें रानच
४ तीर्थरूप महाराष्ट्र
नव्हे : तर माझ्या डाव्या-उजव्या हातांचे डांगरसुद्धां ' संन्यासी ) च होते.
त्यांच्या अंगावर “ मी ' म्हणून वाढला ह्ोता तो त्रिधारी निवडुंग मात्र. जणु
मणि-मललांचे इतस्ततः मरून पडलेळे दानवसेनिकच त्या रूपाने जन्माला
आले होते. आमच्या वाटेलासुद्धां दोन्ही बाजूंनी त्याचाच खडी ताजीम.
मात्र अशाही स्थितींत निसर्गाच्या योजकतेची करामत दिसली. कांही निव-
डुंगांवर शेतावरीची नाजूक हिरवीचार वेळ चढून विस्तारली होती. एखाद्या
कुलवघूने पतीचे दुर्गुण झांकून टाकावे तसे तिन त्यांचे कांटे झांकळे होते.
कांहींच्या अंगभर दुसऱ्या एका वेढीची चार पाकळ्यांची शुभ्र फुळें बहरली
होती. आणि तीं नुसतींच सुंदर नाहींत तर सुगंधीही आहेत, हं वारा
आमच्या नाकाशी येऊन हळूच सांगत होता. या लतावधुंनी असले हे
कांटेरी वर कसे पर्संत केले हेंच नवल होते. पण त्या तरी करतील काय?
त्या मालिनीर्तारावरील कण्वाश्रमापुढच्या भाग्यवंत वेळी थोड्याच होत्या !
सगळेच * नि्वीरमुवीतलम् ' तिथें जो कोणी मिळेल तो सही !
डोंगराच्या कटिप्रदेशापर्यंत चढल्यावर भंडार उधघळलेढी एक खडकाळ
जागा दिसली. तं ' घोडे उड्डाण ' होतं. घोडे उड्डाण या शाब्दामा्गे इति-
हासाची किनार अतळेळी एक दंतकथा आहे. सुंष मुक्कामी खैरे पाटील यांच्या
वंशांत भाव्या नांवाचा एक पुरुष उपजला. तो खंडोबाचा एकांतभक्त होता.
दर रविवारी गांव।हून निघून करा नदी ओलांडून तो जेजुरीस येई. कडेपठार
चढून खंडोबाची पूजाअची करी, सूर्य-चंद्रांच्या विश्वप्रदक्षिणेप्रमाणें त्याचा
हा नेम केक वर्षे अबाधित चालला होता. तारुण्य ओसरळे, पोक्तपण संपर्क
आणि जरेनें बळ शोषून शरीर गलित-पलित केलें, तरीही त्यानें आपला नेम
सोडला नाह्दी. अखेर एक दिवत लटपटलत्या पायांनी आणि धापावत्या
काळजार्ने तो कसाबस्ता इथवर चढला. ' देवा खंडेराया ! किती उंचावर
राहिला आहिस रे! थकला मी आतां... ' असें म्हणतां म्हणतां त्याला मूच्छा
आली. त्याच क्षणी खंडोबा अश्वारूढ होऊन इथं आला आणि त्यान त्या
जराजजर भक्ताची मूर्च्छा सांवरली. ' यापुढ कडेपठार चढण्याचे कष्ट तू घेऊं
नको. मी तुझ्यासाठी गांवाजवळच्या टेकडीवर येऊन राद्दीन, ! त्याने त्या
वृद्धाला आश्वासिले. तो आनंदनिर्भर होऊन टकामकां पहात राहिला. आणि
देवाच्या इशाऱ्यासरशी घोड्यानें एकदम उड्डाण मारळें, तीच जागा ही
मछ़ारि मा्तण्ड पद
भाव्या जवळच्या टेकडीवर जातो तो त्याला तिथे धनुष्याकृति एक लिंग
दिसळे. देवाने आपलं आश्वासन पुरें केलं होते. भाव्याचा हर्ष त्याच्या
अस्थिपंजरांत मावेना. त्यार्ने गांवांतल्या महाजनांना बोलावून आणून तो
साक्षात्कार दाखवला. ते लोकही म्हणाले, ' बरे झाले. तुझ्यामुळे आमचेही
आतां कडेपठार चढण्याचे श्रम वांचळे. ? आणि त्या दिवसापासून खालच्या
टेकडीचे भाग्य उजळले.
देव जरी खालच्या टेकडीवर आला असला तरी तो वृद्धां-बालांसार्ठी ;
आमच्यासाठी नव्ह. तेव्हां आम्हांला वर जाणेंच भाग होत. आम्हांला वाटले
होतें की, गोळ टेकडी गांठली कॉ लगेच कडेपठार लागेल. पण तो केवळ
: शाखाचन्द्रन्याय ) द्वोता. तिथून मधल्या एका डोंगराच्या माथ्यावरून
बरेंच पुढे गेल्यावर मग कडेपठार भेटणार होतं.
६ बारा कोतांवर भाषा बदलते ? म्हणतात. पण नितर्गरचना बदलायला
डोंगरमाथ्याची लद्वानशी रेषासुद्धां पुरेशी होते. एका बाजूला सगळा निवडुंग
तर दुसऱ्या बाजूला सगळय़ा पिवळ्या फुलवंती कण्हेरी ह्वा देखावा निश्चित
आश्चर्यजनक होता. तो सगळा उतार जणुं सोन्याचा झालेला मी पद्दात द्वोतों.
जशा कांही नववधू पिवळी ' अष्टपुत्री' पांघरून बोहल्यावर चढण्यासाठी
सजून राहिल्या आहेत. इतर सगळी झाडझुडष खुरटी ; मग यांच्याच मुळांत
हा जीवनरस कोणीं आणुन ओतला! हींच तेवढी फुळ॑ धमक आणि रस-
रशीत कां? कां म्हृणजे ? आमच्यासारख्या अनेक यात्रिकांच्या स्नेहाळ नर्जेर-
तळा अमृतद्रव ती प्राशीत नव्हतीं का? कोतुकांचे कोवळे बोळ ऐकत
नव्हती का! खंडोबाला पिवळा रंग प्रिय कां असावा हे खालपासून वर येई-
पर्येत मी मनांत विवेचीत होतो. त्याचं उत्तर मळा इथें मिळाळं. पण लगेच
दुसरा प्रश्न उमा राहिळा. इथला आसमंत पिवळा म्हणून देवाने त्याच
रंगाची आवडी घरली का देवाच्या इच्छेनुसार निसर्गानेच आपला कार्या-
पालट केला ?
आमच्याऐवर्जी ' बीगळ ? जह्ाजावरून सृष्टिनिरीक्षणातताठी सतत पांच
वर्ष सफर करणाऱ्या डार्विनला हीं सुवर्णफुळे दिसली असती तर तो त्यांच्या
पाकळ्यांना अळुमाळ स्पर्ष करून त्यांच्याशी घटकाभर त्यांच्याच भाषत
बोलत राहिळा असता आणि बोलतां बोलतां त्याची समाधि लागळी असती.
द तीर्थरूप महाराष्ट
आम्ही फक्त त्यांतली कांही फुळे देवाला वाहण्यासाठी तोडून घेतलीं आणि
पठारावर पाय ठेवला. उजव्या हाताला छोटेसे देऊळ दिसलं. ते रामाचं
आहे ह पुढं उभ्या असलेल्या हनुमंताने सांगितलें. तिथून मुख्य देवळाचा
पाइ्वभाग दिसू लागला. कुडचाफ्यांच्या झाडांखाळून आम्ही प्रवेशद्वारांत
ठाकला. आम्हांला पहातांच कळकट कपड्यांतळा एक म्हातारा गुरव लग-
बगीन देवळांत घुसून स्थानापन्न झाला. मध्यान्हाच्या ऐन उन्हांतून आम्ही
बंदिस्त जागत गेला होतों, त्यामुळे आसनमांडी घाळून बसलेली, शिंदेशाही
पगडी घातलेली खंडेरायाची वरत्रवेष्टित पाषाणमृतत दिसायला कांद्दी क्षण
जावे लागले, आम्ही भंडार उधळला, खोबऱ्याचा तुकडा दक्षिणेसह पुढें
ठेवला, फुळे वाहिली आणि अंजळिसंपुट जोडून खालीं बसलो. आमच्या-
समोर दोन लहानशी स्वयंभू लिंगे एकमेकांना चिकटून होती. आणि तिसरं
एक हातभर अंतरावर होत. गुरव म्हणाला, ' दइुंकर-पार्वती आणि ती पली-
कडची गंगा. ) मी म्हटळे, “ शंकराला गंगा इतकी नावडती कधीपासून
झाली ! मागच्या बाजूस सुंदर संगमरवरी गणपति बसला आहे. त्याने तर
: विगड घातला नन्तेल?”
बाहेर येऊन देवळाला प्रदाक्षणा घातली. प्राकारांत तीनचार
बिऱ्हाडें होती, त्यांतल्या एकांतून गायीचे दही विकत घेतल आणि
दुपार्ची वेळ साजरी करण्यासाठीं जवळच्या तळ्याकडे निघालो.
: एरंडो5पि द्रुमायते ' अशा एका दरिद्री झाडाखालच्या नाममात्र सावलीला
बसून आमच्या सोबत्याने शिदोरी सोडली. सावळी नसली तर निदान
मनासारखा वारा तरी अतावा ! आम्ही कर्मींत कमी चारशे फूट उंचीच्या
पठारावर होतो. इथें तर वाऱ्याची हमामा हुंबरी चाळू अस्तायळा हवी
होती. पण तो कुठल्या वेळींना नाचवीत, कुठल्या कमलवनांना लुबा.
डीत, कुठल्या भातखाचरातल्या पिवळ्या लोंब्यांना डोळवीत आणि
कुठल्या जलप्रवाह्मवर तरंगमाळा उठवीत कोणत्या प्रदेशांत हिंडत होता
देव जाणे ! उन्हाच्या चटक्याला वाऱ्याची मात्रा चांगळी लागू पडते म्हणून
तर आम्ही त्याची चाहूल घेत होतो.
पण तापशामक असे दुसरं औषध जं पाणी ते मात्र त्या तळ्यांत भरपूर
होतें आणि कमालीचे गार होतें, त्याच्यावर दाट थर सांचळा होता; पण
मलारे मातंण्ड ७
तें होवाळ नव्हतें. शेवाळ जाळीदार असतें, एकसंध अततें ; पण हृ निव्वळ
सुटे कण होते. सारवलेल्या काळ्याभोर अंगणांत जगुं वरयाच वाळत घातल्या
आहेत. तोच रंग, तोच आकार. ह्वाताने तें द्रव्य दूर लोटून तांब्या भरून
घेतला तों त्यानें लगेच पुनश्च साखा घ्ताख केली. तळें म्हणजे अगदींच डबके
नव्हे आणि अवघ्या दहापंधरा माणतांचा वापर. बाजूला बघून घागर
घासणाऱ्या बाईला मीं म्हटलें,
“ तुम्हांला पाण्याची चंगळ द्वोत अंत्तेळ नाही ! ?”
त्यावर ती बाई मुद्रेवर विपाद दाखवून म्हणाली,
6 न्हाय व ! उन्हाळ्यांत पार आटून जातंया समदं तळं. ”
4“ अन् मग | १»
“ मंग काय? खाळून आणायचं पाणी, ”
खालून म्हणजे दोन मेलांवरच्या जेजुरी गांवांतून आणि जिथून .मोकळ्य़ा
अंगानं चढतांना आम्हांला घाप लागली तो डोंगर उरापोटावर घेऊन. मीं
म्हटळे, इतके जिवाचे हाळताप सोसून हद्दी माणसे इथे राहतात तरी कशाला!
काय यांचें इथं गांठोडे पुरलं आहे? बोठून चाळून तोंड वेंगाडून जीव
जगवायचा. मग तो इथेच कां! पण वास्तूचे प्रेव मोठें जबरदस्त असतें.
जिवावर किंवा अत्रूवर बेतली तरच माणूस तिचा मोद तोडतो.
उदरस्थ वैश्वानराला हविर्भाग देऊन आम्ही गडावर जाण्यापाठी म्हणजे
खालचे देवस्थान पाहण्यासाठी कडेपठारावरून परत फिरला. त्स पाहिलें
तर आमचे आधीं कडेपठार चढणे हे यात्रानियमाला घरून नव्हतं. पण
आम्ही तसे नेमाधर्माचे यात्रिक नव्हतोच मुळीं. विधिपूर्वक यात्रा करायची
तर इथं तीन दिवस क्षेत्रवास करण्याच्या तयारीनच आम्हांला यायला
हवें होतं. कडेपठाराचे दर्शन ह्या त्यांतला शेवटच्या दिवसाचा विधि होता.
परत येतांना दोन डोंगराच्या मधल्या खोल, चिंचोळ्या दरीकडे लक्ष जाणे
अपरिह्मार्य होते. तिथे वृक्षांच्या पुंजांत जनाबाईचे देऊळ चित्रपटांतल्या
६ क्रेन शॉटने ' घेतलेल्या हृद्यासारखें दिसत होत. फाल्गुन अमावास्येला
गांवांतळां सगळी मंडळी इथें येतात आणि लहान लहान ' गल्या ! (वाफे)
८ तीथेरूप महाराष्ट
खणून त्यांत वेगवेगळी धान्ये पेरतात. ती सबंध रात्र, बोजांचा जल-मातीशी
संयोग होतो. पाडव्याच्या दिवर्शी गांवकऱ्यासह पाटील तिथें येतो आणि
वाफा उकरतो. जे बीज फुगीर आणि अंकुर फोडायला उत्सुक असे दिसेल
तें पीक त्या साला चांगळं येणार असतें प्रसिद्ध करता. या प्रकाराला “ गुढ्या
काढण ? म्हणतात.
गिरिशिखरांच्या उतरणीवरून आम्ही खालीं खाली येत होतो. वाटंत उजव्या
बाजूला एका दरडीच्या कडेवर दोन शिळा एकावर एक चढून बसल्या
होत्या. जरा तोळ झुकला तरी खालीं पडून दुभंग होतील अश्या जागी त्या
होत्या, छबन तिकडे बोट दाखवून म्हणाला, इं ' सासू-सुनेचं भांडण.
खालची वाटोळी, घरटाच्या तळीसारखी दिसत ती सासू आणि वरची
गबदुलळ, ओबडधोबड, चोपटीच्या वजनाची दिसते ती सून. म्हणजे सून
इथे सासूच्या उरावर बसली आहे. सासूची कणीक तिंबायळा तिला निराळें
लाटणे घेण्याची गरज नार्द्दी. मीं म्हटळे, ' कांही दिवस सासूचे, तर कांही
दिवस सुनेचे ' असं म्हणतात ; पण या सासूचे ' दिवत ' आतां कधीं येतील
ही आज्ञा करायला नको.
पण त्यांच्याकडे ' आश्चर्यवत् ? पाहतांना मळा एक निराळीच कल्पना
सुचली, या सास्वा-सुना नव्हेतच मुळीं. या दोघी खंडोबाच्या बायका--
म्हाळसा आणि बाणाई--असल्या पाहिजेत. देवाच्या अर्धांगी झाल्या म्हणून
त्यांच्यांतळा * सवत इताळा ? गेला नव्हता. दोघीही एकमेकाची वर्मेशर्म
काढीत आणि एकमेकींच्या कांठ्याला खिळत. त्यांच्या असंस्कृत ग्राम्य
भांडणावरचें एक लोकगीत नुकतेंच एका वाघ्यानें मळा ऐकविले होते.
म्हाळसा बाणाईला बजावीत होती--
“ आईक मी सांगतं तुजला
चित दे माझ्या बोलाला
कांग तूं भुटलिस चेवाला !
जा तूं आपल्या देशाला
झांकल्या पाढीनं जाई म्हणती घे तूं ऐकून
एक्या घडीर्मांध तांड बाणाई ! टाकिन उतरून
मलछ़ारि मातण्ड ९
पण बाणाई तिच्याहून तिखट. जणुं लवंगी मिरची होती. तिच्याही तोंडा-
वर लगेच लाही फुटली. तिनें म्हाळसेचचीचच नव्हे, तर तिच्याबरोबर देवाचीही
उद्धरगत केळी,
५ टूकतं फेकुनदयानी बाणाईला राग आला फार
रतिमातर तुमच्या घरी न्हाई इच्यार
तूं वाण्याची हायेस म्हूण करदिल पडिभार
आम्ही धनगरणी जश्या नागिणा मोठ्या शिरजोर
तुज्या दयेवानं आमच्या घरी वळिली त्विहारं
ळड्या, लोकर, कन्या मिसळी तुझाच भतार ”
भोळ्या शंभूने नवा अवतार घेतला, केलास सोडून जेजुरीचे पठार
पत्करले, तरीद्दी दोन बायकांचा भ्रतार होण्याचे भोग कांद्दी त्याच्या वांट्याचे
टळले नाहीत. केलासावर गंगा-गोरी भांडत होत्या तर इथं या दोघी. पण
गंगा-गोरींच्या कलद्दांत आयता होती. म्यादशीलताही होती. पण इथें हृ
सगळें ' गांवरान ) काम. गंगा-गोरी या एकाच कुळांतल्या, एकाच बापाच्या
ळेकी; तर या दोघी मित्न कुळांतल्या आणि मिन्न संस्कृतींत वाढलेल्या.
म्हाळसा वणिजकन्या, तर बाणाई धनगराची कन्या,
4 २/-:'-<€///4//"/"* /"/"// “''“4/4>/*":/:>">/7"/:>2 -““'/". “> >.
म्हाळसेनें नेवाशाला तीमदोट वाण्याच्या घरी जन्म घेतला होता. त्याच्या
घरीं लक्ष्मी राबत होती. या एकुलत्या मुलीला त्याने फुलांत ठेवून वाढवले
होतें. तिची बाल्यदश्ा माधारून ती ' पणां' त आढी होती. तिच्या गोऱ्या
रंगावर गव्हाळी कांते खुलली होती. रेखीव अवयवांना गोलाई प्रात झाली
होती. तीमशेट तिच्या लगनाची विवंचना करूं लागला होता. लावण्यद्रापांतलें
हें माणिक कोणाच्या हाती निरवूं, असा त्याला प्रश्न पडला होता. एवढ्यांत
मातड भैरव दैवयोगाने तिच्या दृष्टीस पडला द्वोता. त्याच्या देवी तेजाने तिचे
डोळे दिपळे होते. त्या पुरुषार्थी नवयुवकाचा तिळा छंद लागला होता. मातेड
भैरवाचीही तीच अवस्था होती. ती सुंदरतेची मूस आपल्या अर्धोगी विराजित
करण्यासाठी पडेळ ते साइस करण्याची त्याची तयारी झाळी होती.
पण सरळ मार्गानेंच त्याचा कार्यमागर साघला, त्याच्या मागणीला
तीमशेटीरने मस्तक नमवून रुकार दिला. पाली मुक्तामी वैभवाच्या झगम-
४ ४ २.४ ४-४...” "२ २/५ “% 20२ > 2. ».. -<..”२ “९. २ होट. 0 ७ ७ <
१० तीथेरूप महाराष्ट
२.४१” ४-/४/१५/
गाटांत त्य़ा दोघांचे शुममंगळ झाळं. मा्तेड नीलकमलासारखा सांवळा
आणि म्हाळतपता गोरोचनासारखी आरक्त गोर, मेघ आणि विद्युत् यांच्या-
सारवा तो वरवघूसमागम झाला. छोक त्याळा ' म्हाळसाकांत ? म्हणून
संबोधू लागले. त्यालाही ती उपाधे भूषणास्पद वाटली
पण त्याचा संस्तार असा एकसुरी, एकमार्गी व्हायचा असता तर बाणाई
कशाला त्याच्या मागीत आढी असती ! बोलून चाळून घनगराची पोर.
काय़ पाहिळे त्यानें तिच्यांत ? काय म्हणजे! तिच्या अंगांतली तरारत्या
कोंभाची लवलव. रंगाने कन्हय्याची बहीण. काळ्या शिवारांत नि काळ्या
मंढरांत वाढलेली. जणुं नाचती, सळसळती कृष्णकमळीची वेल. जशी चपळ
तशीच अवखळ. जण फॅसाळत जाणारी यमुना नदी. रानांतलं वारपाणी
पिऊन तिचे सगळे अवयव कसे सकस आणि घोटीव झालेले. खंडोबाला ती
आपल्पा इच्छाशक्तीची प्रतिमा वाटली. तो तिच्यावर एकदम भाळला.
तिच्यासाठी त्याला आपलें मोठेपण बाजूळा ठेवून धनगर व्हावे छागळे. तो
वेष, ती भाषा, ती वात्ते. त्याने तिची मंढरे वळली. तिचे गहिरे कटाक्ष झेलले.
तिचे रांगडे बोल फुलांचे झेळे मानले. [तेला रमवून, हदृंतवून, खेळवून तो
तिच्या अंतरांत शिरला आणि मग एके दिवशी धनगरानं तिचा द्यात त्याच्या
हाती दिला. बाणाई घरभरणीसाठीं त्याच्यापुढे घोड्यावर स्वार झाली.
म्हाळसा आणि बाणाई. एका म्यानांतल्या दोन तलवारी. त्यांचा खण-
खणाट कधी थांबेना आणि खंडोबाला ती कटकट सोसवेना, त्या दोघीत
कर्धांच स्नेहमाव निर्माण होणार नाहीं द्दी जेव्हां त्याला खात्री पटली तेव्हां
त्यानं दोघांना एकदम अलग केले, म्हाळपतेळा आपल्यापाशी ठेवळी आणि
बाणाईला गडाच्या पायथ्याशी नर्वे घर बांधून दिळें. बाणाईंचा भाऊ हेगडी
याला त्यानें आपला प्रधान नेमळ होतं, त्यालाच बाणाईच पाठीराखेपण
सांगण्यांत आले.
आणखी थोडे खालीं उतरून आम्ही गडाच्या पातळीवर आलो. तिथून
डाव्या-उजव्या हाताळा दोन तळीं दिसली. डाव्या दाताचे आपल्या पुऱ्या
वेमवांत लहरत होतें तर उजव्या हाताचे ' ते हि नो दिवसा गताः? असा
उदास, खिन्न भाव दाखवीत होर्ते. पेशव्यांनीं बांधळेल्या सदतीस एकर क्षेत्र-
मछारि मातण्ड ११
० ओन ्ज्होळ् त्री रीड 0604000000000000000040000.0000000000000000040000.40 00008 क क कड क क क क्क कमक काम्य ताचा >>>
फळाच्या अष्टकोनी अशा त्य़ा विस्तीर्ण सरोवरांत, डोंगरांतून वाहून आलेले
मातीचे थरच्या थर सांचले होते. खालच्या भागाला मधल्याच तुकड्यांत जे
थोडते उथळ पाणी द्दोते, त्यावर आकाशांत मधेच उपटलेल्या. एका भटक्या
ढगांची सावली पडली होती. त्यामुळे लमणांच्या तांड्यांत सांपडढेल्या परित्पक्ता
दमपयंतीची दीनता त्या जलदेवीच्या मुखावर काळवंडली शोती. त॑ मला
सांगत होतं, “ माझ्या वांट्याला * चक्रनेमिक्रम ? नाहीं. अशीच डांगराची
खर वाहून वाहून येईल. थरावर थर चढतील. एक दिवस सगळे सपाट
होईल. थोडाबहुत शिलछूक उरेल तो खालचा दगडी बांध. आणि मग
शंतकानंतरचे इतिहाससंशोधक म्हणतीळ की, कोण्या घनवंताच्या अष्टकोनी
वाड्याचा हा चोथरा असावा.”
जुनी जेजुरी याच तलावाच्या परिसरांत बसली होती आणि गडावरच्या
देवळाचे मुख्य द्वार याच बाजून हात. पण काय कारण घडले न कळे;
तिकडची वस्ती उठून किल्याच्या पश्चिम मागाला आली आणि मग तिढा
५ जीवन ? देण्यासाठीं खंडोबा हे कुलदेवत असलेल्या इंदूरच्या अधिपरतीनी
म्हणजे तुकोजीराव होळकरांनी तिकडे नवे तळें खोदले. पूर्व बाजूचे महाद्वार
बुजवढ॑ गेळं आणि उत्तरद्वार हे मग मद्दाद्वार ठरले.
बुजवलेल्या द्वाराच्या बाजूनं उत्तरेकडे जात अप्ततांना तिथल्या भिंतीला
दोन धसघशीत मधाची पोळीं पाहिली. त्या प्रत्येकांतून दोन दोन तांब्ये मध
सहज पिळून घेतां आला असता. ते दोन्ही ओथंब नुसते “ रवरव ? हालत
होते. तिथे माशांवर माझ्या चढल्या होत्या. तळच्या थराला तेवढा मधाचा
स्पर्श होत अतावा. बाकीच्या नुसत्या एकमेकींवर गर्दी करीत होत्या. ना
कलह ना इर्षा. कोणी त्यांच्या संचित धनाला ह्वात-बोट लावायला येऊ दे;
की संघटित द्याला एका पायावर तयार. तियंग्योनीला संघटनेचे माहात्म्य
प्रातपादावे लागत नाही. त॑ सगळे माणसासाठींच करावे लागते. आणि तरीही
माणूस म्हणतो, ' मी शाद्वाणा!?
मधमाद्यांवरून भुंग्यांची गोष्ट आठवली. भुंगे कोरडे काष्ठ फोडतात. तुळया
बहाळे पोखरतात, संस्कृत कवि त्याच्या मधुपानाचें आणि गुंजारवारचं कोतुक
करू देत; पण महाविध्वंसक प्राणी आहे' तो. पण जेजुरीचे देवस्थान
१२ तीथरूप महाराष्ट
>/-/><>//-/-/4/-</>//“<-““</““4“-///“-“/£//*८"4श “*“१४४<--“-““>.“-“““-:“““<““““€“-€><>.“_<.>“<-<><:<-<>:<-:““€-<--<“> >
यवनांच्या भंजक आक्रमणापासून वांचवून त्यानें आजवरच्या सर्व पापांचे
क्षालन केलं आहे. जेजुरीच्या उ च्तेरेस पंधरा मेलांवर असलेले भुलेश्वर हे शिवस्थान
मोडून बेहोष यवनांचा तांडा जेजुरीवर येऊन आदळला, पण तटावर त्यांची
पहिली पहार बसली मात्र ; प्रवेशद्वाराजवळच्याच एका छिद्रांतून भ॒ग्यांचें
कारंजं वर उसळले, “ सुंउ5 'चू55 करीत वर येणारा भुंगा विध्वंसकांच्या
अंगावर आदळून कूंस मारायचा. त्यांच्या तोंडावर, गळ्यावर, हातावर
सगळीकडे ढब्यू पैशाएवढ्या गांधी उठल्या. मारायला ह्वात उगारावा तो
क्षणांत करवंदांच्या घडासारखा व्हावा. विलक्षण आग, असह्य खाज. थोबाडं
सुजून दुप्पट झालीं. ते परचक्र गडगडत गडाखाली आलें. पंचक्रोशींतून तोंड
काळें करीपर्येत त्या भुंग्यांनीं त्यांचा पाठलाग सोडला नाहीं.
हे वतमान ऐकून औरंगजेब चांगलाच चपापला. त्याला कळलें की,
हिंदूंचे सगळेच देव कांद्दी ' मोन्यरूप! घेऊन बसले नाहींत. तो मग खंडे-
रायाच्या दर्शनाला आला. धूर्तपणानें नव्हे, तर नम्नरपणानें. त्यानें सव्वा-
लाखाचे एक अनर्ध्य रत्न देवाला अर्पण केलें. भुंग्यांच्या प्रकरणांतून तें पुढे
आले होतें आणि त्याचा आकारह्दी तसाच द्दोत!. म्हणून सुवर्णकांदणांत
बत्तवलेल्या त्या रत्नाला लोक ' भुंगाच म्हणत.
आम्ही मंदिराच्या प्राकारांत पाय ठेवला तेव्हा घड्याळाने नुकतेच दुपारचे
दोन ठोके दिले होते. काळ्य़ा फरशावर सवत्र ऊन्द्द टळटळत होतं. पितळी
कांसवावर देवासन्मुख उभे राहून आम्ही ' येळकोट मल्हार ? गरजला आणि
आंत शिरला. पाहल्याच दालनांत दोन बाजूंना दोन दगडी घोडे दिसले.
लहानसहान नव्हेत, तर भठे भक्कम, उजव्या हाताच्या घोड्यावर खंडेराय
आरूढ झाला होता. डाव्या हातचा मात्र पाठीवर जीन मिरवीत मोकळाच
होता. कोण बरें त्याच्यावर स्वार होईल! बहुधा द्देगडी प्रधान असेळ. पण
छे! प्रधानाने तर देवाच्या आधी सज्ज असायला हवे. मग कोण! म्हाळसा
स्वार होणार आहे ! दाक्य आहे. तिची तयारी कुठली झटपट व्हायळा. बाय-
कांचा चेंगटपणा द्वा कांही आजच्या युगांतला नव्हे.
गर्भागारांत सगळी रचना वरच्यासारवीच दिसली. तशींच टिंग. त्याच
दोघी सवती. आणि तोच म्हाळताकांताचा बेठा पुतळा. इथे आगळें होतें तें
मलहारि मातंण्ड १३
वेभव. विष होती. ती सार्वत्रिक भव्यता. या श्रीमंतीमुळेंच देवाला स्वतः-
भावती कोट उभारून घ्यावा लागळा होता. दरवाजे भक्कम करावे लागले
होते. इथली ही बडेजावी पेशवे आणि इतर कांही दोळतवाळे भक्त यांनी
निर्माण केळेळी आहे. नारायणरावाचा खून झाल्यानंतर त्याच्या दुभागी
पत्नीला बारमाईनी पुरंदर गडावर नेऊन ठेवळ॑ होते. तिच्यावर आभाळ
कोसळळे त्या वेळी तिळा दिवस गेलेले होते. तिच्या उदरीं पुत्र जन्मण्यावरच
चारमाईच्या कारस्थानाचं यश अवलंबून होते; पण ती गोष्ट सर्वस्वी देवा-
धीन होती. अश्या वेळींच माणते मग देवाळा आळवतात. नाना फडणित्तांनी
त्या वेळी खंडोबाला एक भरभक्कम नवस केला. ' गंगाबाईला| मुलगा होऊं दे.
एंक लक्ष रुपये तुड्या कामी ढावीन. ' आणि खंडेराय त्या नवसाला पावला.
गंगाबाईचा पुत्र सवाई माधवराव जेव्हां गादीवर बसला तेव्हां नानांनी
तो नवस दिरंगाई न करतां फेडून टाकला. पंचवीस हजार रुपये खर्चून त्यांनी
चांदीच्या देवमूर्ति बनवल्या. दगडी मंडपी रुप्यानें मढवळी, उरलेल्या रकमेत
सोन्याचे मुखवटे, कवच, छत्री, कलगी-तुरा, इत्यादि राजोपचारांची सामग्री
केली आणि एवढें करून ते वचनमुक्त झाले.
पण याच श्रीमंतीमुळे बंडखोर, डाकू यांना काळ्या रात्री भाळे-कुऱ्ददाडी
घेऊन देवाच्या मेटीस येण्याची वासना झाली. कर आहे तिर्थे डर भताय-
चीच. सुमार शंभर वषोपूर्वी राघू भांगऱ्या नांवाच्या एका बलदंड कोळ्यारने
इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. अद्दमदनगरच्या एका जमादाराचा हा तरणाबांड
पोरग होता. त्याने आपल्याभोवती निघड्या छातीचे बरेच लोक जमा केले
होते. पुर्ण जिल्ह्याच्या वायव्येला परवतश्रेणीचा आश्रय घेऊन त्यांनीं उपद्रव
सुरू केला होता. शक्यतो प्राणह्वानि न करतां ढूटमार करायची अशी त्यार्ने
आपल्या टोळीवाल्यांना ' शास्त्रमर्यादा ' घाढून दिली होती. त्याचा डावा
डोळा श्रीमंतांकडे आणि उजवा गरिबांकडे असे. तो जणु मद्दाराष्ट्राचा रांबेन-
हूड होता. जणुं जर्मनींतला गॉट्झ व्हान होता. गरिबांचा दीनदयाळ आणि
घनवंतांचा कदेनकाळ. यामुळें दीनदुबळे त्याला दुवा देत. कूणकोचे धर
खाऊन दार तोडी लावणाऱ्या एखाद्या शायलॉकचे त्यानें नाककान कापळे
कीं त्यांना द्वायर्से वाटे, त्याला खंडोबाचे वरदान आहे अशी म्रामजनांची
समजूत होती. त्यांच्या पुंडाईच्या रोमहषंक कथा ते स्तिमित होऊन ऐकत.
१४ तीथरूप महाराष्ठ
याचच राघू भांगऱ्याने एका रात्री जेजुरीच्या देवस्थानावर धाड घातली
चौदा तोळे सोन्याचा खंडोबा नेहृर्मी गळ्यांत वागविणारा ह्या देवाचा भक्त
देवावरच उलटला. भोळ्या सांबाच्या जीवनांतला हा दुसरा भस्मासुर होता.
त्याने चांदीच्या मार्त उचलल्या. खंडोबाबरोबरच म्हाळसेलाहि हाळवली,
औरंगजेबाची देणगी तो ' भुंगा ? हि त्याने घोंगडीच्या घर्डात कोंबला.
चरीचशी इतर चीजवस्तुह्ि हातासली. ना प्रतिकार; ना विरांध. अंधारांतून
ते काळपुरुष आले आणि पुनश्च अंधारांत गडप झाळे. सकाळीं लोक येऊन
पाहतात तो देऊळ धुतलेळें. देव आपला पुन्हा ' उदास जोगी ! !
पण त्या लटारूंना तें जडजोखीम भारी झालें. त्यांनी ते॑सावकादापर्णे
नेण्यासाठी ठायी ठायी पुरून ठेवले. देवमूती नाहि धारित्रीच्या पोटांत ठाव
'च्यावा लागला. म्हाळसेची श्रीमूत॑बेलसरच्या रानांत पुरून ठेवलेली पुढें
बारा वषानी एका शेतकऱ्याला जमीन नांगरतांना सांपडली. त्यानें जेजुरीला
खबर दिली. आणि मग जेजुरीकरांनी वाजत गाजत आणून पुनश्च तिची
देवळांत प्रतिष्ठा केळी. ' भुंगा ) मात्र एकदां उडाला तो उडालाच.
मंदिरांतून बाहेर येतांना उजव्या हाताच्या देवडीवर खंडोबाचा ' खंडा ?
म्हणजे खड्ग एका भिंतीला टेकून ठेवलेलं पाहिळें. तें चार फूट लांब आणि
चार इंच रुंद आहे. पोषाखी माणूस त्याला हात लावण्याच्या फंदांत पडला तर
न्हा एकदां सीतासयंवरप्रसंगींचें ' रावणाख्यान ' ढोकाना दिसण्याचा
संभव. एक हात तर् अकिंचित्करच आहे. पण दोन्ही हातांचे बळ कामी
लावलें तरी---
“ (वेसां करांनी धनु ते न तोलले! ”
अशी अवस्था होईल. हृंच खडूग मल देत्याशीं लढतांना खंडोबाच्या हातांत
तळपलं होतें असें सांगतात. आणि तो मलू देत्य तरी सामान्य होता का?
छे |! भूलोकांचा कृतांतच तो !
त्याचा जो दगडी पुतळा देवळासमोर एका भिंतीला उभा करून ठेवला
अहि, तोच मुळीं नऊ फूट उंच आहे. त्याच्यावर तांबड्या रंगाचा हात
फिरवलेळा असल्यामुळें नुकताच तो कुठल्या तरी मरणमारणाच्या झ्ुंजावरून
आल्यासारखा वाटतो. खंडरायाचे आणि त्याचें रण माजले ते तरी किती
मलछ़ारि मातण्ड १५
रोद्र-मीषण ! प्रथम आपला आघाडीवरचा सेनासागर त्यानें खंडोबावर
लोटून दिला. खंडोबाने ' अगस्ती ' होऊन त्याचे एकच आचमन घेतल्यावर
मणिदेत्य, शस्त्रास्र॑ आणि शांबरी माया याच्यानिशी त्याला सामोरा झाला,
खंडोबा आणि मणि-मछ
त्यानें आपल्यापरी शर्थ केली. पण त्यालाही वीरास्येवर निजणे भाग
झार्ळे, मणि-मल् दोघे बंधु म्हृणजे “ दो देही एक प्राण. ? मणीच्या वधात्ते
मल्लांच्या हृदयांत क्रोघासि पेटला. त्याने उरलासुरला दळभार एकत्र करून
खंडोबाच्या सैन्यावर धाड घातली. खंडोबानेंहि निकराचा प्रसंग जाणून
आपले सैन्य व्यहुबद्ध केळे. उभय दळांत भेणे त्रह्मटल्या. दुख, काहळा,
सांदळ नादावले. वम चर्मे सरसावून राणे-राऊत घोड्यांवर वळंघले. वीरांच्या
विकट द्वांका उठूं लागल्या, ' सकळामुखी एक आरोळी ? कीं, ' मारा झोडा !
शस्त्राला शत्नाने आणि असला अस्त्राने प्रत्युत्तर मिळूं लागलं. शरवृष्टि,
चालकावृष्टि, अंगारवृष्टि, पाषाणवृष्टे, अशा अनेक वृष्टि झडल्या. मल़ाचे वीर
घडाधड कोसळू लागठे. खंडोबाच्या सेन्यांत रणोत्साहाचें वारे भरळें. मळ
१६ तीथरूप महाराष्ट्र
८४१ ८7 ४८2४८१८ ५ >्ट
*९ “४४५/४ “0७ ४७.४४ “४0% २४४ शीक. फ9 “09-0४ ४५४” ४” ७८ ४५४ ४५ -0 0४-४८ ४-४ ४४४४५४५0४0 ४५ “00९४ “४ २४८” ४८४ “हघ्श४४-५”--7०/४-०-/ ->“५-“
चिडला, क्षोमला. जसा पर्वकाळचा महासागर ! खंडोबाच्या वाराग्रणींचींद्दी
काळजं कांपर्ली.
५ झहणाते मनुष्य नव्हे हा राक्षस कौ काळ हा खवळला हो
कीं आमुची कराया, मूत प्रळयाग्रि राख, वळला हो! ”
मल आणि खंडेराय यांचं किती तरी वेळ समोरासमोर रणकांड झाले.
पण अखेर मल़ाच्या कळा हळूहळू क्षीण होऊं लागल्या. गिरिशेखरासारख्या
त्याच्या देहावर जागोजाग धाव बसले होते. त्यांतून अनावर रक्तस्राव
होऊन तो अखेर खंडोबाच्या पायांशी कोसळला,
पण मरणकाळीं त्याची बुद्धि पालटली. जन्मांतरीचे सुकृत पुढें उभं झाले.
त्याच्या हृदयांतळा वेरभाव शमून तिर्थे भक्तिमाव उदित झाला. त्याने
स्तोत्र करून काकुळतीने खंडोबाजळ वर मागितला! “ देवा ! ' माझे मार्थी
तुझा पाय ? कायमचा असूं दे ! तूं ' मलारि ? म्हृणून जगांत मिरव. तुझ्या
नामाशी मार्झे नाम निगडित राहूं दे. ” देवाने त्याला ' तथास्तु ) म्हटलं
आणि मग तो देत्यपुंगव “ शांत ? झाला,
दाके १३०३ मध्ये घीरपाळ वीरमलऴ यानें देवळाचा गाभारा बांधला.
खटाव येथील राघो बंबाजीने शके १५५७ त पुढची सदर आणि सर्भाव्तांचा
कोट बांधला. मुख्य मंदिरामागचें पंचालिंगाचें देऊळ विठ्ठल शिवदेव दाणी
सासवडकर यानें शके १६११ त उभारले. त्याच्या नजिकचे भंडारघर शके
१६७८ त श्रीगोंदेकर यांनीं निर्मडे. नादुरुस्त झाळेला कोट अहल्याबाईने
पुनश्च बांधला ; ते काम शके १६६४ ते ९९ पर्यंत चाललें होते.
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ह्या खंडोबाच्या मोठ्या वाषिक यात्रेचा दिवस. महा-
राष्ट्रांतल्या सर्व भागांतून, विशेषतः खानदेश्यांतून फार मोठा मेळावा त्या
दिवशी इथ जमतो. आदत्या दिवशी पंचमीस तेलवणाचा हंडा गडावरून
खाली चावडीत येतो. भक्तगण यथाशक्ति तेल त्यांत घालतात आणि मग
तो हंडा समारंभाने वर चढतो. खंडोबाचे भक्त सगळ्या जातीत आहेत.
रामोशी ढोकांचें तर ते एकमेव उपास्य देवत. रामोशापासून वचनपालन
इर्वे असेल तर त्याला खंडोबाचा मंडार उचलायला लावावा, रामोशी हे.
पूर्वीचे लिंगायत असें सांगतात. लिंगायत हवे शिवोपासक. पण जेव्हां त्यांच्यांत
महञारि मातंण्ड १७
मांतमच्छर खाणें सुरू झालें तेव्हांपासून त्यांनी शिवाचे हे दुसरें रूप उपास्य
केळे. वीर जातींचे ळोकाहि खंडोबालाच भजतात. आंधळ्या, अविवेकी
भक्तांची अखेर देहदंडर्नेत आणि देदददंडनेचा शेवट अधोरीपणांत झाला
नाही तरच नवल ! खंडोबाच्या उपासनेंत असलेच कांहीं प्रकार कित्येक वर्षे
रूढ दयोते. चंपाषष्टीच्या दिवशी या वीर ढोकांपैकीं कोणी तरी आपल्या मांडीत
स्वहस्ते सुरा खुपसून घेत आणि त्या उष्णोष्ण रक्ताचा टिळा देवाच्या कपाळी
लावीत, मग त्या रक्तरंजित वीरांची तशाच स्थितींत मिरवणूक निघे.
भाविक यात्रेकरूंना त्यांच्या या ' वीर ' तेबद्दल आदर वाटे, का करुणा वाटे,
तं आज समजायला साधन नाही; पण हे मात्र स्वतःला धन्य समजत.
असाच दुसरा अघोरीपणा “ बगाड ' घेण्याचा. कांही संकट पडलें तर
एखाद्या भक्ताने नवस्त बोळावा, ' मल्लारिदेवा ! माझ्यावरचें आरे दूर होऊं
दे. माझी मनकामना पुरू दे. मी चंपाषष्ठी जेजुरींला येऊन बगाड घेईन.
हृ बगाड घेणे म्हणजे काय, तर एका खांबाला गळ बांधायचा आणि तो
आपल्या पाठींत खोचून घेऊन लोंबकळायचें. दोन्ही प्रकारांत रक्ताच्या घारा
वाह्वायच्या. आचरायला जिवावरचें आणि पद्दायळा भयासुर. वर्षानुवर्ष
खंडोबाचे देवद्वार असें रक्ताने ढाळ होत होत. ' दगडाच्या देवा बगाड
नवस >, म्हणून तुकोबांनी त्या निदर्शनावर उपद्दासाचे कोरडे ओढले ; पण
कांहीं उपयोग झाला नाहीं. ते रुधिरापण बंद करण्यासाठी इंग्रज सरकारला
कायद्याचा बडगा उगारावा लागढा.
कायद्यानें बंद झाळेला असाच एक दुसरा प्रकार म्हणजे खंडोबाला मुरळ्या
वाहणे. माणत्ताची मति तरी किती विचित्र पहा. मूल व्हावे म्हणून देवाला
नवस करायचा आणि ' मुलगा झाल तर तुझा वाघ्या करीन आणि मुलगी झाली
तर तुला मुरळी वाहीन ? असतं बोलायर्चे, यांत स्वारस्य काय राहिळें ! वांझ-
पण फिट एवढाच त्यांत लाभ. जे पोर जन्मेल त्याच्या भवितव्याचा विचार
कोणीं करावा ! मुरळीनें देवाशी लस लावावयाचे आणि जन्मभर निस्संग,
निर्विकार राहून सेवात्रत चालवायचे. सोमवती, माघी अमावास्या किंवा
चेत्री पुनव यांपैर्का एखाद्या तिथीला हा छभसोइळा व्हायचा. मुलीला
हळदीने माखायचें, पिवळे वस्त नेसवापचे, मुंडावळ्या बांधायच्या आणि
ती. म....२-२
१८ तीर्थरूप महाराष्ट
देवापुढे उभं करायचे. मटजीने अंतरपाट घरून मंगळाष्टर्के म्हणायची, आत-
स्वजनांनी भंडार उधळायचा. नऊ कवड्यांची माळ तिच्या गळ्यांत घालायची
आणि भरटर्जॉने सव्वा रुपया दाक्षिणा धेऊन विवाहृविधि पुरा करायचा.
एकदां हें मुरळी पद प्राप्त झाळे कीं ती देवाच्या नांवावर मिक्षांदेहीला मोकळी.
वृषोत्सगांच्या वेळीं सोडलेली पाडीच जणुं. सोबतीला वाध्ये. त्यांचादह्दी धंदा
हाच. भंडार भरून पोटावर लांब सोडलेली व्याघ्रचर्मांची पिशवी इं त्यांचें
मिकेचं भांडवळ आणि इंच बोधाचिन्ह. वस्तुतः वाघ्याचा आणि व्याम्नाचा
कांद्दीही संबंध नाहवी. 'वग्गे' म्हणजे भक्त यया कानडी शब्दाचा तो अपभ्रंश आहे.
शब्दाचा उगम ठाऊक नसला कीं मग वडाची साल पिंपळाला लावल जाते
ती अशी.
अर्धा तास वर हिंडून आम्ही गड उतरूं लागला. सुबुद्ध काळ्या सोपा न-
मागीवरून उतरतांना आमच्या थकलेल्या पायांना सुख वाटत होतें. वृक्षांच्या
शीतल सावलीनं त्या सुखांत आणखी भर टाकली होती. खालपासून वरपर्यंत
आमच्या दोन्ही अंगांना लहान-मोठ्या दीपमाळांची फौज उभी होती.
इतक्या विपुळ दीपमाळा ज्योतिबाच्या डोंगरानंतर मी इथेच पाहात होतो.
: नवलाख पायरी, साडेतीनर्शे दीपमाळ, अठरा दरवाजे ? असा इथला
वाक््प़चारच आहे. दक्षिणची भव्योत्तृंग गोपुरे तक्याच या महाराष्ट्राच्या
दीपमाळा. डोंगरपठारावर तर त्या विशेषच प्रेक्षणीय वाटतात. खालच्या
जोड कमानीकडे आल्यावर डाव्या हाताला हेगडी प्रधानाची ' देवळी ?
आणि तिच्यांत दोन मुनिसहश बेठ्या मूर्त पाहिल्या.
त्यापळीकडेच धनगरकन्या बाणाईचें मंदिर आहे. बाणाईला शेळ्या-मेंढ्या
प्रिय दे खंडोबाच्या भक्तांना ठाऊक आहि. ते तिला नवस बोलतात आणि
पावली कीं शेळ्या-मेढ्यांच्या प्रतिमा करून तिला वाहतात. त्या प्रतिमांना
तिर्ने खु्याळ गोंजारीत बसावें. तेवढाच तिचा विरंगुळा. तेवढीच चाल्यदर्दंत
भोगलेल्या सुखाची स्मराति. बाणाई ही मला करुणरसाची ओतीव मूर्त
वाटली. तिला खंडोबाने हा सक्तीचा विजनवास दिला आहे. वर एवढें
वेभव आहे, एवढे सोहाळे आहेत, एवढे यात्रा-उत्तव आहेत ; पणत्या
भाग्याची धनीण एकटी म्हाळसा, हिच्या वाट्याला फक्त व्यया आणि उसासे.
खंडोबा आठवड्यांतून एकदां रविवार्री फक्त तिच्या घरी पायधूळ झाडतो
आगि पुढच्या तहा दिवताचे विरत तिच्यापुढे उर्भे करून वर निघून
झे - मनोळा ओचवळेळी आणि प्रेमाळा दुरावठेळी तो स्वेडित! अबला
। अच म्हणत असेल की, “ नकर्टे व्हावं ; पण धाकर्टे होऊं नये.
हअशखियवक्स वा
२ परशुराम क्षेत्र
८0200022022202224220020........“““..ध्ध्ाळळळाकरयळाळळ ९.१७ “ “7
समंतपंचक क्षेत्रांत एक अतिशय भव्य यज्ञ आरंभला गेढा होता. मागव
परशुराम त्याचा यजमान होता. क्षत्रसंहाराचं अंगीकृत कार्य तडीस
नेल्यानंतर शास्त्र खाली ठेवण्याच्या वेळचे ते जणु त्रतोद्यापन होते. त्या वेळी
समुद्रवळ्यांकित पथ्वीचा तो प्रक्नासक होता. एथ्वीवस्वीं सर्व धने, वैभव
त्याच्या मालकीची होती आणि म्हणूनच तो यज्ञ सवोर्गी सुसंपत्न होता.
वेदद्यास्रपारंगत तपोधन त्या ठिकाणी क्रत्विज म्हणून आळे होते. ज्याने
परशुरामाला उपनयनप्रसंगी द्विजत्वदीक्षा दिली, तो कर्यप महामुने त्या यज्ञाचा
अध्वर्यु होता. त्या यज्ञांतळी दहा वाव ढांब आणि नऊ वाव रुंद अतंलेली
वोदि अंतर्बाह्य सुवर्णाची द्वोती, यावरून इतर यशपात्रांची कल्पना करावी.
यश समास झाल्यावर सर्वीना भरपूर दक्षिणा मिळाली. जे याचक होते ते
५ घनी ? झाले. अध्वर्यूचा मान मोठा, अधिकार मोठा, तसें त्याळा मिळायचे
दानद्दी मोठें. रणयज्ञांत संपादिळेल्या समस्त भूमीचे पर्थुरामाने कदयपाच्या
हातावर दानोदक सोडलें. निलांम, निरासक्त होऊन आणि “न मम
म्हणून. मानवजातीच्या इतिहातांतले ब्राह्मणाने ब्राह्मणाला दिळेळं ह पाहिळे
आणि शेवटचेंच महादान होय. क्षणापूवांचा जगत्पति दुसऱ्याच क्षणाला
इंसतमुखार्ने अकिंचन झाळा. भूमीशी त्याळा कांही कर्तव्य नव्हतें. दुष्ट,
दुर्मद, क्षत्रियांवर दंड घरतां धरतां ती त्याच्या पायाशी लोळण घेऊन आली
होती. त्याला तिचें ओझे झालें होते. साम्राज्याच्या भवचक्रांत त्याला गळा
अडकवायचा नव्हता. आणि म्हणूनच तो घाईघाईने आपल्या स्वामित्वाचा
त्याग करून भोकळा झाला होता.
पण ते दानोदक हातावर वाळायच्या आंतच कद्यपाने त्याळा सुनावले,
: माझ्या भूमीव तूं सदतां कामा नये. तुझा इथळा हक्क संपळा. ' परुरामानें
ती आज्ञा शिरसावंद्य केली. तो नर्मदा पार करून तह्याद्रीकडे आळा आणि
घाट उतरून समुद्रतीरी दाखल झाला.
२० तीर्थरूप महाराष्ट्र
ज्या भूमीत त्याने पदार्पण केलें ती नव्याने जन्माळहा आलेली होती. ती
६ काव्यपी ' नव्हती. सह्याद्रीची सतत प्रायधुणी करणाऱ्या सागराच्या
कुशीतून ती वर आली होती. भगुकच्छा ( भडोच ) पासून तों तद्दत कन्या-
कुमारीपर्यंतच्या त्या प्रदीर्घ पट्टीवर थोड्या कालांत वन्य वृक्षांची दांगे माजली
होती. दऱ्यादरकुट्यांत रानटी पद्यंची वाढ झाली होती. वृक्षकोटरांत
पश्चिगण जमला होता. आणि रिकार्रार उपजीविका करणारे अनार्य,
अत्तंस्कृत असे * कांग ' ढोक तिथे घरकुले. करून राहिळे होते. घाटावरचे
लोक त्या भागाला कोंगवणच म्हणत होते. जसे कोळ्यांचे त॑' कोळवण? ,
गोडांचें त॑' गोंडवन ?, तसेच हे कोंगांचें “ कोंगवण ?, कोणत्या तरी
: शाकल्यारने ' त्यांतल्या ' व ! चा लोप केला आणि ते कोंगण झाले आणि
त्याचाही अपभ्रंश होऊन पुढे ' कोकण ? ह्वा सुटसुटीत शब्द रूढ झाला,
पण ती भूमि अजून ' त्रात्य ' होती. तिच्यावर कसलेच संस्कार झाले
नव्हते. अजून नांगराचा फाळ फिरायचा होता. कुदळीच्या टोची बस्तायच्या
होत्या. खोरे अंगांत घुसायचें होते. त्रिकोण-चोकोनांच्या कणेरांगोळ्या
काढणारा कलाकार मानव अजून तिच्यावर अवतरायचा द्वोता. आडमुठ्या
निसर्गाला ' सषूर ' म्हृणून तिथे आपली करामत दाखविणारा
६ अयं मे दृस्तो भर्गवान् ? अजून तिच्यावर वावरायचा होता, खरे म्हणजे
तिचा उद्घारकर्ता तिला अजून भेटायचा होता. परशुरामाच्या रूपार्ने तो
प्रगटला आणि त्या नवभूमीने त्याला ' स्वागतम् म्हटलें.
हीच भूमे तो आतां आपली म्हणणार द्वोता. त्याने ठरविळ की, आपण
हिच्यांत सौंदर्य ओतायचें. हिला कळेची भूमि बनवायचे. या तांबढ्या
मातीत नवजीवनाचं उद्यान फुलवायचे. आजवर त्यानें केले होतें ते
संहाराचे कार्य. वाहवळे होते ते रक्ताचे पाट, अपरिद्दाये म्हणून नरखडे
अंतराळांत उडवण्याचा अघोरी खेळ त्याळा खेळावा लागला होता.
त्याच्या अंतरांतल्या विधायक प्रवृत्तींना डोके वर काढायला कर्धी उसंतच
मिळाली नव्हती. संद्वाराच्या तांडवांत सजनार्चे हास्य दडपलं गेलं होते. ते
आतां रोमरोमांतून एकदम प्रगटळं. जर्मन महाकवि गटे यानें निमिठेला
डॉ, फोस्ट म्हणतो, ' समुद्रकांठच्या या अफाट दलदलीत मी वसाहत उभारीन,
परशुराम क्षेत्र २१
डाखो मानव इथें स्वतंत्रतेने जगतीळ आणि नांदतील. ' या प्रागैतिहासिक
मद्दापुरुषार्नद्दी ह आणि असेंच स्वम्न पाहिले.
पण द्दे प्रचंड कार्य केवळ दोन हातांनी सिद्धीला जाण्याजोग॑ नव्हतें.
सहस्नावाधे हात एकजुटीने त्यासाठीं राबायळा हवे होते, म्हणून प्रथम त्यानें
कुठून तरी चोदा ब्राह्मणकुळें समुद्रमार्गे या भूमीवर उतरवलीं. नेमकी कुठून
ते इतिहासवेत्ते अजून सांगत नाहींत. कोणी म्हणतात की, चित्पावनांचे द्वे
चौदा मूळ पुरुष इराण, ईजिप्त, पॅलेस्टाइन इकडून कुठून तरी आले असावेत.
ते बहुधा पाश्चिमेकडचे परदेशी असावेत. तर कोणी म्हणतात, इतर भारत-
वषाीतूनच परशुरामाचे हे चोदा आवडते ब्राह्मण त्यानें इकडे आणले. विधात्याने
विश्वसृष्टि वाढविण्यासाठी जसे कद्यपादि दहा मानसपुत्र निर्मिळे, तसेच
हे त्याच कार्याताठी आणलेले चोदा चित्पावन परारामाचे मानसपुत्र होत.
त्यांनीं परशुरामाला स्वामीच नव्हे, तर देवद्दी मानढें. त्याच्या योजकतेला
अनुसरून ते जीवेप्राणें त्या भूर्मीत खपू लागळे. मोकाट वाढळेळी जंगले
तोडण्यांत आलीं. ओढ्यांना बांध घाळून पाट काढळे गेले. ' माळिये जेउत
नेळं । तेउतें निवांतचि गेळं? तसें ते पाणी त्यांना इष्ट असलेल्या जागीं झुळ-
झुळूं ढागळे, केळी-पोफळींची प्रमाणबद्ध लागवड झाली. केळी-पोफळी
म्हणजे सुंदर सुकुमार ललना, वाऱ्यानें जरा अधिक दांडगाई केली की, पिळ.
वटून निघायच्या. दक्षिणायनांतल्या उन्ह्याची जरा अधिक तिरीप लागली कीं
पोफळीचें तेवढच आंग उभं करपून जायचे. म्हणून मग त्यांच्या रक्षणासाठी
समथ असे आंबे-फणस त्यांच्यामावतीं वाढवले गेळे. मधून मधून माडांची
लावणी झाली. माड म्हणजे कोकणचा कल्पवृक्ष. स्वगोतल्या कल्पवृक्षांनी
लाजून * डह्वाळ्या पाडाव्या ? अशी त्यांची उंची आणि समृद्ध फ्लतंपदा. तो
जणूं मानवाला कवि बोरकरांच्या शब्दांत गाऊन सांगतो --
' स्वर्ग दाविण्या तुला स्वतःच जाहला शिडी
चांदूण्याचिया तुला दिल्या भरून कावडी
त्याची शहाळी म्हणजे जणुं अमृताचे कल्श. त्यांतले मिष्ट, मधुर जरू पाहूनच
' सुधा भीता दिवंगता ' अर्से आम्हांला वाटतं. या माडांनीं त्यांच्या घरांवर
आणि जंगणांवर कृपाछत्र धरलें. शेतांच्या बांधावर उभे राहून ते राखणदारी
२२ तथिरूप महाराष्ट
“४. ४०८४-४१.” २.५४ ४ ४७४ ७.” ४ ४.” ४७” ४.” ७.” ७.” ४७४ ४.”
/९.४/"४.//४._//४./” ४.४ ४%./४./४../ ९.५ ४./७%.५१./ ४.” ४. ४८४४ ४७.५ ४.५ ४०५४ ७.५ ९.५४ ७.५७ / ९.५९... ९. ९.०५११-./..४९../ १.४४ %८/७४७”४../0- क
करूं लागले. समतळ भूमीत कुणगे तयार झाळे. जोत बांधून नांगरट करतांना
: ह्रीरी ?, ' पापारी?, असले बेलांना उद्देशून उच्चारलेळे संज्ञाशब्द घुमू
लागले. शेताशेतांतून वर्षीवून दोन वेळां पिवळी लक्ष्मी डोळूं लागली.
चित्पावनांचा वंशवेल वाढला. त्यांच्यामागून इतरदह्दी अठरापगड जाती आल्या.
वसाहत विस्तारत चाळली. नवनवे तुकडे लागवडीखाली येऊं लागले, सगळें
तळर्कोकण हिरवें झालें. चिरर्जीव परशुरामाने चिपळूणच्या डोंगरावरून दूर-
दृष्टीने हे सगळें पाहिलें. त्याच्या डोळ्यांची धणी पुरली. जीवनांतल्या कृतार्थ-
तेचं सुख-समाधान तो अनुभवू लागला. पूर्वी एका काळीं तो कालेंग देशांतल्या
महीनदीकांठच्या महेंद्र पर्वतावर वास्तव्य करून होता. आतां त्यान चिपळूणचा
डोंगरच कायम केला. त्यालाच महेंद्रपर्वत मानले.
आणि याच डोंगरावर याच सहाव्या अवताराच्या दरशीनासाठी आम्ही
त्या दिव्या निघाला होतों. महवाराष्ट्रांतलीं इतर अनेक क्षेत्रे हिंडतांना मी
आनंद उपभोगला नव्हता, असें नव्हे; पण या कॉकणच्या क्षेत्राचा प्रवासी
होतांना मला द्वोणारा आनद हा निजानंद होता. कोंकण ही माझी जन्मभूमि
आणि माझ्य़ा पूर्वजांची कमंभूमि ह्वोती, माझ्या भावनांचे अदृद्य पण अतूट
असे धागे तिथ गुंतलेले होते. एस्, टी. च्या बसला ताशी तीस भेल ही वेग-
मर्यादा असळी तरी माझ्य़ा मनाच्या रंद्ववरला कोण आवरणार? पुणें ते
थेट चिपळूण अशा वाऱ्या करणाऱ्या गाडींत बसला. असतां माझे मन
सह्याद्रीच्या शिखरांवरून खालीं झेप घ्यायला सोट्कंठ झाले होते. सातारा,
उंब्रज, पाटण या गांबांना क्रमाने मार्गे टाकीत आमची . गाडी पथ
आक्रमीत होती.
पाटण सुटळ आणि कोयना भेटली, ती कऱ्हाड क्षेत्रांत कृष्णेशी प्रीति"
संगम करायला निघाली होती. आमचा रस्ता तिच्या उगमाकडे चालला
होता. आटपसर पात्र आणि बेताचेंच पाणी, आगामी हिंवाळा आतांच
तिच्या मुळावर आला होता. पात्र ठायी ठार्यी उघडं पडले होते. वर्षाकाळी
£ आऊर ? ज्यांच्या डोक्यावरून जायचा तीं लव्हाळी आगि झुडपे आतां
: तटस्थ ' झालीं होती. पण अश्या या पडत्या काळांसुद्धा कोयना संथ होती,
प्रस्न होती. अजून ती तीरावरच्या मळ्यांना पोशीत होती. बारा वाटांनी
परशुराम क्षेत्र २३
वेमव पळूं लागळे तरी आपले दान-धर्माचें ग्रत न सोडणाऱ्या एखाद्या सत्त्व-
धीर ग्रहृलळक्ष्मीतारखी ती मला वाटली.
आमचा तांबडा रस्ता तिळा कसा समांतर जात होता. नदी जरा ' डोंगी
झाली कीं रस्त्यानेंद्ी जरासे आंग वांकरडे करावे. तिनें डावीकडचें मोठें वळण
घेतले कीं मनाला वाटायचे, आतां हिची आणि आमची फारकत होणार. पण
रस्ताही नेमके तसेंच आणि तेवढेच वळण घेऊन तिला म्हणेः “मी नाही
एवढ्यांत तुझ्यापासून दूर् होणार, ? ' सतां सद्धिः संगः कथमपमि हि पुण्येन
भवाते ! ? तिनें उजवी मोहर दाखविली कीं मी मनांत म्हर्णे, ' आतां हिचे
उललेघन कराव लागणार. ' पण मार्ग कसला वस्ताद! तोही आपल्या
शरीराला तसाच बांक देई. अखेर आम्हीं हेळवाकच्या ग्रामसीमेजवळ तिचा
पूल ओलांडला. ती सह्यकन्या मग उजवी वळतां वळतां आम्हांला आशीर्वाद
बोलली ! ' श्ञान्तानुकूलपवनश्व शिवश्च पन्थाः ! ?
हेळवाकच्या पुढें कासटीवाळे कुळवाडी गाडीत चदूं-उतरूुलागले.
निस्तगोत फरक पडला तसा भाषेतही. वाटेत गुरांची गोठण दिसली. गायी
पोटमर पाणी पिऊन वृक्षच्छार्यंत डुलकी घेत होत्या. दुधाची तळफ आलेले
एक वासरू आपल्या आईला ढुशा देऊन ' ऊठ म्हणत होते. रानांतल्या
नाचण्यांच्या शेताची कापणी सुरू झाली होती. भरविलासांना अनभिज्ञ
असलेल्या कृषकवधू आमच्या धांवत्या निळ्या गाडीकडे विळा थांबवून
पाहतांना नेत्रदळें उत्फुऴ कर्रात होत्या. तशी ओझरती दृद्ये पद्यात पहात
थोड्याच वेळांत आम्ही सह्याद्रीच्या माथ्यावर दाखल झालां.
आतां खालच्या बाजूला असंख्य शिरे, अनंत दऱ्या, आणि अगाणित
वृक्ष पसरले होते. कांही शिखरं सपाट होती, सुगम होतीं. ती म्हणत होता :!
: ये आमच्यावर. आम्ही तुला खूप गंमत दाखवू आणि अलगत खालच्या
शिखरावर सोडूं. तुटळेळे काळे कडे मळा मिववीत होते ! “ असेल हिंमत
तर ये मला भेटायला. बाहेर सवंत्र प्रकाशधारांचे वर्षण होत होते. आणि
त्या तळपत्या उन्ह्वांना भ्यालेल्या अधाराला सह्याद्रीन॑ आपल्या उद्रांत सुराक्षित
जागा दिला होती. पावसाळ्यांत दुघिया रंगाचे जलप्रपात कड्याकड्यांवरून
उड्या घेऊं लागले कीं सह्याद्रि आधिक रुद्र होतो आणि निसर्गाने हरित तृणांचे
२४ तीर्थरूप महाराष्ट
४४.४५” ४४% “0५ “२.” “00 “0 “न. 7१ /४- /7५.
गालिचे आंथरल्यामुळें अधिक सुंद्रद्दी होतो. आज या दोन्ही आगंतुक गोष्टी
नव्हत्या, आज त्याचें सहजसोंदर्य तेवढेच विराजत होते. स्वाभाविक भव्यत्व
तेवढेच प्रतीत हात होते. आणि तेवढ्यारनेंच डोळे फाटत होते. खरोखर
आमच्या प्रवासगीतंतळा हा विश्वरूपदर्शनयोग होता. एकेक वळण घेऊन
गाडी एकेक टेकडी उतरत ह्वोती. अर्ध्यांपाऊण तासांत तिनें पायथा गांठला.
माझ्या काळजावरचे ओझें उतरले.
आतां आम्ही वासेष्ठी नदीला उजवी ठेवून चिपळूण जवळ करीत होतो.
जागोजाग भाताची उंच उडवी दिसत द्दोती. अजून मळण्या व्हायच्या होत्या.
आश्विन पौर्णिमेला ' आग्रयण नवान्न ? झालं असलें तरी भाताच्या राशी
अजून घरांत पडायच्या होत्या. वासिष्ठी नदी या बाजूला अक्षरशः निर्जल
होती. जणुं उथळसा मोठा चर. तिच्यांतळे ओबडधोबड गोटे राख फासल्यागत
यांढुरके दिसत होते. जसे काही कुंभमेळ्याला जमळेळे दसनाम गोसावी. पाग
नाक्यावर उतरून आम्दी आमचा सज्जनगडचा संवगडी श्री. नरेंद्र रानडे
यांच्या घरीं दाखळ झाला. आणि नंतर आमचे आत्ततंबंधी श्री. अनंतराव
ओक यांचा पत्ता शोधून काढून त्यांचे पाहुणे बनलो.
निपळूणहून परशुरामाला जाणारी पहिली गाडी गर्गाचार्याच्या मुहूर्तावर
निघत होती, पाग विभागांतून चिपळूणच्या बस स्टॅडपर्यंत चाळून जायचे
म्हणजे दीड भेळाची वाट. त्या रात्री थेर्डीनेंही चांगलाच प्रताप दाखवला
होता. अंथरुणांतून उठणे जिवावर आठे. चालायला लागलां तर द्वातपाय
कांकडून गेळे. ' अद्य शीत वरीवर्ति नरीनार्त समीरण! । ! हे सुमाषित अगदी
कडकडून चावले. पण मनुष्यवस्ती सोडून उघड्या शेतांतल्या रस्त्याने जाऊं
लागतांच खाचरांतून खारी हवा धांवत येऊन नाकातोंडांत शिरली आणि
तिनें मळा लगेच उत्तेजित केळे. तिच्यांत ताजेपणा तसाच जोमही होता.
शेताच्या वक्षःस्थळावर चंद्रिकेचे क्षोम वस्त्र पसरलं होते. तो शीतळ अमृत-
मय प्रकाहरस झाडमाडे मूकपर्णे प्राशीत राहिली होतीं. पश्चिमाकाशांत
कुत्तिका क्षितिजाखालच्या अथांग सागरांत सुर मारावी का न मारावी अशा
संदिग्ध मनःस्थितीत दिसत होत्या. चंद्राला मात्र विठोषशी घाई दिसली
नावी. तो रोहिणीशी विरद्दापूर्वीच्या गुजगोष्टी विश्रब्धपणें बोलत राहिला
होता, सर्भावतींच्या डोंगरांना आकाझमाउली दंवर्बिदूनी कार्तिकस्नान
परशुराम क्षेत्र २५
घार्लीात होती. ताजी, टवटवीत, प्राणमय, प्रकाशमय अक्षी ती पहांट होती.
ती मुळांसाठी, फुलांसाठी, संतांसाठीं, कर्मवीरांताठीं प्रगटळी होती. ती नव्या
दिवसासाठी नवजीवन घेऊन आली होती. विश्वांत मांगल्य आहे, जीवनांत
आनंद आहे, असे जणुं ती माझ्या कानांत सांगत होती. तिचा तो संदेश
हृदयांत भरून घेऊन मी गाडीत चढलॉ.
तिथून पांच मेळ परशुरामाच्या डोंगरावर येऊन एका पथिकविश्रामा-
समोर आम्ही उतरला, तरी अजून उषा मार्गच रेंगाळत होती. प्राची वधूला
सूर्यदेवारने अरुणदूताच्या हाती अजून गुलाबी साडीचा नजराणा पाठवला
नव्हता. तारका अजून दिमाखांत होत्या. झाडापेडांतला अंधार अजून
निश्चित होता. पांखरांचे प्रातःस्मरण अजून सुरू झालं नव्हतं. त्यामुळे
आम्हांला त्या विश्राममंडपांत बसून त्याच्या माळकाच्या गोष्टी ऐकत आणि
त्यानें शिंक्यांत घाळून मांडवाला टांगलेल्या कोइळ्पा-भोपळ्यांना पह्वात वेळ
घालवावा लागला.
फटफटीत उजाडल्यावर तिथच धघस्ता गरम करून आम्ही देवळाकडे
जायला निघालो, त्या अदंद रस्त्यावरून निप्तगाच्या काव्याचे रसग्रहण करीत
रमत गमत चाललो असतां कोणी तरी उद्गारले, ' तो पद्दा समुद्र! ! मीं उजव्या
बाजूला तोंड वळवले आणि थबकलोच. समुद्रच होता तो! पण खाऱ्या
पाण्याचा नव्हे, तर धुक्याचा. वासिष्ठी नर्दातून ते वर उठले होते. तिकडची
सारी सृष्टि तिने अज्ञातांत विळीन केली होती. ' वाढतां वाढतां वाढे ' अक्ा
क्रमार्ने तिकडचे डोंगरसुद्धा त्यानें गिळीत आणले होते. कांहार्ची फक्त बोटभर
शिखरं वर उरली होती; पण त्यांचेंही लक्षण ठीक दिसत नव्हतं. अजून
लाटांचे लोट वर उठतच होते. प्रथ्वी जणुं विरघळून बाष्परूप होऊन आपल्या
: द्योसू ? पतीला सर्वोर्गी खेंब द्यायला निघाली होती.
' शव: पिता पूुथिवी माता-- !
हदी विश्वाची मातापितरं आतां एकजीव होतील, अनंतकाळचा दुरावा
केडतील. आले, आलें! तें आणखी वर चढळें. खालच्या साऱ्या आत्तमंतावर
धूसर पांघरूण पडळें, आतां त॑ मलाही वेढील. त्याच्या लाटा माझ्या डोक्या-
वरून जातीळ. मी द्रवरूप पण अपारदर्शक अशा मिंतींत कोंडळा जाईन.
र्ट ताथरूप महाराष्ट
४४£८४४€ ५ ४८/५/-४-€-/८/ ---/-“-€-/-/५€-/-€-< »«. -4-» »->०८१/ *€४*९./४/१.५-/४५.४/४/५///४/” १-४”
विश्वापासून अळग, एकटा पडेन. मग मी मलाच जाणायर्चे. माझ्यावरच प्रेम
करायचे. मीच एकटा माझा आणि बाकी सारे शून्य. पण मी तरी आहे त्या
स्वरूपांत शिळक उरेन का! कदाचित् माझ्य़ांतलेही पार्थव अणु बाष्परूप
बनतील. मीद्दी अनेक तरंगांतला एक तरंग बनून अंतराळांत भ्रमेन. या
अभिनव कल्पनेसरशी मी एकदम निःशब्दाचा कवि झाला. त्या विशाल,
मऊ मऊ काव्यांतला रस ' दे दे! म्हणून पिऊं लागलों. एवढ्यांत कोणी तरी
माझी तंद्री मोडढळी--' चढा, जाऊं या आतां!
ज्या बाजूनं आम्ही डोंगर चढला त्याच्या दुसऱ्या पालथणाला परशुरामाचे
देऊळ होतें. आतां थोर्ड उतरायला हवे होते, त्यासाठी रुंदशी पाज बांधलेली
होती. तिच्या तोंडावरच गावकऱ्यांचे गोधन आम्हांला सामोरं आळे. वरून
वैदिक क्रर्षींच्या प्रकाशघेनु अवतरत द्ोत्या आणि खालन या परशुरामाच्या
गायी वर चढत होत्या. त्यांना वाट देऊन आम्ही खालीं उतरू लागलो. एक
द्दजार फूट उंच डोंगरावर हृ गांव वतळें आहे. वस्तुतः गांवाचे नांव आहे
पेढे; पण देवस्थानामुळें ' परशुराम ' याच नांवाने तं प्रातद्ध आहे. लोकसंख्या
-*/ ५७//”/*»*/ »/ ७ ४१५ /९”» /५ “४५” ८-£ “४१९५१४ ४ ६ ४४
४ 222 कळी म्हने
(ता
री द्र त्र्त्रर् फा
परशुरामाचे देऊळ
दोन हजाराच्या आंतच. उरलेला सगळा गजबजाट वृक्षांचा, परशुरामाच्या
भोवती पहिलें मंडळ आहे मानवांचे आणि दुसरं वृक्षांचं. प्रत्येक घरापुढे
सारवलेलं प्रशस्त, स्वच्छ आंगण. कोकणच्या संस्कृतींत आंगणाळा फार मान
परशुराम क्षेत्र २
आहे. तो जणुं घराचाच एक महत्वाचा माग, एका बाजूळा तुळशी-वृंदावन,
कडेला जाई, जुई, पाच, शेवंती, अघोली या फुलवंती वाढलेल्या. आधा फुलं
देवाला, नंतर घरच्या लेकी ठुनांच्या वेण्यांना आणि उरळेळीं आल्यागेल्याच्या
मनाला उल्हास द्यायला. त्या अगणांत कोणीही येऊन टेकार्व. मुलांबाळांना
स्वच्छंद बागडावे. ग्रह्हलद्षमी त्या अंगणांतळे खडेगोटे केरसुणीनॅच नव्हे;
तर निर््यांनासुद्धां ळोटील. पुढच्या वाटेवर इकडून तिकडून दहापंधरा हात
झाडणी [फिरवील, अआतिथअभ्य़ागताला प्रसन वाटावे, त्याच्या पायांत खडे
रुतूं नये, हा त्यांतला कोवळा भाव. कोकणच्या खेडेगांवांतला घरधनी
एक वेळ उपाशी राद्वाळ ; पण आंगणांत मांडव उभारील.,
कांह्दीच्या परसांत लिंबिणी लागल्या होत्या. कांहींच्या घराशेजारी पपनतत
लोंबकळत होतीं. कुठें रसबाळ्या केळ्यांचे घड आपल्या गोपुच्छासारख्या लांब
दांड्याच्या बोंड्या दह्वाळवीत होते. प्रत्येक घरामावती गडगा उभारलेला. त्या-
बाहेर वेळूची वर्न हालत डोलत असलेलीं. फणस तर जिकडे तिकडे. कोकणचा
दुसरा महावृक्ष फणस. त्याचा आसरा ह्वा आमचा ' मद्दापुरुषसंश्रय, ? फणस
६ फुटला ? कीं तो प्रथम आमच्या पानांतळी उजवी बाजू संमाळतो. पिकला
कीं सोनेरी, सुगंधी रसाळ गरे जिभेवर ठेवतो. आणि उलगला तरी मातीत
मिसळून मिंतीशीं लिंपलेल्या त्याच्या आठळ्या पावसाळ्याला उरतातच
कोकणच्या कन्या फणत्तारचें लोकगीत गातात. त्यांत त्याच्याविषर्यांची आमची
सगळी कृतजतता सांठवलेली आहे--
“ फणस फणस । बाहीं बाहीं फुटे
फणस झाले मोठे । पिकावेया
पिकले फणस । देवा समपिले
मग ब्राह्मणांसी । गरे दिले ॥
यांतसुद्धां पद्दा. पहिला फणत्त ' सादावला ' की देवा-ब्राह्मणॉरचि स्मरण
प्रथम, ' पहिला डाव देवा गजाननाला ' तसे पहिळेवहिळ फळ देवा-
ब्राह्मणाळा मग तो आढीतला हापूस असो कीं गोठ्यावरचा भोपळा असो.
हे सगळें आसमतवेभत न्याहाळीत आम्ही चोघड्याखालच्या महादारांतून
देवाच्या प्राकारांत शिरला. पायऱ्या उतरतांच दृष्टि सर्भाोवार प्रदाक्षिणा करून
२८ तीर्थरूप महाराष्ट
"४ 0५..५१४५../”९
"२.५४ ५१४४... १५ ७. ४.५ ७ ४ ४४% ४९.१७ ४.४१ ४४.१५ “९ ४४.१४ "५४.१.
-“४-४*-५-१-४-/--५-”/% “<.«.
आली. त्या विस्तीर्ण प्राकारांत त्या वेळीं एकही माणूस नव्हतें, कुठे आवाज
नाही, कुठें गोंगाट नाहीं. सगळें कसं निःस्तब्ध, निवांत ! देवाजवळ जसे
असायला पाहिजे तसें. इथं भपका नाहीं; पण स्वच्छता आहे. झगझगाट
नाहीं; पण शांति आहे. पंढरपूर-करवीस्वी संपदा नार्ही; पण स्वयंपूर्णता
आद्वि. कोकणच्या सर्व देवस्थानांत याची थोरवी विशेष आहे.
प्रथम देवदशन आणि मग आलतू-फालतू चोकऱ्या हे उचित समजून
आम्ही सोळखांबी सभामंडपांतून मंदिरांत प्रवेश केळा आणि गाभाऱ्याच्या
उंबरठ्यांत हात जोडून तिष्ठलॉ. हार्रानं उम्या असलेल्या तीन सुरेख, सायुध
पाषाणमूर्तीनी मार्झे मन वेधून घेतले. डावीकडचा खालचे दोन्ही दात
उताणे सोडढेला तो काम, उजवीकडचा तसाच दुसरा तो काल आणि
मधला परशुराम. काळ-काम हे विश्वदेवांपेकी आहेत. पण त्यांनीं परुरामाचा
शेजार कां केला ते समजत नाही. तिथले लोक त्या तीन मूर्ति एकत्र पाहून
त्यांना ब्रह्मा, विष्णु, महेश हद्दी सरवप्रसिद्ध नांवे देऊन मोकळे झाळे आहेत.
काम, परथु्राम, काल
तिन्ही मूर्तीत परशुरामाची मार्ति जरा अधिक, उंच आहे. त्याच्या चार
हातांपैकी उजवा खाळ्चा हात अभयकर असून बाकीच्या हातांत अनुक्रमे
बाण, धनुष्य आणि परशु अशी तान आयुर्धे आहेत. याच परशूर्ने प्रथम
त्यानं आईचे शिर तोडलं आणि नंतर एकवीस वेळां एथ्वी नि'क्षत्रिय केली.
त्याचा पहिला शत्रु दैद्दय कुळांतळा सहस्तारजुंन. नर्मदेच्या उत्तर तारावरची
परशुराम क्षेत्र २९
माहिष्मती म्हृणजे आजर्चे ओंकारमांधाता दह्दी ह्याची राजधानी होती.
हिमाचळाच्या पायथ्यापर्यंत त्याचे साम्राज्य गाजत होते. त्यानें कारण
नसतांना जमदसनीची होमधेनु त्याच्या आश्रमांतून फरफटीत नळी. आणि
त्यानंतर कांही काळाने लांडग्याच्या वृत्तीने परशुराम घरी नाही हदी संधि
साधून खुद्द जमदमीचाच खून पाडला.
आजवर निरनिराळ्या तपोवनांवर क्षत्रियांकडून द्दोणाऱ्या अत्याचारांच्या
हकीगती परशुराम ऐकत होता, आज अत्रीची कुचाळकी करावी, उद्यां
वसिष्ठाच्या आश्रमावर घाड घालावी, परां आणखी कोणाच्या पणकुटींतून
बायकामुली पळवाव्या, कोणावर थुंकार्वे, कोणावर शिंकरारवे, कोणाचें अन्न
भक्षावे, कोणाचं घन लुबाडावे, कोणाला जीवें मारावे, असे निंद्य, चीड
आणणारे प्रकार वाढत्या प्रमाणांत सुरू झाल्याचे त्याच्या कानांवर येत होतं.
त्या दिवशी तर त्याच्याच आश्रमावर कहर गुदरला. अत्याचार अंगाशी
येऊन मिडला. जागजागी एकवीप्त घाव बसून रक्ताच्या ताळणांत पडलेले
आपल्या तपोधन पित्याचे कळेवर पाहून त्याचे रक्त जळजळलें. आपळा परशु
उंच उभारून त्याच क्षणी त्यानें प्रतिज्ञा केळी $ ' या परशूरने मी एकवीत
वेळां प्रथ्वी नेःक्षत्रिय करीन ! ?
त्याने आजूबाजूच्या तपोवनांतल्या ब्राह्मण युवकांची दुर्दम्य संघटना
उभी केली. रुद्राक्षांची माळ ओढणाऱ्या त्यांच्या हातांत रोद्र शख्र दिली.
त्यांना धनुरवि्धेत तरबेज केलें. ' खस्थ बत्ताल तर मराल, नामरोष व्हाळ !
हृ भीषण तत्य त्यांच्या काळजांत ठसवळं. दृजारो ब्रक्षतैनिक त्याच्या आरे-
सरशी उडी ध्यायळा सिद्ध झाळे,
प्रथम त्यानें हेदय कुळाचे कंद छेदले. नंतर इतर क्षत्रियांनाहि रणाचें
आवाहन दिले. क्षत्रिय सगळ्या शक्तीनिशी त्याच्यावर तुटून पडळे. पण
त्याच्या संहारतांडवापुर्ढे त्यांचं बळ कुचकामी ठरळें. कित्येक क्षत्रिय घारा-
तीथी पडले. कित्येक ळपळे. कित्येक परागंदा झाळे. मधे कांही वर्षे शांततेची
जावी, क्षत्रियांनी पुन्ह्या कुठें तरी उचळ खावी, पुन्हा परशुरामाने आपल्या
वज्कुठाराळा धार लावावी, अत्तं लागोपाठ एकवीस वेळां झाले.
मग मात्र उभयपक्ष कंटाळले. क्षत्रियांतही त्राण उरल नाही. आणि
"५../ २././”९.””५.”४..””९..
“7२.
३० तीथरूप महाराष्ठू
परशुरामालाही ज्ञानवृद्धांनी या संहारकमांपासून परावृत्त केलें. ' पुरे झाले ह
वैर ' अशी भावना उभयपक्षांत उदित होऊं लागली. या अंदाघुंदींत उभय
वणीचा उत्कषषं थांबला होता. या देशांत हढमूल व्हायचं तर त्यांना कायमचे
वेर धरून चालण्यासाखे नव्हतें. कांही झाळें तरी ते एकमेकांचे शेजारी होते.
त्यामुळे उमयवणोतले विचारवंत पुरुष हा शेजारधर्म वाढवण्याच्या मार्गाला
लागले. ' आमचें चांगलं असेल तं तुम्ही घ्या, तुमचे चांगळे असेल ते आम्हाला
द्या ) असा परस्पर सद्दकार निर्माण होऊं लागला. हळूहळू मागचे घाव बुजू
लागळे.मनाची मिळणी साधूं लागली. आणि याच सात्त्विक वृर्तांतून पुढें
दाशरथी रामाच्या काला पर्यंत हिंदूंची व्णमूळक समाजरचना सिद्ध झाली. मग
भगवान् मनु त्रह्म-क्षत्रांच्या या वर्धिष्णु ऐक्याचे गोडवे गाऊं लागला. त्याची
आवदयकता प्रतिपादूं लागळा---
:: नाक्षच ब्रह्म भवाते क्षचं नात्रह्म वधते
ब्रह्मक्षचे तु संयुक्ते इद्ातुच च वर्धते ”
: क्षत्रावांचून ब्रह्माचे अस्तित्व टिकणार नाहीं. ब्रह्मावांचून क्षत्र वाढणार
नाहीं. ब्रह्म क्षत्र जर संयुक्त झाळे तर समाजाचं इह-पर कल्याण साधेल. ? मग
कालिदासानेंद्दी याच तत्त्वाचा गोरवान्वित अनुवाद केला : ' क्षत्रियांचे
अस्त्रंतेज आणि ब्राह्मणांचे तपस्तेज या दोघांचा संगम म्हणजे आगीला
वाऱ्याची भेट. ?
परझुरामाच्या मूतींला न्याहाळीत असतां मार्झे मन सात-आठ इजार वषी-
पूर्वीच्या त्या कालखंडाची दखळ घेऊन आलें. एका जटाघारी वद्ध वेदिक
ब्राह्मणाने आमच्या हातावर तीथोंदक घातले. * अमुकद्या नाही, ' तमुक
ठेवा ? नाही. सगळें यात्रेकरूंच्या मर्जीवर. मधल्या दालळनांतळें देवाचें शेजघर
पाहून आम्ही बाहेर पडला. सभामंडपाच्या पूर्वमागी असलेल्या मारुतीला
वंदून तुळशीवृंदानावकडून प्रदक्षिणेला प्रारंम केळा, परशुरामाच्या मागच्या
बाजूला रेणुकेचे लह्वानसें मदिर आहे. रेणुका हदी परशुरामाची आई हं
सांगायला नको असलें तरी ती सोमपा क्षत्रियाची कन्या द्वाती आणि तिचें
दुसर लाडके नांव '* कामळी ? होतं हे अवश्य सांगायला इर्वे.
मायळेकरांची ह्दी दोन्ही देवळें हेमाडपंती अहित. रेणुकामंदिराच्या बाह्य
परशुराम क्षत -$4
स्तंभावर कांही चित्रे कोरलेली आहेत, ती वगळली तर बाकी इथं कसलीच
कलाकुसर नाहीं. परशुरामाच्या डाव्या अंगाला गंगा आणि उजव्या सोंडेचा
गणपति अशा दोन सुबक संगमरवरी मूर्त आहेत. बाणगंगा हे इथले मुख्य
तीर्थद्दी प्राकारांत याच अंगाला आहे. या ल॑बचोकोन कुंडांत निराजीपंत नांवाच्या
एका ब्राह्मणाने मैळावरच्य़ा * सवतसडा ' या ओढ्याला चिरेबंदी पाट
बांधून पाणी आणून सोडले आहे. आणखीद्दी एक पाण्याचा झरा वरच्या
टेकडीवरून बारक्याशा पाटांतून या कुंडांत येतो. परशुरामार्ने धारत्रीच्या
उरांत बाण खांचून हद्दी गंगा वर काढल्याचं सांगतात. कुंडांतल्या पाण्याचा
उपत्ता केळा की तळाशी पांच बाणखंधे दित्ततात.
परशुरामाळा सातवा चिरंजीव मानतात. मडोचपासून मळबारप््रेतचे सर्व
जातीजमातींचे लोक येनकेन प्रकारेण परशुरामाशी आपला संबंध दर्शवितात.
मळूचारांत तर परुरामाचा शकच चाळू आहे. त्याने कोंकण वसवले ही तर
सर्वश्रुत गोष्ट. मूळचा महेंद्र पर्वत सोडून तो भापल्या वत्ताइतींत कायमचे
वास्तव्य करायळा आला इंसुद्धां शतकानुशतक जाणते ढोक सांगत आले
आहेत. पण तो नक्की कोणत्या ठिकाणीं राहिळा आहे हं मात्र सहाशे वर्षो-
खालीं कोणाला ठाऊक नव्हते. कदबांच्या नंतर इ. स. च्या सहाव्या शतकांत
हा प्रदेश चालुक्यांच्या अंमलाखाली होता. काकण धरून तारे दक्षिण
हिंदुस्थान त्यांनीं जिंकळे होतें. त्यांचा एक कर्णदेव नांवाचा सुभेदार इथून
जवळच असलेल्या संगमेश्वरी राहून या प्रांताचा कारभार पाह्वात होता. त्याने
तिथें कर्णेश्वर महादेवाचे एक कलासुंदर मंदिर निर्मून आपलें नांब चिरंजीव
केळे आहे. त्याला जर परशुरामक्षेत्राचा पत्ता लागता तर त्यानें इथं अपूर्व
कारागिरीचें देवालय उभारले नसते अर्से म्हणवत नाह. त्यानंतर इतरद्दी
अनेक राजवटी आल्या-गेल्या. पण परशुरामाचा शोध कोणाला ढागला
नाही.
तो शोध लावला तो एका गायीने. ती बहुधा जमदसतीच्या होमघेनूची
वंहाजा असावी, आपल्या या ' मूळमाये ? चा परशुराम ह्वा त्राता आहे, या
कृतजञताबुद्धीनं जणुं ती या स्थळी येऊन नित्यनेमाने पान्हा सोडू लागली.
गुराख्यांना त्या गोष्टींचे नवल वाटलें. इतर लोकांनी पाहिलें, त्यांनाही हँ
कोडे उलगडेना, अखेर कोण्या पुण्यवंताढा दृष्टांत देऊन परशुरामाने आपण
“/4४/"/ < “*>४->-//"--:५/4/--/”/-> “£ **५१-/*
३२९ तीथरूप महाराष्ट्र
*९./-४ -/--€ “-€> /->५:/-€-/५-€५-€८४- “४-“-€ /५<”-/* /५८”-€-“ "२. -/ -४४१-/१ -/०/ /<४६/५४४/४ ८४५” ८४५-/५/४/ ४” १४४/४/--५/-९-€-€->८-०/-€ “५ >/“-“*** * ८५/५४/४५४४ "५५ १-५९-”-€-*
इथें असल्याचे निवेदिले, तेव्हांपासून मग या विषरिष्ट॒ भूमिकेर्चांच परशुराम
या भावनेने पूजाअर्चा सुरू झाली. अजून तिथें मंदिर नव्ह्ते, पण योग
तरी कसा आश्चर्यजनक पहा. या हिंदु अवताराचे मंदिर निर्माण व्ह्वयचें
होतं,ते एका आदेंदु यवन स्त्रीकडून,
देवळाची दुसरी बाज
इ. स. १४०० सालीं आदिलदाद्दाच्या बेगमेची तारवे समुद्रांत गेलीं
होतीं तीं बेपत्ता झाळीं. बेगमेचे काळीज गलबलळें. माणूत संकटाच्या
वातचक्रांत सांपडले कीं ल्या वेळी कोणता तरी कर्तुमकतुसमर्थ असा देव पावो
अस त्याळा होते. कांकणचा स्वामी आणि समुद्राचा शास्ता म्हणून
परञुरामाळा ती ओळखीत होती. तिनें त्याला नवस केला की, ' मार्झी
तारवे सुरक्षित किनाऱ्याला लागूं देत. मी ह्वातचे कांकण लावून तुर्झे देऊळ
बांधीन. ' भ्रीकृपेने तारवे सलामत आली. तिने मग दाभाळ्याहून काळे दगड
आणले आणि श्रींच्या स्थानी गाभारा उभारला. समोरच्या टेकडीवर आम्हांला
दिसत होती ती दीपमाळही तिच्याच अमलांतढी आहे. द्दी दीपमाळ स्वणाऱ्या
कारागिराने दिशासाधन केळे आहे. परशुराम, त्याच्या दारांतली तुळत आणि
दीपमाळ ह. तिन्ही बरोबर एका रेषेंत येतात. कार्तिकी पौर्णिमेला तिथं
त्रिपुर पाजळला की तो प्रकाश सरळ धांवर्णे करून भार्गवरामाच्या मुख-
मंडलावर विसावतो.
पण अजून या स्थळाला ऊर्जितदशा आली नव्हती. पुढें तीनशे वर्षोर्नी
परछुराम क्षेत्र ३३
“रा “<<<... “-८/५:/-/-/-/५८/-/<५/-८/५/<<<--“-“//“/< /“>“-“““<>.-:<><<><>
"७४१/४८४४४७४४९४४१७०
ब्रह्मेंद्रस्वामी धावडऱकर या सत्पुरुषाच्या मर्नीमुखी रिगून परशुरामानें
*आपल्या क्षेत्राचे माह्वात्म्य वाढवून घेतले. स्वामी हे शाहूमहाराज आणि थोरे
बाजीराव यांचे गुरु होते. हा पुरुष संत, संन्यासी खरा; पण राजकारण
आणि अर्थकारण यांत रस घेणारा होता. जन्मगाव दुधेवाडी नांवार्चे वऱ्हा-
डांतळे एक खेडे. आईबापांचे वृद्धाप्यांतळं एकुलतं अपत्य. जवळच्याच राजुरी
गांवांत गणपतीचे स्थान आहे तिथे तप करून त्यांनीं गजाननाचा वरप्रसाद
मिळविला. पुढे त्यांना चतुर्थाश्रम स्वीकारण्याची बाद्रे झाली. “ यददरेव
विरजेत्तदद्दरेव प्रत्रजेत् * या उपनिषदांतीळ वचनाचा आघार घेऊन हे काशीस
गेळे आणि एका वृद्ध यतीकडून संन्यस्त झाले. मूळचे विष्णु हे नांव बदलून
गुरूनें त्यांचें ' ब्रह्मेंद्रस्वामी ' अस नर्वे नामकरण केलं. पुढें अनेक तीर्थ,
क्षेत्रे, पुरे, पट्टणें भ्रमून हे कृष्णातीरी आळे. सतराव्या शतकाच्या अखेरीचा
तो काळ. छत्रपति संभाजीचा वध झाला होता आणि महाराष्ट्रांत मोंगळ
पुनश्च जोरावर आले होते. त्यामुळें तूर्त कृष्णाकांठ आपल्या वास्तव्यात
प्रतिकूळ असं जाणून स्वामी कोंकणांत उतरले, पेठे गांवच्या पश्चिभेत्त
धामणीच्या रानांतळी एक गुंफा त्यांनी पसंत केली. जवळजवळ एक तप
त्या निर्जन एकांतात घालवून इ. स. १६९८ सालीं ते परशुराम येथें प्रगटले.
त॑ स्थान त्यांना रम्य आणि पवित्र वाटळं खरें ; पण त्या वेळा त्याची
सर्वतोपरी दुर्दशा होती. मंदिर जीव टाकण्याच्या बेतास आलें द्दवोते. देवाचे
पूजोपचार बंद पडले होते. महानेवेद्याविना तो शतकांचा उपाशी राहिला
होता. गोवळकोटच्या सिद्दीसाताच्या गांजणुकीनें पुजारी सगळे पळून गेळे
होते. त्या स्थानाला जिवतपणाच उरला नव्हता.
ब्रह्मंद्रामींनीं तात्काळ त्याचा जीर्णोद्धार करायचे ठरविलें, कोणतेही
महत्कार्य उभारावे तर ते एक लक्षापतीने अथवा मभिक्षापतीनें. स्वामी
दुसऱ्या वगोतळे होते. त्यांनीं हा ' सत्यसंकल्प ? सोडून खांकेला झोळी
ढावली. महाराष्ट्र आणि कनाटक या दोन्ही प्रांतांत दौरे काढून ' ओमवती ?
केळी. इकडे काम सुरू, तिकडे मिक्षा सुरू. कार्यापुरत धन गोळा झाले,
प्रथम त्यांनीं परशुरामार्चे देऊळ सुधारून वाढविळें. मागच्या बाजूस रेणुकेचे
मोंदेर बांधून सुपुत्राळा वत्सळ मातेची जोड करून दिली, तिथें प्रथम होती
ती. म....२-२
३४ तीथरूप महाराष्ठ
क क्क काका कक कक कक 7000000000 01000000000000ीरवी तीची त्री तीसरी ची >“४”५”५८/”-४”५४४५ -/ >€५” ५४१४५ “९०४४५४५ “ “५५५
ग्रामदेवता जाखाई. तिला त्यांनीं सामोपचाराने बाहेरच्या बाजूस नेऊन
यसवली. गजानन आणि इनुमान यांची देवळेंही त्यांच्याच द्वातची आहेत.
“८४४०९ हीन टोक च
ड |. | ॥| ॥॥॥- र |
” प र र शि द भे
| प श॥श!., व डु आह, .», 32. च्य
अनी
नु
ऱ्ि
च ची
रेणुकेचं मोदिर
एवढे करून त्यांनीं देवाचे सेवेकरी परत आणले. तिथें एक नषें गांवच
वसविले, पण देवाचे उत्सव, यात्रा, पर्वकाळ अव्याहत चालायचे तर देव-
स्थानाला कायम उत्पन्नाची जोड करून देणें भाग होतं. पेढे, आंवडस,
देवाचें गोठणें, इत्यादि कांद्दी गांवे देवस्थानास इनाम मिळवून त्वार्मीनी
आपल्या कार्याला चिरस्थायीपणा आणला.
जमवायला वषाचे श्रम लागतात; पण लुबाडायळा एक घटका पुरते.
त्या काळी सिद्दीसात नांवाचा हबश्याचा सुभेदार इथून जषळच्याच गोवळ-
कोटावर रहात असे. तो वरून ब्रह्मंद्रस्वार्मींचा चद्दाता म्हणवी ; पण आंतून
हेषाने पुटपाकासारखा कढे. आपल्या डोळ्यांदेखत, दृष्टीच्या टप्प्यांत एका
हिंदु देवस्थानाचा होत असलेला उत्कर्ष त्याळा कसा खपावा ! पण त्याळा
उघडपणे कांद्दी करतां येत नव्हते. मराठी राज्यांतळें स्वामीचे वजन तो
ओळखून द्वोता. एकदां स्वामी कनोटकांत मिक्षेसाठीं जात आहेत हं समजून
त्यानें त्यांना एक गळ घातली. ' प्ावनूर-बंकापूर येथील पठाणानें आपणास
परदा]राम क्षेष ३५
> ऱ:>५>-/८८--.८>८८८५--/०.५/५०>८८-/>४५” 2८ “-“.
क्क
बक्षीस दिलेला हत्ती स्वार्मींनी कृपाळू होऊन येतांना आणावा. ' त्याची
प्रार्थना मान्य झाली. हत्ती घाट उतरला आणि माखजनपर्यंत आला. तिथें
आंग्रे आणि हबशी यांच्या चोक्या जवळजवळ होत्या. दोन्ही चोकीदारांत
त्या हत्तीवरूनच तंटा निर्माण झाळा आणि आंग्ऱ्यांच्या लोकांनीं तो
ताब्यांत घेऊन जयगडास रवाना केला. स्वामी त्या ठिकाणी हजर असते तर
हृ प्रकरण उद्भवलें नसत. पण त्यांची मागच्या मुक्कामावर स्नानसंध्या
चालली होती आणि लवाजमा तेवढा पुढें आला होता.
सिद्दीसातानं या गोष्टीचा अन्वयार्थ लावला तो असा कीं, ' स्वामी हिंदु;
तेव्हां जातीला मिळाले. आपला हत्ती मुद्दाम आंग्ऱ्यांच्या घशांत घातला. त्याळा
खवळून उठायला एवढें कारण पुरेसे होतं. त्यानें नेमका स्वार्मींच्या वमावर
घाव घातला. शिवरात्रीच्या दिवशी त्याची परशुरामावर धाड आली. त्यानें
पुजारी आणि कारकून यांना निर्दयपणे झोडपळे. त्यांची घरदार लुटली. देव-
स्थानांची सारी चीजवस्त ओरबाडून नेली. हवा तसा तिथें हैदोस घातला.
स्वामींनी हवे सव पाहिल. त्यांचा अंतर्यामी तडफडला. सर्वांग घगघगले,
त्यांनीं सरळ दंडाराजपुरीस जाऊन हृबऱ्याकडे दाद मागितली. इहबऱ्यानें
तिद्दासाताळा चांगळाच दम भरला. लटळेळी सगळी संपदा स्वददस्ते परत
करायला लावली. सिदीसाताची खोड मोडली खरी ; पण त्या दिवसापासून
तो स्वार्मांचा अंतर्वैरी झाला. शेवटी स्वामी त्याच्या त्रासाला कंटाळळे आणि
परशुराम सोडून वर घार्टी आले ते कायमचेच.
अग्रशाळा, दापमाळा, नगारखाना, भंडारघर, सभामंडप, द्या सगळा
सरंजाम झाला खरा; पण सन १७८९ पयेत मंदिरांत मूर्त मात्र नव्हत्या.
सगळे पूजोपचार चालत ते शिलासनाला, गुहागरचे श्री. परचुरे यांना त॑ गोड
चाटले नाही. त्यांनी पुण्याहून कोण्या बंकतराम नांवाच्या शिल्पकाराकडून
श्रीमत घडवून आणल्या. माघ शुद्ध षष्ठीस पंचकुंडी अर्चा होऊन त्यांची
प्रतिष्ठा झाली. त्या वर्षांपासून वरील तिथीस मूर्तीचा वर्धापनोत्सव होत असतो.
याशिवाय भार्ग० वद्य एकादशी आणि शिवरात्र हे दोन पर्वमहोत्सव इथं होत
असले तरी इथला मुख्य उत्सव अक्षय्यतृतीयेचा. वेशाख शुद्ध प्रतिपदेपासून
त्याला प्रारंभ होतो. प्राकारमर उभारलेल्या मांडवांत मंत्रजागर दुमदुमतो.
पुराण-कार्तनांचा रस गळतो. गायन-वादनांची झक्कड उडते. द्वितीयेस
१द तीथरूप महाराष्ट्र
"४४-४४ ४-५ ४८४५0४४४0५ १८४ ४५/४५/७४०७
तिन्हीसांजा जन्मोत्सव करतात. तृतीयेला रात्री छबिना होतो. मग मान-
कऱ्यांना प्रसादाचे नारळ षांटळे जातात, आणि शेवटी लळित होऊन उत्सव
समाप्त द्वोतो. युद्धकालापूर्वी या प्रसंगी मोठी समाराधना व्हायची. आल्या-
गेल्याला अन्नप्रसाद मिळायचा. पण आतां कालाच्या प्रतिकूलतेमुळें सगळेच
६ अनुष्टुप् 'झाळे आहे.
एवढें सारें पहातो ऐकतो तों जवळच कुर्ठे तरी ' रुडुः5म' झाले. मी
म्हटले, ' तोफेचा आवाज कुठून आला ! कोरियांतली लढाई कोंकणापंयेत आली
कीं काय? आमचे मार्गदर्शांक मला उत्तर देण्यापूर्वी ' मारीवराम ? असें
उघ्चारून नतमस्तक झाले अन् मग म्हणाले, “ही देवाची तोफ. सकाळ-
संध्याकाळ ही नित्य गरजते. चला तुम्हांला दाखवतो. ' प्राकाराबाहेरच्या झाडीत
ती ' कालिकामाते ? आकाशाकडे तांड उघडून तिरकी बसली होती. ब्रह्मंद्र-
स्वामींच्या काळापासून ही रोज एक रत्तळ दारू ठासून घेते आणि आग
ओकते. दरसाल एकदां तिचे ' देणें ? दिलें कीं मग तिची तक्रार नसते.
पुन्हा पाग चढून आम्ही तिच्या तोंडावर आळा आणि तिथून उजव्या
ह्वाताळा वळून वर चढू ढागलॉ, झळझुळत्या पाटाच्या कांठाने दत्ताच्या
देवळाकडे जातांना आम्हांला हुरूपवाटत होता. निसगंश्रींला जळाची जवळीक
असली कीं त्या ओलाव्याने प्रवाशाच्या मनाच्या पाकळ्याह्दी लगेच खलतात.
दत्ताच्या देवळांत पुढच्या अंगाला डाव्या हातीं जी एक पुष्करणी आहेती या
पाटाची मायमाउली. त्याच्याच वरच्या भागाला चिमुकल्या गुंफेच्या मुखांतून
जो एक निर्झर प्रगटतो तो त्या पाटाचा मामा म्हणायला हरकत नाही.
टेकडीच्या माथ्यावर उभ राहून आम्ही सगळा आसमंत पाहेळा, काळ्या
कातळांवर आणि हिख्या झाडांवर उन्हे चमचमत होती. पण सकाळच्या
सौंदर्याची टवटवी, आद्रेता आणि साक्तिवकता आतांच्या सौंदयीत नव्हती.
सूर्यनारायणाने आपळे उष्ण कर आमच्या कानशिलांवर ठेवून आम्हांला
सुचविले, ' पळा आतां ; मुक्काम गांठा.? तिथून मधल्या वाटेने चिपळूण
अवघे अडीच भेळ असले तरी ते अंतर आम्हांला पार्यीच तोडावं लागणार होत.
वाट उताराची खरी; पण खालीं उतरतांनाच तोळ संमाळावा लागतो, हें
विसरण्याजोगे नव्हतें. आमच्यांत दोघे वैद्यकश्याक्ञाचे विद्यार्थी होते. त्यांनी
परशुराम क्षेत्र ३७
८५-०० 2० "०2": “£'“/>. >. >.-“.“></“>““““/>>.">/>."// 2“ *ऱी “४४४ “४” >” “"/१४/४-८/४५/४">५६/१-५००९०५.” ५०2० .“>2“/02-/2९2//"/“...>“7_2 7 ००८/*./”.2.७/०० ४०० करन
चनस्पतीची आपुलकीने विचारपूस चालवली होती. मीद्दी माझ्यापरीने तॅच
करीत होतो. गुंजावेलीचीं गर्भपुटें नुकतीच उकललीं होती. कणेरे अजून
द्विरवींच होतीं. रुमडाचे घड अजून गोडीळा चढायचे होते. काजूच्या ठसलशीत
रक्तपालवावर मोहराचे तुरे अजून डोलायचे द्दोते.
अर्ध्या डोंगरांत आल्यावर डाव्या द्वाताळा काळ्या कड्यावरून उडी घेणारा
एक क्षीण, पसरट जलप्रपात आमच्या नजरेस पडला. तो प्रपात ह त्या डोंगराचे
वैभव होतें. जणं तो परशुरामाचा रुद्र प्रताप अनावरपणे धोधावत होता. ज्या
दरांत तो जलसंघात कोसळत होता, ती भयावद्द वाटत दवोती. ' सवतसडा
म्हणतात तो हा बरं का! श्री, ओक म्हणाले. त्याची दंतकथा त्यांनी आधींच
आम्हांला सांगून टाकली होती--
: एका पुरुषाच्या दोघी बायका. अर्थात् थोरढी नावडती आणि शाकटी
आवडती हं ठरलेळूंच. दोधी वरून गोड बोलत; पण आंतून एकमेकींना
पाण्यांत पह्मत. एक दिवस कशाकरितां तरी त्या दोघी मिळून या सदढ्यावर
आल्या. त्या वेळीं थोरली धाकटीला म्हणाली, “ ये, तुझी वेणी घालते. !
धाकटी तिच्यापुर्ढ पाठ करून बसली ; पण थोरलीचा केस विंचरणारा हात
थरथरत असल्याचें पाहून तिला अंदेशा आला कीं, द्विच्या मनांत कांह्दी तरी
काळेंबेरं आहे. ही आपल्याला कदाचित् लोटूनद्वि देईल. धाकटी तरी किती
विचक्षण पद्दा. झटकन् बाजूला व्हायचे त॑ सोडून तिने आपल्या ढळत्या
पदराची आणि तिच्या रुळत्या ओच्याची तिळा नकळत पक्की गांठ मारून
टाकली. थोरलीनें पेड वळतां वळतां दोन्ही हातांनी एकदम तिळा खाढीं
ढकलले. पण झालें मात्र ' इंद्राय तक्षकाय स्वाद ! ' पडतां पडतां दोघांचा
हुदयमेदक चीत्कार उठला आणि तो जलप्रपात त्यांच्या आत्मघातकी
मत्सराबद्दळ एकदां खदखदून हइंसला, '
४ तुळजा भवानी
५८५४५५४ ५/५४४/५-/५-५५ ५८५५-८५. ५ ४८"५-€४-४-४४४-/४/४-४५/ * ०५/४५/५५५४”
ननन-------।प---सॅशशणणटॉशकिप?से१िॅ0१िॅ१ि१फि२प? 0? १ी?0?२0१ि?२0३?९?"?""ॅसॅ१?१॑ि१?१?0?णण0१?0र
रावणाने सीतामाईंचा अपद्दार केल्यानंतर रामरायाचा अवस्था अत्यंत
करुणास्पद झाली. ' द्दा साते, दह्या सीते) असा विलाप करीत तो देडकारण्यांत
म्रमू लागला. आदिमाया पार्वतीळा रामाचे दव देन्य रूचळें नाही. ती शिव-
शेकराला म्हणाळी, ' पूर्णपर्रह्म म्हणून तुम्ही ज्याचें ध्यान करतां तो पुरुष
किती सामान्य मानव आहे तें पाहून घ्या एकदां. बायको नाहीशी झाली
म्हणून पुरुषाने काय इतके दीनवार्णे बनावे £' सदाशिव गंभीर होऊन
तिला बोलला, ' देवि ! माझ्या रामाचे तत्व तुला आकलन होणार नाहीं.
रडला, कढला तरी तो आनंदकंद परमात्मा आहे. मानवदेह धरल्यामुळे तो
मानवी भावनांचे खेळ दाखवतो इतकेच. ' त्यावर पार्वती पुन्हा म्हणाली,
६ ठीक आहे. मग मीद्दी त्याला माझा एक खेळ दाखवते. या खेळांत तो
फसेळ आणि तुमचाही भ्रम दूर होईल.
आणि पारवती लगेच सीतारूप नटली. दंडकारण्यांतल्या यमुनागिरीवर
रघुवीर होता तिर्थ प्रगट झाली, ' सीते55!? या रामाच्या आर्त हवांकेळा
तिने ओ दिली. शेजारीं उभा असलेला लक्ष्मण “सीता आली ' म्हणून
आनंदार्ने उचेबळला. पण रामाने मात्र तिच्याकडे पाठ फिरवली. त्याने
उमेचें हं कोटिल्य तेव्हांच जाणले दोर्त. ती जेव्हां त्याच्यासमोर आली तेव्हां
तो काकुळतीने एवढेंच म्हणाला, ' आई ! कशाला हे भ्रम घेतलेस ! !
पार्वतीच्या हृदयमर्मांला ते शब्द झोंबले. मग निजरूप घेऊन तिन रामाचे
शांतवन केलें. त्याला वरद्दी दिले. जी रामाची छळणा करायळा आली होती
तीच ' रामवरदायिनी ? होऊन लंकेहून परत येणाऱ्या त्याची वाट पहात
त्या पर्वतावर राहिली, तीच तुळजा प्रर्ची जगदंबा. पुराणांत तिला ' तुरजा ?
म्हटले आहे, प्राकूतांत 'र' चा “ ळ' होऊन ती तुळजा झाली. एकनाथ-
महाराजांनीं तिला तुकाई म्हणून संबोधले आहे.
तुळजा भवानी ही उम्या महाराष्ट्राची कुळस्वामिनी आहे. ती मद्दाराषट्राची
तुळजा भवानी ३९
प्राणशक्ति आहे. मद्दाराष्ट्रमद्दीदयाची स्व यंस्फर्ति आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्राची
ती अंबा आहे. आततायी असुरांची ती चामुंडा आहे. भक््तजनांची ती
माउली आहे आणि भरांत-अनाथांची ती साउली आहे. ज्याळा महद्दाराष्ट्रांत
जन्म घेतल्याचा अभिमान आहे त्यानें एकवार तरी तिच्या पायांशी
गेळेंच पाहिजे.
मकरसंक्रमणाचा पुण्यकाल. साधून आम्हीं तिच्या दशंनासाठी सोला-
पुराहून निघाळों. तुदेवाने सकाळची पहिलीच मोटार आम्हांला मिळाली.
सूर्य त्याच दिवशी उत्तरायणाचे प्रस्थान ठेवीत होता आणि आमची गाडी
पण उत्तरेच्याच रोखार्न चालली होती. सूर्याच्या विरद्ददुःखानं निघणारे
दक्षिणेचे 'निश्थासवायु गाडीत शिरून आमच्या अंगावर कांटा आणीत
होते. सोनेरी सूर्यकिरण शेतांच्या अगावरची धुक्याची दुलई इळकेच वर
करून त्या रोप्ट्यांना ' उठा उठा हो सकळिक म्हणत होते. दंवाने
न्हाळेलीं कणसं वाऱ्यावर झलत होतीं आणि त्यांच्यावस्ची पांखरेंद्दी त्यांच्या-
संगे डुलत होतां. गाडीच्या घडघडाटानें रस्त्याच्या कडेचें एक मिर भुरेंदिशी
उडाळें खरे; पण तें रिकाम्या चोचीने खात नव्हे. त्यांना आपल्याबरोबरच
घरट्यांतल्या अजातपक्ष पिलांचीही काळजी होतीच.
थोड्या अंतरावर डाव्या हाताला एक जलाशय दिसला. चौकशी करतां
कळलें कीं, सोलापूर शहृराळा जीवन देणारा हिप्परग्याचा तलाव तो हाच.
कासव खुर्षींत आळा कीं जते पाय पसरतो तसे त्याळा कांही फांटे फुटले
आहेत. ते सगळे जमेस घरून हिशेब केला तर त्याचा दह्या मेलांचा घेर होईल.
सोलापुराहून तुळजापूर पंचवीस भेळांवर आहे. निजामी राज्यांतल्या उस्माना-
बाद म्हणजे पूर्वीच्या धाराश्यीव या जिल्ह्यांतळ ते॑ एक तालक्याचें ठिकाण
आहे. आमची गाडी दीड तासांत तो मार्ग क्रमून बाढाघाटाच्या चढणीला
लागळी, घाट चढल्यावर लागणाऱ्या पहिल्याच पठारावर तुळजापूर
वसलं आहे.
एका धर्मशाळेपुढे गांडी उभी राहतांच क्षेत्रोपाथ्यांनी आम्हांला वेढले.
त्यांपेकी आमच्या नक्षिबाला आला तो उपाध्या आम्ही पतकरला आणि
दोन हजार फूट उंचीवरचें अधंचंद्राकार वसलेले ते गांव पहात त्याच्यामागून
४० तीर्थरूप महाराष्ट
निघालो. गांव लहान असले तरी इथें सामेंटचे रस्ते आहेत. वीज खेळविलेली
आहे आणि नळही आणलेले आहेत
मिठाई आणि कुंकू, फुळें घेण्यासाठीं बाजारांत येतांच तांदूळ, गहूं, वगेरे
अन्नधान्ये टोपलीत भरून उघड्यावर मांडलेली दिसली. मला क्षणभर असा
भास झाला कीं, कुठल्या तरी उच्च लोकांत आपण सदेह येऊन पॉचलों
आहो. थोडे खालीं गेल्यावर मंदिरप्नाकाराचा पहिळा अधवट उभारलेळा
दरवाजा दिसला आणि त्यापलीकडे देवीचे शिखरही डोळ्यांत भरू लागलं.
एकेक पायरी उतरत आम्ही देवीचे आवार जवळ करूं लागला.
उजव्या हाताळा एका दगडी मंडपाखालीं कठड्यावर बसून स्नानाचा
संकल्प सांगणाऱ्या भस्मभूषित भटजींनी क्षणभर आपल्या गिऱ्हाइकांकडे
दुलंक्ष करून आम्हांला हटकले. ' या, इकडे या, इथं गोमुखतीर्थ आहे.
आम्ही' सोलापुराहून स्नान उरकून आलेले असल्यामुळें आतां त्याच
आन्हविकाची पुनरावृत्ति करण्याची आमची तयारी नव्हती. ' ज॑ फल स्नानाला
तेंच मार्जनाला ' हा अपवादनियम आम्हांला तोंडपाठ होता. यात्रेकरूला
एवढें तारतम्य ठेवार्वेच ळागतें. त॑ न ठेवतां तो जर प्रत्येक तीथीत आणि
कुंडांत बुचकळ्या मारूं लागेळ तर त्याळा दुसऱ्या क्षेत्रांत जाण्यापूर्वी
रुग्णालयार्चाच मार्ग धरावा लागेल,
त्या ओल्या पायऱ्या जपून उतरत आम्ही कुंडांत प्रविष्ट झालां. पोटरी-
एवढी जलधारा एका गायमुखांतून दीड पुरुष उंचीवरून तिथे ओतत होती.
त्या धारेखाली उर्भे राहण्यासाठी बऱ्याच मंडळींचे ' मी आधी का तूं आर्धी?
ऱ्चाळळें होत. आम्हांला पाहून त्या सवीनींच बाजुला होण्याचे दाक्षिण्य
दाखविलं आणि आम्ही ' अपवित्र: पवित्रो वा-? या मंत्रार्ने मस्तकीं मार्जन
करून तिथून दूर झाला. आमचा उपाध्या सांगूं लागला, * हा साक्षात्
गंगेचा प्रवाह आहे. ' आम्ही जिजासा दर्शवितांच त्यानें आम्हांला एक
जुनाट कथा ऐकवली.
“£ गरीबनाथ नांवाचा एक साधु इथे देवीची सेवा करून राहत होता.
भक्तीला भाळून भवानी त्याच्याशी बोले. संसारांत काय, किंवा परमार्थात
काय, माणसाला हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागण्याची खोड फार.
तुळजा भवानी ४१
त्याला वाटलें की, आपण काशीयात्रा करावी. देवी त्याळा म्हणाली, ' कशाला
एवढी पायपीट करतोस! इथल्या गोमुखांतून वाहते ती खुद्द गंगाच आहे. '
पण त्याला तें कसें पटावे ! माणूस ' देव देव ? करतो ; पण देवाच्या इच्छेची
मात्र तो कद्र करीत नाही. गरीबनाथ तरी त्याला कुठून अपवाद असणार?
त्यानं पडशी खांद्यावर टाकलेली पाहून देवीनें त्याच्या हाती एक ढिंदू आणि
एक वैताची छडी देऊन म्हटले, ' काशीला जाशील तेव्हां या दोन वस्तु
गंगेत टाक. ? त्यानें तेवढं केळे. यात्रेहून परत आल्यावर गोमुख तीर्थाखाली
ओंजळ धरतो, तर तेंच लिंभू भाणि तीच छडी त्याच्या हातांत --
लोककथा मोठी मार्मिक आहे यांत शेका नाहव. सांगणारे ती यात्रेकरूंना
पटावी इतक्या भाविकपणें सांगतात खरी ; पण त्याना ठाऊक असते कीं, या
तीर्थांचा उगम वरच्या महंकावतीच्या तळ्यांत आहे आणि तळें आटले तर
द्दी धारी खुंटते. समोरचे दुसर लंबचोरस कुंड तर खुद्द सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाने
आपल्या चारी ह्वातांनी खोदले. त्याला “ कळोळतीर्थ ' नांव कां तर त्यानें
पाचारण केल्यावर विश्वांतल्या सकळ तार्थानी तिथें कलोळ केला म्हणून.
दोन्ही तीर्थांच्या मधून जाणाऱ्या वाटेने आम्ही मंदिराच्या प्राकारांत
उतरलो. दिवत चढत असला तरी तिथे वृक्षांच्या छायेनं गारवा राखला होता.
४२ तीर्थरूप महाराष्ट
न तापतांच आम्ही त्या तरुच्छायेचें ' निवीण ' उपभोंगळं, पुढचा ठेंगणा
दगडी सभामंडप ओलांडून आम्ही मध्यमंडपांत प्रविष्ट झालो. आम्ही तिथें
काळ्या फरशीवरून चालत नव्हतां; तर चांदीच्या चकचकीत रुपयांवरून.
अंबिकेच्या धरी लक्ष्मी भक्त-भाविकांच्या पा्यांतळीं लोळत होती. धानिकांनी
अधिक धनसंपदा मिळविण्याच्या आकांक्षेनं देवीच्या वाटेवर त्या रोप्यमुद्रा
खिळवल्या होत्या.
तिथल्या संगमरवरी सिंहाच्या मार्ग उभा राहून मी समोर पादद्ता तर गर्मा-
गारांतळें सिंद्दासन रिकार्मे. मनांत म्हटले काँ, देवी मळा पाहून एकदम अद्य
झाली कीं काय? मी दशनाला पात्र नाही अते जगदंबेला वाटलं कीं काय!
पण एवढ्यांत उपाथ्याने मळा उजव्या हाताला वळवले. भवानी तिथल्या
दायनरमॅदिरांत पर्यकावर पहुडून निद्रासुख अनुभवीत ह्वोती. दर्शन घेणारे
ळोक त्याच बाजूला जमत होते. आम्हीद्दी त्यांतून पुढे झालो. अंबेपुढें
नतमस्तक होऊन भी नमस्काराचा कोक म्हटळा--
“ यभुनाद्रिळतावासां योगेनीवन्दसेविताम्
भक्ष्ताल्हादकरी दाकितिभस्वां देवी नमाम्यहम ”
देवीचे मुख तेवढें उघडं होते आणि बाकीचे सर्वोग दुल्यांच्या खाली
झांकलेळें. निजलेल्याची झांपमोड करणें हें आमच्या नीतिह्यास्रांत पाप गणलळें
आहे. त्यांतून ही तर चंडिकेची निद्रा. मीतमीतच आम्ही तिच्या पांघरुणांना
कुंकू-फुळें वाहिली, नैवेद्य-दाक्षिणा ठेवली. पुजाऱ्यानें दिळेळा प्रसाद घेतला
आणि तिथून दूर् झाला.
वर्षातून तीन वेळां इथें देवीची निद्रा असते. चार प्रहरांची नव्हे ; तर
चांगली पांच ते आठ दिवसांची. भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावास्या हा
पहिला दयनकाळ. आश्विन शुद्ध एकादशी ते पौर्णिमा हा दुसरा आणि पोष
शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी ह्या तिसरा, इतर सर्व काळी ती अष्टौप्रहर जाग्रत
असते. अहोरात्र भक्तांची गाऱ्ह्मणीं ऐकत रहाते. निद्रेच्या आर्धी आणि
जागात आल्यावर तिला अजापुत्राचा एकेक बळि लागतो. इथली नवलपरी
अशी की, स्थापित मूर्तिच उचळून निजवतात आणि तीच पुन्हा तिह्ातन-
तुळजा भवानी ४३
र*-“ ४-७ ४५४-0
वर चढवतात. इतर ठिकाणीं असले भोगोपचार उतल्सवमूतीला करण्याची
वहिवाट असते.
जगदंबेची श्रीमूर्त गंडकी शिळेची आहे. उजव्या अंगाळा वनराज सिंह
आहे. शिवाच्या चार भुजा तर अंबेच्या आठ. डाव्या उजव्या स्कंधावर
चंद्र-सूर्य विसावळे आहेत. सहा हातांत आयुधे आहेत. सातव्या डाव्या
हातांत महिषासुराची शेंडी आहे. आठव्या उजव्या हाताने त्याच्या बरगर्डींत
त्रिशूळ खुपसलेला आहे. टाचेखाली रेञड्याचं घड आहे आणि चरणांजवळ
: अनुभूती * नं मुर्कुड घातली आहे.
4२५४१६०४०७
अनुभूति ही कर्दम ब्राह्मणाची भार्या. ती पतिसेवापरायण होती. तिने
आपल्या संसारांत स्वर्ग उतरवला होता. पण अचानक एके दिवशीं काळाने
तिचें सौभाग्यमाणिक गिळळें. तिनें सतीचे वाण उचलले. जिभोळ्या
चाटणाऱ्या चितासीछा आपली कोवळी काया ती समर्पण करणार एवढ्यांत
आकाशवाणी झाळी, ' तान्ह्या बाळाच्या आईला सती जाणें वर्ज्य आहे! '
निरुपायानें तिळा झोंकलेळं अंग मागे ध्यावे लागळ. पुढे याच यमुनाचळावर
ती जगदंबेची आराधना करीत राहिली. प्रद्दरान् प्रदर ती ध्यानमस़ असे. रोज
तिचा बाळ तिचें ध्यान मोडायचा. पण त्या दिवश्या त॑कुक्कुर देत्यानें
मोडलें. तो तिच्या रूपावर पतंग झाला होता. तिचे नाजूक हात त्या बेभान
देत्याळा दूर लोटायला असमर्थ होते. तिनें देवीला टाहो फोडला. सारध्वीचे
मरण सतीने जाणले. सायुध, सश्क्तिक अष्टभुजा तिथें प्रगटली आणि कुक्कुर
देत्याळा प्राणांनी प्रायश्चित्त कराषे लागलें.
अष्टमुजेचे इंच पाषाणमयरूप आपादमस्तक मला पहायचे होते. पण
माझ्या मंदभाग्यानें मी तिच्या निद्राकाळांत तिथें पोचला होतो. “ देवीचे
दर्शन घेतलें का! ' असा कोणा प्रश्न केल्यास ' होय ' असें यथार्थ उत्तर मढा
देतां येणार नाहीं, आणि त्यावर ' समुद्रांत जाऊन कोरडेच कीं ' असा जर
त्यानें टोमणा दिला तर मी काय बोलणार त्याच्यावर?
देवीची नित्य पूजा दिवसांतून चार वेळां होते. पहांटेस पुजारी येऊन
देवीचे श्रीमुख आणि करचरण पुसतो. तॅच वस्त्र नंतर भक्तांच्या हातावर
४४ तीर्थरूप महाराष्ट्र
पिळले जातं. जे चार थंब ह्वातावर पडतील ते देवीचे ' चरणतीर्थ म्हणून
भक्त प्राशन करतात. लगेच देवीला भाजीभाकरीची न्याह्वारी होते.
दुपारी महापूजा होते. इथळे पुजारी मराठे आहेत. पंचामृताच्या वेळी
दह्या-दुधाचा भांडीं देवीच्या मस्तकावर ओततात. नंतर शुद्दोदकाने स्नान
घालतात. भाली चंदनाचा मळवट भरतात. मस्तकी हळद-कुंकू वाहतात.
हृदयावर बुक्का उधळतात. नंतर आरती-महानेवेधय होतो. सायंकाळी
धूपारती आणि रात्री प्रक्षाळण.
इथे एक गमतीची चाळ आहे. महापूजेच्या वेळीं साह्वित्य घेऊन पुजारी
देवळांत आळे की जामदार देवळाच्या पश्चिमद्वाराकडे उभा राहून
मोठ्यांदा ललकारतो--
6 पुजारी आले हो 5५! लोकर या ५५! ”
हे खुद्द जगदंचेला आवाद्दन असतें. खालच्या डोंगरघळींत ती दीर्घ साद
घुमत घुमत जाते. तिथें उभं राहिळे की, डोंगरांची लांबच्या लांब ओळ दिसते.
तिथून वर येण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. थकलेल्या माणसाला दमछाट
करायला मध्ये मध्ये विसावेही आहित. याच बाजूला एका काळीं रणछोडभारती
या सत्पुरुषाचा मठ होता. देवी सारीपाट खेळण्यासाठी त्याच्या आश्रमांत
मंदिराची पश्चिम बाजू
लुळजा भवानी ४५
बळय०० ७०००१ क ०० उक “रीच क? आ” ७४१९७० २४० भोक? कॅ”? क प” विक” जक” च ४*१ ७००१५७० ७४४४९. कॉस्सि” अकॉ” कक ०४०७४ चक कॉ” १४३७” ०७४४४७४ ३७४१७७” ७५ ७४ क” ७/”३७ क” ७५” ७४७४ क्क” ४” ७४७०४७ ७४७ ४७ ७४
““/९०/०-९०/०-/-००/५/५०/-.००५-/५००-/.> “र
जात असे आणि ' पोबारा, वांकडे तेरा ) करतांना तिला वेळेचे भान राद्दत
नसे. तिनें हारजीत खेळून केंव्हा तरी अकाली मंदिरांत यावें तो. पूजा-महा-
नैवे आटोपलेळा. पुन्हा दुसऱ्या दिवशीद्दी तसेच. खेळाचा छंद सुटेना आणि
अन्नाची गांठ पडेना. तिला भरल्या मंदिरांत उपास घडू लांगळे. तिने पुजाऱ्याला
दृष्टांत देऊन आपली स्थिति कळवली. पुजारी म्हणाला, “ माझ्याकडून कसूर
नाहीं. मी अगदीं डोळे मिटून नेवेद्य दाखवतो. ' तिनें मग तोड सुचविली,
“ आजवर झालें ते झालें. उद्यांपासून पूजेच्या आधीं मला “ कुकारा ?
घालीत चला. ”
आणि त्या दिवसापासून द्दी चाल पडली ती अजून कायम आहे. सहसावधि
वषीच्या परंपरा राखण्यांत भारताचे वैशिष्ट्य असळें तरी याच वृत्तीतून
गतानुगतिकत्वही पैदा झाळे आहे है वितरतां कामा नये.
"३ €._ > &€_
तुळजा भवानीच्या सेवेसंबंधी ज्यांना नित्यनेमित्तिक अधिकार आहेत त्यांची
हुद्दयांचीं नांवें वाड्ययांत आणण्यासारखीं आहेत. पहिळा बजाजीबुवा. यानें
कवाडे उघडायची आणि लावायची. येतील तेवढे नेवेद्य दाखवायचे आणि
नंदादीप संभमाळायचा. चिलोजीबुवा म्हणजे इंगाराध्यक्ष. देवीचे दागदागिने
आणि पाटावें, क्षीरोदर्क इत्यादि वस्रसंभार त्याने संभाळायचे, जगदंबा ही
स्त्री असली, नागाविराजाची कन्या अतली तरी ज्या दिवशी भस्मोद्धूलन
करणाऱ्या वीतराग शिवाला वरायर्च तिने ठरवले त्याच दिवशी अलंकारांचा
हव्यास सोडून ती साधीसुधी बनली, पण तिची दोस भागली असली तरी
भक्तांची राहिली होती ना. त्यांनीं तिळा रुमझुमत्या नूपुरापासून झळाळत्या
किरीट-कुंडलांपयेत सर्व प्रकारचे अलंकार समर्पिळे आहेत, इथल्याच लिंगाप्पा
नाइकानें दिठेल्या रत्नजडित मुकुटाचें मोळ लाखांच्या भार्षेत बोलावे लागेल.
नथच नुसती पंचवीस हजारांची आहे. वाकोजीबुवा म्हृणजे आमच्या
कोकणच्या भाषेंत ' पाणियाळा ?. पाणी पुरवर्णे हे त्याचें काम, देवळांत
६ द्वीपत्कार !ही तोच करतो. पळंगेबुवाकडे शेजघर, चवऱ्या;, मोरचेलें यांची
व्यवस्था असते आणि झाडपिडेबुवाने झाडणे, तण-काडी काढणे ही स्वच्छतेचा
कार्भ करायर्ची असतात.
मंगळवारी रात्रीं छबिना निघतो. देवीच्या डाव्या हाताच्या ओवरांत त्या-
४९ तीथेरूप महाराष्ट्
९.” ४.”
*../५.//%-””*”
साठी सिंह, नंदी, गरुड, दंत, मयूर इत्यादे लांकडी रंगीत वाहने तयार
असतात. त्यांपैकी एखाद्या वाहनावर देवीची अंबारी चढते. प्रदक्षिणा सुरू
झाली कीं संबळ वरैरे वार्ये वाजतात. भुत्ये पोत घेऊन नाचतात. मग
आराध्याच्या अंगांत देवीचा संचार होतो. त्याने घुमर्णे सरू केळे कीं भक्त-
मंडळी प्रश्नोत्सुक द्वोते. ' आई जगदंबे! पाणकळा कधी होईल! तोही मग
६: गळेल तेव्हां कळेळ रे 55! ' अशा थाटाची उत्तरे देऊं लागतो.
इथला सवोत मोठा उत्सव नवरात्राचा. प्रतिपदेच्या दिवशी गांवचा कुंभार
तीन घागर्री आणून गोमुखतीर्थाजवळ ठेवतो. अधिकारी सेवेकरी जमून मग
वाजत गाजत ते घट खालीं आणतात. पहिला घट समामंडपांत इंशान्येला
स्थापायचा. दुसरा देवीसमोर जे शिवमंदिर आहे त्याच्या मागच्या त्रिशूळाच्या
ओवर्रांत बस्तावायचा आणि तिसरा त्याच आवारांतल्या मातंगीच्या मादरांत.
नंतर सप्तशतीचे पाठ आणि नवचंडीचं हवन सुरू होतं. त्यासाठीं देवीच्या
समोर एंक मोठें होमकुंड बांधूनच ठेवलें आहे. खड्गनवमीस पूर्णाहुते होते.
तेव्हां बकऱ्याचें शिर घडावेगळें करून ' असर्ये स्वाहा ) करतात.
दसऱ्याच्या रात्री देवी शिलंगणाला निघते. त्या वेळी मृर्तीच्या अंगा-
भावती कापडाची दिंडेंच्या दिंड गुंडाळतात आणि त्यावर वस्त्राचा पिळा
करून आवळून बांधतात. लोटलेल्या जनसागराच्या ळाटांत मूतीला इजा
पोचू नये म्हणून अशी ही खबरदारी घेण्यांत येते. पाळखी निघाली कीं
अगणित मुखांतून ' उदो, उदो ' चा उच्चैघोष उठतो. नगारा, तास, संबळ
ही रणतुरें झड लागतात. ' नाद कांदळे अंबर ? असे होतें. गिरिशिखरं आणि
दरेदरकुटे नादमय, घोषमय होतात. वन्य श्वापदांना चळकंप सुटतो. दिवे,
दिवट्या, पोत यांनीं जणुं त्या सगळ्या डोंगराचाच त्रिपुर पाजळतो. लोकां-
कडून मुक्तदस्ताने पालळखीवर कुंकवाची उधळण . सुरू होते. भूमीवर
त्याचाच दाट थर जमतो. वातावरणांत त्याचेच कण तरंगू लागतात.
पालखीच्या जवळपासचे लोक आत्तांच एखाद्या कुरुक्षेत्रारून आले
आहित कीं काय असे वाटतें. सवोच्या नाकांत, तोंडांत, पापण्यांवर एकच एक
पदार्थ आणि तो म्हणजे कुंकू. बायका-पुरूष सगळे देहभान हखून त्या
मिरवणुकींतळा अद्भुत रस्त घोटतात. उत्तर रात्रीपर्यंत ही धुमाळ चालते
आणि देवी परत मंदिरांत येते.
तुळजा भवानी ४७
“७७ >” ०४४५५८४ ५८८४५ ४४५५०७०७०० ०” ०४०४० -”५/-८४/५४” ४४४५५” “->५/५”-४/८/००४/५”८”-/०/५०”२४"-/-2//>०7>.>.”.».>»>»>“</>>/४५/->/०४७४५ “>” १०-2४“
भक्तमंडळी तुळजापुरी दर्शनाला येतात, त्यांपैकी बऱ्याच लोकांचे नवस
फेडायचे असतात. कोणत्या तरी आपत्प्रसंगी ते केळेळे असतात. नवस
म्हणजे आतं अथवा अर्थाअर्थी भक्ताने देवाशी केलेला एक प्रकारचा सोदा.
यांत देवाकडून आर्धा ' कोहळा ? घ्यायचा असतो आणि त्यानें तो दिला
तरच मग त्याला आपला ' आवळा द्यायचा असतो. पण नुसता नवस म्हटल्याने
अलीकडच्या पिढीला त्यांतला तपशील कळायचा नाहीं. मानवी मनाचे
सौंदर्य, ओचित्य, आचरटपण, अधोरीपण यांचे निदरशंन या नवसांच्या
प्रकारांवरून चांगळं होऊं शकेल.
पंचामृत आणि ओटी भरणे हा इथला सर्वसामान्य नवत्त. मग कोणाची
डोटांगणे असतात. कोणाला लिंबाचे टाळे नेसून पूजा-प्रदाक्षिणा करायची असते.
कोणी नवससायासार्ने पुत्रवती झालेली नारी देवीला पाळणा खेळणा बांधते.
कोणी सौभाग्य चिरंतन होण्यासाठीं वेणीदान करतात. कोणी स्त्री बांक्या
प्रसंगी म्हणते, ' अंबे भवानी ! माझं कुंकू राख, मी तुझ्या दारी कुंकवाचा
सडा घालीन, ?
“ नवस मां केला । अंबाबाईला कमळ
परदेशी तूं सांभाळ । उषाताईला
आई अंबाबाई । खण नारळ ग तुला
राख माझ्या कुंकवाला । जन्मवेरी ”
तपस्येच्या बळावर अविनाशी सोभाग्य मिळवून बसलेल्या जगदंबेकडे
स्त्रियांनी अक्षय चुडे मागायचे नाहींत ; तर दुसऱ्या कोणाकडे ! कोणी
देवीवरून कोंबडी उतरतात. आपले पोटचे मूळ वाहण्याची सुद्धां एका काळीं
प्रथा ह्वोती. असे अनेक प्रकार आहेत.
मंदिराच्या दक्षिणेत ' येमाई ' देवी आहे. गोंधळी हे तिचे उपासक,
ते तिच्या ओवरींत बसलेले असतात. तुळजापूर्चे ते प्रमुख वतनदार
आहेत. पूजेच्या आणि छबिन्याच्या वेळीं संबळ वाजविर्ण आणि यात्रेकरूंचा
गॉंघळ घाळणे हँ यांचे काम. गोंधळी हा शक्तीचा 'प्रस्तोता? आहे. तो
इतिह्ासकाळांतला सूत-मागध आहे. शिवाजीमद्वाराजांच्या काळी स्वातंत्र्य-
लढ्ष्मीचा ' उदे, उदे ' यानेच केला. तुम्हांला गोंधळ पहायचा असला तर
चढा माझ्यासंगें उपाध्याच्या घरी, तो पहा त्याने गव्हाच्या पुंजीवर घट
8८ तीर्थरूप महाराष्ट्र
मांडला आहे. वर जोंधळ्याच्या घाटांचं त्रिकूट उभें केळं आहे. तो आतां
मद्दाराष्ट्रमंडळांतल्या देवांना गोंघळासाठीं आवाहन करील. ताथीदाराचें
तुणतुगे ' तुंई तुंई ' बोलत त्याळा अनुमोदन देईल. तिसऱ्याच्या गळ्यांतला
संबळ कडकडेल. चोथा नाइकाच्या माषणाला ' शेव ' ढावीत अधूनमधून
विनोदाचे तुषार उडवील.
मलमली'चा अंगरखा, वर जाकिट आणि डोक्याला पॅचाचें बसके पागोटे
घातळेला, कललेंदार मिद्यांचा नाइक, खांद्यावरचे चुर्णांदार उपरणें सांवर्रीत
आतां तुम्हांला एखादी बहारदार लोककथा ऐकवील. समरप्रसंगांनी खच्चून
भरलेली आणि अदूभुत रसांत न्हाळेळी, हरणावती, निळावंती, चंद्रगुजरी या
आणि अक्वाच लवत्या लचकत्या नाइका तुम्हांला तुमच्या विदग्ध वाच्ययांत
भेटणार नाहींत. या लोककथा म्हणजे गोंधळ्यांच्या जिह्ाग्री पिढ्यानपिढ्या
नटनाच करणार निरक्षराचें अक्षरवा्यय आहे. जो रासेक असेल तोच त्याची
ऱचव चाखील
एकनाथमद्वाराजांच्या घराण्याचीही जगदंबा हीच कुलंदेवी,. नाथ हे
जातिवंत कावि, जनतासंबंध राखणारे कवि. गोंधळ्यांचें पाहून त्यांनाद्दी सवतः
गोंधळ घालण्याची स्फूति झाली. त्यांनी आपल्या जीवींच्या विठाईळा अंबेशीं
एकरूप करून गोंधळ मांडला. त्यासाठी त्यांनी त्रेळोक्याचा मंडप उभारला.
वर चारी वेदांचा फुलवरा बांधला. शास्त्र-पुराणांना साथीला बोलावले.
पुंडाढेकाच्या हाती दिवटी-बुधळी दिळी आणि मग एकदम पुढे होऊन
त्यांनी अंबेला ह्ाकारलें--
“ गांचळा ये बो जगदंबे
विढाबाई तूं मूळस्तंभे ”
त्या भक्तराजाची साद काय नुसती वाऱ्यावर विरेळ ! देवी तत्क्षणी
प्रगटळी, पण ती अशी रुद्र, उम्र कां दिसते ! कां म्हृणजे ! तिळा महिषासुर
मदायचा आदे.
५ मोहमदिषाचा करावया घात
अंबा कडकडोनि दांत खात
तो धाकेंचि निमाला निश्चित
पूर्णानंद प्रगटला ”
तुळजा भवानी ४९
५./% ४ ५/४६ /./ ५./४./१ /'./१..//९..%_./४५ /४_.”९..४_ /४..*१./..५१ १९ /”५.”९..”* ४..””४५.//%५.”४..”.५.”९.५/४ «४४.१५... १./४/४/५//५/५/५/ ७४४४ ७४१ “००.०९ ./१ ९५०९ 6०.५”. ५९ “९
देवीने पुराणकाळीं देत्य निर्दीळळे खरे; पण ते आतां लिंगदेहानें
माणसाच्या हृदयांत शिरून बसले. जनांत होते ते मनांत आले. तो मोहाचा
महिषासुर. ते काम-क्रोधांचे शुंभ-निशुंभ. तो अहंकाराचा मुंजा. तो दंभाचा
झोटिंग. त्यांचा पुरता निकाळ लावायचा तर अंबा पुन्हा प्रगटली पाहिजे.
तुळजापुरांत नव्हे ; तर प्रत्येकाच्या हृदयपुरांत. पण त्यासाठी कांद्दी साधना
करावी लागेल. मन चोखाळ, निर्मळ करावें लागेल. भूतमात्री प्रेम, विश्व-
मंगलाची आकांक्षा, पापाने हात-ताँड काळें होऊं नये याची दक्षता आणि
त्या दयामयीवर नितांत श्रद्धा दवी लेणी जर तुम्ही ल्यायिलळी असतील तसच
ती अवतरेळ. तिच्या खागतासाठीं तुम्ही सद्मावनांचे मखर बांधू लागळांत
हे दिसलं कीं तेवढ्याने ते अंतःशत्रु आपलें ठाणे उठवती ल,
जगदंबा म्हणजेच दाक्ति. जेव्हां जेव्हां देस्य उन्मत्त होऊन जगाचे काळ
झाले तेव्हां तेव्हां ती अनेक रूपांनी प्रगटली आहे. ' एकच माउली दहा
अवतार खेळली ? असता नाथांचा निर्वाळा आहे. या शक्तीची आराधना
भारतांत फार प्राचीन काळापासून सुरू आहे. भारतांतच कशाला ; अन्य
देशांतसुद्धां. आशियामायनर, मिसर, फिनोरोया या देशांतळे लोकह्दी एका
काळी शक्तिपूजक होते. आपल्या जगदंबेने [संह हे वाहन म्हणून स्वीकारले
आहे. ईंजिप्तची प्राचीन देवता ' सेखेट ! ( 5८120) ही सुद्धां तिंद्वाधि्टितच
आहे. सेखेट आणि शक्ति यांतळं वणेसताम्यद्दी लक्षांत घेण्याजोगे आहे. सीरियन
ळोक ज्यांना विश्वाची मातापितरं मानीत तीहि आपल्या पार्वती-परमेश्वरा-
प्रमाणेच सिंह आणि नंदी याच वाहनांवर आरूढ होता. हायरापॉलित्
( ाटा'9७०115 ) येथील सुप्रसिद्ध वेदीवर ' हायरा' आणि 'झेऊस "या
दोन देवतांचा जोडपुतळा आहे. त्यांतद्दी द्वायरानें सिंह्याचा आधार घेतला
असून झेऊस वृषभवाहन आहे. रोमन स्मारकांमध्येंद्दी देवीची चिर्ज़े आणि
तींह्वी तिंद्दसनाधिष्ठित अशशींच आढळतात.
जगदंबेचा उगम शोधायचा तर आपल्याला वेदकालापर्यंत जावें लागेल.
क्वग्वेदांत ती आदितीच्या रूपानें वावरतांना दिसते. तिथें जे आदितीचे स्वरूप
कल्पिळें आदे, तें अतिभग्य आणि महदहिव्य असतं आहे. ' आदिति द्युलोकांत
वास्तव्य करते. अंतरिक्षांतद्दी तिचा संचार आहेच. विश्वाची माउळी तीच
ती. म....२-४
७५० तीर्थरूप महाराष्ठर
आहे. ती भजकांना पापपंकांतून उद्धरते, ती आपल्या अपत्यांना सगळें
कांही देते, भूत-मव्य सर्व कांही तीच आहे.-? तिच्या सामथ्याविषयी वैदिक
श्र्षींची बळकट श्रद्धा आहे.
ह्या 1 ।
“ अदितिन उरुष्यत्वदितिः शर्म यच्छतु
1 |
आदितिः पात्बंहसः ”
६ अदिति आम्हांला वृद्धिंगत करो. ती आमचें कल्याण करो, तीच आमचें
दुरितापासून रक्षण करो? अशी एका क्रषीची प्रार्थना आहे.
अदिति म्हणजेच परमात्मशक्ति. शाक्ते आहे म्हणूनच परमात्म्याला
परमात्मपण आहे. इच्छा, ज्ञान, आणि क्रिया या तीन स्वरूपांनीं ती विश्वांत
प्रगट होते. शिव ह तिचें अधिष्ठान. शिवाहून ती अभिन्न आहे, पण शिव
एकरूप तर शक्ति अनेकरूप. शिव एकरस तर शक्ति अनेकरस., शिव अनंग
आहे, “ निकवडा ' आहे आणि जुनाट जुगादीचा वृद्ध आहे. याच्या उलट
शक्ति सांग आहे, समर्थ आहे आणि नित्यतरुण आहे. खुद्द शिवार्नच तशी
कबुली दिल्याचं ज्ञानेश्वर सांगतात. शिवांतून शक्तीचा प्रादुर्भाव झाला कीं
लगेच चोदा भुवनांची उभारणी होते. जीवसृष्टीचा पसारा मांडतो. चारी खार्णात
नाण्यांची टांकसाळ सुरू होते. ही नामरूप निर्माण करते. गुणांचा चाळढाळ
हीच करते. शिव अकर्ता, अभोक्ता, उदास; पण ही पतिम्रता त्याला सर्व
भोगवते. त्याचे नाक, कान, डोळे हीच बनते. त्याचे भाव, त्याचे अवयव
हीच निजांगे होते. हिचे हें अमयांद कर्तृत्व जाणून सांख्यांनीं हिला ' प्रकृति
म्हटलें, ती इंद्रजालळ खेळते, अघटित घटना घडवते म्हणून वेदांती हिलाच
: माया ' म्हणूं ढागले.
हिने प्रथम दक्षाच्या घरीं जन्म घेतला. दक्षाने तिचे कन्यादान करून शिव
जांवई केला. पण सासऱ्या-जांवयांचं बनले नाद्दी. त्याने जो यज्ञ केळा त्यांत
शिवाला हविर्भाग ठेवला नाही. सतीलळा तो अपमान वाटळा. तिनें त्याच
यजमंडपांत स्वतःचा देह योगासींत जाळून दक्षा्शी असलेलं बापाचे नातें तोडून
टाकलें. तीच पुढें नगाघिराज हिमाचलाच्या पोटीं आली. त्याही जन्मांत
क्ृषिमुनींना लाजवणारे तप करून तिनें शीवाचीच जोड करून घेतली. त्य
तुळजा भवानी ५१
दोघांचे पारमार्थिक लस लागलेठेंच होतें. तेंच तिर्न लौकिकांत खर करून
दाखवले. शिव तिला वरून अर्धनारीनटेश्वर झाला. या अलीकिक दंपतीला
मग भक्तजन मायबाप म्हणून शरण गेले. शिवाची पूजा होऊनही शक्तीची
पूजा स्वतंत्रपणें होऊं ढागळी. हळूहळू तिढा प्राधान्य येऊं ळागळें. आपल्या
पंचायतनांत विष्णूची लक्ष्मी नाही; पण शिवाबरोाबर देवीला मात्र स्वतंत्र
स्थान आहे. पुढें तिची उपनिषदे, पुराण, माहात्म्य निर्माण झाली. शकक्तसूर्चे,
तंत्रग्रंथ आणि स्तोत्रकलाप असं बहुविध वाह्मय तिच्या सेवेला सादर झालें.
श्रीयंत्रासारखीं अनेक येत्रे तिच्या पूजेतताठीं कल्पिळी गेली. तिच्याकडून वेग-
वेगळ्या सिद्धि मिळविण्यासाठां ' ऐंऱ्ह्दी छी. ' अशासारखे बाजमंत्र पुढ आले.
दुर्गा, चामुंडा, तारा; कामाख्या, त्रिपुरसुंदरी अशा नानारूपांनी तिचे अर्चन
होऊं लागलें, भारतांत शयाक्तपंथ हळूहळू वाढला, विस्तारला.
>» ८:८/५५/-/५४/१/४५/५./५-/५-/८/५-/१//५८/५//५५/१/"५/”/५/*/५४४५५”५८*/”-/"-* "४
त्यांतच कित्येकांना देवीच्या कृपेसाठी उजू उपचार अपुरे वाटून त्यांनी
वामाचार पत्करला. देर्वांचे उपचार या नांवाखाळीं मदिरा, मदिराक्षी इत्यादि
पंच ' मकारां 'चा परिग्रह होऊं ढागळा. पुढें पुढें हे प्रकार इतकया थराला
पॉचळे कीं, लोकांना या वाममार्गीयांची घणा वाटूं लागळी. छाकटा (शाक्त )
द्दी नीतिभ्रष्ट माणसाला वापरण्याची शिवी बनली. त्यांनी उपानिषदांतलळें
आणि दर्शनांतळं शक्तीचे मंगलोज्ज्वल स्वरूप मलिन करून टाकलें. आज-
मितीस द्दे भ्रष्टाचार नामशेष झाले आहेत ह सुदैवच म्हटलें पाहिजे.
बोद्ध आणि जेन धर्मही शक्तिपूजेला पराड्मुख नाहींत. बौद्धांच्या महायान
पंथांत वज़्वर आणि वज़वाराह्दी यांचं युग्म उपास्य आहे. पूजेअचेंची पद्धतही
आपल्यासारखीच. त्यांची दुसरी विशेष देवता म्हणजे तारा. ओंकाराला ' तार?
अशी संज्ञा आहे. त्याची भार्या ती तारा. तारेची विद्या आहे, तिचें रद्दस्य
आहे. तारेविषर्या त्यांच्या पंथांत विपुळ साहित्य आहे. हीनयान पंथांत देवीला
मणिमेखलळा या नांवाने भजतात. तुफान वादळांतून ती वांचवते अशी त्यांची
श्रद्धा आहवे.
जेनधर्म इंधर मानीत नाहीं. त्याळा तीर्थकर मान्य आहेत. त्याच्या
'चोव्वीस तीथेकराची पूजा-अर्चा हिंदु पद्धतीप्रमार्णेंच ते करतात. त्यांच्या
वीर्थस्थानांत देवीच्या मूर्ति पुष्कळ आढळतात. प्रत्येक तीथेकराची एकेक
५२ तीर्थरूप महाराष्ट्र
शासनदेवता असते. चक्रेधरी, आअभितबला, कालिका अर्शी त्यांची नांवें
आहद्देत. राजस्थान प्रदेशांतल्या काम्यकवनांत नेमिनाथ या तीर्थकराची
शासनदेवता जी अधिका तिची एक भव्य कोरीव मूर्त आहे. तिनें एक बाळक
डे ०),
च क) | ,>>-- रक व ्व्न्जा 3
ल्न्च्ल (टॅ “_. 7,
2, क ;
र
1) (
आपल्या पोटाशी धरळें आहे. खालीं सिंहवाइन, वरच्या मेहरपींत यक्ष-गंधर्व,
माथ्यावर कमलासन नेमिनाथ, उजव्या अंगाला गणेश आणि डाव्या अंगाला
कुबेर असा तिचा थाट आहे. मध्ययुगांतळी ती एक दर्शनीय कलाकाति
आहे. मंदिरप्रतिष्ठेच्या वेळीं किंवा अनुष्ठानाच्या सांगतेळा या देवतांचे
आवाहन केले जातं. जैनांच्या श्वेतांबर, आणि दिगंबर या दोन्ही शाखांत
शक्तीची उपासना आहे.
तुळजा भवानी ५३
भक्ताने देवाचे गुण गावे हें ठीक; कारण ती त्याची ' आवडीची धणी?
आहे. पण जेव्हां एक देव दुसऱ्या दैवताचे माहात्म्य सांगूं लागतो तेव्हां ते
* सूर्य सूयासे ओवाळिळं । चंद्रे चंद्रम्या क्षेम दिधले ' अज्यासारखें आते गोड
वाटतें. कुरुक्षेत्रावर भारतीय युद्धाचा रणखांब पुजण्याच्यापूर्वी योगेश्वर
श्रीकृष्णाने अर्जुनाला देवीचं स्तोत्र करायळा सांगितलें. आणि लगेच पार्थ
अंजाळेपुट जोडून तिला स्तवूं लागला--
£ हवे कात्यायाने, महामाये ! तूं सिद्धसमुदायांची नेत्री. तू॑ कपाळघारिणी.
शूल इं तुझं तिखट शास्त्र. तुझें हास्य उग्र. तू विद्यांची मद्वाविद्या, तूं प्राण्यांची
महानिद्रा. तुला माझा सादर प्रणाम, ”
त्याच क्षणी अष्टभुजा गगनाच्या निळावंतीवर झळकली. दददिश्ांना
धवल हास्य उधळीत तिनें अर्जुनाला पसायदान दिले. “ अजुंना ! तू नर
आहेस. नारायण तुला साह्यकारी आहे. या युद्धांत तू. विजयश्रीचा नवरा
होशीळ ! ' तानशं वषापूर्वी स्वराज्यसंस्थापक शिवरायाळाही इंच दर्शन
आणि इंच वरदान जगदंबेकडून मिळाल द्ोते. तुळजाभवानी ही शिवाजी-
मद्वाराजांची तशीच समर्थांचीही कुलस्वामिनी. शिवरायाची तिच्यावर अढळ
निष्ठा होती, त्याच्या हातांतळं खडूग हा भवानीचाच वरप्रसाद होता.
6 घषा5त्मशाक्तेः । एषा बिश्वमोदिनी ।
पाशांकुशधनुर्बाणधरा । पषा श्रीमहाविद्या ।
य एवं वेद । स शोक तरति । ” - देव्यथर्वशीर्ष
शिवराय ईं तिचें यथार्थ स्वरूप जाणत होता. जाणून तिळा भजत होता.
म्हणूनच तो शोकाला तरून गेला. एकटा नव्हे; तर सगळ्या मद्वाराष्ट्रासह.
कोणतेही महत्त्वाचें राजकारण उद्भवळ की महाराज प्रथम देवीचा कोल
घेत. त्यांचे काया-वाचा-मन पवित्र होते, यज्ञमय होतें. म्हणून ध्यान घरतांच
त्यांच्या अंगांत भवानीचा संचार द्वोत असे. ती त्यांच्याच मुखाने भविष्यार्थ
सांगे. देवीची अक्षरें बाळाजी आवजी शेजारी बसून लिहून घेई. शिवाजीला
जिता धरून आणण्याचा विढा उचलून जेव्हां अफजुलखान विजापुराहून
निघाला तेव्हां मद्दाराजांना तं मोठें अरिष्ट वाटलें. खानाच्या बाबतींत काय
५४ तीथरूप महाराष्ट्र
धोरण बांधावे याविषयीं संदिग्ध, सचिंत होऊन ते कुलस्वामिनाच्या चरणांशी
आले. त्या वेळीं अंगांत येऊन देवी काय वदली तें चित्रगुप्त सांगतो--
“ अरे मुला ! चिंता कां करतोस ? तुजला माझा वर आहे. अरिष्ट दूर
करीन. तुजला हदी शिकार्च साधून देत्ये. ?
अफजुलखान निघाला तो प्रथम तुळजापुरावर आदळळा. त्यार्ने मनांत
आणले की, शिवाजी जिच्या बळावर एवढा पुंडावा माजवतो, ती त्याची
देवीच जाग्यावर ठेवूं नये. तिचीच शकले करावीत, पण तिथले बजाजी,
चिळोजी, वाकोजी सावध होते. त्यानी देवीची मूर्त उचळळी आणि होम-
कुंडाजवळच्या पिंपळाखाळीं आसेय कोपऱ्यांत असलेल्या ब्रह्मकूपांत सोडून
दिली. खानाला वाटळे असेल कीं, देवी आपल्या प्रचंड प्रतापाळा घाबरून
अदृद्य झाली. पुढे खानाचे धूड प्रतापगडी कायमर्चे निजवल्यावर महा-
राजांना वाटलें कीं, त्रह्मकूपांतली मूर्त वर काढून आतां प्रतापगडावर आणावी
आणि इथेच स्थापावी. पण समथांना तो विचार रुचला नाही. त्यांनी
सांगितलं काँ, ' प्रत्येक देवतेला तिच्या विशिष्ट सामथ्यीप्रमाणेच स्थान-
माहवात्म्यह्ी असते. जेथली देवता तिर्थेच शोभायची. ' गुरुवचन प्रमाण मानून
महाराजांनीं मग तो बेत रहित केला. आज तो ब्रह्मकूप गुप्त आहे. पण यात्रे-
करू न चुकतां त्या पाराला करस्प्ष करून तिथें माथा नमवतात,
इथल्या मंदिरांत मुसलमानांना प्रवेश आहे हे नवल नाहीं. कारण आजवर
या प्रदेशाचे तेच कर्तुमकततु समर्थ शास्ते होते. पण नवल ते ह काँ, त्या
जातांतही भवानीचे भक्त आहेत. तिच्यावर भ्रद्धा ठेवणारे, तिळा नवस
करणारे आणि पुजाऱ्यांच्या हातून तिची पूजा बांधणारे. आणि त्याहून
नवलाची गोष्ट ही की, इथल्या मातंगी देवीचे पुजारी महार असूनही ब्राह्मणादि
वर्ण तिची पूजा करतात आणि तिच्या मातंगकुंडांत स्नानद्दी करतात.
देवळाळा प्रदक्षिणा करीत पुढे जात असतां नेत्रंत्येच्या ओवरींत प्रल्हा-
दास्तव स्तर्भी प्रगटणाऱ्या नसिद्दारचे दर्शन घडलं. या देवाळा ना वतन ना
वाडी. पण तरीही त्याळा एक पुजारी लामळा आहे. त्याळा नंदीबुवा
म्हणतात. तो सकाळीं पूजा करतो, दुपारी माधुकरी मागून देवाळा महानैवेद्य
करतो आणि त्या यज्ञारेष्ट विघस अन्नावर आपली वृत्ति चाळवतो. पण
तुळजा भवानी ५५
सगळ्यांची भोजने झाल्यावर मग नंदीबुवाच्या मुखांत ग्रास जायचा. त्याला
नेहर्मांच उशीर. म्हणून एखाद्या दिवशी कोणाच्याही घर्री जेवण अतिकाळले
कीं गेजारचीं माणस विचारतात. ' काय, आज जेवणाला नंदीबुवाची वेळ
आणलीत ?? स्थानपरत्वे जश्या लोककथा तसेच अनेक विशिष्ट वाकप्रचारद्दी
कानावर येतात. आपली मराठी भाषा संपन्न करायची तर ग्रंथच वाचून
भागणार नाहीं. त्याबरोबरच कान, डोळे, उघडे ठेवून संचारद्दी
करायला दवा.
उत्तरेच्या बाजूला मुख्य मंदिराच्या अंगाला लागूनच खंडोबा आहे.
कुठल्याही क्षेत्रांत तुम्ही पहा. मुख्य देवता म्हटली कीं तिचा परिवारद्दी तिच्या
अवतीभोवती असायचाच. आपली एकंदर उपातनापद्धाते सांग, सपरिवार
असते. कोणत्याही यजञक्रियेंतलळें देवतापीठ पाहिळेंत तरी मुख्य देवतेच्या
परिसरांत अष्टदिद्यांना निरनिराळ्या देवतांच्या नांवांच्या सुपाऱ्या ठेवलेल्या
तुम्हांला दिसतील. विष्णुचा परिवार अष्टनायिका, अष्टलोकपाळ, शिवाय
गरुडादे अनेक वैष्णव यांचा अत्ततो तर शिव-शक्तींच्या भोवती मैरवगण
खडे असतात.
तुळजापुरांतही भेरव आहेतच. मधल्या दरवाजाच्या बाजूनें थोडेतं चढून
गेल्यावर तुम्हांहा टोळमैरव भेटेळ. त्याची गोष्ट ऐकळीत तर तो खट्टू काँ
दिसतो तेंही कळेल. यमुनाचळावर आपल्यासाठी एखार्दे रमणीय स्थान
पाहून ये, म्हणून देवीनें त्याला घाडळें. ह्या प्राणी आला तो इथेच रमला.
त्याला आपल्या सेवाधर्माची शुद्धच राहिली नाही. भवानी वाट पाहून
कंटाळली आणि स्वतः वर आली. तिनें येऊन त्याच्या टाळूवर जेव्हां एक
थप्पड लगावली तेव्हां कुठें स्वारी भानावर आली.
टोळभेैरवाच्या दक्षिणेस उंच जागीं काळभैरव आहे. तो इथला मुख्य
कोतवाल. एका लहानश्या जलाशयाच्या कांठी त्याने आपली चोकी उभारली
आहे. तो तुम्ही पैता आणला आहे कीं नाहव ह पद्वायच्या आर्धी तुमच्या
हातांत गांज्याची पुडी आहे का ईं पाहीळ. रोजच्या पूजेनंतर ल्याला एएक
चिळीम भरून द्यावी ढागतेच. त्या तारंत मग तो अष्टौप्रहर पहारा बजावतो.
अश्या रीतीनें सगळ्या देवांचा आदर करून आम्ही पुन्हा एकदां जगदंबेच्या
>. >५“*“-“६/५-.>/ >» हीडाजारा“ डा
५६ तीर्थरूप महाराष्ट
भेटीस गेलां. ' अंब, प्रसीद ! म्हृणून पुन्हा एकदा तिला दंडप्रणाम केला
तिथून उपाध्याच्या घर्री आलों. त्याच्याशी गोष्टी बोलत उपाद्वार केला. त्याची
यथाशक्ति संभावना केली. त्यानं प्रसादासद्द दिलेलं देवीचं छायाचित्र घेतलं
मोटारीपर्यंत तो आम्हांला पोचवायला आला. नव्या यात्रिकांना तेथ उतरून
अन् जुन्या यात्रिकांना आंत घेऊन गाडी घाट उतरूं लागली.
घाटशिळेकडे येतांना लक्ष गेलं नव्हतं ; पण जातांना तं गेले, घाटरिळा
म्हणजे राम-लक्ष्मणांना दाक्षिणापथ दाखवायला तुकाई जिथवर आली आणि जिथें
निढळावर हात ठेवून त्यांची वाट पाद्वत राहिली ती जागा. घाटाशेळेवर
लहानसं मदिर बांधळ॑ आहे आणि त्याच्या सर्भावती खडा आहे. मेदिराच्या
कळसाचचा एक मोठा टवका उडालेला पाहून मीं शेजारच्या ग्रहस्थांना पच्छा
केळी. ते म्हृणाळे, ' पोलिस कारवाईच्या वेळीं भारतीय सेन्यांतल्या
गोळंदाजांनी डागढेल्या तोकेचा तो प्रताप आहे. ' रझाकार त्या मंदिराचा
खंदकासारखा उपयोग करून राहिळे होते. या धुमश्चक्तींत देवस्थानला
य॒त्किचित् धक्का लागूं नये अशी भारताच्या समरघुरंधरांची अपेक्षा होती.
आणि इंच ओळखून गनीम तिथून मारा करीत होता. अशा स्थितींत
देवीनेंच सेनापतीला प्रेरणा दिली अत्तावी, ' सुटूं दे गोळा. कळत भंगळा तरी
भंगूं दे. या आततायांचा संद्दार झाला कीं मी तुम्हांढाच माझ्या मार्थी कळत
करीन. ' आणि तोफेचा घनगर्ज उठला. त्याचा परिणाम जो व्हायला हवा
होता तो झाला. अनेक मेळे. उरलेळे जीव घेऊन पळाले. भारताच्या
हुदयांतळं शल्य उपटले गेलें. जो गाजी होता तो--
पण जाऊं दे. त्याचा विशेष विस्तार नको. इतिहासाने त्याची तपशीलवार
नोंद ठेवलेली आहे. आपण समथांच्या शब्दांत एवढेंच म्हणूं.
“: बोळता भवानी माता महींद्र दास्य इच्छिती
बोलणं हें प्रचीतीचं अन्यथा वाउगं नव्हे! ”
३ भीमाठांकर
२० “४.५४ “४२ .४१./४.” ४-./१ “700 /५_/९-५४१/५.५१./० /%-”९
मी कोणत्याही तीथक्षेत्रांत यात्रेच्या वेळीं सदृत्ता जात नाही. यात्रा म्हटली
की जनसंमर्द टाळणे अशक्य. जिकडे तिकडे माणसंच माणसं झालीं काँ दृष्टि
बहिमुख होते. चोह्दींकडून शब्दुब्रझ़ उठत राहिल्यामुळे कान बघिर होतात.
मन अंतर्नादाला मुकतें. नाम, रूप आणि रंग यांच्या पत्ताऱ्यांत नको अस-
छेला संकोच जिवाला येऊन चिकटतो. संचाराला साहाजेकच मयादा
पडतात. मग निर्वेघधपर्णे कांही पाहतांही येत नाही आणि कशाशी समरस
द्ोतांही येत नादी. समुदायाचे सुख भोगायचे असेल तर यार्त्रेत जावें. पण
त्याहून निराळें कांही मिळवायचे असेल तर
५ रमाकांत एकांतकाळीं भजावा ”
हच भ्रेयस्कर. निवांतपणांत देव आपलासा होतो. ती ती स्थळेंद्दी बोलकी
होऊन आपला इतिहास मोनाच्याच भार्षेत सांगू लागतात. आपण मिळव-
लेल पूर्वशान मग वस्तुस्थितीशी ताडून पाहतां येतें.
पण भीमाशंकर असा आडवळणाला आहि कीं, मनांत येईल तेव्हां तिथं
जायला कसलीच सोय नाहीं. महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते म्हणून त्याच
वेळी फक्त गाड्या, मोटारी त्या मार्गानं घांवतात. आधी दोन दिवस लोकांना
वर चढवायला आणि मग दोन दिवस वरून खालीं आणायला. आमची
एस्. टी. ची गार्डी सकाळी सात वाजतां पुण्याच्या तळावरून सुटली आणि
खेड-मंचरच्या रस्त्याला ढागळी, गाडीतले सगळे लोक भीमादंकरा'चेच
: कापडी ? होते. मंचरला थोडी विश्रांति करून तिथून तिर्ने वाममार्ग
पत्करला, गाडी इळूइळू उताराळा घसरू लागली तेव्हांच मीं ताडले की, पुढ
एखादी नदी भेटणार आणि त्यापुढे घाटद्दी चढावा लागणार, आंबिगांव
पेव्यांतळें घोडेगांव हे त्या मार्गावरचें मोठें ठिकाण. तिथून यात्रेचा पोलिस-
बंदोबस्त सुरू झाला होता.
ष्ट तीथरूप महाराष्ट्र
आज त्या रस्याचें भाग्य उजळले होते. शेकडा माणसे थव्याथव्याने
त्यावर आपली पदचिन्हे उमटवीत, गप्पागोष्टींची रंगत उडवीत भामा-
शेकराकडे निघाली होती. बहुतेकांच्या हातांत शिदोऱ्या लटकत होत्या.
बायकांच्या कडेखांद्यावर ' जानीं तानी ' मुळें मर्धेच खुसमुसत होतीं, मधेच
हसत हाती. एका बुवार्ने ज्या एका अवरगुंठनवतीला खांद्यावरून चालवले
होते, ती तर चांगळी घोडनवरी होती. मर्ध्येच ' कुण्या गांवचे पाटील ?
बेलगाह्या जुंपून चालले होते. त्यांच्या लेकी-सुना टोपपदरी ल॒गडी नेसून
आंत ठाण मांडून बसल्या होत्या. क्षणाक्षणाढा अधिकाधिक प्रखर दवोणाऱ्या
दिनमणीला त्या ग्रामलळनांची दयामाया नव्हती.
मध्येंच कोणी मावळचे शिलेदार तट्टांवर खार होऊन जातांना दिसत
होते. मात्र ते एकांडे नव्हते. त्यांच्या मार्गे किंवा पुढे एखादे मूल त्यांना
बिलगलेलं असायचें. सवोच्या चाळीत बोलींत उत्साद्दाचा प्रत्यय येत होता.
नेहमीं लह्वानश्या वर्तुळांत फिरत राहणारे, ठराविक जीवन जगणारे ते लोक.
त्यांच्या वांद्याला आज आनंदाचं पवे आले होतं. सगळी कार्म, सगळ्या
विवचना मार्गे सारून ते भीमादंकराच्या दर्शनाला, तिथल्या वनविह्वाराला
चालले होते.
माणूस एकदां वाद्दनांत बसला कीं तो त्याच्या अधीन होतो. वाहनालाही
रस्त्याचे पारतंत्र्य असतंच. पादचारी मात्र या बाबतीत खरा आत्मतंत्र. ज्या
पोखरी घाटाने आम्हांला आतां वर चढायचें होतें त्याच्या प्रारंमालाच एक
मोठें वांकण आहे. आमची गाडी तिर्थ पोहोचते तो कांद्दी माणस रस्ता
सोडून उजव्या बाजूर्न सरळ टेकडी चढतांना दिसली. अर्धा-पाव मेलाचा
फेरा वांचवून तीं पुन्हा रस्त्यावर उमटणार होती. आणि पुढेही सगळ्या
घाटांत द्वाच क्रम चालवणार होती. पार्यी प्रवास करणाऱ्यांना अशा युक्त्या
सद्दजच सुचतात. त्यांत साहसाचा, नवी वाट मळवल्याचा, आनंदद्दी
मिळतो आणि तेवढीच चालही वांचते.
पोखरी घाट फार उंच नाही; पण लांबीला मात्र भरपूर आहे.
तो आडवा आडवा चढावा लागतो. एकेका वळणाने गाडी जसजशी वर
चढूं लागली तसतसे खालचे हृद्य लहान लहान होऊं लागढें. पायथ्या-
भीमाशंकर ५९
जवळची चौकोनी भातखांचर आक्रसली, घर लहान मुलांच्या खेळांतल्या-
सारखी वाटूं लागलीं आणि वृक्ष भुईसरपट झुडर्ष बनले, वर क्षितिजाचा
परिघ वाढळा. अष्ट दिद्यांनी ओथंबून आलेलें निळें नभांगण पाहून सहजच
वाटले की, आपण धरतीमातेची लेकर नसून आकाशमाउलीर्ची आह्वोंत.
घाटांतळा रस्ता धड काळाही नव्हे, धड तांबडाही नव्हे, असा कांद्दीसा मिश्र
रंगाचा आहे. बऱ्याचश्या पिंजरींत थोडासा बुक्का मिसळून. एकजीव करावा
तक्ीी ती धूळ दिसत होती. पायदळी तुडवल्याचा अपमान सहन न होऊन
ती मोटारीच्या माथ्यावर चढली की आमचा जीव कासावीस व्हावयाचा.
६ माघ-फाल्गुन शिशिर कातु' असें आपण समजता. पण हे क्रतुमान
आतां जवळजवळ एका महिन्याने अलीकडे सरकले आहे. शिशिर 'क्रतूनं
सरत्या माघांतच आपली कामगिरी आटोपून वसंताला आमंत्रण केळं होते.
वसंत-माधव आतां उमामहेश्वरांच्या वनमहोत्सवाची आइती करूं ढागला
होता. झाडांच्या मुळांतून सांठलेली [शशिराची पानगळ लोटून काढण्याच्या
कामावर त्यानं प्रथम वाऱ्याची योजना केली होती, आणि ते काम चोख
बजावल्यावर वसंत त्याला मकरंदसुगंधाचे बक्षीस देणार होता. घाटांतले
आंबे बहुतेक आरक्त, ठसलशीत पालवी पांघरून उभे होते. वसंताच्या
सुरवातीला आंबा पालवण म्हणजे फळांची आशा घरायलाच नको. ' यंदां
तुम्ही भामचा पलवसंभार पाहूनच संतुष्ट व्हा, ' असेंच जणुं ते आम्हवांठा
सांगत होते. कुंदवेलींनीं टाकळेला फुलांचा बदर शेजारच्या करवंदानी
उचळळा होता. त्यांच्याचजवळ पण त्यांच्याहून उंच वाढून वांकलेली
तोरणीचीं झाडे फलोन्मुख झाली हेतीं. त्या तोरणी, करवंदी आंब्यांना जणुं
म्हणत होत्या, ' तुम्ही बापहो, बडे लोक. तुमच्या लहरी ढोक चाळवून
घेतील. पण आम्हांला तुमचं अनुकरण करून चालायचं नाहीं. दरवषी
फळांचे घड दाखवले तरच माणसे आम्हांळा पुसणार ! ? घाटांत त्रिघारी
निवडुंगद्दी कमी नव्हते. त्यांनाही वाटले, सगळेच रान फुळतें तर आपण
तरी कां मागें रह्वारवे ! फुलवर-कोबीसारखी पण विरळ आणि आमसुलठी
रंगाची पुळे त्यांनीही आपल्या काड्यांच्या टोकांवर उमटवून दिलीं होती.
गोऱ्या कुंभाराच्या थोट्या ह्वातांना नव्या अंगुली फुटाव्या तसे. काहीस त॑
दृश्य मळा दिसले.
९० तीर्थरूप महाराष्ट
घाटांतल्या या नाना धृक्षजातींत जागोजाग डोळ्यांत भरत होते ते पांगारे
शिशिराने त्यांचा पर्णमय पोषाख हिरावून नेलेला पाहून वसंताने त्यांवर
फुलांचा साज चढवला होता. त्यांच्या बारक्या आडव्या डद्दाळ्यांना आमूलाग्र
ढाल, टोकदार फुळे आलीं होतां. कालिदासाने त्यांच्याबद्दल म्हटलें आहे:
६ यांगाच्याच्या फुलाला वर्णप्रकर्ष असला तरी त॑ निर्गन्ध असल्यामुळें माझ्या
हृदयाला वेदना होते. गुणांची सामग्री एकत्र आणण्याच्या कार्मी ब्रह्मदेव
पराड्मुखच म्हटला पाहिजे. ' पण मी मात्र त्यांच्या लालीवरच खुष झालो,
सूर्य माथ्यावर यायच्या आंतच आमची गाडी भीमादांकराचा डॉगर
चढली. पुण्यापासून सुमार पाऊणशे मेळ तिनें मजल मारली होती. माणशी
दोन आणे यात्राकर दिल्यावरच आम्हांला क्षेत्राच्या सीमेत प्रवेश मिळाला.
आम्ही उतरलां ते एक लांबरुंद पठार होतं. तिर्थे बाजाराची मांडावळ चाळू
झाली होती. तो शिवरात्रीचा आदला दिवस होता, तरी आजपासूनच
माणसांची मूस फुटली होती. पठारापासून देऊळ एका हांकेच्या अंतरावर
होते. तिकडे जाण्यासाठी डागडुजी केलेला उताराचा रस्ता होता. सवाच्या
आधीं तिथे हजर झाले होते ते आंधळे, पांगळे आणि बुवाबेरागी. त्यांनी
रस्त्याच्या दोहो बाजूंस सावळी साधून आपापल्या जागा धरल्या होत्या.
यात्रेकल्चे मानसशास्त्र पुरे अवगत अत्तणाऱ्या कांहीं साधूंनी मधे मधे धुम्या
पेटवून आपापली देवतारचॅने मांडली होतीं. मस्तकी जटाजूट बांधून, कपाळीं
भस्माचे त्रिपुंडू ओढून ते सावजं देरूं लागले होते.
देवळाच्या परिसरांत जी मोजकी पांच-सात घर आहित, त्यांचीं अंगणे
सारवून स्वच्छ केळेली होतीं व त्यावर मांडव उभारलेले होते. सहकुटुंब
सहपरिवार आलेल्या यात्रेकरूनी तिथें आपापले चोके मांडळे होते.
यायका भातपिठल्याच्या तयारीत होत्या. पुरुष पाण्याचा पुरवठा करीत होते
कोणी पत्रावळींना काढ्या टोंचीत होते आणि कोणीं श्रीकृष्णाचा वत्ता
घेतला हद्वोता कीं, ' गोष्टी सांगेन युक्तिच्या चार. ' सगळ्यांना हवे नको
पह्वातांना घरधन्यांचा संभ्रम उडाला होता. यात्रिकांना पुण्याची तर त्या
घरधन्यांना अथंप्राप्तीची ती पर्वणी होती. मीही एका घरी डबा-पिश्यवी ठेवून
दिली आणि हिंडायला मोकळा झालो.
त्यांतल्यात्यांत आज देवदर्शन सुकर होतें. मंदिरांत कोण्या यजमानाचा
भीमाशंकर ८१
अभिषेक चालू होता, ब्राह्मण द्रुत ठर्यात रुद्राध्याय म्हणत होता. शिवाचा
गाभारा खोल असायचा हे अगर्दी ठरून गेलेलं आहे. येथेही तो तसाच
होता आणि प्रशस्त पिंडिकेत एक ठेंगणेंच शिवळिंग अभिषेकपात्रांवून
पडणारी जलधारा मस्तकावर घेऊन उभे होत. बारा ज्योतिलिंगांच्या नामा-
वळींतळ हे शिवलिंग आहे. ' भीमा उगमी भीमादंकर ' असा त्याचा
प्राकूत वाड्ययांत निदेश आढळतो. त्रयंबकेश्वरी शिवशेकर ब्रह्मगिरीच्या .
पायथ्याला राहिळा आहे आणि ब्रह्मर्गारि लांबलचक असला तरी तो दुग्यम
दर्जांचा पर्वत आहे. तिथं वनशोभेचीही त्या मानाने वाणच भासते. पण या
सगळ्या उणीवा इथं सह्याद्रीच्या उत्तमांगी निवास करून सदाशिवाने भरून
काढल्या आहेत. त्र्यंबकेश्वराइतकंच दं स्थानही पुराणप्रासिद्ध आहे.
“ पुंजिछ्वेभ्यो निषादेभ्यंश्ध बो नमो नमः ”
हृ रुद्राध्यायांतळे नमन भीमाशकरालां ठीक जुळते, इथ चारपांच कोळ्यांची
घरें आहेत. 'ते आपल्याला ' महादेव कोळी ? म्हणवतात. इथं पुजारी या
नात्याने जे ब्राह्मण स्थायिक झाळे आहेत त्यांच्या बरीच आधींची ही कोळी-
वस्ती असली पाहिजे. कोळी हे इथळे आदिवासी. भीमाशेकर हा प्रथम
त्यांचा आणि मग इतरांचा. ते त्याला ' गातेभर्ता प्रभु: साक्षी ' करून या
डोंगरवस्तीत पिढ्यान् पिढ्या नांदले.
भीमादांकराचें देऊळ अर्धे जुने आणि अर्धे नवें आहे. ज्या जागी नंदी
बसळेला आहे तो भुयारासारबा दिसणारा भाग भक्कम काळ्या दगडाचा
असूनही आज मोडकळीस आलेला आहि. गाभारा तेवढा जीर्णोद्धार करून
नवा बांधलेला दिततो. मंत्र्युत्तम नाना फडणिसांनी या जीणोद्वाराला प्रारंभ
केला आणि ते निवर्तल्यावर त्यांच्या घर्मपत्नीने ते काम पुरें केलें. जुन्या-
नव्या देवळांच्या मर्ध्ये आजमितीस एक मोठं खिंडार आहे आणि त्यामुळेच
कुठेही शिवाच्या गाभाऱ्यांत शिरू न शकणारा सूर्यप्रकाश इथें ' घे घे ' म्हणून
आंत घुसतो. जुने देऊळ आजच्यापेक्षा बरेंच मोठे द्वोते. नव्या देवळाचा घेर
त्या मानानें लद्वदान धरला गेला आहे. काळ्या; ता्यीव दगडांनी हेमाडपंती
घत्तीवर या गाभाऱ्याची उभारणी केलेली आहे. पंचवर्टीतल्या काळ्या रामाचे
शिखर ज्या पद्धतीचे आहेत्याच पद्धतीचे हेंही आहे. तिथल्याच नारोशंकराच्या
“*-€->१-/४*/१.-/१-४/१.४१-/१-/१४५/१५/१५//५-/५/४/१४€१-/४०१५//१४५/१७७४,
६२ तीर्थरूप महाराष्ठ़र
कटिबंघावर जश्या मूर्त कोरलेल्या आहेत तशाच त्या इथेंही आहेत. देवळाला
एक प्रदक्षिणा घातली कां चतुर्मुख त्रह्मा, वामन, परशुरामादि अवतार आणि
गणपल्यादे देवता यांच्या मूर्तींची प्रमाणबद्ध अशी रांग पाहतां येते. दरोनी-
भागाचें कोरीव कामही प्रेक्षणीय आहे. या देवाला सरकारकडून वर्षासन आहे.
ग:
जी 14६ : ", बी
(0 व
भीमाशंकराचें मोटर
आणि कांही. जमीनही सोडलेली आहे. देवस्थानची सर्व व्यवस्था सद्दा
वहिवाटदारांकडे वंद्यपरंपरेने चाळत आलेली आहे.
एका चमत्कारिक प्रसंगाने भीमाशंकर इथें प्रगट झाला. 'चोदाव्या शत-
काच्या मध्यकालांतली गोष्ट, एक माणूस इथं लांकड तोडायला आला
होता. त्याने अनेक झाडें तोडली असतील; पण एका झाडाच्या मुळांत
त्याच्या कुऱ्हाडीचा घाव बत्ततांच तिथून रक्ता'चा प्रवाह सुरू झाला. त्याला
वाटलें की, हे काय अरिष्ट! कोणत्या अहृदय देवतावर आपली कुऱ्हाड बसली!
आणि आतां आपलं काय होणार ! पण त्याला एक युक्ति सुचली. त्यानें
आपली * तानपी ' गाय तिर्थे आणली आणि त्या वृक्षमूलांत [तेळा आपल्या
भौमाशकर द्र
>" £४६४१/*"*१५/*४०- ०१ /१/% .८५/४/५/५/१५/५/५८/१ '५.८४५/४४/५४/४/४/४/५११/४४/९४५/ ५५४५८४५४७७
» ५४५४४४” ४५४५ ४४१ ८४५४४१५ ४४५४४ ७”
चारी घारा वरसायला लावल्या. त्या दुग्धधारेने रकतधारा शमवली आणि
थोड्याच वेळांत तिथे एक शिवलिंग वर आलें. तोच ह्वा बारा ज्योतिळेंगांतला
भीमादंकर. त्या शिवलिंगावर त्यानेच पहिळें मंदिर उभारले, आणि मग इळू-
हळू त्याची सवंत्र ख्याति झाली.
मी तें देऊळ आणि त्याचा परिसर न्याहाळीत उभा होतों. एवढ्यांत एक
महान् घंटानाद कानावर आदळला, इतर लह्वान सद्दान घंटांचे आवाज त्या
नादापुढें क!पदार्थ ठरले. मला एकदम पंचवटांतल्या नारोशंकराच्या घंटेचं
स्मरण झालें. नंदीला उजवी घालून मी जुन्या देवळांच्या प्रांगणांत दाखल
झाला. तिथें दोन जाडजूड खांबाच्या मधल्या लोखंडी दांडीला ती घंटा लोंबकळत
होती. तिर्चे वजन तीनचार मण सहज भरेल. दहा-बारा वषाच्या मुलांचा-
सुद्धां हात पुरेल इतक्याच उंचीवर ती टांगळेळी आहे. मोठ्या आकाराची
पूजा करणे ह्या मानवी मनाचा धर्मच आहे. इथले पुजारी आणि यात्रेकरू या
घंटेला शंंदूर फासून आपला पूज्यभाव व्यक्त करतात. मी जवळ जाऊन तिचें
निरीक्षण केलें. घंटेच्या तोंडावर जी मानवी आकाते आहे ती कांहीं भारतीय
नाही. ती बहुधा खवित्तमाता व्हर्जन मेरीची असावी. मूर्तींच्या मस्तकावरच्या
चिन्हाळा अजाणते लोक स्वस्तिक म्हणत असळे तरी तो खराखुरा क्रॉत
आहि. मूर्तीच्या पायाखालचा १७२९ हा आंकडा ती घंटा केव्हां ओतली तें वर्ष
दर्शवीत असावा. नारोशंकराची घंटा वसईच्या चर्चवरून आणली आहे
तशीच होही १७२९ च्या सुमारास ठाणे जिल्ह्यांतल्या वर्शिद या. गांवच्या
एखाद्या पोर्तुगीज चर्चमधून आणली असावी असा अंदाज आहे. या दोन्ही
घंटांचा घणघणाट हा विजयनाद आहे. मीं त्या विजयघंटेला म्हटले की, अशीच
निनादत रहा.
“ आगमार्थ तु देवानां गमनार्थ तु रक्षसाम्
कुरु घंटे रवं तत्न देवताव्हानलक्षणम्”
मादेर पाहून झाल्यावर पहिळी आठवण कोणाची झाढी असेळ तर ती
संतांच्या आवडत्या मिवरेची. मी पंढरपुरी तिच्या वाळवंटांत लोळलां होतों.
आणि गाणगापुरी अमरजेर्ने तिच्याशी केढेल्या संगमावर स्नानह्दी केलें
होतें. ' आर्धी कळस्त मग पार्यारे' म्हणतात तसा मुखाकडून उगमाकडे
६४ तीर्थरूप महाराष्टर्
५ */ ४८ ४ ४. ४”
२.” ९.” ४.” २९.५ ९. ४. ४.” ४.५ ९.» ९. "५. ९.” ९.” ७. ४.” १.” ४७.५४ ९.” ५.४ ४-० ४.५ ४.५४ ४.१७.” 0.” ५.४९ /%../४../४../ ४९.” ४. १../९_ / ७.४४. ४७” ५९७७७१७ १७-४४. /ज
असा हा माझा उफराटा प्रवास होता. ' नदीचे मूळ आणि क्रषीचें
कुळ पाहु नये? हद्दी म्हण सर्वीच्या परिवयाची आहे. क्र्षीचं कुळ
पहायळा गेळें की तिर्थ अकाल्पित आणि पूज्यतेळा धक्का देणारे अर्त
कांहीं तरी आढळतें. त्या दृष्टीनें त्याच्या खोलांत शिरू नये हे ठीक. पण
नदीचे मूळ शकय असेळ तर कां न पद्दावे? नदी म्हटली कीं ती गिरिकन्याच
असायची. कुठल्या तरी कडेकपारीत, दुर्गम, दुलध्य अश्या उंच जागीं तिचा
जन्म झालेला असतो आणि तें स्थान गांठायळा माणसाला बरेच कष्ट
सोपावे लागतात म्हणून कांही ही म्हण प्रचारांत आलेली नाहीं. खालच्या
सपाटीवर आल्यानंतर अनेक वहाळ वोहळ मिळाल्यामुळे तिला ज॑ सोंदर्य
आणि वेभव मिळतें ते उगमापा्शी न आढळल्यामुळे एखाद्या व्यवहारी
माणताने द्दी निषेधार्थक म्हण बनवली अत्तावी. पण ज॑ मुखाजवळ नाईह्द तें
उगमाजवळ असतें हे जो तिथे जाईल त्यालाच कळेल. त्या सोंदर्याची रुचिच
वेगळी. प्रयागला गंगा-यमुनांच्या संगमावर स्नान करून आपल्या सर्व ज्ञाता-
ज्ञात पातकांचें प्रक्षाळण झालें अशी धारणा होऊनही कित्येक माणसें
हिमालयाची शिखर चढू लागतात आणि देह कष्टवून गंगोत्री, जम्नोत्रीची
यात्रा करतात, यांतळें रहस्य ईंच आहे. रसिकता आणि धार्मिकता या
दोन्ही भावनांचा तिथें परम संतोष साधतो.
पुजाऱ्याचा एक चुणचुणीतसा मुळगा देवळाच्या दारात उभा होता.
त्याला मीं भीमेचा उगम कुठें आहे असे विचारढें. त्यानं लगेच अंगुलिनिदेश
केला. ' त्या वरच्या झाडीत. ! मी त्याचेच मागदर्शन पत्करून मंदिराच्या
डाव्या अंगाची टेकडी चढूं लागलां. तिकडे जायला रस्ता असा नव्हताच.
होती ती प्रादेशमात्र अस्पष्टशी पायवाट, या चार दिवसांत ती मळणार
होती, थोडी मोठी होणार द्दोती आणि पुन्हां पुढच्या पावसाळ्यांत झाडीचे
पांघरूण घेऊन झोंपणार होती. टेकडीच्या मध्यभागावर, ठेंगण्या झुडपांच्या
वतुळांत एका कुंडाजवळ त्या मुलाने मळा नेऊन उभे केलें. पुरुषभर खोलीचे
काळ्या दगडांतळे ते एक कुंड होतं. आंत डोकावून पाहिळें तो पाण्याचा
उगीच द्रवसा दिसला. विश्वास्त ठेवायळा तक्रार करणाऱ्या मनाला मीं
बजावून सांगितळे की, ' मीमेचा उगम तो हाच!
भीमाशंकर द्५
७०९०७०० ८५” -->५/८५€-€-4>८-€-€>€”५€४४६९% ४४ “५५४४ <१४/४०७ «४५-४० 0४ > ४०? ७८७७ २५१४७ “७७५७० ४४ ७“ ७५९१ “८ “टी ७९ ७ व“ क ७४ ४७४४ ७७९ ७ ७४ «४ ७९७५७५ ७७% “८७/७७/७००५. ०५..>-०>६«>.
त्रिपुरासुराठा दग्ध करून त्रिनेत्र शूळपाणि याच जागीं विसावळा असला
पाहिजे. कळ फिरवतांच इच्छेनुरूष आकाद्यांत हवा तसा संचार करणारी
भीमा उगमाचें कुंड
लोहमय, रोप्यमय आणि सुवर्णमय अशीं तीन पुरें त्या अतुराच्या मालकाची
होती. वरून गोळे टाकणाऱ्या आजच्या विमानांची ती पुराणकालांतली
प्राथामिक आवृत्षि असावी. त्या पुरांतून तो देवां-मानवांवर अभिव्षांव करी.
सर्व देव त्याच्या या अभिनव यंत्रसामर्थ्यापुढ॑ हृतबळ झाले. त्यांनी महा-
रुद्राला ' त्राहि भगवन् ? म्हटलें. पठुपाते त्याच्या संद्वारासा्ठी निघाला. आतां
मी ज्या डोंगरावर उभा आहै त्याचाच त्याने रथ बनवला. काळाला महाकाळ
मिडला. पण त्रिपुरासुर रथयुद्धांत आवरेना. शेवटी रुद्राला दिसरा भालनेत्र
उघडावा लागला. त्यांतून प्रलयासीचे झोत वर उफाळळे आणि त्यांनी वर
घिरट्या घालणाऱ्या त्या तिन्ही पुरांची एका क्षणांत तीन चिमट्या राख
करून वाऱ्यावर उघळली. त्यांतच तो त्रिपुरासुरही निवटला. संत्रस्त जनतेने
आणि सुखंदाने सुटकेचा निःश्वास टाकून शिवाचा जयघोष केला. तो
उघडलेला डोळा पुनश्च मिटला. पण बाद्देरचे भ्रम आणि आंतली धग यांनीं
शिवाच्या हिमघवल अंगांतून घामाच्या धारा सुटल्या, विःधमंगलाताठी,
ती. म....२-५
द्द तीथरूप महाराष्ट्र
"*-५/४५-”
जगाला जीवदान देण्यासाठी देह झुंजवतांना निघालेल्या त्या धर्मधारा !
त्यांच्यासारखे पावनतीथं दुसरं कोणतं असू शकेल? भीमक नांवाचा एक
सूर्यवंशीय राजा, शिवप्रसादासाठी तिथें तप करांत होता, तो या प्रसंगी
नेमका पुढे आला. त्रिपुरविजयामुळें भोळाशंकर दृषांच्या भरांत होता. त्यानें
ताबडतोब ' वरं ब्राह्ि ) म्हटलं. ' वरह वरायास पाहिजे समज? म्हणतात
ती मीमकाला होती. त्यार्ने वैयक्तिक क्षुद्र स्वार्थाला पुढं येऊं न देतां
मागणे मागितले.
“: मगवन् ! या धर्मघारांची लोकपावनी पुण्यनदी होऊं दे! ”
दोंकरानें ' तथास्तु ! म्हटलं. डोंगराच्या अंगांत जिरणारे ते घामाचे लोट
फिरून झळझुळत वर उठळे, ताच ही भीमरथी नदी, इथून ती खाली
देवळाच्या बाजूला असलेल्या मोक्षकुडांत शिरळी आणि तिथून पुढच्या
प्रवासाला लागली.
हे मोक्षकुंड म्हणजे इथं आश्रम उभारून जपतपत्ताधन करणाऱ्या कौशिक
मुनींच्या सामथ्यांची साक्ष आहे. क्रचीक नांवाचा एक क्रषिकुमार होता.
वंशाचा एकमेव अंकुर. त्याने वेदाध्ययन केळे, गुरुदाक्षिणा दिढी, पण
६ प्रजातन्तुं मा ब्यवच्छेस्सी:? द्दी गुरूची आज्ञा मात्र पाळली नादी. ग्हस्थाश्रम
न करतां तो तीर्थक्षेत्रे हिंडत राहिला. प्रवासांत एक दिवस पाण्याच्या आशेने
तो एका विहिरीच्या कांठावर वांकला ; पण तिच्यांत पाणी नव्हते. तो एक
अंधकूप होता आणि त्यांत कांद्दी अंगुष्ठमात्र मनुष्याकृति एका दुर्बळ तंतूला धरून
लोंबकळत होत्या. त्रहरचीकाला ते अद्भुत वाटलें. त्यानें त्या दुदवी जीवांना
विचारलें, ' तुम्ही कोण आणि तुमची अश्शी अधोगति कां !' विचारता, पुसता
भेटल्यावर त्यांच्या दुःखाला वाचा फुटली.
५“ क्रुच्ाक ह्या क्रषिकुमार कदाचेत् तुझ्या कानावर आला असेल. आम्दह्दी
त्याचे पूर्वज. त्याने भारयोपरिम्रद्द केला नाही, वंशपरंपरा खुंटवली, हदृब्य कब्य
बुडविल, म्हणून आम्हाला स्वगीतून लोटून देण्यांत आढे आहे. आतां आम्ही
असेच खितपत पडणार, ज्या तंतूला लॉबकळतों तो तुटळा कीं याहून खाली
झंधताभिर लोकांत बुडणार. देहपातानंतर क्रचीकाळाही हेंच ताट वाढून
ठेवलेले आहे, ' अपुत्रस्य गतिनोस्ति ) हं तो विसरला आहे. ”
<.*-“५--४-2५-८* “४-८ ४८ १८-/%-
भीमाशंकर द
जे आश्रय म्हणून क्रचीकाला वाटळें तं त्याच्याच अंगाशी येऊन मिडळें.
त्याळा आपल्या पितरांची ती दुदंशा पाहवळी नाहीं. त्याला कन्या तर
वरायची नव्हती. पण पितरांचा उद्घार मात्र करावयाचा द्वोता, इथे आल्यावर
कौशिक मुनीनें त्याला या विवंचर्नंतून सोडविले. त्याने आपल्या अंगणांत एक
कुंड निर्मून त्यांत आपलें कमंडलूंतर्ळे पाणी ओतळें. लागलीच भीमाही त्यांत
शिरली. क्चीकार्ने तिथ स्नान आणि पितृतर्पण करतांच त्यांचे ते अधकूपांत
लोंबकळणारे पितर उद्धरून मुक्त झाले. त्या दिवसापासून या कुंडाचें नांव
: मोक्षकुंड ) पडलें. वरून आलेला भीमेचा ओढा इथूनच पुढें जातो. आज
त्या प्रवाह्यंतळा रस सूर्याने पुसून टिपून, घेतला असला तरी वर्षाकाळीं तो
दामदुपटीनें परत मिळेळ याची मला खात्री होती. इथून खालीं अर्ध्या
कोसाच्या अंतरावर भामेचा प्रवाहव एका खडकावरून खालच्या धळींत कोसळला
आहि आणि शंकराने गुत्तपणें खाळी राहून तो मस्तकीं झेळलळा आहि. दिमगिरी-
वरर्चे गंगावतरण, त्ते सह्यगिरीवरचें हे ' मामावतरण. ? त्या स्थानाला ' गुत
भीमाशेकर' असे नांव अपून तिथेच एका वृक्षाच्या छार्यंत साक्षी विनायक आहे.
गुप्त भामादाकर पहायला जायचे तर त एकट्याचे काम नव्हे. त्यासार्ठी
र्वांगळी खंबीर सोबत हृवी. भीमेच्या कडेकडेने जाणाऱ्या उताराच्या रस्त्याने
बरंचतें खाली गेल्यावर उजवीकडे वळावे लागते. आणि घनदाट कारवीर्चे रान
दोन्ही हातांनी बाजूळा करीत एकेक पाऊळ टाकावें लागते. असली गर्द झाडी
म्हणजे वाघोबाचा बालेकिलछाच तो. या ठिकाणी कुठल्याही जागी त्याचे
अस्तित्व शक्य आहि. इथें लोकवार्तांच आहे कीं, रोज भर मध्य रात्री वाघ
शिवदर्शन घेऊन जातो. खरे म्हणजे हे वन्यपद्यूंचेच निवासस्थान, माणूस
तिथे राहतो तो त्यांच्या हकावर गदा आणून.
तीन हजार फूट उंचीवरून उडी घेणाऱ्या भीमेने तिथून पुढे पूर्वेकडे कळ
घेतळा आहे. भीमनेरच्या खडकाळ प्रदेशांतून छत्तीस मेळ ती अवखळ वन-
कन्येसारखी हुंदडत धांवते. वाडे खेड या गांवाजवळून पुढे पिंपळगांवापर्यंत
तिचा प्रवास झाला को तिथे उजवीकडून तिला पहिली सखी येऊन भेटते ती
भामा. दोघी हितगुर्जे बोळत गळां मिठी घाळून निघाल्या की तुळजा पुराजवळ
इंद्रायणी त्यांना विचारते, ' मी येऊं तुमच्यांत ! ' मग दोघींच्या ऐवजी
तिघी होतात. तुळजापुराहून ती दक्षिणेकडे वळते आणि इंवेळी तालक्यपाळा.
दट तीथरूप महाराष्ट
कव घालते. तळेगांवदाभारडे या गांवच्या दक्षिणेस पांच मेळांवर तिला वेल
नदी मिळते. तिथून ती इंशान्यवाहिनी होऊन महाळुंगीकडे जाते. रांजण-
गांवाजवळ मुळामुठा ही संयुक्त नदी तिच्यांत शिरते. तिथून वळणे वांकणें
घेत ती आसेयीकडे चौदा भेळ वाहिल्यावर घोडनदी्शी तिचा संगम होतो
आणि पुढे पुणे जिल्ह्याच्या आसेय टोकाजवळ ती नीरा नदीला आत्मसात करते.
भीमा ही सरिता असली तरी ' तटिनी ? नाही.
“ यास्यति जलटधरसमयस्तव च समद्धिलधीयसी भविता
तटिनी तट ट्रुमपातनपातकमेक चिरस्थायि '
६ पूऊप्तकाळ निघून जाईल, तुझी जलसंपदा आटेल. हे सरिते, मग तुझ्या
वांट्याला उरेल तें वर्षाकाळीं तटवृक्ष उन्मळून विध्वंसिलेत्त त्याचे पाप! ?
ह्वा बोल जगन्नाथपंडित भीमेळा लावूं शकणार नाही. तिची उभय तौर अति
सखळ आहित. इंद्रायणी मिळाल्यावर तर पुराने वाहून आणलेल्या गाळाने
तीं भरून गेलेली आद्वेत.
॥_. त
ी ऱ)
|
णप्य्ट वि. 23.
] ग 9
1. १ : | | | ( ठर हि. र
'॥'., | | १ र » रु . र 9
| | | ५! 3 (१
| क, १४४०६. र
६. रि
1] ह १
शा र! शी १ हो
४४ नी
देवीचे मंदिर
सूर्य डोक्यावर आला होता तरी उन्हांत विदेोषसा चटका नव्हता. वाराही
अकारणबंधु झाला होता. त्यामुळे पाय जसे न सांगतांच पुढे पडत. तो मुलगा
म्हणाला, ' या, तुम्हांला देवीचे देऊळ दाखवितो. ! आम्ही तसेच आडवाटेने
पुन्हा मोटारतळावर आलों, तिर्थेच खाळच्या बाजूला त मंदिर माहे. त्यांतली
भीमाशंकर दर
अघिष्ठात्री देवी देवांनाही दुस्ताध्य असें एक वारकृत्य पार पाडून तिर्थे वारा
घेत बसली आहे.दुघर्ष देत्याळा तिनें एका मुटिप्रहारानं यमदूतांच्या हवाली
केलें. ब्रह्मदेवार्न कृत होऊन कमळांनी तिची पूजा बांधली म्हणून ढोक
तिला ' कमळजा ? म्हणतात. आम्ह्दी तिथं पोचला तेव्हां बरेचसे जानपद
तरुण तिच्या अंगणांत घोळका करून उभे होते आणि आळीपाळीने तिथली
वाटोळी धोंड उचलून आपल्या बळाची परीक्षा देत होते.
देवींच्या देवळापासून थोड्याच अंतरावर “ कोकणकडा ' आहे. तो जर
पाहिला नाद्दी तर इथं येण्याचे श्रम व्यर्थ! तीन हजार फूट उंचीवरून
पाहिलेळे तें कोंकणचें विशाळ, विददंगमहदय मी तरी जन्मांत कर्घी विसरणार
नाहीं. आम्ही जिथ उभे होतो ती जागा दोन डोंगरांच्या हातमिळवणीची
होती. त्यामुळे आमच्या खालच्या भागाला साहजिकच एक अर्घवतुळ निर्माण
झालें होते. उजव्या हाताचा तो उभा कडा मधल्या काळ्या कातळानें काल-
यवनासारखा भासत होता. खालच्या कोकणभूमीवर धुक्याचा एक विरळसा
थर मांडून राहिला होता ; त्यामुळें त्याळा गूढरम्यता आली होती. मध्याह-
सुर्याला वांकुल्या दाखवीत तिथें ठाण मांडून बसलेल्या त्या बाष्पाची मळा
शह्मामत वाटली, त्या सरपोसाखालीं समुद्र कुठें आहे जर्मांन कुठें आहे,
आणि झाडंमाडे कुठें आहेत ते आम्हांलाच काय,पण खवीलासुद्धां
स्पष्ट दिसत नसावे. त॑ जाणायळा आणि उलगडून दाखवायला
कवीचीचच गरज होती. चिपळूणच्या परुरामाजवळ मां पाहिलेले धुके तामस
आणि प्रमत्त होतें तर ईं सात्विक आणि शांत होते. उजव्या बाजूला सवैत्र
प्रकाशच प्रकाश खेळत होता. डाव्या हाताला छायेने आपलें राज्य थाटले
द्वोते. दोघांनाही आपल्या घरीं आसरा देऊन सह्यराजानें आपला सममाव
दाखवला होता. वरची ह्िरवी वनराज़ि, मधळे काळे कडे, खाळची निळी
५ माया ? , सगळे रंग कसे मित्र बनून इतरांना भूषर्वांत होते. ती लांबवर
पसरलेली पर्वतांची रांग आणि खालचा पार क्षितिजाला जाऊन मिडळेला
तो अनंत अपार अत्ता समतळ प्रदेश ! मी सदद्ताक्ष असतों तसच मळा ती
विज्यालता दृष्टीत सांठवून घेतां आली असती.
सहज डाव्या बाजूळा पुन्हां लक्ष गेढं तर बरींच माणसे कणीच्या वाटेने
वर चढतांना आढळली. ठारणे-कल्याणच्या बाजुने ती. आलीं होतीं. भीमा-
७० तीथरूप महाराष्ट्र
शंकराची यात्रा म्हणजे संस्कृतिसंगम आहे. कोंकण आणि देश तिर्थे एकत्र
सरमिसळ होतात. मी तिथला बाजार हिंडायला ढागलॉ तर मावळांतल्या
बायकांपेक्षां कातकरी आणि ठाकूर जातीच्या स्त्रियाच अधिक दिसल्या आणि
उठूनही दिसल्या. जणुं आपल्या घरचाच समारंभ अश्या मावनेनं त्या स्वच्छंद
विहरत होत्या. कातकरणी सोळा हात ल॒गडे असळं तरी अंगाबरोबर अगदी
टांचगे नेसतात. डोंगरांतल्या कांट्याकुट्यांतेन आणि आडव्याखाडव्यांतून
वावरायचे तर लगड्याचे फलळकारे काय कामाचे ! ठाकुरणींना तर पदरच
नसतो. दोन्ही जातात दागिन्यांची होत मात्र अनिवार. रानच्या वेली जर
पानांफुलांनीं तुरभुरून राहतात तर आपणही तर्सेच असार्वे अशी त्यांची
समजूत असेल. गळ्यांत रंगी बेरंगी मण्यांच्या एकावर एक चढवलेल्या माळा,
देडांत चांदीच्या वांक्या, बोटांत चांदीची नाणी बत्तवलेल्या आंगठ्या,
चांदीचे च दुद्देरे गोठ आणि त्याखाली हातभर कांकणें आणि असेच अन्य
कांद्दी. एकेका बाईला लंकेची पार्वती केळी तर त्या अलंकारांचे होर दोन
शेर वजन सद्दज भरेल. त्यांच्या साळंकृतपणाची तुलनाच करायची तर
तिथल्या रामेठ्याच्या झुडपाशींच करावी लागळी असती. जुन्या काळच्या
बायका बुगड्यांखाली सुपारीएवढी मोल्येंजडित घोस लॉबवीत तशा प्रकारच्या
गेंदेबाज, केसरयुक्त फुलांनी तीं ठुतकी झुडपे अक्षरशः लवली होती.
शिवरात्रीला इथें सर्व प्रकारचा बाजार मोठ्या प्रमाणावर भरतो. इथली
माणसे वर्षांचा पुरवठा याच वेळीं करून घेतात. कडघान्ये आणि मसाल्याचे
जिननत्त यांचा पुष्कळसा व्यवद्दार विनिमयावरच चालळतो. नाचणे, वऱ्या,
आपल्याकडच्या द्यायच्या आणि मोंबदल्यांत इतर धान्यें आणि हिंगजिर
वगैरे संतारोपयुक्त वस्तु घ्यायच्या. प्राचीन कालीं सररास सुरू असलेली ही
प्रथा भीमाशंकराने अद्ययावत् आणून ठेवली आहे, पूर्वी अर्सेच असे. मेंढ्या
द्यायच्या आणि गाय घ्यायची. गायी द्यायच्या आणि यज्ञासाठी सोमवली
खरीदायची. पुढे विनिमयाला एक सोयीस्कर मध्यस्थ म्हणून नाणे निर्माण
झाळे, आणि त्या 'दिवसापासून माणसाच्या मनांत संग्रहाची, राखून ठेवण्याची,
वासना निर्माण झाली. जें साधन होतं ते साध्य बनले. ' लोममूलानि
पापाने ? म्हणतात तसा तिथूनच सगळ्या पापांचा उगम झाला. “ दाम
करी काम ! हा आजच्या युगाचा बीजमंत्र. त्या काळी “ घाम करी काम ?
भीमाशंकर ७१
अशी धारणा होती. श्रमल्यावांचून, कांही तरी निर्माण केल्यावांचून, त्या
काळी अन्य कांदह्दी मिळवताच येत नसे. व्यवहाराच्या सुलभतेसाठी पेतता
निर्माण केळा गेला. पण माणताने जन्माला घातलेला ह्या भस्मासुर, माणसा-
च्याच टाळूवरून ह्वात फिरवून विकट हास्य करतो आहे.
इथल्या हनुमान तळ्याजवळच्य़ा मारुतीर्चे दर्शन घ्यायचं असेळ तर
हठुमान तळे
भामाशकराच्या उजव्या अंगाची एक टेकडी चढायला हवी, एक उतरते पठार
आक्रमायला हवें आणि पुन्हा दुसऱ्या एका टेकडीच्या मुळाशी यायला इव.
अध्यी कोसाची ती वाट आहे. तिथें एक गोसावी मठ उभारून
राहतो. उत्तर हिंदुस्थानांतून कुठून तरी येऊन आज दोन तर्पे तो इथं
जगाचा संबंध तोडून राहिला आहे. ' एकाकी न रमते या सिद्धांताचा तो
अपवाद आहे. वृक्षवली आणि वनचरं हच त्याची सोयरी. तो एकला
असला तरी विटलेला नाही. नाना जातांची फुलझाडं त्याने अंगणांत लावली
आहेत आणि समोरच्या काळ्या दगडांनी बांधलेल्या तळ्याचे जीवन पाजून
वाढवली आहेत. बागेला लागूनच उजव्या अंगाला त्याची असिशाळा आहे.
अष्टोप्रहर प्रज्वलित असलेला तो कुंडांतळा असि त्याचा अतिथि आहे आणि
७२ तीथॅरूप महाराष्ट
"॥*..”९ “१५/१५/४१५५. ..”४७. ८४४७४0१४१७ ४४7 ..७”
धजत नाहीत ते त्या अस्तीच्या भयानेच, तळ्याच्या वरच्या बाजूला लह्वानशा
खोपटांत एक माराते आहे, त्यालाही तोच शेंदूर माखतो. त्याच्या एकांतांत
आणि साधनेत ननसंपकांचा व्यत्यय कधीं येत असेल तर तो या
शिवरार्वाच्या प्रसंगीच.
सगळे फिरून आम्ही मळपदावर येतो तो अस्तमान झालं होतं. माणतांची
आवक मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पठार आणि मंदिर यांच्यामध्ये
अव्याहत रहदारी सुरू झाली होती. घंटानाद अविरतपणे उठूं लागले होते.
लोकांची आमोद-प्रमोदाची रात्र उगवली होती. दुकानदारांनी दिव्यांचा
लखळखाट केला होता. वरती तारामंडळ चमचम करीत होते. एवढा समाज
आमच्या गोव्यांत एकत्र जमला अस्तता तर तिथल्या देवस्थानसभितीरने
त्याच्या समाराधनासार्ठी एखादा निःशुल्क नाट्यप्रयोग योजला असता.
आमच्या हृरवळें या गांवी अशीच मोठी शिवरात्र भरते. तिथें प्रेक्षक-गण
रात्रमर नाटक पाहतो आणि शुंजुमुंजु द्वोतांच तिर्थेच उंच कड्यावरून
कोसळणाऱ्या दुग्धघवळ धबघवब्याखालच्या भीमकुंडांत स्तान करतो.
दरवळ्याला पांच गुंफा असून त्या पांच पांडवांनी खोदल्या अशी समजूत
आहि. लोककथा असें सांगते की, पांडव वनवासांत असतां तिथे गेले ह्दोते.
त्यांना त॑ स्थान सुंदर वाटलें. एका रात्रीत पांचांसार्ठा पांच गुहा तयार
होऊन तिथे महाप्रसाद करतां आला तर तिथेंच वनवासाचा पुढील काळ
घालवायचा असे त्यांनी ठरविले, पांचांनींह्दी कंबरा कसल्या. गुंफा तयार
झाल्या. द्रोपदीने घाईघाईने स्वयंपाक केला, धर्माने वैश्वदेव केला आणि
काकर्बळि टाकण्यासाठी तो बाहेर येतो तोच कावळ्याने ' काँ केलें, भोजन
होण्यापूवी तो ओरडला. आपल्या मनोरथावर पाणी पडलेळें पाहून भीमाला
निराशेचा संताप झाला आणि त्या भरांत त्यानें आपली गदा भूमीवर
आदळली. त्यासरशी तिथं महाकुंड निमाण झाळं आणि वरच्या प्रपाताने तं
लागलीच भरून. काढलें. पांडव निघून गेले; पण तं भीमकुंड कायम राहिले,
हृरवळ्यांच्या भीमकुंडाशी भीमाशंकराच्या मोक्षकुंडाची तुलनाच होऊं
शकणार नाद्दी.
_”_७ ४४ ७७५ ५0 »_ ७९.४१ ५-५.”
५ वेरुळचा घष्णेश्वर
जी, आयू. पी. लोहमार्गांला मनमाड स्टेशनवर निजामराफ्र्य रेल्वेचा फाटा
फुटतो. मनमाड ते ओरंगाबाद हे अंतर आगगाडी अडीच-तीन तासांत
तोडते. श्रीमंत लोकांना उतरायला इथे स्टेट हॉटेळ आहे. पण आमच्या-
सारख्याने ते इंद्रभुवन ' दूरतः परिवर्जयेत् ' असेंच मानले पाहिजे. मोटारीतून
त्याच्या प्रांगणांत शिरणाऱ्या एका धनपतीला मी मनांत म्हटल की,
£ तुझीच एवढी ऐट नको. तुझ्या निवासापुढचाच ह्या बंगला पाहून ठेव.
बागेत कारंजं उडत आहे. ओटीच्या पायऱ्यांवर मनरंजनीची कमान
आहे. ओरंगाबादचे सेशन्स जज्ज श्री. बळवंतरावजी घाटे तिथें रद्दातात.
मी त्यांचा पाहुणा आहे. ज॑ तुळा भारंभार पैते ओतूनही लाभणार नाई्दी, ते
सज्ञनाच्या घरचे प्रेमळ, तत्पर आतिथ्य मला तिथें लाभेल. ''
दुसऱ्या दिवशीं पह्दांटे घाटेसाहेबांच्या अभंगमय प्रातःस्मरणानं आम्ही जागे
झाला. आम्हांठा लवकर निघायचे द्दोतें आणि देवगिरीचा किल्ला नि वेरूळची
लेणी पाहून सूर्यास्ताच्या आंत परत यायचें होत. लेण्यांबद्दलची ख्याति मा
वाचली होती आणि अनेक रसिक कलाविदांच्या तोडून ऐकलीह्दी होती.
। काशीस जाव, नित्य वदावे * त्याप्रमाणें अनेकदां बेत रचतां मोडता आज
मी त्यांच्याजवळ येऊन ठेपला होतो. मंदिराच्या गाभाऱ्यांत चंदनी उद-
बत्तीचा सुगंध भरून रहावा तशी अंतरांत उत्कंठा दाटली होती. स्वतंत्र
मोटार ठरवूनच आम्ही निघाला. आमच्या जोडीला एक शीख जोडपेद्दी
मिळाल. शहराच्या बाह्य भागाचा रस्ता फुललेल्या गुलमोहोर वृक्षांच्यामधून
जात होता. लाल शेंदरी रंगाच्या फुलांनी ते नुसते आच्छादले होते. फुलांच्या
भाऊगर्दीत पानांना जागाच उरली नव्हती. खालीही सगळा खच पडला
होता तो फुलांचाच. ते वृक्ष म्हृणजे जसे कांही यादवांचे अतिरथी-महारथी
नुकतेच अलछाउद्दिन खिलजीच्या सैन्याशी मुकाबळा करून आले होते. पुढच्या
मार्गीवर वडाच्या फांद्यांनीं ह्विग्या, दाट कमानी उभारल्या होत्या. उजव्या
७४ तीथरूप महाराष्ट
हाताला ओसाड डोंगरांची रांग उंटाच्या काफिल्यासारखी अविच्छिन्न उभी
होती. ती कुठून सुरू झाली होती आणि कुठे जाऊन थांबणार होती देव
जाणे ! पण वेरूळच्या लेण्यांपर्यत ती जाणार द्ोती एवढे नक्की,
सुमार दद्दा मेळांवर डाव्या हाताला दोलताबादचा काळाकमिन्न किला
दिसला, त्याचा अनादर करून पुढ जाणें शक्य नव्हते. भरल्या कुटुंबांतून,
नांदत्या गोकुळांतून फुटून निघून एखाद्या आपमतलबी पुरुषाने
: वेगळाचार ? मांडावा, तसा त्या डोंगरओळींतून बाजूला झालेल्या एका
डोंगरावर त्या किल्याची उभारणी झाळेली आहे. त्याच्याभोवती किती तरी
तट आहेत आणि ते आतां ठायी ठायी ढासळले आहेत. आज ज्या ठिकाणी
झाडी वाढली आहे आणि जिच्या आश्रयाने कोल्हे, लांडगे आणि जीवजिवाणू
निश्चितपणे राहिळे आहेत तिथेच एका काळीं मिल़म यादवाने स्थापलेली
देवगिरीची राजधानी वैभवाने झगमगत होती. तेराव्या शतकाच्या अखेरीस
राजा रामदेवरावाच्या कारकीर्दीपर्यंत तिथें धनाचे पूर ळोटत होते. नवलाख
दिव्यांच्या द्वारकेसारख्या तिथें रत्नांच्या ज्योति आणि माणिकांच्या वाती
पाजळत होत्या, ह्वा किल्ला त्या वेळीं डांगराच्याच नव्हे तर सहीच्याही
शिखरावर होता. त्याच्याकडे कोणी वांकड्या डोळ्यांनी पाहूं शकत नव्हता.
पण चक्रनेमिक्रम कोणाला चुकला आहे! प्रथम नाशाला टपलेली काळाची
आणि नंतर धनाला वखवखठेळी अलाउद्दिन खिलजीची नजर या राज-
धानीवर वळली, रामदेवरावाचे नवग्रह पालथे पडळे आणि यादवसाम्राज्याचा
सूयास्त झाला. हा किल्ला यादवांचे बारसे जेवला तर्तेच त्यांचे बारावेंद्दी
त्याला जेवावे लागळे. केवढा तो त्याचा खोल खोल खंदक ! कुठून तरी
जलसंघाट आणून तो भरून ठेवलेला अते. आणि त्याला लागून एकरदो-पन्नास
फूट उंचांचा तो काळवथर कडा, सर्व बाजूंनी ओळंबा लावून उभाच्या उभा
छिनून काढलेला आहे. त्याच्यावरून चढायचा प्रयल्न करणाऱ्याने एकदम स्वर्ग-
ह्वारच गांठावें. जप्ता अनुलंध्य तसाच अभेद्य. पण जगांत फितुरीला अभेद्य
अर्से काय आहे? किल़्यांत दाणागोटा भरपूर आहे या खात्रीवर रामदेव-
रावार्ने अल्लाउद्दिनाच्या वेढ्याला छाती दिली ; पण ऐन वेळीं कोणत्या तरी
अघटित घटनेने कोठारांतली धान्याची पोती. मिठाची पोती झालीं आणि
देवाला निखंदीत रामदेवरावाला दाती तृण धरावे लागले.
बेरुळचा घृष्णेश्वर ७५
किला उतरून आम्ही पुढे निघाला तर रस्त्यावरच्या कमानीतून बहिर
पडायच्या आंतच आम्हांला सरस्वतीचे वाहन भेटलं, पण आमची चाहूल
लागतांच तं पाठ फिरवून आणि पिसाऱ्याचा संकोच करून खालच्या
जाळींत तुरतुरल॑. मी एक शारदेच्या दरबारांतला लहानसा * छडीदार *. त्याचें
माझ उपास्य एक. असे असतां त्यानें मला वाळींत टाकल्यासारखं करावें हे
मनाला रुचले नाही. पण ही खिन्नता पुढच्याच क्षणाळा भरून निघाली.
त्यापुढे जे चारपांच मोर द्दोते त्यांनीं रस्याच्या उजव्या बाजूकडून डाव्या
वाजूळा ळ॑घण मारतांना आमच्या गाडीवर रंगीत पिसाऱ्याची कमान केली
आणि मला धन्य धन्य वाटलें. दिलीपसुदक्षिणेपेक्षांही आम्ही भाग्यवान होतो.
त्यांच्या रथावर बिनखांबारचे तोरण उभारळ॑ होतं त॑नदीकांठच्या सारस-
पक्ष्यांनी. पण सारसापेक्षां मोरांचा दिमाख न्यारा हे काय सांगायला हवें!
साम्राज्यतृष्णेचा ओतीव पुतळा ओरंगजेब जिथे अस्मानांतल्या चांदण्या
मोजीत निळ्या धुमटाखालीं कायमचा पहुडला आहे, तें खुलताबाद गांव
ओलांडून आमची मोटार घाट चढू लागली. दुसऱ्या बाजूने उतरल्यावर
आमच्या सारथ्याने एका वळणावर गाडी उभी करून म्हटलें, ' ही उजव्या
हाताला लेण्यांची रांग सुरू झाली. पाहिल्या क्रमांकापासून पद्दायला सुरू करा.
तोंवर मी गांवांतून माहितगार घेऊन येतो. ?
बाहेर धरणी तापढी होती. डोंगर रसरसत होते. अंगाची उकडहंडी दह्वोत
होती. पण पाहेल्याच गुंफेत त्या डोंगराच्या पोखरलेल्या पोटांत जेव्हां आम्ही
शिरला, तेव्हां एकदम हायसं वाटलं. यंत्रांच्या साह्याने दवामान समधात
राखणाऱ्या एखाद्या प्रेक्षागरहांतच जणू आम्ही प्रवेशला होतो. मन हळूच
कुजबुजले . ' आतां हिंइंबिडूं नकोस, इथंच आडवा हो. कसे गपूकन डोळे
मिटतीळ. ' इथे क्रमाने एक ते बारा गुद्दा बौद्धांच्या आहेत. पुढें सभामंडप,
याजूंना भिख्खूंच्या ध्यानधारणेसाठी बारक्या बारक्या गुहा, समोर गाभारा,
दोन्ही अंगी वज़्पाणि आणि पद्मपाणि हवे उभे ड्वारपाळ, आणि गाभाऱ्यांत बुड्धमूर्त
इंच सवंत्र एका साचाचे शिल्प. आंतहि तेंच, बाहिरच्या पडवीतहि तेच आणि
भिंतींवरद्दि जागजागी तेंच. ' सर्व बुद्धमयं जगत् ! ' फरक कुठें असलाच तर
तो गाभाऱ्यांतल्या बुद्धमूतीच्या आसनबंधांत. कुर्ठे तो दोन्ही पाय खालच्या
कमळावर सोडून बसलेला दिसतो तर कुठें त्याने पद्मासन घातळेळें असते.
“४५.%५/%५/१../”१७.
७६ तीथरूप महाराष्ट
बुद्धाची ध्यानमुद्राच त्यांनीं स्वंत्र कोरळेळी आहे. नेत्र मुकाळिस आणि डाव्या
हाताची करंगळी उजव्या हाताच्या चिमटीत घरळेली. जणुं तो मानव-
जातीळा करपलवी भाषेंत सांगतो आहे. “ जगांतल्या पर्वंताएवढ्या दुःखावर
या करंगळीच्या टोकाएवढें लहानसे पण रामबाण रसायन आहे. वासना
सोडा. तृष्णा त्यागा. ताच सर्व दुःखांचें मूळ आहे. '
बुद्धभगवान् तुम्ही कुठेही पहा. त्याच्या कानांची पाळीं खांद्याला टेकठेलीं
दिसतात. त्या काळचें त सोंदर्यलक्षण होते. दगडाचे वजनदार मणि कानांत
लोंबवून ते असे दीर्घ केळे जात. एका मण्यानें पाळें जरा खालीं आलं की
त्याच्या जोडील्य दुसरा एक तेवढ्याच वजनाचा मणि तिथें चढे आणि
अशा रीतीने पाळे ताणत ताणत खांद्याला येऊन चिकटे. चिनी लोकांत
मुलींचे पाय बारीक व्हावे म्हणून ते जन्मापासून आवळून टाकतात तशाच
प्रकारची हद्दी सोंदर्यीपासना ददोती.
पांचव्या ढेण्याजवळ पावसाळ्यांत एक प्रपात खालीं कोसळतो. खालच्या
कांडांत अजूनही त्याचें पाणी अवशिष्ट होते. या बारा बोद्ध लेण्यांत मर्धेच
एक चेत्य़ आहे. चिंचोळ्या गुहेत, खांबांच्या मेहेरपीत बुद्धस्वूप उभा
करणें हे चेत्याचें लक्षण. इथें या स्तूपांतह्रि एक बुद्धमूर्त घडवलेली आहे
आणि शिल्पकाराने तिच्यांत एक विशेष कोशल्य ओतलं आहे. बुद्धदेव
समोरून ध्यानस्थ दिसतो, उजव्या अंगाने सचित दिसतो आणि डाव्या
अंगाने सुस दिसतो. केवळ ओठाच्या पाकळीत आणि डोळ्यांच्या ठेवणीत
* होय नव्हे ? अता फरक ठेवून शिल्पकाराने हे तिन्ही भाव' साधळे आहेत.
बारावे ढणें तर तीन मजली भव्योचुंग आहे. जी खोदाई खालच्या मजल्यावर
ती आणि तशीच वरच्या दोन्ही ताळांत. इथल्या गुहांची खोली, स्चनेची
प्रमाणबद्धता, मूतीची भव्यता, आणि इसवीसनाच्या पांच ते सात असा
तीन शतकांचा द्वा विराट प्रयत्न नि अविच्छिन्न दी्घोद्योग पाहून “ अही
आश्चर्यम् | ' अत्ता उद्गार निघतो हें जितकं खरं; तितर्केच प्रत्येक गुंफेत
शिल्पकलेचा तो एकसुरीपणा, तो ठरीव सांचा पाहून पुढे पुढें मन कंटाळतें
इंद्दी तितकच खरें. बुद्धाचे जीवन म्हणजे विश्वाळा जडलेल्या मृत्यु-जरा-
व्याधि या त्रिविध दुःखांवर ओषध शोधायला निघालेल्या शुद्ध, बुद्ध, मुक्त
अश्या एका धर्मसम्राटाचे जीवन | त्या दयामय महापुरुषाच्या चरित्रांतळे किती
बेरुळचा घृष्णेश्वर ७्$
तरी हृदयस्पर्शी प्रसंग या काळ्या कातळावर कोरून अमर करतां आले
असते. राजप्रासादांत कुसुमकोमळ हातांनी वाढवला जाणारा बाल
गोतम, ढावण्यद्वीपांतल्या लक्ष्मीसारखी पत्नी यशोधरा आणि सर्वसुलक्षण-
मंडित असा पुत्र राहुल, या दोन प्राणाधिक व्यक्तींचा एका रात्री गुततपणे
त्याग करून जाणारा तरुण पण विरक्त गोतम, अनोमा नदीच्या कांठी
आपल्या लाब, रेशमी केसांना कात्री लावणारा आणि राजपुत्र असूनही मिक्षेचे
शिळे तुकडे चघळणारा तपी गोतम, मानवजातीचा सनातन शात्र जो मार
त्याच्याशी दोन हात करून त्याला चीतपट लोळवणारा ' सिद्धार्थ ? गोतम,
गयेजवळ वटवृक्षाखाली अखंड साधना करून ' बोधि' मिळवणारा 'बुद्ध
गोतम, असें त्याचें सगळें जीवन इथें साकार व्ह्यायला दृर्वे होते. त्याने
उपदेशिलेल्या भेत्री, मुदिता, करुणा, उपेक्षा या भावना इथं नारीरूपांत
उमटायळा हव्या होत्या, आणि बुद्धाने विधवजनासाठी सांगितलेले ते त्रिकाला-
बाधित दहा नियम आल्यागेल्यांच्या डोळ्यांत भरतील अश्या जागीं एका खालीं
एक असे एखाद्या रुंद शिळेवर खोळ कोरून ठेवणें आवश्यक नव्हतं काय!
पण तसें झाळे नाही. बुद्धाच्या भक्तीर्ने भारावळेळे ते कारागीर जागा सांपडेल
तिथं बुद्ध आणि बुद्धच खोदीत राहिले.
पण प्रेक्षकांच्या मनाला लागलेली ही विविधतेची तहान पुढच्या हिंदु
लेण्यांत पूर्णतया शमते. विशेषतः केलास लेण्यांत तर डोक्यावरून पाणी
जाते. प्रवेशद्वारांतून आंत शिरतांच पहिला पडदा म्हणून उभ्या केलेल्या
शिळेवर गजल्वमीचें ज॑ चित्र आहे तिथूनच त्यांचा कल्पनाविलास दिसूं
लागतो. राष्ट्रकूटांनीं आपल्या गजांतवेभवाचें द्योतक म्हणून ते तेथ कोरले
असावे. खाली क्षीरतागराच्या लाटा उचंबळत आद्दित, त्यांतूनच एक सद्दस
पत्र कमळ उमलून वर आले आहे. त्याच्या नाजुक पाकळ्यांना एवढीशीहे
इजा न पोचेल इतक्या हळुवारपणे कमळजा लक्ष्मी त्यावर विराजित झाली
आहे. जलपृष्ठावरचे दोन आणि वर अधांतरीचे दोन असे चार गजराज तिला
दुधाने न्हाणीत आहेत. खालचे दोन हत्ती कळश भरून वर देतात आणि
वरचे दोघे सोंडेच्या विळख्यांत धरून तिच्या मुकुटमंडित मस्तकावर ते
एकत्र जुळवून पालथे करतात.
तिथून आंत जावे आणि समोर उर्भे राहून सर्वत्र नजर फिरवावी. कोणताही
७८ तीर्थरूप महाराष्ट
“७००००.” “>/"“/.// 2". /"/-/"“7:9:2*» “*7"/"/ “/£* “7"-/शागी"४४ “५4४ ५०४४०५४४४४" 2७४१०९ ४ /"५५/४५/" /*/720427"2"":7 77४४५५.» “/४८/५०” »८/”//”- ८८५८-०८-८८ ५/-.»..»८-८/८८५८०८८/*/*-०--७०
मनुष्य त्या क्षणी स्तंमित होईल आणि थोड्या वेळाने माराक्रांत हृदयांतून
निःश्वास सोडील. बुद्धलेण्यांत न भेटलेली विविधता इथं आपल्याला चोहदों
केलास लेणें
बाजूंनी घेरते. मद्दाद्वारांतच उजव्या हाताला उभा असलला तो काळा भव्य
हत्ती, समोरचा आपलाच सख्खा भाऊ छिन्नमिन्न झाळेला पाहून तो दुःखी-
कष्टी दिसत आहे.
केलास लेणे म्हणजे उत्तुंग अशा तीन ताळांचे शिवमंदिर. यालाच रंग-
महाल असे दुसर नांव आहे. भारतांत जी विशेष उलेखनीय लेणी आहेत,
त्यांत यालाच अग्रपूजेचा मान लाभेल. ' सीतान्ह्माणी » “* तीन ताळ >,
। रन्द्रसभा ? द्ी कलाकोशल्याची आगरें जर आसपास नसती, तर केलास
लेण्याला आजच्यांपेक्षांही अधिक महत्त्व आळ असतें. रसिक प्रेक्षक इथ येतो
तो एका खेपेत सगळ्या गुंफा डोळ्याखाळून घालण्याच्या इराद्यान, त्याला
सावकाश्ीी नसते. तो आपली ठोसर नजर सगळीकडून कशीबशी फिरवून
आणतो. बुभुक्षिताचें खाणें तस त्याचें पहाणे, त्यामुळें केलासाचा आकार,
त्यांतल्या कारागेरीचे बारकावे, त्याच्या निर्मितीच्या मागचा शतकांचा
अखंड दार्घोद्योग इत्यादि गोष्टींची ल्याला या उडतपगड्याच्या पह्ार्णांत खरी
कल्पना येत नाहीं. तो पायांनी चालत राहतो, मजळे चढत राहतो, डोळ्यांनी
पद्दात राहतो आणि तासाभरानें पंचप्राण पांगुळळे म्हणजे म्हणतो, ' बस्त् !
पुरे झाळें आतां. !
ह्री सगळी लेणी डोंगरमाथ्यावरून पायथ्याकडे अश्या पद्धतीने खोदीत
वबरुळचा घृष्णेश्वर ७९
आणलेढी आहेत. “आर्धी कळस मग पाया रे? ही उक्ति या मंदिरांना
यथार्थत्वार्न लागू पडते. इतर लेण्यांपेक्षां केलासाची रचना सर्वस्वी अभिनव
आणि कलाधरांच्या प्रातिमेचें दिव्यल्व दाखवणारी आहे. हं लेणें समावतींच्या
खडकापासून अलग आहे. काळ्या एकसंध पत्थराचा तेवढाच म्हणजे, १५४
कूट रुंद आणि २७६ फूट लांब पाया घालतां येईल, इतका भाग मोजून
मापून त्यांनी कसा सुटा करून घेतला असेल, ते त्यांचे तेच जाणोत. खालच्या
चौथऱ्याला सगळीकडून हत्ती आणि सिंह यांच्या मस्तकांची रांग उभी केलेली
आहे. त्यावर सोळखांबी सभामंडप उभारडेला आहे. प्रत्येक खांब नक्षी आणि
आकृति यांनीं आपादमस्तक कोरून काढलेळा आहे. गाभाऱ्यांत भव्य
शिवलिंग स्थापळं आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला, वरच्या मजल्यावर
पेंचायतनाची पांच मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या डाव्या अंगाला प्रवेरा-
द्वाराच्या बाजूर्न पुढे आळेळा एक खडक आहे. त्यावर उभें राहून पहावे,
म्हणजे वाटतं का, ह मंदिर नसून द्दा भारतीय युद्धांतला अजुनाचा मव्य
दिव्य रथ आहे. शिवलिंगाचे स्थान ही अजुनाची बसण्याची जागा आणि
मंदिराचा समामंडपाच्यापुर्ढे आलेला सज्जा ह पा्थसारथी भगवंताचे स्थान.
हवे लेणे मुख्यत्वे शिवाचे असले तरी इतर अनेक मूर्तीची विपुलता इथें
पहावयास मिळते. मुख्य मंदिरांतच नव्हे, तर सर्भावतींचा काळा कातळ
फोडून जो प्रमाणबद्ध प्रदक्षिणामार्ग तयार केळेला आहे, त्यांतद्दी अनेक
देवदेवता आणि नानाविध पोराणिक प्रसंग प्राकार झालेले पद्दातांना तुम्हांला
वाटेल कीं, विधात्याने आपल्याला दोनच डोळे देण्यांत फार कंजूषपणा केला
आहे. इथें ढंकेधवर रावणाला बरेंच प्राधान्य दिळेळं आहे. रावण हा अग्रगण्य
शिवभक्त, शिवप्रसाद मिळवण्यासाठी लंकेंतून केळासलळा येऊन त्यानें उम्र
आराधना आरंभली. पण दीर्घ काळ लोटला तरी शिव कांही प्रसन्न होईना. ळर्केतळं
चौदा चोकड्यांचें राज्य संभाळायरचे तर वर्षानुवर्षे बाहेर राहुन चालण्याजोगे
नव्हतें, म्हणून त्याने आपल्या बलदर्पाला साजेतता विचार केला की, केलासच
उपटून लंकेत न्यावा. मंदिराच्या पाथ्वमागावर या प्रसंगाचे चित्र आहे आणि
प्रदक्षिणेंतून जातांना तं आपलें लक्ष खंचल्यावांचून रद्दात नाही.
रावणाने गुडघे टेकून आपली दशशिरें आणि वीस हात केलासाखाली
रदेडे आहेत आणि तो साऱ्या शक्ति पणाला लावून केलास उचलतो आहे.
८५ तीर्थरूप महाराष्ट
“>> -/५/-”-€५/-€-“>€५/४५८/४/-/-€-/-/-/४५ -“-/५<-€-€--“€<€<५/-./ /-* “<< -<-“-<“<>./-“>/->“<->>>“-«
५५/१४/५५४५ ०४४७४४//४०//१५४१४१४४४७४१४७४४७/७७ ७०
> “-“--
सखी-पावती आणि शंकर या वरच्या मंडळीला या उत्पाताचा पत्ता नाही.
एकाएकीं केलास गदगदूं लागलेला पाहून उमेच्या सखीच्या अंत्रमाळा उडत
आहेत आणि ती सुराक्षत आसरा शोधण्यासाठी ओणवी ओणवी पळत
आहे. पार्वती भयचकित होऊन शिवस्कंधाचा आधार घेत आहे. शिवाच्या
मुद्रेवर मय नाही, पण आश्चर्य आहे. हाळता डोळता केळास स्तब्ध करण्या-
साठीं तो वरून आपल्या पायाचा दाब देत आहे आणि तो दाब रावणाला
असह्य होऊन त्याची दद्वाही शिरे ओझ्याखाली पिळवटून पाठीकडे वळत
आहेत. शिवधनुर्भगाच्या वेळीं रावणाची जी फजिती झाली ती पहिली आणि
ही दुसरी. याच चित्रावरून या लेण्याळा केलास ह नांव पडलें असावें.
दुसऱ्या एका ठिकाणी रावणाने आपलीं नऊ शिरकमले स्वहस्ते उतरून
त्यांची शिवलिंगाभावती प्रमावळ रचली आहवे. त्या पुढच्या चित्रांत पार्वती
शिवाला विचारते, ' रावणाच्या भक्तीला प्रसन्न केव्हां होणार ! त्याला काय
देणार?) या ठिकाणी तिची मुद्रा जिज्ञालु आदे. तिच्या प्रश्नाचे उत्तर त्या-
पुढील चित्रांत दिठेळे आहे. शिव म्हणतो, ' रावण आत्मळिंग मागतो. मी
ते त्याळा देणार, ? या ठिकाणीं तिची मुद्रा म्लान आहि. दुसऱ्या एका
ठिकाणीं पार्वती -परिणयाचा समारंम उभा केळेळा आहे. तिर्थे सर्वाच्याच
ओठावर तृक्ष्म हास्य फुळून राहिळे आहे. आणखी एका ठिकाणी एक
मयानक हृदय उभे आहे. पशुपतीने एका राक्षप्ाच्या पोटांत त्रिशूळ खुपसून
तो उंच घरला आहे. त्या राक्षसाचे नांव रक्त्बिंदू. त्याला असा वर होता
की, त्याच्या रक्ताचा एक थब जमिनीवर टपकतांच त्यांतून तसलेच शंभर
निशाचर प्रकट व्हावे. दुसऱ्या हातानें नरकपाल धरून शिवार्ने तसें न होऊं
देण्याची खबरदारी घेतढी आहे. राक्षसाचे रक्त कपालांत सांडत आणि
त्यांतून रजे खाळीं गळेळ त मुख पसरून आडवी झालेली कालिका वरच्यावर
चाटून टाकते. आदिवराद्वाच्याही अनेक उंच उंच मूर्ति इथे पहायला
निळाल्या. आदिवराह ईं राष्ट्रकूटांचं प्रतीक होते. त्यांनीं दिलेल्या ताम्रपटां-
वरच्या प्रशास्तींतही वराद्वाचा उललेख आढळतो. या वराद्वानें रसातळांतून वर
काढळेली परथ्वी ही निरवयव वाटोळी नसून तन्वी इयामा अज्ली नाजुक नार
आहे आणि ती त्याच्या सुळ्यावर निश्चित पर्णे विसावली आहि. केवळ दगडां-
तून या ठिकाणी भय, विस्मय, चिंता, ईर्ष्या, आनंद इत्यादि भाव-मावना
बेरुळचा घृष्णेश्वर ८१
प्रकट झालेल्या पाहून त्या विश्वकर्म्याळा धन्यवाद देण्याइतकीसुद्धां प्रेक्षकाळा
शुद्धबुद्ध रद्दात नाही.
तसंच आणखी पुर्ढे जातांना एका वळणावर शिवशंकर तांडवाच्या अमि-
निवेश्ांत उभा दिततला, त्याचा एक पाय पुढच्या चवड्यावर टेकलेला आहे
आणि दुसरा अधांतरी. किती विलक्षण पीळ आहे त्याच्या शरीराला. उंच
पण रेखीव अश्ली ती आकृति आहे. त्याच्या सोष्ठवयुक्त पाठीच्या कण्यावरून
तर दृष्टीच काढूं नये. संस्कृत वाड्ययांतल्या शिवविषयक सर्व कल्पना त्या
मूर्तीत एकवटल्या आहेत. तांडवाचे स्फुरण त्याच्या नेत्रांत आणि मुखावरच
नव्हे ; तर प्रत्येक अवयवांत भरून उरलेलं दिसतें. त्यांचे भुजदंडच उठाव-
लेळे नाह्दींत तर अंगावरचे नागही. शिवगण बेहोशीनें त्याच्या नृत्याला
वाद्याची साथ देत आहे. त्याच्या पाठीमागे एक मानवी हाडांचा सांगाडा
उभा आहे आणि तोह्दी अंतरी अनावर होऊन खदखदून हंसतो आहे. हे
चित्र माझ्य़ा स्मृतिपटलावरून कधींही पुसलं जाणार नाही. स्वप्तांतसुद्धा ते
जसेच्या त्से उर्भे राहीळ, पहातां पद्दातां मला मालती - माधवांतल्या त्या
तांडव-वर्णनाची आठवण झाली.
: आतां त॑ पाठीवरचे गजचमं फडफडेल. त्याचें टोक अंगीं घुसून. जटा-
जूटांतळी ती चंद्रकला पाझरेल, त्या अमृतद्रवार्ने शिवाच्या गळ्यांतली नररुंडं
सजीव होऊन अट्टद्दास मांडतील. बाजूबेदांचे काळे भुजंग घुसळळे गेल्यामुळें
फूल्कार सोडतीळ. हातांतळं खट्वांग अळातचक्रासारखे इर्वेत भिरमिरतांना
आकाशांतल्या नक्षत्रांना तडाखे बसतीळ. कटपूतना, वेताळ वगेरे भूतगण
टाळ्या पिटीत पुढ येतील आणि सर्व प्रकारे हा मयानक रस पुंजाळळेला
पाहून गोरी घाबऱ्याघुबऱ्या घांवेळ, धवळ्याभोळ्या शिवाच्या गळ्याळा
मिठी घाळून ती म्हणेळ, ' नाथ, आतां पुरे करा. विश्वाचा प्रळयकाळ
ओढवेल. !
हे सगळें लेणे पुरे करायला तीन लाख घनफूट दगड खोदावा लागळा
आहे. दिव्य लोकांचे ईं अप्रतिम शिल्प उभं व्हायला पुरी शंभर वर्षे खर्ची
पडळीं आहेत. छन्नी आणि हातोडा या दोनच साध्या आयुधांनी इथळे दगड
ती. म....२-६
८९ तीथरूप महाराष्ठू
फुटळे आणि घडळे आहेत. पण या त्रिगुणात्मक अर्मसृष्टीचा विधाता कोण
म्हणून पुसाल, तर इतिहास कानावर हात ठेवील. अडीच हजार वर्षापूर्वी
ग्रीकांच्या अथेन्स शहरांत सर्वत्र पुतळेच पुतळे उभारणारा, प्रोपेलिआरचे
भव्य शिल्प निर्मिणारा, टेकडीवर अथिनी देवतेची उत्तुंग मूर्ति उभी करणारा,
दगडा घोंड्यांतून रंगीबेरंगी पाकळ्या-फुळें उमलवणारा, अथेन्सला दुजा
अमरपुरीची कळा चढवणारा तो शिल्पकारांचा सम्राटू फिडियस--
त्याचें नांव जगाला ठाऊक आहे; आपल्याला माहीत आहि. पण बाराशे
वषोपू्वी आपल्याच महाराष्ट्रांत स्वगीतली देवतसृष्टि खाळीं आणणारा हा
प्रातिसष्टा विश्वामित्र मात्र कोण आणि कुठला तं आम्हांला माहीत नादी. बरे,
तोही महाभाग असा निःस्पृह की, एखाद्या कोपऱ्यांतला लहानक्या दगडावर-
सुद्धां आपल्या नांवाची चार अक्षरें उमटवायला त्यार्ने छनी उचलली नाही.
जणुं तो आपल्याला म्हणतो ' मार्च नांव काय पुसतां? या ठेण्याचं ज नांव
तेच माझे. या मूतीची जीं नाम-रूप तींच माझी. मी यांच्यावेगळा नाही.
मला समजून घेणें असेल तर माझी हद्दी अफाट कलासष्टि समजून घ्या!
कलादर्शनाचा आनेद हृदयांत तुडुंब भरून घेऊन बाहेर पडतांना मां
म्हटलं, याचे वणेन मी काय करूं अन् क्स करूं! उगाच शब्दांचे बुडबुडे
उठवण्यांत अर्थ नाहीं. सच्चिदानंद परह्माप्रमार्णेंच हा कलेचा खजिनाही
वाणीला अगोचर आहि. द्या शब्दाचा विषय नसून प्रत्यक्षाचा आहे. मुक्या
माणसाने साखर खावी. त्याला तिची गोडी कळावी, पण सांगतां मात्र येऊं नये,
अशी इथें अवस्था होते. या दगडांची भाषा समजायला निराळेच डोळे, निराळेच
अंतःकरण घेऊन जायला पाहिजे.
राष्ट्रकूटांच्या यश-कीर्ति-प्रतापाचा तो काळ होता. हिंदुधमांच्या पुनः-
प्रातिषठ्ठेंचा तो काळ द्ोता. भारतभर फेलावलेला बोद्ध धर्म अव्यवहार्य म्हणून
जनांच्या मनांतून उतरळा होता आणि भगवान् आध दंकराचायीनी तर्काच्या
धारेवर धरून त्याच्या तत्त्वज्ञःनाचं ठिसूळपण सिद्ध केलं होते. आसेतुहिमाचल
दिग्विजय करून त्यांनी अगस्तीप्रमाणे बुद्धधर्माच्या सागराचे एकच आचमन
केलें होते. भारतीयांचा सनातन धर्म त्यांना परत मिळवून दिला होळा.
आणि हे सगळे राष्ट्रकूटांच्या अमदानीत झालं होतें, हे घराणे इ. स. ७५०
च्या सुसारास सरसावले आणि पुढे दोन सग्वादोनशें वर्षे त्याने सत्ता गाजवली.
//./ /£-“<“</>./ /£“//£/-<// >.
वेरुळचा घृष्णेश्वर ८३
त्यापूर्वी मद्दाराष्ट्रांत त्यांचाच लद्दान लह्वान राज्ये होतीं. पण दन्तिदुर्ग नांवाचा
एंक शक्ति-युक्तींचा पुरुष त्यांच्यांत निपजला, त्यानें ही सर्व राज्ये एकत्र
केली. चालुक्यांची माँंडळिकी फेकून दिली. सम्राट कीर्तिवर्म्यांचा युद्धांत
पराभव केला आणि एक बळाढ्य साम्राज्य स्थापले. हिंदुस्थानच्या इतेहासांत
ञ्या स्वाऱ्या झालेल्या आहेत, त्या प्रायः उत्तरेकडून दक्षिणवर. पण राषर-
कूटांच्या अमदानींत याच्या उलट झालें. मराठी आणि कानडी सैनिकांनी
एक होऊन उत्तरदिग्विजय केळे आणि हिंदुस्थानभर आपला दरारा'बसवला.
राष्ट्रकूटांच्या नेतर दाक्षिणात्यांचा असा उत्तरेवर वचक पहिल्या बाजीरावाच्या
कारकीर्दीपर्यंत पुन्ह्या बसला नाहीं.
दन्तिदुर्गाच्या अर्धवट राहिलेल्या महत्त्वाकांक्षा त्याच्या मृत्यूनंतर त्याचा
चुलता कृष्णराज यानें पुऱ्या केल्या. ' अकालवषवलमभशुभतुंग ) हदी प्रर्दार्ध
विरुदावाळे धारण करून तो गादीवर आठा. केलास लेणे आणि धष्णेश्वराचे
मंदिर ही दोन्ही त्यानेच बनविली. असंख्य कलाकार ळेणीं खोदण्यासार्ठी
पुढें सरसावळे. पण आश्चर्याची आणि तितकीच अभिमानाची गोष्ट द्दी की,
त्यांनी एकादी बुद्ध-गुंकंतल्या एकाही मूर्तीवर द्वातोडा उगारला नाही. बोड धम
परास्त झाला दोता. हिंदुधमींचा नवोदय झाला होता. दृषांच्या उद्रेकाचा तो
काल द्योता. पण तशाद्दी स्थितींत त्यांच्या अंतरांतळा विवेकददरि जागा राहिळा.
ते जणू म्हणाले, ' बौद्धांची खोदकळा आपण आणखी पुढे नेऊं. तिच्यांत
अधिक सूक्ष्मता, अधिक विविधता आणूं. भावी पिढ्यांना दोन्ही प्रकार एकाच
चेळीं एकाच रांगेत पाहूं देत. '
बौद्धांनी आपल्या उपास्याला तसंच हिंदूंनी हरिहरांना आपल्या
कारागेर्रात मदृत्त्व दिळें. शैव-बेष्णव संप्रदाय याच काळांतून उगवले
'आणि वाढीस लागल, ज्या चाटुक्यांचा पाडाव करून राष्ट्रकूटांनी आपळं
साम्राज्य जोडळे, त्याच चाळुक्यांनी इ. स. ९७७ मर्ध्ये पुनश्च ते
मोडले. चाढक्य हे जेनधमी होते. त्यांनाही याच खोदकलेच्या द्वारे
आपल्या धर्माचा उत्कर्ष दाखवावा असें वाटल्यास नवल नाही. त्यांनी
याच रांगेंत पांच ळेणी कोरली आणि त्यांत महावीर, पार्श्वनाथ इत्यादि
तीर्थकर आकाराळा आणले. चालट्क्यांनी राष्ट्रकूटांचें वेर केळे; पण त्यांनी
निमिळेल्या केळासाचे नाही. केलासाचे अनुकरण तर त्यांनी केलंच; शिवाय
८४ तीर्थरूप महाराष्ट
ऱ्“ २८ ७८ ४ ७/४/ -”५/५/१ १ ५ “०५०५७० -/:/->-“//५/-//-/-//५/-/-7-/-/-/./:/->7/////-:<-/“'“-.*.//५/५८४८/* :“”*/-:“/“:-“.“/-:“€*:*-/“*““-:*-***“““”“/*/।*'“/*५-*/-./,»/"*
आपल्याही कांही अमिरुचि त्यांत प्रगट केल्या, जेनांचींही दोंदोनशें वर्षे या
कामांत खर्ची पडळी आहेत. काळ्या मातीच्या, बिनझाडीच्या, वरवर
उपेक्षणीय वाटणाऱ्या या सामान्य गिरिमाळेच्या पोटांत संपूर्ण एक दृजार वर्षे
सांठवलेळीं आहेत. विस्मृतीच्या अंधारांत विरून जाणारा भूतकाल इथें वज़्-
ळेप केला गेला आहे. राजनेतिक आणि धार्मिक घडामोडींचे तान टप्पे या
ठिकाणी ठळकपर्णे दिसून येतात.
व्र त
> ्र्र& द्य
द्र 8 ८2. (कळ र व्य
रट 1 वी
*व्ल२७१० ७ मी द्र ' टू ल्य >.
। “2,228 92 2222218. : 9२
हक ४, ८-/ मई द्र द
4442६40:204/2//22//7
»””/”//८८/- ////”/4/ य
हि िस्व्स क आब... काट अ
याड क्त्रत्र्क्ात
म /:£/€ 4” की यी
घृष्णेचर-मादर
हीं चौतीस विशाळ सुंदर कलारमेदिरें सुमारे पस्तीस वषोपूर्वी केवळ
बेवारशी गुरांचे गोठे, वन्य पशूंच्या ळपण्याच्या जागा, दिवाभीतांच्या तमो-
मय ढोली आणि भिकाऱ्या-टाकाऱ्यांची बिनभाड्यारची घरें होती. कोणाला
ह्यांची कदर नव्हती. निजामसरकारद्दी आंधळेच होतें. पण कोण्यातरी
जाणकार आणि वजनदार माणसाने या गुंपांचें महत्त्व पटवून दैद्राबाद-
सरकारचे कान उघडले असावे. त्यानंतर यांच्या सुरक्षेची तरतूद झाली.
आजमितीस या सर्व गुंफा अंतर्बाह्य खच्छ आहेत, जोपासलेल्या आहेत आणि
जरूर त्या ठिकाणी डागडुजी केलेल्या आहेत, मुख्य रस्त्याला फांटे फोइन ते
प्रत्येक टेकडीकडे नेळेळे आहेत, तेही सुंदर आहेत.
त्यांतल्याच एका र्याने खाली करक आपल्याला घधष्णेश्वराच्या मंदिरा-
कडे जातां येते. बारांपैकी हँ शेवटचे ज्योतिळिंग समजतात. या'च डोंगरावरून
वेरुळचा चृष्णेश्वर ८५
इलागंगा नांवाची एक लहानक्यी नदी निघून पुढे गोदेला मिळाळी आहे.
तिच्या अरुंद आणि कोरड्या पात्राच्या कांठी कोरड्याच भूमीवर घष्णेश्वर-
मंदिर आहे. आवारांतलीं तीन-चार बकुळीची झाडं आणि पिछाडीच्या डाव्या
कोंपऱ्यांतली, तृषिताची कर्धीही निराशा न करणारी विह्दीर द्दी जर नसती तर
ते स्थान अगर्दी भकासच दिसले असतें. कृष्णराजानें बांधलेळं हे देवालय
मोडकळीला आलेलें पाहून अइल्याचाईने त्याचा जीर्णोद्धार केला आदे.
अहृल्याबाई ही एक अशी धर्मांची माउली होती की, भरतखंडांतल्या बहुतेक
क्षेत्रांत तिच्या नांवाची कांही ना कांही तरी निशाणी आढळतेच. हं मंदिर
दगडी बांधणीचे, ठेंगणे, ठुसके पण रुबाबदार आहे. ८४ आणि ६१ फूट
एवढी त्याची लांबी-रुंदी आहे. महादाराशिवाय त्याला, दोन पक्षदवारेही
आहेत. देवाचे पुजारी गुरव, पण त्यांची वस्ती देवासन्निध नसून खालच्या
गांवांत आहे. महादेवाला एकांतवासाची खंत नाही म्हणूनच ठीक.
देवळाच्या परिसरांत कोणाच्या तरी दोन समाध्या आहेत. मी त्यांबद्दल
पृच्छा केली, पण त्यांची माहिती मिळण्याऐवजी क्षेत्रस्थ लोकांचे ' अगाध
ज्ञान मात्र कळळें. मग मीं आपला अनुमानधपका बसवला कीं, भोसल्यांचे
पूर्वज येथें रद्त असत, त्यांपैकी कोणाच्या तरी दहनभूमीवर या मठ्या
उभारलेल्या अताव्या. त्या दिवशी सोमवार असल्यामुळें जवळच्याच कुठल्या
तरी गांवांतून कांद्दी त्राह्षण मंडळी सकुटुंध सपरिवार घुंष्णेराला लघुरुद्र
करण्यासाठी तिथें आली होती. ते कार्य उरकल्यावर जवळच्या घर्मशाळेंत
त्यांचा महाप्रसाद चालला होता. आम्ह्ांलाही त्यांतला अंशभाग मिळाला.
तिथून आम्ही गेला, ' शिवालय ? तलाव पाहायला, ह्या तलाव दृष्टि
छुन्ध होईळ इतका सुंदर आहे. चोंहीं बाजुंनी तो खोळवर बांधून काढलेला
आहे. मध्यावर चार कोनांवर चार घुमट्या असुन त्यांत लिंगे बतताविळेली
आहेत. शिवरात्रीच्या दिवशी घष्णेश्वराची उत्तवमूर्त' पालवींत बसवून
वाजत गाजत इथे स्नानाला येते आणि यात्रेप्ताठी जमळेला सद्दतावाचे जन-
समूद्द, शिवाचा दवा स्नानोत्सव भावभक्तीने पद्दातो. या सुरेख, सुरिठ्ट
तलावांतळे पाणीहि जर स्वच्छ-सुंदर अस्ते, तर त्याची शोभा द्विगुणित
झाली असती. पण विघात्याच्या सृष्टींत एकस्थ सोंदर्य पद्दायला मिळणेंच
दुलम. रात्र असली तर चंद्र नसायचा, चंद्र असळा तर त्याच्या कळा पुऱ्या
१७५०७०० “४५५१४ >१५/" £* > *८/* /१ /* ५.५.
८६ तीर्थरूप महाराष्ट
"२ ““%-४४-८ *-/४../ 0१-५८...” ७ ४.”
नसायच्या, त्या असल्या तर बारक्या बारक्या नक्षत्रांचे शोभिवंत पुंजच
झांकळून जायचे. एवंच एक आहे तिथे एक नाही.
“€ शिवालय तलाव
मंदिराप्रमाणेंच हा तळावही अहल्याबाईनेंच बांधला आहे. हिरव्या
बाबुळीच्या थराखालीं झांकलेलें त्याचें पाणी स्वर्गंगेशी स्पर्धा करणारे,
पाताळांच्या भोगावर्तार्चे आहे आणि ते सदाशिवाने आपल्या अधागीची
तृषा हरण करण्यासाठी भूमीत त्रिशूळ खुपसून वर आणलेलं आहे.
या वनाला पुराणांतर्री काम्यवन म्हटलेले आहे. तर्सेंच वाराणर्सांचे दुसरे
नांव आनंदवन असे आहे. याच आनेदवनांत पार्वतीबरोबर सारीपाट खेळतांना
शिव सवस्वी हरला, नंतर क्षोमळा आणिं गिरिजेचा त्याग करून गोदेच्या
उत्तरतीरावरीळ काम्यवनांत येऊन बसला. पारवती त्याचा शोध घेत घेत
वर्ने-दांगे तुडवीत इथवर आली. निजरूपांत शिवापुढें जाण्याची सोय नव्ह्त
म्हणून मिछीणीचा वेष नटली. मल्हार रागांत गाऊन आणि कलाकुसर्रचें
नृत्य करून तिने शिवाला प्रस्न केळे. आशुतोष शंकराचा राग निवायला फार
वेळ ळागला नाही. पार्वतीला हे स्थान आवडळें आणि शिवाला आग्रह करून
बराच काळ ती इर्थ राहिळी. एक दिवस ती डाव्या हातावर उजव्या
वेरुळचा घृष्णेश्वर ८७
२/ ५/९/१/४५/५/ ९४९४ ४/ ८/४/१-€ १४/४४/४४५७” ४-” ५” ४४-४४ 2८ **><“६८८८५८ ४ ४८ ४४ ४५४४५४ ४४४४१४ ५४४४४५४४४४ “५४ >“४४ ४७१ ”./*/**.४.४./५ १” ५ "४५४५१४४४५४
हाताच्या आखत अंगुलीनें कुंकू चोळीत असतां त्यांतून ढद्दानत शिवलिंग
प्रगटळें तोच हा ' घृष्णेश्वर.
ज॑ पहावयाचे होतें त॑ पाहून झालें होते. सकाळपासून चढ-उतार करतां
करतां पाय थकले होते. आमच्याप्रमाणंच पश्चिमेचा दिनमणीद्दी टेकीला
आला होता. किरणजाल ओसरत होते आणि तांध्यच्छाया हळूहळू पधळत
होत्या. ' चला आतां मुक्काम गांटूं ! म्हणून आम्ही मोटारीत चढलो आणि
संध्याकाळी चोखुरांनीं धुरळा उडवीत तान्ह्या गाई जशा घराच्या दिदेनें
धांवत सुटाव्या तशी आमची मोटार औरंगाबादकडे भरवेगांत पळूं लागली.
& गोकर्ण-महाबळेश्वर
४.०९. 0 ..“८.०५./०-./९-.५९.००/५५-४/६-०”-०- क्ल 0 ९ ९५.४९” >_0१-./४.”/"% /४./५५./% क
--न-->-:>:<:>>-----८--->-->_-------.>---
गोंदिया ते गंगावळी ही महाराष्ट्राची अनुप्रासात्मक दक्षिणोत्तर सामा
मानतात. गोकर्ण हे या सीमेच्या खाळी आहे. मह्ाभारतकालींद्दी क्र्षींच्या
तपोवनांची ही नैक्रत्येकडील सीमा होती. शृकडा पंचवीस टक्के लोक तिथें
मराठी बोलतात ; यावरून गोकर्णाला एक-चतुथीश महाराष्ट्र समजायला
हरकत नाही. महाराष्ट्राची द्दी दक्षिणतीमा रुद्र पण शिव अशा महावळेश्वरानं
सांभाळून आपल्याला निर्धास्त केळें आहे. सागरतीरावर असल्यामुळें जल-
स्थळांवर त्याची समदृष्टि आहे. ' जो भूमिरूपार्ने विश्व घारण करतो तो माझें
स्थलापासून रक्षण करो आणि जो आपोरूपानें प्राण्यांचे संजीवन करतो तो
माझं जलापासून रक्षण करो ? असे तिथल्या शिवभक्तांना त्याला प्रार्थितां येतें.
* मार्गेषु मां रक्षतु नीलकण्ठ:
शेलादिडुर्गेषु पुरघयारिः
अशी मीही पुष्पदन्त कवीच्या शब्दांत त्याची प्राथना करून कारवारहून
निघणाऱ्या मोटारीत बतल.
आम्ही निघाला होता. तो कलता मध्याहृ दवोता. ग्रीष्मताप अंगांतून
घामाच्या धारा काढीत होता आणि खारा वारा लागोपाठ त्या पुपूनद्दी
टाकीत होता. तांघूस रेतीच्या नागमोडी रस्त्यावरून आमची गाडी घोंघावत
चचाळली होती. कधी उन्ह्ांतून तर कधी छार्येतन. डाव्या हाताळा हिरव्या
झाडाचे साजरे डोंगर आणि उजव्या हाताला लहरत्या शुभ्र किनारीचा निळा
दरिया हे माझ चित्त द्विधा करीत दवोते. एखादी टेकडी आडवी आली कीं
गाडीळा आरोइृ- अवरोह करावे लागत आणि तेवढ्यांत समुद्र दृष्टीआड होई.
पण तेवढी जवनिका फिटली कीं पुन्हां तो डोळ्यांसमोर पसरे. कधी टेक-
ड्यांच्या पोटांत घुसणारा, कधीं उंच खडकांना ढुशा देणारा तर कधी पुळणी-
वर लोळणारा. प्रत्येक वेळीं नर्वे रूप, नवा आविष्कार. कारवारभागांतल्या
गोंकर्ण-महावळे*वर ८९
“५४: "4-4 /“/-“/*-/५/-.”./४६८/./ ./५-/५८/८/५/»
किनाऱ्याला जर कोणीं विशेष शोभवर्ले अतेल तर तें सुरूच्या वृक्षांनी. ते
जणुं त्याचे अविश्रांत ' चवरीधर ' आहेत.
कारवारपासून अंकोळं बारा मेळ आणि तिथून पुढें गोकर्णही तितर्केच
आहे. गोकणांच्या अलीकडे दोन कोसांवर गंगावळी नदी भेटते. हिला
पुराणांतरी ' शाल्मली * म्हटलेळं आहे. हिला तेतुबंध नतूनही मोटार पर्लांकडे
जाऊं शकते. त्यासाठीं दोन होड्यांचा ' सांगड ! करून त्यावर लांकडी पूल
तयार केलेला आहे. सांगड धक्क्याला लागला आणि सांध्यावर दोन फळ्या
टाकल्या कीं गाडी सुखनेव त्याच्यावर चढते. माणतांनी हब तर गाडीतच
बसावे अथवा खालीं उतरून बाजुळा उभं रद्दावे. मी इतरांच्या आधी खाला
उतरला. संथ, गहिऱ्या पात्रामधून तो सांगड चाळू झाला. त्याला वल्ह्यां-
चीही गरज नव्हती. एक उघड्य| अंगाचा, पिळदार बांध्याचा नाविक केवळ
एका लांब काठीच्या साहाय्याने त॑ अवजार पुढे रेटीत होता. उत्तरेला
हृषिकेशजवळ गंगामेर्यावर मीं झुलता पूल पाहिळा होता. आज दक्षिणा-
पथांतल्या गंगावळीवर मी तरता पूळ पहात होतो. डावीकडे लांच नदीच्या
वळणावर मीं दृष्टि फेकली, तटस्थ घनदाट वृक्षांचे मुजरे घेत सलील, मंथर
गतीने एखाद्या राजमहिषीसारखवी गंगावळी खालीं येत होती. पांच मिनिटांत
आम्ही दुसऱ्या तीरावर उतरला. त्या काव्यमग्र जलप्रवासाची गोडी जिभेला
लागते न लागते तोच तो संपूनद्दी गेला. मीं म्हटळें, ' द्दी नदी याहून दुप्पट,
चौपट रुंद कां झाली नाहीं?!
आतां गोकर्ण जवळ येऊं लागलें होतें. समुद्र दिसत नव्हता खरा ; पण
तोह्दी आतां जवळ झाला होता. उजव्या द्वाताला मिठागरे दितली. तिथे ठायी
ठायी त्या ' सबरसा ! च्या टेकड्या स्चलेल्या होत्या. कांद्दीवर पेढ्यांचं आच्छादन
टाकलेढे होतं तर कांही उघड्या होत्या. मीठ हं पांढरे नसळे तर काळें असायचे.
पण हं मात्र तांषूस छटेचें होते. ते मिठागर पाहून माझ्या मनांत अनेक स्माते
चुळबुळल्या. भारवाच्या इतिद्वासांतल्या एका दिव्य, तेजाळ काळखंडाचा पट
दृष्टीसमोर तरळून गेला. याच मिठासाठी महात्मा गांधींनी सामुदायिक सत्या -
ग्रह्ह पुकारला होता. त्या महापुरुषाची ती * दांडीयात्रा ' देशदेशांतरी
दुमदुमली होती. शिरोडं वगेरे समुद्रतीरें ही धारातीर्थे बनली होती. सत्याग्रही
युवकांच्या रुधिरधारा तिथल्या वाळुंत थिजल्या होत्या, ते अहिंसक वीरपुंगव
४ >“ 6५ ५४१. 020 2९ “७.४० 2७४७ अच
९० तीर्थरूप महाराष्ट
>“५”-“€/€€४” “४१ ८०-/- ““>/-<“-< >>> “./>/५“-:/५८ “-“-“५/--८/-/-/./-:-/>/-“>/.-“/-:<-><-“/--“*.“ “:€-/-४.-/-<.-< /.//-<“>. «> * “-५८/-/ >>>“
*्“ *८* **
प्राण सोडायला तयार होते; पण मिठाची मूठ सोडायला तयार नव्हते. याच
मिठावरून पूर्वी दारकेच्या राणीवश्यांतही एकदां वादळ निमाण झाल्याचे मी
मार्ग एका स्त्रीगीतांत ऐकलं होतं. ' तूं मला मिठासारखी आवडतेस? ह
भ्रीहरीचं प्रेमवचन ऐकून रुक्मिणीनें रुसून देवा्ी असहकार मांडला होता
आणि मग दुसऱ्या दिवशी षड्रस अने अळणी रांधघायळा लावून यादव-
राण्यानं तिला वरवर क्षुलक दिसणाऱ्या मिठाचे महत्त्व काय आणि त्या-
वाचून सगळें कसें व्यथं, ते सप्रयोग पटवून दिलें होत.
मिठागरांना वळत्ता घाळून पुढे निघालो आणि मधून मधून कुळागरं दिसू
लागलीं. दोन पोफळीच्या मध्ये एक केळ असे चोरस भूभाग त्यांनीं व्यापले
होते. जणुं वुंदावनांत गोपींचा रासच मांडला आहे. कृष्णकन्हृय्या अधरावर
मुरली ठेवून प्रगट व्हायचाच काय तो अवकादा ! तांबडमातीच्या टेकड्यांवर
ठेंगण्या ठुत्तक्या काजू आपला हंगाम संपवण्याच्या बेतांत द्वोत्या. आकाशाला
मिडूं पाह्मणाऱ्या मिरंडी मात्र ऐन भरांत दिसल्या. त्यांची दिरवीं, ढाळ
कोकंबे प्रत्येक डद्ाळीला आमूलाग्र बिलगून बसली होती, आंब्याची झाडं
विपुल होती; पण फणस मात्र तुरळकच दिसले. कुळागरांच्या आभ्रयानें
दिसणारी बहुतेक घरें जांभ्या दगडाची होती.
गोव्याहून गोकर्ण अगदीं जवळ ; पण तिकडे असेपयेत तं पद्याण्याचा योग
आला नाही. ह बारा ज्योतिलंगांवेकीं नसले तरी आत्मलिंग असल्यामुळे
पुरातनकालापासून प्रसिद्ध आहे. काशी, पुष्पगिरी, कांची इत्यादि दहा
भास्करक्षेत्रांत गोकर्णाची गणना होते, रामायण, महाभारत, भागवत या
ग्रेंथांतेन त्याचे किती तरी नामोाळेख काढून दाखवितां येतील. त्या
कालापासून इथं अखंड यात्राप्रवाह सुरू आहे. अनेकांनी भल्याबुऱ्या अनेक
हेतूंनी इर्थे तपःसाधना केली आहे. देवराज्य मोडावें, देत्यराज्य जोडार्वे या
आसुरी आकांक्षेने चौदा चोकड्यांचा रावण इर्थे तपोबळ मिळवायला आला
होता. अहल्येशी पापकर्म आचरून भगांकित झालेल्या देवेद्राने त्या महा-
दोषाची बोहरी व्हावी म्हणून इथेंच अनुष्ठान मांडळे होते. नेमिषारण्यांत
गेल्या वेळीं बलरामानें क्रोधाच्या भरांत रोमहर्षण तूताची हत्या केळी आणि
त्याच्या प्रायश्चित्तासाठीं बारा मास तीर्थयात्रा कर्रांत असतां तोही इथे
आला होता. नारदमुनींचें या क्षेत्रांतळं आगमन तर मी कर्धींच विस्तरणार
गोकण-महाबळे*वर ९९
*“४५€ €५४५--/-</-:-€-“:“-:“*.“ “८-८ */ “.“<*<“-“-“*€५“-4<“*<€<€५€४/५/४/४/४”४/४/%४४४/४/ ५४/४५/५५१४ ४ ५ “€<€४*/४/४५”५€ < “४” ५ "५ -/>€><>« ““></>> “>>>. “>
नाह्दी. स्वगीय गायन करून शिवाला संतुष्ट करण्यासाठी आपल्या ब्रह्मवीणेतह
तों आकाशमार्गानें येत होता. त्य़ाने वीणेच्या अग्रावर दिव्य पुष्पांची
माळ ठेवून दिली होती. नारद वरून जात होता. खालीं अयोध्येच्या
उपवनांत अज राजा इंदुमतीशी विश्रब्ध गोष्टी बोलत बसला होता.
वाऱ्याच्या सोसाट्यानें ती माळ वीणेवरून सुटळी आणि नेमकी
पडळी ती इंदुमतींच्या हृदयावर! त्या आघाताने भूलोकींच्या त्या
लावण्यसरितेने जे डोळे मिटले ते कायमचेच ! आणि मग सरोवरांतल्या इंस-
कारंडवांसह परिजनांचा तो आक्रोश, अजाचा तो छोकत्व पावलेळा शोक,
तो बाष्पगदूगद विलाप--कोणता सहृदय मनुष्य हे करुणाख्यान विसरू
शंकेळ ! नारदाप्रमार्णेच सनत्कुमारद्दी या क्षेत्री आले होते. ' पहिला भागवत
प्रल्हादद्दी नरतिंहमूर्ति स्थापून इथं निवांतपर्णे मजनपूजन करीत राहिला.
होता. ऐतिहासिक कालांत पूज्यपाद श्रीआद्य शंकराचार्यांनींहदी इथें येणें केलें
होत. आमच्यासारखे इतरे जन तर ' आले बहु येतिळ बहु-- कोण त्यांची
गणती ठेवणार !
बाकी इथें नगरपालिका स्थापन झाल्यापासून सवोचीच गणती होते.
नांवासद्द पावली देऊन कराची पावती घेतल्याशिवाय तुम्हांला गांवांत जाऊं.
देतो कोण! आणि दुसरी पावली ध्यावी लागते ती महाबळेश्वराच्या दर्गना-
साठी, देवळाच्या देवडीवर, नगरपालिका आणि देवस्थानसामाते यांनींच
पहिल्याप्रथम अश्ली सक्तीची दक्षिणा वसूळ केल्यावर क्षेत्रस्थ मिक्षुकांना आपण
कोणत्या तोंडाने नांवे ठेवायचा !
पण तिथले जोगळेकरभटजी मात्र या लोभाविष्ट भिक्षुकांच्या पंक्तींत बत्तत
नाद्दींत. ' असंतुष्टा ढ्विजा नष्टाः ' या जातीतले ते नव्हत. त्यांच्याकडे
आतिथ्यह्दी चांगळं होतें आणि यात्राविधिही यथासांग होतो. वस्तुतः इथें
मुंडन, अष्टतीथोत स्नान, उपवास, श्राद्ध इत्यादि घर्मकृत्ये करावीं लागतात.
पण तुम्ही म्हणालांत, ' देवदर्वांनापळीकडे आम्हांला कांद्दी कर्तव्य नाही
तर ते म्हणतील, ' अयं विशेष! ? तीस-चाळीस माणततांचें त्यांचें
एकत्र कुटुंब आहे. त्यांच्या घरी जो ' यावा-जावा आहे त्याला एवढें मनुष्य-
बळ इर्वेच. पुरुष पुरोहित आणि बायका अनपूर्णा | त्यांच्या स्वयंपाकघरांत
'चारी प्रहर अभिनारायण जाग्रत असतो.
९२ तीथरूप महाराष्ट्र
स्वयंपाकघरांतच नव्हे, तर त्यांच्या आसिशाळेंतसुद्धा त्यांचे अभिहोत्र आहे.
आजकालचे नव्हे; तर सात-आठ पिढ्यांचे. ब्रह्मचारी आशिहोत्र घेऊं शकत
नाही. विधुराळाद्दी त॑ धारण करतां येत नाहीं. त। फक्त सपत्नीक ग्रहस्थाचाच
अधिकार. जोंवर धमंपट्नी ह्यात असते तोवरच तो चालतो. असिहोत्राचें
खरें बंधन ग्रहिणीला. पुरुष प्रवासाला गेला तरी स्व घरांत असेपर्यंत अस्नि-
विच्छेंद होत नाहीं. पतीच्या अनुपास्थतींत तिच्या हातची सामेघा असीला
चालते. ती अखेरच्या महायाजला निघाली की आमि चालला तिच्यापुढ॑ !
ज्याची तिनें मनोभावे सेवा केली तोच शेवटीं तिच्या देहाचे सोने करतो.
वे. बाळकृष्णभठजी जोगळेकर मळा सांगत होते, ' मी ऐन तारुण्यांत
असिद्वोत्र घेतले. हिने आढेवेढे न घेतां परवानगी दिली. [तिला महिनाभर
माहेरी पाठवून आणली आणि मग एक दिवश्ली दीक्षित झालों, त्या दिवसा-
पासून हिने घराची पायरी ओलांडली नाहीं. बाहेरची दिशा पाहिली नार्ही.
अभमिशाळा आणि ती. वर्षामागून वर्षे लोटली. मी तरण्याचा म्हातारा झाला.
तीही आतां थकली आहे... ... ' ऐकतां ऐकतां माझे डोळे पाणावले. मीं
त्या धर्मदेवतेलळा ' निवांत नमन ? केलें. असा निकराचा संयम, अशी प्रखर
तितिक्षा भारतीय स्त्रियाच करू जाणेत!
घरांतळा एक मुलगा बरोबर देऊन त्यांनीं आम्हांला देवदर्शनाला पाठविलें.
इथें महाबळेश्वराच्या आधी गणपतोचे दर्शन घ्यावं लागते. महादेवाचा
नेक्रत्य-कोन संभाळून बाहेरच्या बाजूला तो उभा आहे. उभा म्हणजे खरोखरच
उभा ! चार भुजांपेकी दोन भुजा त्यानें देवळोकी ठेवल्या असाव्या, दक्षिणेंत
असे द्विभुज गणपाते पुष्कळ आहित., त्या बाजूळा गणपति ब्रह्मचारी आणि
कातिकेय ग्रहृस्थ, या गणपतीच्या मस्तकावर जो लहानस्ता खळगा हाताला
लागतो ती रावणाने वज्मुष्टि मारल्याची खूण !
रावणाला ' खंडेराव ) करण्याताठा बटुवेषानं तो इथं आला होता. भोळ्या
सांचानें रावणाच्या भक्तीला भाळून त्याळा आत्मलिंग दिलं होते आणि तं
घेऊन तो लंकेच्या मार्गाने नघाला होता. दह्दी वार्ता समजून देवलोकी
हाहाकार उठला, काय वाटेल तं होवो; हं लिंग लर्केत जाऊं देतां
कामा नये, असा देवांनी मनसुबा रचला. गणपाते बुद्दिसागर म्हणून त्याला
गोकण-महांवळेशवर ९३
त्या कामांत पुढाकार मिळाला. त॑ आत्मलिंग जमिनीळा टेकले की तिथेच
घट्ट होईल आणि रावण आपली संध्येची वेळ चुकविणार नाही, हीं दोन्ही
वर्भे त्याळा ठाऊक होतीं. तदनुसार त्यानें आपला धूर्त डाव मांडळा. ल॑केश्वर
द्विथुज गणपति
गोकर्णाला पोंचतो तो सूयास्ताचा समय झाला. आतां वरुणाला अध्यं
द्यायर्चे तर आत्मळिंग कोणाच्या तरी हाती देणें आवरप्रक होतं. नेमकी
त्याच वेळीं गजाननाची स्वारी बटुवेषार्ने पुढ झाली. रावण त्याला म्हणाला,
६ थोडा वेळ एवढें लिंग संभाळ ! ? बटु उत्तरळा, ' संभाळीन ; पण जड झाळें
तर खालीं ठेवीन ! ? ल॑केश्वर त्यावर आणखी बोलला, “' मळा आधी तीन
हांका मार! बटूला त मान्य झाळं. रावण मोकळ्या ह्वातांनीं जलाशयावर
गेला; पण आचमन करतो तों पहिली दवांक दणाणळी. अधमर्षण होतें ता
दुसरी आणि अर्ध्य ओंजळीत घेणार तोंच लागोपाठ तिसरी ! रावण धांवत-
पळत जाऊन पहातो तर आत्मलिंग जामिनीवर ठेवलेले. वीस हातांनी तो तें
उपटू हागळा ; पण तें वज़ळेप झालें होतें. त्याचे कपचे निघाळे; पण मूळ
लिंग कांही उपटून घेतां आळे नाई. त्याने हृवेंत भिरकावळेळे लिंगवंड जेथें
९४ तीर्थरूप महाराष्ट
२ ८४% ८ : “४.४४ /% / ५४१ /%५”५ ४-४.” २९/%/४ ८४ १ ?"५./४-५0 ४४ ४.७...” ४-५ ४.0 2 0.४ १५” ४-४ ९५१ मवहला
पडळे ती शेजेश्वर, गुणवंतेशधवर, मुरडेश्वर, धारेधर अर्शी चार स्वतंत्र ठिंगे झाली.
हीं चार आणि गोकणाचें मूळ लिंग पांचवे मिळून ही पंचक्षेत्री आहे.
रावण चडफडला, त्याचीं दहाही ' शिताळीं क्रोधाने लालबुंद झाली. त्या
अविगांत त्यानें बटूच्या मस्तकीं ठोसा हाणला, पण उपयोग काय! तं लिंग
कायमचे तिथें प्रतिष्ठित झाळे. या क्षेत्राचा निमाता म्हणून गजाननाला इथें
अग्रपूजेचा मान मिळाला. आम्ही त्याला श्रीफल ठेवून याचा सुफल करण्या-
० ५बळ ३
विषयी प्रार्थिळं आणि मह्ाबळेश्वराच्या महाद्वारांत शिरला.
थोड्याच वेळांत सूर्य मावळणार होता. प्रकाशांतळे सूयीकिरण माडांच्या
झुचक्यांवर चढळे होते आणि तिथून समुद्रांत उडी घेण्याच्या बेतांत होते.
यात्रा विशोषशी नसल्यामुळें आसमंत निर्जन, निवांत होता. पश्चिमाकाशानें
नव्या पालवीसारखी तांषूस पण सोम्य प्रमा मंदिराच्या कळसावर पसरून
दिली होती. तिचा आनद इंद्रियांतून मनाच्या कोक्यांतद्दी झिरपत होता.
देवाच्या भेटीसाठी दवी असलेली प्रसन्नता अनायास मिळत होती. हृत्कमल
भावमकरंदानें भरत होते. प्रदोषकाळ हा शिवाचा इर्षनिर्भरतेचा समय.
अनुरागवती संध्या ही त्याची पार्वतीहून ' पढियंती ?. त्याच्या गात्रांतला
अणु-रेणु या वेळीं नाचूउडूं लागतो. त्याच्या आत्म्यांत नकळत नृत्य संचरतें.
तो या वेळी निजानंदाचे घुटके घेऊं लागतो. त्याचे स्वाभाविक ओदाय या
वेळीं पघळतें. शिवशेकराकडे जं अमीष्ट मागायचे असेल ते या वेळी मागार्वे,
आणि याच वेळीं मीं मोदिरांत प्रवेश केला. सभामेडपाच्या चारी कोनांतून
काळोख पुढे पुढें येत होता. पण मळा काय त्याची भीति! मारे अतर्याम
पाजळळं होतें आणि समोरचा तो गाभाराही, तिथल्या अनेक नंदादीपांचा
सौम्य, सात्त्विक ' दीपल्कार? गंडकीशिळेच्या पिंडीवर आणि तितक्याच
सांवळ्या यामपूजकाच्या मुखमुद्रेवर पसरळा होता. आत्मविस्माते करणारे,
आधिव्याधि शमवणारे मदृन्मंगळदर्वांन होते तं. साझ। देह ' स्थाणु ' झाला.
दृष्टि मुकुळित झाली. अंजडळिसपुट उंच झाला, मस्तक नत झाळें, नकळत
ओठ पुटपुटूं लागळे--
: उऊ नमो भगवते सदाशिवाय......नीलकण्ढाय, पावबतामनोहर-
प्रियाय, सोमसूर्याभिलोचनाय... ...'
गोकण-महावळे*वर ९५८
तिथे पूजक दिसला, पूजासाहित्य आढळळें. जलधारा दिसली. पिंडीवर
कालोद्धव पुष्पांची पवरणहदी दिसली, पण आत्मलिंग कुठें होतें! मा तर
घरटाच्या आकाराची प्रशस्त पिंडीच पद्यात होतो. घर आहे पण धनी नाही;
तळें आहे, पण जळ नाही ; घरटे आहे, पण पक्षी नाही ; तसाच तो प्रकार
मला वाटला. मीं माझ्य़ा पुरोहिताला जिज्ञासा दर्शविली. तो म्हणला;
६ [पेंडीच्या मध्यभागी दिसतो त्या खळग्यांत आंगुळमर लांब आणि
[तितकेच उंच आत्मकिंग आहे. बाकीचा सारा विस्तार भूमिगत. चाळीस
वर्षीच्या मुदतीने ' अष्टबंधमहोत्सव ? होतो त्या वेळीं हद्दी वरची पिंडी काढून
नवा बंध घातला जातो. पिंडी काढली की आत्मलिंगाचा बराचसा भाग
दिसतो. त्यावर रावणाच्या अंगुलिमुद्राही आढळतात. हा सोहळा पाहण्या-
साठी लार्खी यात्रा जमते. !
त्यापुढचं तिसरें दर्शन ताम्रगोरीचे. ती त्याच प्राकारांत महाबळेश्वराच्या
उजव्या अंगाला आहे. तिचें मंदिर ढहानसेंच आहे. आम्ही गेलां त्या वेळीं
तिचा शृंगार केलेला होता. निढळावर, वस्रांवर, अलंकारांवर आणि पायांतळी
कुंकवाची उघळण झालेली होती. तिने आपल्या सोभाग्याची ळयळूट केली
होती. जुन्या काळच्या सुवातिनी कुंकू जितकं अधिक लावणे शक्य तितकें
लावून आपलें अहदेवपण भोगीत होत्या. त्यांची आदर्श पतित्रता ही ताम्नगौरी
होऊं शकेल. हिने आपले ताम्रगौरा हे नांव सार्थ केलें आहे.
ताम्रगौरी ही शिवाची भाय खरी ; पण अधीगी पार्वती मात्र नव्हे. ही त्रह्म-
देवाच्या ध्यानावस्थेत त्याच्या उजव्या करतलापासून निर्माण झालेली कन्या.
विधाता तिला म्हणाला, ' आतां उपजलीच अहद्िस तर शिवाला वरून कृताथं
हो! ? ती लगेच गगनमार्ग इथल्या ताम्रपर्वतावर अवतरली. पार्वतीप्रमाणेच
जिवभावे सेवा करून तिनें सदाशिवाचे मन जिंकळे. नंतर ब्रहयाने प्रगट
होऊन तिचे रीतसर कन्यादान केलं. ढसमास कोणता तर अश्विन आणि
तिथि वद्य चतुर्दशी. कोणत्या गणकभास्कराने हा मुहूर्त काढळा अतेल तं
देव जाणे ! पण सदाशिवाला सगळेंच शुभ-मंगळ !
या ताम्रगोरीच्या हातांत तराजू आहे. ती तुम्हा -आम्हां तवीना गोकणं
क्षेत्र तोून दाखविते. ' जनहो ! नीट पद्दा, या डाव्या दाताच्या पारड्यांत
१.७४ १.५ ४...” ६.५ ५.५४” “४ ४०५...” ७.७ ७ वळ
९८ तांथरूप महाराष्ट
मी विश्वेध्वराची काशी घातळी आहे आणि या उजव्या पारड्यांत मद्ाबळे-
श्वराचे हे गोकर्ण घातळें आहे. गोकर्णाच पारडे खाली झुकले. कारण काशी-
तलीं सर्व तीर्थे इथें आहेतच; शिवाय सकलतीथोचा आधार द्दा पश्चिमसागर
काशीला नाही तो इथें अधिक आहे.
उघर्ड सत्य आहे इं. गोकणांची शोभा, त्याचें वैभव, त्याचे प्रभुत्व, सगळें
कांहीं या सागराच्या सान्निध्यामुळेंच आहे. त्याचा तो उतरता किनारा
भाग्यवंताच्या भाल्पट्टासारखा वाटतो. त्याची तांषुतत रंगाची स्वच्छ वाळू
पायांखाढीं दाबीत सारखें पुढें पुढें जावेंसं वाटते. बेठक मारल्यावर पुढच्या
भागाची ' धूळपाटी ) बनवली कीं तिच्यावर कोणाकोणाची नामाक्षरं
लिह्वावीं याचा मधुर संभ्रम पडतो. एखादी टेकडी पुढें घुसून तिनें किनारा
तोडला कीं तिला कोसळून घालायला लाटांचा भगीरथ प्रयत्न चालतो. तो
मोठा प्रेक्षणीय वाटतो. तिथल्या दगडांवर दुंभमर ढाटांनी डोकफोड करून
घेतळी तर्री एकर्शेएकावी पुन्हा तेंच करायला पुढ येते. भरतीच्या लांबच
लांब लाटा किनाऱ्यापासून आंतपर्यंत एकामागून एक फुटून पसरायला
लागल्या कीं विश्वकर्म्यांने समुद्रांत रुंद पायऱ्यांचा उलटा घाट बांधला आहे
आणि त्यावर काहिमरी पाषाणांचा शुभ्र चुरा पसरून टाकला आहे
असे वाटतं. निळ्या, नितळ सागरपृष्ठावरून ' अनकाळेत ' धांवत
आलेल्या ओल्या अंगाच्या वायुलद्दरी तीरावरील माडांच्या कानांशीं ढागतात.
आणि ह्वीपांतरीर्चा रद्दस्ये त्यांना सांगतात, ती. आपल्यालाही कळावी अशी
ळालसा उत्पन्न होते. ' कळले, पटले म्हणून ते झुकळेळे माड जेव्हां माना
डोलवूं लागतात तेव्हां त्यांचा हेवा करावासा वाटतो.
मी सकाळीं समुद्रावर गेलो होतों तो स्नानासाठी ; पण आंत उतरण्या-
पूर्वी किती तरी वेळ मी त्याचे ध्यान घरूनच बसला. अनेक ज्ञांतअज्ञात
दर्यावर्दी माझ्याभोवती घेरून आले. अनेक देश-विदेशांतळे कवि हृदयांत
शिरले. रत्नाकराची उदात्तता, अद्भुतता अनेक परींनीं ते माझ्या कानांत
गुणगुणले. कांहीं संस्कृत कर्वीनीं मधेच अनादराचेही सूर उमटवले. एकानें
त्याच्या खारटपणाबद्दल तक्रार केळी. दुसरा त्याच्या गर्जनेबद्दळ कपाळाला
आंठी घालतांना म्हणाला, ' धारत्रीची तहान शमविणारा मेघ गरजतो, हें
एक ठीक; पण कोणाचाही घसा ओला करायहछा समर्थ नसलेल्या या
गोकर्ण-महाबळेश*्वर ९9
६ निस्त्रप) सागराने काय म्हणून गर्जावे !? ' रत्ने पार्यांतळीं घालून, क्षुद्र
तृण-पर्णे डोक्यावर घेऊन नाचणारा हा समुद्र शद्दाणाच म्हटला पाहिजे ? अशी
आणखी एकाची तक्रार. ' मेघांना दिळेळें जलदान त्यांच्याकडून तूं परत ध्यास
ना! अरेरे! ! हे जगन्नाथपंडिताचे खेदोद्गार ! शेवटीं काळिदासावर येऊन
थांबळा. ईं निळें अनंत जळमेदान पाहून तो मात्र म्हणाला, ' श्रीहरी प्रमार्णेच
ह्वा सागर दशदेशा व्यापून उरला आहे. याचें स्वरूप असे आहे आणि एवढे
आहे हई सांगर्णे कठीण! असंख्य पर्वतांना याने आपल्या उदरांत ठाव
दिला आहे. शेषशायी भगवान् युगांतीं याच्याच घरी चिरनिद्रा घेतो. !
पुरा एक तास भरतीच्या लाटा पाठीवर, डोक्यावर घेऊन मी स्नानानंद
उपभोगला. नंतर पुनश्च देवदशंनाळला गेलां. याच वेळीं मळा मंदिराची
_£::८--<< > ---_ >> र डू
महाबळेशराचे मंदिर
रचना स्पष्टपणे पदह्वायला मिळाली, त्यावर द्राविड शिल्पकलेचा ठत्ता आहे
शिखर कमीत कमी साठ फूट उंच भरेळ. त्यावर अष्टादिक्पाळ, नवनाग,
दशावतार कोरलेळे दिसले. सभामंडप ६०४० फूट आहे. सभावती अग्र-
झाळा आहेत. देवातमोरच्या चंद्रशाळेचें बांधकाम अर्धवटच पडळ आहे.
ती. म....२-७
९८ तीथरूप महाराष्ट्र
ताम्रगोरीचें मंदिरही जी्णोद्वाराळा आलेलं आहे. मुख्य मंदिराचा सभामंडप
कुंदापूरच्या तुलव ब्राह्मणाने बांधल्याचे समजते. पण मंदिर कोणीं आणि
कर्धी बांधलें त्याचा मात्र शोध लागत नाहीं. ज्याला गोत्र नादी, त्याच
काइयप गोत हे जते ठरलेले तत्तंच ज्याचा स्यपाते अज्ञात त्याचे कतृंत्व
विश्वकर्म्यांकडे सोंपवायचे हंही ठरलेळं आहे. भाविकांचे तेवढ्याने समाधान
होर्ते. कांदहदी लोकांचें म्हणणे की, तं पांडवांनी बांधरळ. चिकित्सकांचा इति-
हासाच्या जवळ जाऊं पाहणारा तक॑ असा की, कर्नाटकांत अनेक मंदिरांची
उभारणी करणाऱ्या जक्कणाचार्यानेच हेही देवालय बांधले अतावें
याचा पहिला ऐतिहासिक उलेख सांपडतो तो आठव्या शतकांतला.
कदंबांचे जे एक कुल बनवाती प्रांताचे राज्य चालवीत होतं त्यांत मग्रवर्मा
नांवाचा एक राजा झाला. कोणत्या तरी प्रसंगाने तो गोकर्णाला आला
द्वोता. त्याने हे मंदिर पाहिले. होतं आपले अज्ञात, उपेक्षित आणि मिलांच्या
वस्तीने वेढळेळ. कर्धी मनांत आलढेंच तर त्य़ांनींच देवाची अविधि, अमंत्रक
पूजा करावी. कसला तरी नेवेद्य दाखवावा. मयरवर्म्यांच्या भक्तिप्रवण
मनाला ते रचळे नाही. त्यानें अहिक्षेत्रातून तीनशे ब्राहषण येथ आणले.
त्यांना भरपूर द्रव्य देऊन त्यांच्याकरवीं देवाचे नित्योपचार सुरू केळे. पण हीद्दी
व्यवस्था कायम टिकली नाही. मयूरवम्यांच्या मृत्यूनंतर या ब्राह्मणांना उपद्रव
होऊं लागला आणि ते गोकण सोडून पळून गेळे. बहुधा तिथल्या आदिवासी
जनांनींच त्यांना पिटाळून लावळं असावे. कारण ब्राह्मणांच्या हातांत देव-
स्थान गेल्यापासून त्यांचा देव त्यांना दुरावला होता. त्यांची तिथली सत्ता
संपुष्टांत आली होती. त्यानंतर कालांतराने लोकादित्य राजाने पुन्हा सात
गोत्रांचीं आणि तीन वेदांची चोवीस ब्राह्मणकुटुर्ब इथं आणून वसविली
आणि त्यांना वर्षांसर्ने नेमून देऊन त्यांनीं पुनश्च ' यः पळायते ' कलूं नये
अशी व्यवस्था केळी. इथले सगळे ब्राह्मण त्यांचेच वंशज असून जातीचे
* हुविक ? आहेत. कनाटक, म्हेसूर, कूर्ग या प्रांतांत त्यांची वस्ती आहे.
देवस्थानाची व्यवस्था विश्वस्त मंडळींच्या हाती आहे. देवाळा मिळणारे
सरकारी उत्पन्न अवघे बाराशे रुपयांचे. एवढ्यावर वर्षांचा खर्च काय चालणार!
पण यत्रिकरूंकडून कराच्या रूपानें बराच निधि गोळा होतो. शिवाय नेवेद्य,
नंदादीप यांसाठी धनिक भक्तांनी देवाला बऱ्याच जमिनीद्दी दिळेल्या आहेत.
गोकर्ण-महाबळे*बर ९९
इथं बाराही महिने निरानराळ्या देवतांचे लहानमोठे उत्सव चाळू असतात.
पण मह्ाबळेश्वराचा सवीोत मोठा उत्सव म्हणजे माघांतल्या मह्यागिवरात्रीचा.
फाल्गुन शुद्ध प्रातिपदेळा देवाचा रथोत्सव होतो, एका उंच छपराखाली
निवाऱ्याला ठेवून दिलेला द्दा रथ म्हणजे सामान्य प्रकरण नाईद्दी. त्याच्या
दोन भर्रीव, लड चांकांमधलं अंतर सुमारे नऊ हद्वात आहे. वर उंच डोलारा,
तीळ ठेवायला जागा नाहीं अद्या भरगच्चपणे त्यावर कोरलेली देवतांची चित्रे,
आणि वरच्या भागावर देवासाठी सुखासन, अकद्या त्या रथराजावर आयत्या
वेळी बहुरंगी पताकांचा भार चढतो आणि मग देवाच्या जयजयकारांत
भक्तगण कासरे उचलतात. दतसहसतांचे बळ जेव्हां एकवटावे तेव्हां कुठे तं
अवडंबर जागचे हालते !
काळ आदिगोकर्ण पद्दायचा राहिला द्योता तो आज पाहिला. देवाच्या उजव्या
अंगाला प्राकारांतच खोळगट जागीं आदिगोकर्णारचे लिंग आहे. महाबळेधरा-
च्याही पूर्वीचे दे स्थान ; पण आज त्याची सही नाद्दी. त्याला कोणी नारळ
ठेवीत नाह्दी. रुद्राचा अनुवाक म्हणून धारभर पाणीही कोणी घाढीत नाही.
वेदकाळांतलें इंद्राचे माहात्म्य त्राहणकाळीं ठढप्त होऊन ' उपेंद्र ) विष्णु पुढं
आला तसाच द्दा प्रकार आहे. याचे आख्यान श्रवण करायचे अत्तेळ तर
स्कंदपुराणाची पोथी सोडली पाहिजे. आदिगोकण हा ब्रह्मदेवाच्या ललाटापासून
निर्माण झाळेळा पहिला रुद्र, विधात्याकडून त्याला सश्रिचनेची आज्ञा
मिळाली. तो म्हणाला, ' मी आर्धी तप करून सामर्थ्य मिळवीन. ? त्यासाठी
तो पाताळांत जाऊन बसला आणि युर्गे लोटली तरी उठलाच नाही. त्याच्या
चेंगटपणाला ब्रह्मदेव कंटाळला आणि त्यानेंच चारी खाणी, चौऱ्यांयशीं लक्ष
योनी स्चून सष्टिविस्तार करून टाकला. प्रकृतीने पाताळांत जाऊन ही वार्ता
रद्राच्या कानावर घातली, वस्तुतः द्दी लावालावी करण्याचे तिळा कांहीच
कारण नव्हतें. पण बायकांचा स्वभाव म्हृणतात ना! र्ंद्र खवळून वर
यायळा निघाला. पण एवढ्या अवर्धीत परथ्वीचें कवच बरंच घट्ट झाळें हेर्ते.
तो जेव्हां त्यांचे विदारण करायला प्रवृत झाला तेव्हां धरित्री घाबरली. तिने
ल्याला प्रार्थिळे की, ' सूद्म रूप घेऊन माझ्या कर्णाकार प्रदेशांतून वर ये. !
रद्राने ती प्रार्थना मानली. तो ज्या विवरातून वर आला त्याच जागी ही
लिंगस्थापना झाळेळी आहे. ही कथा म्हृणजे अज्ञात काळांतल्या एखाद्या
१०० तीथरूप महाराष्ट
भूकंपावस्चे काव्य असावें. कदाचित् हे सगळे गोकर्णमंडलच समुद्रांतून वर
आलें अप्षेळ आणि समुद्र तितका मागें हृटला असेल.
कोटितीथं
कोटितीर्थ हे इथलं सगळ्यांत महत्त्वाचें तीथं; हें त्याच्या नांवावरूनच
कळून येईल. आकारानेंद्दी ते विशाळ आणि लंबचोरस आहे. चारी बाजूंनी
मनुष्यवस्ती आणि माडाची झाडं असल्यामुळे त्याला शोभा आली आहे;
पण कोणतेंही सरोवर जळावांचून ओके आणि कमळांवांचून फिक. त्या
दृष्टीनं आजमितीस तरी तें स्वत्व गमावून बसलं आहे. त्यांत सगळें पाणी
काढून टाकून त्याचें नवें बांधकाम सुरू झालेळे आहे. त्रिपुरी पोर्णिमेला
याच्या सर्भावर्वी बघण्यासारखा दीपोत्सव होतो असे आमच्या मार्ग-
दशंकाने सांगितले.
ज्या डोंगराच्या पायथ्याला गोकर्ण वसले आहे त्या शतशुंग पर्वतावरही
अनेक पुराणपुरुषांची तपरःस्थानें आहेत. त्यांपैकी सर्वांत कडेच स्थान म्हणजे
रामतीर्थ, कल्पवृक्षांच्या मेळाव्यांत, समुद्राच्या अत्यंत निकट आणि त्याच्या-
पासून दद्वा-बारा हात उंचीवर असल्यामुळें याचें सोंदर्य निरपवाद आहे. कुंड
लहमानसेंच ; पण बांधून काढलेळें आहे, डोंगराच्या प्रोटांतून बाहेर आलेळा
झरा पन्हळाच्या मुखानं त्यांत अविच्छिन पडतो. खाऱ्या जलळराशीजवळ ती
गोड्या पाण्याची धार जवळच्या राममंदिरांत राहणाऱ्या बुवा-बेराग्यां ना
गोकर्ण-महाबळे*वर १०१
आणि आमच्यासारख्या यात्रिकांना ' जीवन ! देऊन धन्य होते. रामतीर्थाला
छागूनच भरताच्या मंदिराकडे जाण्याची वाट आहे. मात्र तिथे जाण्यासाठी
शंभर-दीडशं पायऱ्या चढाव्या लागतात. पण भरताची सुंदर संगमरवरी मूर्ति
पाहून चढण्याचे श्रम परिह्वार ह्वोतात.
तिथून थोडं अलीकडे आळे की माणेश्वर भेटतो. त्याचे मूळ नांव मणिभद्र.
तो आणि त्याचा मित्र सिद्धेश्वर द्दे दोघे शिवाचे भक्त. गोकणेक्षेत्र पाहण्याच्या
इच्छेने ते शिवाची अनुज्ञा घेऊन केळासाहून इथें आढे. गोकणाच्या सीमेवर
येतांच क्षेत्राची समृद्धि आणि उज्ज्वळता पाहून सिद्धेधर इतका दिपळा कीं,
या भूमीवर पाय ठेवण्याची आपली योग्यता नाहीं अस त्याळा वाटलें.
क्षेत्राच्या पूर्व सोमिवर आश्रम उभारून तो तिथेच तप करीत बसला.
मणिभद्राळाही तसेंच वाटलं; पण तो बाहेर थांबला नाहीं. तो खाला डोक
वर पाय करून हातांनी चाळत इथवर आला आणि तशाच स्थितीत तपस्या
करूं लागला. शंकराने प्रसन होऊन त्याला पश्चिम दिक्पाळ नेमळें. पुढे
प्राकृत जन त्याला * भमाणेश्वर ) म्हणु लागळे. या स्थानावर शिवलिंग नसून
त्याचाच उलटी पावलें आहेत. लोक त्यांचीच पूजा करतात. गोकणांच्या
चतुःसीमतली सगळी तीर्थ करायचां आणि सगळे देव वंदायचे तर चार
दिवस्त तरी तिथून हाळतां येणार नाही. ' सागरे सवंतीथानि ! म्हणून मी
सर्वांच्या वांट्याचें समुद्रस्नान केळं आणि सर्व ज्ञाताज्ञात देवतांसार्ठी
महाबळेश्वराच्याच चरणांजवळ आणखी एक प्रणाम सादर केला.
एवढें करून जोगळेकराच्या घरी परत येता तां त्यांच्या अभिशाळेंत
नक्षत्रसत्र चालले होते. हे पांच दिवसांचे यजनकर्म आहे. आज द्िती यदिन-
कृत्य होत. वे. बाळकृष्णभटजी कानांत सुवर्णाची मकरकुंडळें लेवून असरी-
जवळ बसले होते. सोमयाग करून त्यांनीं त्या कुंडलांचा आधेकार मिळवला
होत. त्यांच्या उजव्या हाताला ब्रहयार्चे आत्तन होते. गाहपत्य असतीत
पुरोडाद्यार्ची पात्रे शिजत होतीं, तोंवर क्रत्विजांनीं पूर्वसिद्धता केळी होती.
एक पाय वेदीच्या आंत आणि दुसरा बाहेर अश्या स्थितींत उभा राहून
८ होता ) देवतांचे समंत्रक आवाहन करीत होता.
: अनुमतिमा 555५ वह । देवा 5 5 आज्यपॉ ५ ५ आवह '
१०२९ तीथंरूप महाराष्ट्र
१७०९७५..०९४४,.७”१७ ०४ ७.९५ “८-०७१५७४१५ ४४ च.
अध्वर्य पुरोडाशावर आणि अस्तीवर प्रथम तुपाचा ' अभिधार ' करीत
होता. नंतर दोन खवा जोडीने घेऊन वरंचीच्या तिवळ्यांत पुरोडाशाचा
अंशभाग ठेवीत होता. आहवनीय असरीपुढे उर्भे राहून त्याने 'ओ55
श्रा 55५५ वय? म्हटले की समोरचा “आसरीप्र' “अस्तुभो 5५ षटू?
म्हणून त्याला प्रतिवचन देत होता. ' ये 5 5 यजामहे '. म्हणून ' द्वोता
पुढचे मंत्र म्हणत होता. अखेरीस ' वोषटू म्हणून तो थांबला की अस्रींत
आहुति पडत होती.
सकाळचें उन्ह, झऱ्याचे पाणी, दूघमात, वगेरे जी आयुष्यवर्धक साधनें
सांगितली आहेत, त्यांत यज्ञधूमही आहे. तो आमच्या पोटांत भरपूर गेला.
नको म्हणत असतां डोळ्यांतही शिरला. आपण आज पुनीत झालो अर्से वाटलें.
अभिहोत्र आणि तदनुषंगाने होणारे यज्याग हा प्रकार आतां इतिद्वासजमा
झालेला आहे. त्या कालखंडांतून आपण फार पुढें आलेढे आहो. ती समाज-
व्यवस्थाही आमूलाग्र बदळली आहे. काल बदलला की धर्मसाधनही बदल-
तात, बदलावी लागतात. पण. तरीही प्राचीन यज्ञतंस्थेचे हे तुरळक
आढळणारे अवशेष शिल्लक राहिले पाहिजेत असें मी मानतो. प्राचीन
संस्कृतीच्या अभ्प्रासकांना त्यांचा पुष्कळ उपयोग होईल. आपले ज्योतिष,
गणित, स्थापत्य ही यजसंस्थेतूनच विकास पावली आहेत. आपलीं इतिहास-
पुराणें आणि धमेप्रवच्न यज्ञमंडपांतूनच समाजाच्या सर्व थरांत पसरली
आहित. यज्ञसंस्था ही भारतीयांना अभिमानास्पद अशी पुरातन संस्था आहे.
तिचे हे अत्पत्ते अवशेष मारतीय संस्कृतीला शतकांचीच नव्हे; तर सइस-
कांची परंपरा आहे ह सांगण्यास समर्थ आहेत. नव्या-जुन्या कालांमघले ते
धर्मसेतु' आहेत.
७ रामटेक
माझे नागपूरला जायचें ठरळें तेव्हांच मीं मनाशी निश्चय केला की,
रामटेक पाहिल्यावांचून परत यायचे नाह्दी, माझ्या या निश्चयाळा तिथल्या
स्नेह्ीमंडळांनी साथ द्यायचे कषूल केलें आणि एक दिवस पंच पंच उषःकाली
निघणाऱ्या गाडीत बसून आम्ही रामटेक स्टेशनवर उतरला, नागपूरपासून
आम्ही पंचवीस भेळांवर आलो होतो. आणि गांवाला लागूनच रामटेक खडा
असलेला दिसत होता. पण त्याच्या चढणीला लागण्यापूर्वी मळा शकय तर
पलीकडचा खिंडसी तलाव पाहावयाचा होता. आमची इच्छा आणि तिथले
तहसीलदार श्री. बडकस यांचें सोजन्य यांचा मेळ जमळा आणि त्यांनी
आमच्यासाठी मोटार आणून रस्यावर उभी केळी. पंधराच मिनिटांत राम-
गिरीला वळसा घाळून आम्ही डाकबंगल्याच्या आवारांत उभे राहिला.
तढावाच्या अगर्दी कांठावरच तो बंगळा आहे. रामटेक द्वाच ज्याचा एक
स्वयंभू तट झाला आहे त्या तलावाला ' रामसागर ? हे नांव अन्वर्थकच म्हटलं
पाहिजे. वरून ' सूर ' नदी उतरली ती नकळत या पर्वतांच्या चक्रव्यूद्दांत
सांपडली. तिनें बिचारीनें पडून समुद्रमार्गाळा लागण्याचा प्रयत्न केला; पण
६ अवघ्या वाटा झाल्या क्षीण ' म्हणून तिला बंदिस्त राहार्वे लागलें, हा
रामसागर म्हणजे ब्रह्मांडकटाहवची लह्वानशी प्रातिकातिच म्हटली पाहिजे.
परतीरावरची झाडेंमाडं तिथून केवळ प्रादेशमात्र उंचीची दिसतात; त्यावरून
त्याच्या घेराची कल्पना करावी, रामसागराला प्रदक्षिणा करायची तर काशी-
विश्वेश्वराच्या पंचक्रोशी चें पुण्य सहज पदरांत पडेल.
भर्तुदरि ' सरो विगतवारिजम् ? म्हृणून बिनकमळांच्या तळ्याबदहळ
हळहळला आहे, पण मळा तर कमळांच्या आईबद्दळच ' शल्य ? लावून
घ्यावे ढागळं. ह्या अतिविस्तीर्ण सरोवरांत फक्त डाकबंगल्याच्या बाजुनेच
थोडेते पाणी होतं आणि शिशिर क्ततु त्यालाही आटवून सुकवून पंकशेष करण्याच्या
तयारीला होता. अगस्तीने एकाच आचमनांत समुद्र कोरडा पाडला, आंतळा
१०४ तीर्थरूप महाराष्ट्
५७>/->/-€>/५€>€€*-€५”-€-“-€-<-<>:>.-“/“/-4/““-“*।*“-“.>"/'“ ४-4” <*€-".<*-€-“-/-"-“.“.“€-”-“:-““-:“*“ <<“: -/>/>/4/<-“€<<4/></“>/>>/>><></<:.<>“-><५--€५€>/-> >
जक
चिखल वर आला, गतप्राण जल्चरांचे सांगाडे इतस्ततः पसरळे आणि ते
धरित्रीचे अनंतपार विवर दृष्टीला भय, उद्देग, जुगुप्ता निर्माण करणारें
झालं असं पुराणांतरी वर्णन आहे. रामसागराच्या तळवटीं सपाट प्रदेशावर
भाजीपाल्याचे मळे आणि शेताचे कुणगे यांचा हिरवा गालिचा पसरलेला
दिसला. तो जर नसत तर रामसागरांतही आम्हांला कांही ' राम? वाटला
नसता. वरून एक लोंढा फुटला असता तरी त्या शाकभाजीच्या रोपांना
आणि सस्यांकुरांना जलसमाधि मिळाली अस्तती. पण तीं रोष खालच्या
भूमीचा ओल्हासा शोषून घेत निर्भय आत्मविश्वासाने वाढत होता,
ढवलवत होती.
नागाजुंनाच्या पायथ्याशी आम्हांला सोडून आमची मोटार मोकळ्या
अंगाने परतली. ती उभी सोपान-परंपरा चढून वर जाईपर्येत आम्हांला
चांगलाच दम लागला. तिथल्या चिंचोळ्या तिकोनी गुद्देंत रींदूर माखलेली
एक ओबडधोबड आकृति आहे. तीच नागारजुनाची प्रतिमा अततावी. दोन
हजार वषीपूर्वी नागार्जुंनानं या ठिकाणी तपःसाधना केल्याचे सांगतात.
नागार्जुन ही त्या काळची एक बडी आसामी होती. विदर्भात जन्म
घेतळेला हा ब्राह्मण प्रकांडपंडित तर द्वोताच; शिवाय मोठा साक्षेपीहि होता.
आयुर्वेदाच्या रसायनक्रियेंत त्याने पुष्कळच संशोधन केले होते. माणसाला
हजारा वर्षे तारुण्याच्या जोमाने जगतां येईल असे अमृतरसायन शोधून
काढण्यासाठी त्याची पराकाष्ठा चाळळढी होती आणि त्याचें जपतपसताधन
त्याचसाठी होतं. वैदिक धर्म सोडून प्रथम तो जेन झाला आणि नंतर
त्याचाहि त्याग करून बोद्ध बनला. बौद्धांच्या मद्दायान पंथांतील माध्यमिक
तत्त्वज्ञा नाचा प्रस्थापक म्हणून त्याला मोठा मान आहे. त्याचे तद्विषप्रक
ग्रंथ बरेच अहित. चोऱ्यायशीं सिद्धांपेक्ी त्याला सोळावा सिद्ध मानळेलं आहे.
मगघांतल्या नालंदा या विश्वविख्यात विद्यापीठाची जागा त्याने निश्चित
केली आणि त्याचा शिष्य आयेदेव यानें तिथें विद्दार, उभारले.
गुहेचे दर्शन घेऊन आम्ही तिच्या माथ्यावर चढलो. तिर्थ एक मेघडंबरी
होती. आणि तिची मागची बाजू डोंगराला लागून होती. तिला प्रदक्षिणा करायची
वर दोन शिळांमधल्या निरुंद सपार्टीतून पार व्हायळा इवें होते. आमचे सइ-
रामटेक १८५
प्रवासी त्या दिव्यांतून अंगाळा ओरखडा उठू न देतां सहज पसार झाले.
कारण आमच्यांत कोणी
र 0 शिळ |
खुखाचे पेललं दोद
नाभी आवतला आनंदकंद
या जातीचा नव्हता. अडकलो तो मी मात्र; पण तोही 'प्रस्थ' म्हणून नव्हे;
तर शिळेचा कोन लक्षांत घेऊन तदनुसार शरीराला बांक देण्याची युक्ति
चटकन् साधली नाद्दी म्हणून, वस्तुतः इथे प्रदाक्षणा घालण्याचे कांहीच प्रयो-
जन नाहीं. पण माणसाच्या अनेक आनंदांत साहसाचा, अडचणीतून
निसटल्याचा म्हणून एक आनंद असतो. त्याच्या पूर्तीसाठींच असल्या
गोष्टी होतात.
तिथून डोंगराच्या कणीनें मेळ दीड! मेल चाळून आम्हांढा अंबाळा तलावा-
कडे उतरायचे होतें. त्या. वेळीं दुसरा प्रहर संपायला आला होता. उन्हाचा
ताप वाढूं लागला होता. सूर्यकिरण गारेच्या स्वच्छ दगडावर चमचमत होते.
फुटलेल्या शिळांवर कसल्या तरी धातुरेवा चकाकत होत्या. डोंगरमाथ्यावरचं
रान शिशिराने झाडून टाकलं होतं आणि वाऱ्याला रस्ता मोकळा करून दिला
द्वोता. पर्णद्दीन अर्जुनवक्षांच्या फांद्या कशा वेड्यावांकड्या दिसत होत्या. भार-
वीच्या भार्षेत घोलायचें तर ते शतबाहु अर्जुन, भुजा उभारून आणि करांगुळी
वक्र करून तांडवाला उभे झाले होते.
पण ल्या नृत्याचे प्रेक्षक कोण? माना डोलवणार कोण! वलरी तर केव्हांच
सुकून गेल्या होत्या. जवळ होतीं, तां कांटेरी झुडपं. पण त्या अरसिकांना त्या
नृत्यप्रयोगाचें काय होय ! नाह्दी म्हणायला पारिजातकार्ची झाडे मात्र ठायी
ठायी आपल्या वसाहती थाटून बसली होती. मळा वाटलें, हे सगळे प्राजक्त
भश्रावणांत फुलून लवले कीं उभा डोंगर कसा सुगंधाने धुंद होत असेल आणि
देवेंद्राचे * फुलारी ) यक्ष-गंधर्व रात्रीच्या निवांत वेळीं आपलीं विमाने इथं
उतरीत असतील.
रामसागर आणि अंबाळा यांमध्ये फक्त डोंगराची एक भिंत उभी होती;
पण रामसागर कोरडा तर अंबाळा भरलेला, मळा शका आली की, भूगमातून
रामसागराचा रस तर यानें आपल्या पोटांत ओढळा नसेल ना? हदी चोरी का
(१
१०८ ताथरूप महाराष्ट
न ५९०५६८८” “-“-“-“€--५/-€---->/>24€-/-<-<-/- “-<</*/- “८ €./ €/ -*-*-“>“><५““/*/> “<“<<““€-<“-“><>.“:<><-“<<*>*-/१-/५१-५-/४५-/"-८१५-/१./"'/"-/ ५१५ “'/४५/'५/"/१५४"५५४/"'५'* 2४४५४४१
हे दान? पुष्कळदां असें हाते को, क्रृत्विजांच्या घरांत सुवर्णमुद्रांच्या राशी
अन् खुराजाच्या हाती मातीचा थाळा. एखाद्याने ओदार्याचा पुतळा
बनून दोद्दी द्वातांनीं वैरीत सुटावे, अंती कफळक व्हावं आणि त्याच वेळी
त्याच्या दानावर जगलेल्या आभ्रितांनी गबर होऊन बसावें असाही प्रकार
पुष्कळदां दिसतो, श्रूद्रकाचा चारुदत्त आणि रेक्पपियर्चा ' टिमॉन ऑफ
अथेन्त? हे नाट्यसष्टींतळे अद्या दानेश्वरांचे प्रतिनिधि आपण पाहिलेले आहेत.
सगळ्यांनी त्यांच्याकडून घे घे घेतलें ; पण त्यांच्या पडत्या काळांत त्यांना
उपयोगी पडायचें कोणाच्याच मनांत आलें नाही.
अंबाळ्याचें पाणी नाचत नाचत आम्हांठा सामोरे येत होतं. आम्ही
एकेका पावलाने त्याला जवळ करीत होतो. ' निर्वाणाय तरुच्छाया तप्तस्य
हि विशेषतः ? ह सावर्लांच्या बाबतींत जितके खरं तितकेच त॑जळाच्याद्ि
बाबतींत खरें आहे. तळ्याची एका बाजूची कड सावलीत सांपडल्यामुळ
काळी अन् गंमीर दिसत होती आणि बाकी सगळ्या जलपृष्ठावर मध्यान्ह्दारचे
काव्य वरसत होतें. आमच्या समोरच्या तीरावर शिव-मंदिरांची रांग उभी
होती. सगळी कशी छोटेखानी, विविध शिल्परचनेची, सुदर आणि नखशिखांत
चुन्यानं सारवलेली.
ही देवळे दुपारी उन्हांत न्हातात आणि तळ्यार्चे पाणी ' निवांत निष्कंप?
झालें कीं त्यांत आपलं प्रताबिंब पाहून स्वतःच्या सोंद्याचा गर्व मिरवतात.
मला वाटलें,
: घयसा कमलं कमलेन पयः
पयसा कमलेन विभाति सरः
या धर्तीवर एखाद्या कवीला दुसरे एक सुभाष्रित तयार करायळा सांगावें--
४ तळ्यामुळें तीं देवळे शोभतात ; देवळांमुळे तं तळे शोभते आणि देवळे ने
तळें यांच्यामुळे ते दोन्ह्दी अंगांचे डोंगर शोभतात. '
त्यांच्या मागचा तो निरुंद रस्ता, ती. तुरळक रहदारी, त्यामागची ती
नागपूरकर भोसल्यांच्या पडक्या वाड्याची भव्योत्तुंग मित, डाव्या हाताची ता
रस्त्यावर उमवळेळी गौरकाय कमान, उजव्या हाताचा तो रामगिरीचा
सोपानमार्ग, हे सगळें चित्र, त्याचे रस-रंग, इतके कांही दिव्य, रुचिर दिसत
रामटेक १०७.
०४५४४ ४ ४४ 0४४ ४४४7४५” ५ ५“ % / ४.” “०९. १८५ ४.” २.” १,५४४ _ ९.२ /० ५” /79_./ ५. २१.” ५.” २/ २.” ७४
होते की जणुं नंदनवनाचाच एक कोपरा सुटून धरतीच्या अंकावर येऊन
बसला आहे.
पण कोणत्याहि आनंदाला विषादाची सूक्ष्म, काळी किनार असायलाच
हवी या विधीच्या संकेताला तुम्ही-आम्ही काय करणार ! अंबाळ्याच्या तीरावर
इथें तिथें चाललेलं त आशोचांतळे क्षोरकर्म, ती ओध्वदेहिकाची मांडावळ,
ते आंगठा वाकडा करून फरसबंदीवर ठेवले जाणारे पिष्टपिंड, त्या माणसांच्या
मुद्रेवरचे ते त्ून्य उदास भाव, हं सगळें कल्पनाहि नसतांना पाहावें ढागल्या-
मुळे माझा इर्ष एकदम विरजला. सीतामाईने या तळ्यांत स्तान केळं आणि
अंबराजाचे गलत्कु्ठ याच पाण्याने नाहीसं झाळं, या पौराणिक आघारामुळें
अंबाळा इं मोक्षदानी क्षेत्र बनळं आहे. या प्रांतांतले भ्रद्धाळू लोक मृतांचे
अस्थिविप्तरजंन आणि क्रिय्राकर्मान्तर या ठिकाणी करून परलोकाच्या मार्ग-
स्थांना थेट खर्गांची वाट दाखवतात.
तिथून आम्ही रामटेकच्या गढीचा रस्ता चढूं लागला. हा रस्ताहि रुंद असा
यांधून काढलेला आहे. वाटेंत सावली नसली तरी करमणूक भरपूर मिळाली.
शेपट्या उंचावीत वर खाली हिंडणारी वानरांची टोळकी आदोने आमच्या-
जवळ येऊं लागली. एका वानरीनें तर स्त्रीसुलभ लजा गुंडाळून ठेवून माझे
मनगट पकडलं आणि फुटाण्यांनी भरलेली माझी मूठ रिकामी करून घेतली.
थेट देवद्वारापयेत या रामदूतांनीं आमचा पाठलाग केळा आणि सर्वांकडून
खंडणी वसूळ केली. त्यांच्यादेवत खिश्शांत हात घाढायची सोयच नाई. तरस
केल्यास खित्ता आणि अंगरखा यांची वजाबाकी ठरलेली.
इथल्या राममंदिराला विस्तीर्ण प्राकार आहे. चारी दिशांना दरवाजे.
आहेत. पांचशे फूट उंचीच्या या डोंगराला जरूर तिथें भक्कम तटबंदीही आहे.
हें मंदिर वाकाटक राजांच्या कारकीर्दीतर्ळे आहे. त्याच्या रचनेवर बोद्ध
शिल्याची छाप सहजपणे दिसून येते. इथं लढ्ष्मण रामाच्या शेजारीं नसून
त्याच्यापुढे आहे. मला ह युक्तच वाटे. वनवासाच्या त्या चौदा बषीत लक्ष्मण
नेहमी एक पाऊल पुढेच राहिला आहे.
। राम चाले बाटे । एक्ष्मण झाडी कांटे
असे बंचु नाही कोडे । संसारांत !
म्हणून भारतीय नार्रानी त्याहा परोपरी गोरवळ आहे.
२-५ ७५/४%/ १६” ७-४४%./0
१०८ _ तीर्थरूप महाराष्ट्र
याच लक्ष्मणमंदिरांत रामदेवराव यादवाच्या काळचा एक शिलालेख
गाभाऱ्याच्या बाह्य भागावर भिंतीत बसवलेला आहे. मंदिर सारवणाऱ्या
सेवेकऱ्याच्या हातचा चुन्याचा कुंचा भिंतीबरोबरच त्याच्यावरूनद्दी फिरला
आहे. त्या गिचमिड ' अवाच्य ? शिलाळेखाची किंमत त्यांच्या ळेखीं पूज्य.
त्यासाठीं जीव थोडा थोडा होतो तो इतिह्वाससंशोधकांचा.
लक्ष्मणाची भेट घेऊन आम्ही रामदरदांनाला गेलो. पुढें वसंत येणार
म्हणून आतांपासून पिवळा पोषाख करून रामराय सीतामाईसद्द चांदीच्या
नक्षीदार प्रभावळांत उभे होते. पुजाऱ्याच्या हाती. आमचा पुष्पह्वार त्याला
पोचता करून आम्ही तीर्थप्रसाद घेतला. या देवस्थानाला सालिना इजारों
रुपयांचे उत्पन्न आहे. हिऱ्यामाणकांचे अलंकार आहेत, त्यांची किंमत दोन
छाखांहून अधिक भरेल. रामटेकला काळीयात्रेचे मद्ाद्वार म्हणतात. जुन्या
काळीं दक्षिणापथांतळे लोक वाहतुकीच्या साधनांच्या अभावी पार्यी यात्रा
करीत, तेव्हां त्यांचा मार्ग रामगिरीवरूनच जात असे. इथे मुक्काम करायचा,
या रामाचे दर्शन घेऊन यात्रा निर्विभञ होण्याबद्दळ प्रार्थायरचे आणि पुढे
विंध्य पर्वताच्या मोद्देरेस ढागायचें.
इथं त्रिपुरी पोणिमेची मोठी यात्रा भरते. पूवी एक नवा कोरा पीतांबर
तुपांत बुडवून त्याचा त्रिपुर पाजळीत आणि तो प्रकाश नागपुरांतून पाहतां
येत असे अश्ली आख्यायिका सांगतात. आम्ही ती त्रिपुराची जागा पाहिली
आणि रामझरोक्यांतून विश्याळ आसमंतहि पाहून घेतला. इथं आणखी दोन
वेगळ्या नांवाचे राम आहेत. पैकी एक कपटराम आणि दुसरा भोगराम.
कपटराम गांवाच्या बाजूर्ने डोंगराच्या कपारीत दडून बसला आहे तर
भोगराम प्राकारद्वाराच्या आंत डाव्या अंगाला आहे. भोगराम ही चतुभुंज
विष्णुमूर्त असून त॑ महानुभावांचे एक उपास्य आहे. त्या दिवशीं बरेच
महानुभाव स्त्री-पुरुष त्याच्या दर्शनाला आले होते. पंथाचे संस्थापक 'चक्रधर-
स्वामी इथं कांही काळ राहिले होते, म्हणून त्यांना रामटेक हे क्षेत्र झाढे आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूला चक्रधराचे दोन तीन ओटे आअद्देत. ते एका
भाविक मानभावाने पुढे होऊन आम्हांला दाखवले,
प्राकाराच्या आंत उजव्या बाजुला वराहाचा चोपाळा आहे आणि त्यांत
आदिवराह्वची सुमार चार फूट उंचीची सवोगपुष्ट अश्शी वराहमूर्त आहे.
रामटेक १०९,
तिच्या पदतळीं हिरण्याक्ष दडपठेला आहे. वराह इं राष्ट्रकूटांचे प्रतीक होतें.
वेरुळरची लेणी त्यांच्याच द्वातची आहित आणि त्यांतही कांद्दी कोरलेल्या वराह-
मूती मीं पाहिल्या अहित. त्यांनी दिलेल्या ताम्नपटांच्या प्रशस्तींतद्दी वराह्याचा
नामोळेख असतो, आठव्या दोतकापासून यांची कारकीर्द सुरू होते. ही
वराहमूार्त बहुधा त्यांनींच स्थापली असावी. वराद्द द्या आपला तिसरा अवतार
आहि आणि त्या कल्पनेची बीज वैदिक वाड्ययांतच आढळतात. ' प्रथम हँ
विश्व द्रवरूप होते, केवळ जळमय होतं. प्रजापाते वायु बनून त्या जढावरून
तरंगला. त्याला जळांत एथ्वी दिसली. त्याने लगेच वराहरूप घेऊन तिला वर
काढलें. ? अत तेत्तिरीय संहितेत सांगितलें आहे. झरतुष्टी वाढ्ययांतद्दी त्यांच्या
वेरेथेश्न या देवाने अनेक रूपें घेतली, त्यांतच एक वराहरूप होतें असा उलेख
आहे. वराह म्हणजे सजल, कृष्णवर्ण मेघ अर्से मक्पमुलर प्रातिपादितो. वराह-
हिरण्याक्षयुद्ध म्हणजे जलदारचे अवर्षणाशी युद्ध असा त्या प्रतीकाचा उलगडा
त्यानें केला आहे. या सर्व गोष्टी आणि वराहविषयक अनेक कथा लक्षांत
आणून यात्रिकाच्या रिवाजाप्रमाणे मी त्याच्या पोटाखाळून सरपटत दुसऱ्या
अंगाला गेलां.
वराह्मच्या पुढे नरसिंह, त्याच्या एक नव्हे तर दोन मूर्त इथें प्राकाराच्या
बाहेर जंगलांत आहेत. धाकट्या नरसिद्दानेंच माझ्या छातीवर ओझें आणलें
मग थोरल्याबद्दळ काय बोलावें ! बसलेला असुनही त्याची उंची दीड पुरुष
भरेल. शंदुराचा चार आंगळें जाडीचा थर त्याच्यावर जमलेला आहे. पाठमोरे
पाहिल्यावर त्याच्या आयाळीची खरी कल्पना येते. एखाद्या कमकुवत मनाच्या
माणसाने त्याला पाहिळे तर तो स्वरांत प्रकटून त्याला निजल्याजागी घामाघूम
करील. त्यानें हिरण्यकारोपूर्चें पोट या ठिकाणी फाडळें आणि त्याच्या रक्ताचे
पाट वाहून उभा रामगिरी लाढीलाळ झाला म्हणून याचें नांव सिंदुरागिरि
पडलं असे पद्मपुराण सांगते.
त्यापुढचा अवतार म्हणचे ' उर्गाय' वामन. तोहि रामटेकावर आहे. पण
आज त्याला निवारा नार्ही. त्याचें कलासुंदर मंदिर केव्हांच ढांसळून गेले आदे.
त्याच्या मस्तकावर अभ्र काय छाया करील तेवढेच. मग आरतीधुपारती तरी
कुठून असणार ! आणि याहूनही दुदेवाची गोष्ट म्हणजे तो त्रिविक्रम वामन आज
६ भसमूर्ते ' या सदरांत पडलेला आहे. अप्रतिम पुढुषलावण्याच्या त्या निर्दाष
११० तीथरूप महाराष्ट
“४४-५४ ४४-४४” ४५/१४/६४४४ ४५५४ ४५४४९४४. ४५९... ४५४५-४४-५४.” ५५ ५१५५” »२./%./५.»०./-०> श...
मूतविर ज्या कोण्या विध्वंसकाचा घण बसला असेल त्याचे देव भठें करो!
“पण ही मोडतोड तेवढ्यावरच थांबलेली नाहीं. इतर लोकहि अधूनमधून त्या
बामनांची भग्न मार्ति
मूतींचे कपचे पळवतात. कश्यासाठी ठाऊक आहे! त्या तांबड्या दगडाच्या
वर्णाने सोन्याचांदीर्ची भांडीं लख्ख उजळतात म्हणून. या दुर्दैवी वृत्तीला
कोणत्या शब्दांनी बोळ लावायचा ! कळा आणि संस्कृति यांच्या या आणे अशाच
विध्वंसाविषयी कविमन कसें पिळवटून निघते त॑ पहावयार्च असेळ तर कवि
* अनिल यांचें ' भसमा्त ) हे काव्य वाचावे.
आज अवद्दिष्ट असलेल्या मूर्तीचे ते आपल्या मुक्तछंदांत वर्णन देतात--
शिखेपासुन नखापयंत
लिहिळं जणूं पाषाणांतच
ओजस्वी काव्य वीररसाचे
भरीव, सुंदर आणि रेखीव
रामटेक १११
उरुमाळ रळे मांडीवरतो
अद्भुत तीवर भावमिश्रण
शांत-विक्रांताचे
आक्कष्ट भिवया, विशाल भाल
विस्फारित तेजे दिव्य लोचन
स्फुरित नासिका कंपित ओप्ठ
णऐेसं ह॑ द्षन ब्रेलोफ्यव्यापी--
वामनाच्या त्या शिल्पांतच खाळच्या बाजूला बळिराणाही खोदडेला आहे ;
पण त्याच्या मस्तकावर ठेवला जाणारा त्रिविक्रमाचा उजवा पाय गुडघ्यांतूनच
भंगला आहे आणि त्यावरून जनपदांतल्या लोकांनीं त्या शिल्पाचा एक
नवाच अर्थ लावला आहे. ते त्या शिल्पाला * बद्दीणमाऊ म्हणुन ओळख-
तात. बळीच्या मूतीकडे निरखून न पाहिल्यामुळे त्यांनीं त्याला बहीण
बनवर्ढे आणि वामनाला भाऊ. मग भावाचा पाय असा गुडव्याखाली शून्य
कां, तर त्यानें बहिणीच्या मार्थी लाथ मारली या पापाने तो किडला, झडला.
१1 टु
टं १ (> विमाशिकिक-- शि »_
* वु
शी रि
भै
|!
जोक.
ी /भ 1 पाश
वामनाच्या मूर्तीचे पूणेस्वरूप दशन
११२ तीर्थरूप महाराष्ट्र
बहीण बिचारी प्रेममूर्त. ती भावाचे अपराध पोटी घाळून त्याचे कृमि उप-
शीत राहिली आहे. लोककथा कशा बनतात त्याचा द्वा एक नमुना लक्षात
ठेवण्याजोगा आहि.
कालिदासाला मेधदूताचे स्फुरण झालं तें याच गिरीवर. कालिदास कांडी
वर्षे विदर्भात वाकाटक टपति ह्वितीय प्रवरसेन याच्या दरबारी सम्राट चंद्र-
गुप्ताचा वकील म्हणून राहिला होता. वाकाटक राजघराण्यांतळी मंडळी राम-
टेकच्या यात्रेला वारंवार येत असत. अर्थात् कालिदासही त्यांच्याबरोबर
अनेकदां येथें आला असेल. रामगिरीसारखा वनश्रीने विनटलेला पर्वत,
तद्लांत आषाढाचा महिना. सगळीकडे कुड्यांचे रान नवकुसुमांनीं बहरलेले,
मावळतीच्या मुळसांतून चढतचढत एक कृष्णमेघ रामगिरीवर ओथंबून
आलेला. कालिदासच कदाचित् त्या काळी विरद्दी असेल. डॉ. श्रीखंडे
अनुवाद करतात त्याप्रमाणे,
“ सुखीजनांचंहि बघानि मेघा
होते मन व्याकुळ भावपूरा
व्हावे किती ते मग की जयांची
प्रिया दृढारठिंगनलोभि दूरी ”
हा कदाचित् त्याचाच स्वानुभव असेल. आपल्या प्रिय भार्येला त्या मेघा करवी
भावरम्य, ढलिताथंगर्भ क्षेमसंदेश पाठवावा अत त्यालाच वाटले असेल
आणि त्याने आपल्या भावभावना ह्ापभ्रष्ट यक्षाच्या मुखाने बोळकया करून
शारदेळा ' मेघदूता 'चा लाखमोलाचा नजराणा समर्पिळा असेल.
८ नाथांचे पेठण
“%८>०-०---->-24८:24//2.2552“22255.5>5>4>45 ० द 2”.
आज आपण औरंगाबादला मोटारीत बसला कीं तीस मेढांचा रस्ता दोन
तासांत आटपून पैठणढा उतरू शकतो. यंत्रयुगाचे द्दे आपल्यावर उपकार
आहेत. पण या प्रवासांत एकदां माझ्या मनांत आले काँ, सातशे वर्षीपूर्वी
किशोर-वयांतळे ज्ञानेश्वरमंडळ जेव्हां आळंदीहून पैठणच्या यात्रेला निघाळें
तेव्हां त्याला किती हाळ-ताप भोगावे लागळे असतील ! ते बंधू तरी काय
सडे द्वोते! मुक्तेचा बाळजीव आलटूनपालटून त्यांच्या पाडुंगळीस असायचाच.
किती दिवस त्यांना मुक्काम गांठायला लागळे असतील हरि जाणे !
त्या काळी प्रवास कष्टदायक होता ही गोष्ट खरी; पण त्या कष्टांचे
परिमार्जन होईल, एवढा आनंदद्दी त्यांत गवसे. जुने प्रवासी निसगांच्या
पोटांत शिरत. ते जणुं त्यांतळेच एक असे बनत. निसर्गाचे नवे नवे रंग,
कळाकुसरी, लढीलालहरी, त्याचे कधीं रुद्र तर कधी शिव असे सोंदर्य, हे सगळें
त्या प्रवाशाला डोळ्प़ांच्या अंजुळीर्न घोटतां येत असे. आज आपण त्याच्या
अंगावरून भरकन् जातो. संकीण असं पद्दाता पुष्कळ; पण अनुभवीत मात्र
कांहरच नाह्दी. नुसती पाने फडफडवून ग्रंथ वाचल्याचे जेवढे समाधान
तेवढेच अशा धावत्या प्रवासाचे,
सकाळीं नऊ वाजतां आम्ही पैठणास मंडइंपुढच्या मोटारतळावर उतरलो,
त्या दोन दिवतांत तिकडच्या भागाला वळवाचे पाऊस पडत होते. आजद्दी
सकाळपासून दुर्दिनच होतं. काळसर पांढरे ढग तूर्याळा उघडण्या-झांकण्याचा
पोरखेळ कर्रात होते, ट्यामुळें हवेंत उकाडा बराच जाणवत होता. मीं म्हटलं,
: उकडूं दे किती उकडत ते. गोंदामाई आतां जवळच आदे. ' धूळभरल्या
निरुंद रस्त्यावरून आम्हांला प्रथम थोडासा चढ चढावा लागला आणि सग थेट
नदीच्या पात्रापर्येत गेलेल्या उताराच्या मध्यमार्गी श्री. नरहरिबुवा जह्यागेरदार
यांचे घर भेटले. बारा वर्षोर्नी प्रेमाचा बंधु घरी यावा तसे त्यांनी आमर्चे
ती. म....२-८
११४ तीथरूप महाराष्ट
«४८८. ८६८८८५१५५१. /१./१./१./५/१ /५५१./१/१/५/१/१/१५/”५" "४१ ४४४"*" ४४४ /५५/४४१४१४/"४*"*१५"-"४72//'>27>”“**'““५५'५/-/>"'//2>.">//_>/“./”“““€<“““€ “ “>>> >. -€ > शी
स्वागत केलें. बुवा म्हणजे तथाकथित संतमहंत नव्हेत. ते पैठणचे नामांकित
वकीळ आहेत. ते प्रसंगविशे्षी सांप्रदायिक “ निरूपण ? करतात म्हणून ढोक
त्यांना बुवा म्हणतात. एकनाथांचे ते बारावे वंशज आहेत. वाणी लाघवी,
वृत्ति निरद्देकार आणि मन मोकळे, मी स्वतःशीच म्हणाळा, ' गरहृस्थ
नाथांच्या वंशांत शोभतो खरा |!
उन्हाळ्यांत नदी आटते ; पण लोकांना ती अधिक प्रिय द्दोते. त्यांतून ही
नदी म्हणजे त्रह्मगिरीवरून निघाळेली दुसरी गंगाच. तब्बळ एका वर्षाने
आज मला पुनश्च ती पदराखाली घेणार होती. मला मायेने कुरवाळणार
होती. मोठ्या उल्ह्वासाने आम्ही चंषूगवाळें खांकेळा मारळे. मी तीरावरच्या
वृक्षछार्यत जाऊन उभा राहिलो. तिथून ऐलतीरपैलठतीर न्याहाळले.
५ गोदावर्याः दाक्षिणे तीरे शालिवाहन शके-- ? अता नित्य संकल्प मी म्हृणत
होतां त्या नेमक्या जागी आज मी येऊन ठाकला होतो. गोदावरीचे पात्र
: वक्षुर्वे सत्यम्? होतं आणि शककर्ता शालिवाहन इथच जन्मला हवे इतिहास
सांगत होता. केवढं विस्तीर्ण ते वाळवंट ! चंद्रभागेचे याच्यापुढे अगदींच
तोकडे. डाव्या हाताच्या लांबवर दिसणाऱ्या नागघाटाखालीं काय डोह
असेळ तेवढाच ; बाकी सगळें पात्र उथळ. आटून कृश झालेला प्रवाह
पलीकडच्या तीराला चिकटून वाद्ृत होता. मी सपशेळ आडवा पडला तेव्हां
कुठें डोक्यावरून पाणी गेलें
कालच रामनवमी झाली होती. पुढच्या पौर्णिमेला इनुमानजयंती येणार
होती. या दोहोंच्या मधळी एकादशी साधून गांवोगांवच्या कावडी येऊं
लागल्या होत्या. आम्ही नदीवर होता. तेवढ्या वेळांतच कावडीवाल्यांचे
दोनतीन मेळ काठीने डफ-दिमड्या वाजवीत तिथें पोंचळे. गाय दिसतांच
वासरूं जसे घाव घेईल तितक्या ढगबगीनें ते धावत, धडधडत पेलतीराच्या
उंचवट्यावरून प्रवाहांत उतरले. आंगभर पाणी उडेळ इतक्या घाईंगर्दीने
ऐेलताराला आले आणि * गांठला एकदांचा मुक्काम ? अशा समाधानाने
वाळषंटांत ऐसपैस पसरले. त्यांच्या आधीही आणखी बरेच जथे तिथें येऊन
थडकले होते आणि कोंडाळे मांडून फराळ किंवा गप्पा-गोष्टी करीत होते. त्या
रात्री ते वाळवेटांतच आभाळाच्या रत्नजडित चांदव्याखाली झोपणार होते.
दुसऱ्या दिवशी एकादशीचें पर्वस्नान आणि नाथदर्शन करणार होते आणि मग
नाथांचे पेढण ११५
“ट“/५€-“-:/>/>“€-<-:-“-“-*/:/-“>“-<>/>“-/ऱ> “>. “<<:“<“-“५-“-:<-“-<-<>/>/>-/“4.“-/--:/:/-:>/-“>“:/“/>“-« >“ /-/-€€ -“ *->/./>“<><><“-/“->/-:/-/-->/>/>/./>.“>.
आपापल्या गांवच्या मारातरायासाठीं गोदाजळाच्या कावडी भरून घेऊन पेठण
मोडणार होते. चेत्रवारीला अशी हजारां कावड तिथें येते आणि त्या कावड-
वाल्यांच्या संगे गोदामेय्या गांवोगांव, घरोधर जाते. आसपास दद्वा-बारा
कोसांतळे मारुती आपल्या जयंतीच्या दिवर्शी गोदाजलाने न्हातात.
पैठणगांव गोदातीरावर आहे ईं म्हणणें अल्पोक्त ठरेल. तें गोदावरीनें
वेढलेळे आहे. त्याच्या तीन बाजू भरतखंडाप्रमाणें सजल आहेत. गोदावरी
प्रथम पूर्वपश्चिम वाहते, नंतर दक्षिणोत्तर वळते आणि पुन्हां मूळ
दिशेला येते,
नदीकिनारी ज्ञान आणि संस्कृति यांची विशेष प्रकारे वाढ होते असा एक
सामान्य नियम आहे. पैठणही त्याला अपवाद नाही. ते एका काळी विद्यापीठ
आणि घधर्मपीठ होतें. इथला धर्मनिर्णय महाराष्ट्र मंडळांतळा अखेरचा मानला
जाई. पैठणच्यापुढें धर्मांच्या बाबतींत बोलणें नाहीं. उत्तरेळा काझी ज्या
तोढाची, त्याच तोलाचें दक्षिणेंत प्रातिष्ठान म्हणजे पैठण. लखलखीत
विद्त्तेचे वैदिक आणि पंडित इथे अखंड परंपरेने निर्माण होत होते. इथल्या
घर्मसभांतून शास्त्रार्थ गाजत होते. रामेश्वरमट्टांसारवे आचार्य विद्येचे सदावत
घालून बसले होते. कोणीद्दी यावें आणि हवे ते शास्त्र अन्यासावे, ' निर्णय-
सिंधु * या ग्रंथाचा कर्ता कमढाकरभद्ट आणि शिवछत्रपतीच्या मस्तकावर
राज्यामिषेक करणारा गागाभट्ट हे दोघे मूळ पेठणचेच. या मद्घराण्याला
काशीत अद्यापि अग्रपूजेचा मान आहे.
हेच पैठण पुढें नाथांच्या काळांत भक्तिपीठ बनळें. ज्ञान आणि वैराग्य
या दोन पुत्रांतद्द भगवदूभाक्त आपल्या पोषणासाठी इथं दाखळ झाली. महाराष्ट्र
रसवंती तर म्हणाली कीं, ' गोदातीर हेंच आतां माझे माहेर! आतां मी
ओवीछंदानें पूर लोटीन. अभंगरूपानें कीत नरंगी रंगेन. भारुडांच्या रूपाने
ळोकसमाजांत लीलानृत्य करीन. गोदावरी जनांचे देद्द क्षाळते ; मी त्यांची
मर्ने क्षाळीन !
गेली दोन दइजार वर्षे या ना त्या कारणासाठी पैठणचा कॉर्तेपरिमळ
दिगंत धावणे करीत आहे. सम्राद अशोकाच्या शिलालेखांतून ' पेत्तानिक 'म्हणजे
बैठणवासी लोकांचा उल्लेख आढळतो. लखितस्त शकाच्या पूर्वीपासून व्या पार-
११६ तीर्थरूप महाराष्ट्र
धंद्यानिमित्त पैठणचे श्रेष्ठी आणि महाजन देशांतरी संचार करीत असल्याचा
युरावा मिळतो. पहिल्या शतकांत पेरि्ठत्त नांवाच्या एका हाजाप्शयन लेखकान
भारताचे ग्रीस, रोम इत्यादि देशांशी व्यापारी दळणवळण कर्ते चालतें या
विषयावर एक पुस्तक लिहिले आहे. त्यांत तो म्हणतो, ' दाक्षिण देशांत
फक्त दोनच शहर व्यापारी दृष्टीने फार महत्त्वाची आहेत. एक पेठण व दुसरें
तगर. पैठणला पोहोचण्यात भडोचहून वीस दिवसांचा प्रवास करावा लागतो.
पैठणहून भडोचला “ गोमेद ? नांवाच्या दगडांची फार मोठी निर्यात होते.
ह्या सर्व माल मोठ्या गाड्यांमधून व चांगले रस्ते नसलेल्या प्रदेशांतून आणावा
ळागतो. तेथ नाना प्रकारचे कापड तयार होते. ! जरीचे काम सवीत कुठं
चांगलें होत अत्तेळ तर ते पैठणला. रेशमी जरीबुट्टयांच्या गड्याला ' पैठणी ?
म्हणतात तो नग पेठणच्या पेठेतच बनत होता म्हणून.
शातवाहनांच्या कालांत पेठणचा सर्व अंगांनी उत्कर्ष झाला, दह्या काळ
खित्तपूर्व आणि ख्रिस्तोत्तर असा मिळून चारशे वर्षांचा आहे. शातवाहन राजे
च्य श्र
इथूनच साऱ्या दक्षिणेवर राज्य कररत होते.
* पहाणे नगरे सालिवाहणो राया
असे त्याचे जन वाडूमयांत गोरवोलेख सांपडतात. बृदृत्कथेचा कर्ता गुणाढ्य
सातवाहनांचाच आश्रित होता. गुणाढ्याचें पैठणांतळे वास्तव्य ह्वा महाराष्ट्राच्या
सांस्कृतिक इतिहासांतळा महत्त्वाचा काळ समजला जातो. पैश्याची, महाराष्ट्री
वशेरे प्राकृत भाषांना त्यानें राजाश्रय मिळवून दिला, शातवाहनांनाच आंत्र
असें दुसरं नांव आहे. आंग्रांनंतर चाटुक्य आढे, राष्ट्रकूट आळे. पण त्यांनी
आपल्या राजधान्या पैठणष्टन हालवल्या आणि त्यामुळें पैठणचे माहात्म्य कमी
कमी होऊं ढागळं. आजमितीस पैठण हे निजामी राज्यांतळ॑ एक लहानसे
तालुक्याचे ठिकाण आहे. शहर या दृष्टीनें त्यानंतर त्याची कधींच भरभराट
झाली नाहीं. चौदाव्या शतकांत राजशेखराने पेठण पाहून जे उद्गार काढले,
त्यांचाच आजही अनुवाद करतां येतो.
॥ अथुना तु दक्षिणदेशस्थितं प्रतिष्ठानपुर क्षु्ठकम्रामतुल्ये वर्तते”
श्री. नरहृरिखुवांनी आम्हांला फिरायला नेताना शालिवादनाचा तो प्राचीन
वाडा दाखवला. केवढे प्रशस्त आवार आहि त्याचें! मुसलमानांनी त्याचं
नाथांचं पेढण ११७
*४टी८* 4५/५१/५५५८ ><८४६८०/४८
“४८४४०”
मशेर्दात रूपांतर केळें आहे. त्या राज्यांत असे न होतें तरच नवळ ! पोळिस-
कारवाईच्या पूर्वी या वाड्याच्या आवारांत प्रवेश करणें हे एक दिव्यच होतं
असें मला कळलें, मोकळ्या पटांगणांत कबर आहे आणि दोन बाजू बांधलेल्या
आहेत. बाजूळा उन्हा-पावसांत झिजलेळे, तुटळेळे, कांही दगडी खांब आहेत.
त्यांवरची कोरीव कुसर पाहिली कीं वाढ्याच्या प्राचींनत्वाची साक्ष पटते. आंत
विहीर आहे तिला शाळिवाहनाची विहीर म्हणतात. वाटोळ्या, लह्वान
तोंडाच्या त्या विहिरीत तळापर्वैत नजर बुडविली म्हणून तो भूतकाळ हाताळा
लागणार आहे थोडाच ! एक दंतकथा मात्र गवसली.
कुठून तरी एक ब्राह्मणकन्या पैठणच्या एका कुंभाराकडे येऊन राहिली.
त्यानं तिचा प्रतिपाळ केला, शेष नांवाच्या नागाचे तिच्यावर मन जडले.
त्याच्यापासून तिळा जो पुत्र झाळा तो शालिवाहन. तोही त्याच कुंभाराच्या
घरी वाढला. कुंभार गाडगी-मडकी घडवी तेव्हां हा त्या गाऱ्यांतली थोडी
माती घेऊन हत्ती, घोडे, शिपाई बनवी. त्या मातीच्या चित्रांनी त्याने घर-
दार भरून टाकलं. जणुं भवितव्यतेर्नच त्याला हा चाळा लावला होता.
अनेक सौंगडी जमवून तो जळींस्थळीं खेळे, त्याच्याच कालांत तिकडे
नर्मदेच्या पळीकडे विक्रमानं आपळा शक ( संवत् ) सुरू केळा होता. भरत-
खंडभर तो चालू व्हावा ही त्याची मददत्त्वाकांक्षा होती. पण एका ज्योतिष्यानें
त्याळा सांगितळं कीं, ' तुझा एक प्रतिस्पची वाढतो आहे. तो दक्षिणेत
आपला शक चाळू करील. तूं एका हत्तीच्या मस्तकावर सुवर्णपत्रिका लावून
तो सोड. या हत्तीर्चे वजन करून द्यावे, नाह्दी तर युद्धाला सिद्ध व्हावे! अशी
राज्याराज्यांतून द्वाही फिरव. जो इत्तीला तुळील तो तुझा प्रतिस्पर्धी असें
समज. ? विक्रमादित्याने तसे केळं. हत्ती संरक्षकदलासहृ पैठणापर्मंत आला.
तोंवर कांही त्याचें वजन करणारा कोणी चतुर भेटला नाही. शालिवाइनाने तें
आव्हान स्वीकारले. त्यानें इत्तीला एका नावेंत चढविळ. नाव जिथवर
पाण्यांत बुडाळी तिथें एक रेघ ओढली. मग इत्तीला उतरवून त्या रेघेपर्यंत
बुडेल इतकी वाळू त्या नावेंत भरली. त्या वाळूचे जे वजन तेंच इत्तीचे.
सर्वाना त्याच्या कल्पकतेर्चे नवळ वाटलें. विक्रमादित्यानें त्याच्याशी युड
पुकारळे, शालिवाद्दनानें कशाच्या बळावर त्याळा तोंड द्यायचे ! पण शेष-
नागाने त्याळा आयत्या वेळी अमृत आणून दिलें. त॑ त्या मृण्मय सेन्यावर
११८ तीर्थरूप महाराष्ट्र
२“ '*२३-/१./.४.४४४५/७४५. “४४७५१७५... ४.४९.» ४७७७ ४..५५४./ 0९.” ४-७ ४... १.५ “00५0-९५-५४. १५,४४५. 0... ४९ /%७ “0 “७
शिंपडतांच ते ' कोल्हेरीचे आतिवार ? प्राणमय झाले, झालिवाहनानें तो
दळभार विक्रमावर लोटला, त्याळा नमंदापार हुसकून ढावळ॑ आणि लगेच
त्यानं आपला शक जाहीर केला. हा शालिवाहन म्हणजे पुलमाई आंत्र आणि
विक्रमादित्य म्हणजे जयदामन् हक असावा अत्ता इतिहासवेत्त्यांचा
कयास आहे.
आम्ही म्रामस्चना पद्दात पद्दात दक्षिणेकडे चालला होतो. पुढे शिवदीन-
केसरीचा मठ लागला, मठ म्हृणजे मोठा वाडाच आहे. कांद्दी पायऱ्या चढून
आम्ही वर गेला. अंधाराने आमचें स्वागत केलें. धुळीने आम्ह्वांला पायघड्या
घातल्या. मठाच्या देवघरांतद्दी सगळा ' उत्साद्द ) च दिसला. एखादी जीणे
वास्तु पद्दायची या भावनेर्ने मी तिथें गेला असता. तर ही सगळी
लक्षण ठीक होती. पण मीं गेलो होतो मठ पद्वायला. मठांत आरास नसो;
पण निदान स्वच्छ झाडळोट तरी! हा मठ * दीना ? चा असला तरी
तो दीन अनाथ नार्ही. ल्याला जहागीर आहे आणि पेठणांत मोठा मानही
अहि. एकनाथमह्ाराजांची पालखी निघाली कीं शवदीनाचा झंडा आघाडीवर
असतो. शिवदीननाथ हे अठराव्या शतकांतीळ महत आणि ग्रंथकार. ' दीन?
ह्वी त्यांना एका मुसलमान साधूने दिळेळी पदवी आहे. उजव्या द्दाताच्या
दालनांत त्यांची पर्यंकारूढ तसबीर आहे. राजविलासी पोषाखांतळी आणि
नीलकमलासारख्या डोळ्यांची ती आकृति पाहिली कीं हा कोणी तरी अधिकारी
पुरुष अत्तावा हे कळून येतं.
असाच इथला दुसरा मठ कृष्णदयार्णवस्वामीचा. तो गोदावरीच्या कांठी
वृक्षांच्या छार्यत आहे. या माधथ्यंदिन यजुर्वदी ब्राह्मणाचे मूळ नांव नरद्दरि.
पण भिक्षा मागतांना तो कृष्णदयार्णव समर्थ ? असा पुकार करी. म्हणून
लोकांनीं तेंच त्याचें नांव रूढ केलें. पुढे त्याच्या अंगी कुष्ट उजळले म्हणून
नाथसेवेच्या उद्देद्याने तो पैठणाला आला. नाथांनी त्याला दृष्टांत दिला की,
मीं भागवताच्या एकादश स्कंधावर टीका केळी तशी तू दशमावर कर.
तुझा रोग दूर होईळ. हाच नव्हे; तर भवरोगसुद्धा ! !
कृष्णद्यार्णवार्ने हा. आदिदा मस्तर्की घरळा. ओवीछंदांत ग्रंथर्चनेळा
प्रारंम झाळा, भावभक्तीच्या अमृतरत्तांत न्हाऊन त्यांची प्रतिभा मगवत्पूजे-
नाथांचे पेढण ११९
साठी नित्य नवी कल्पनारत्नें आणि शब्दसुमनें वेचून आणूं लागळी.
६ हूरिवरदा २ ग्रंथ अध्याया- अध्यायार्ने वाढूं लागळा, ग्रंथरचनेच्या आनंदांत
निभर, निमस असतां अंगावरचे कुष्ट केव्हां मावळले त्याचा कृष्णदयार्णवाला
पत्तादह्दी लागला नाहव. वाग्देवतेनें महारोगांतून मुक्त केल्याचे हे अठराव्या
शतकांतळ॑ दुसरे उदाहरण. पहि्ळ उदाहरण सातव्या शतकांत
मयूरकवीर्चे आहे.
मयूर ह्या बाणाचा समकालीन आणि जवळचा नातेवाईक. एके दिवशी
सुप्रभातीं तो बाणाच्या घरीं जातो तर त्याची मार्या संतापळी आहे आणि
हे ' कादंबरी ' कार कविश्रेष्ठ करुणशब्दांनीं तिची मनधरणी करीत आहेत.
आंतल्या दालनांत द्दा सांत्वनविधि चालळा होता आणि मयूर बाहेर
उभा राहून ऐकत होता. गद्यार्य तिचा क्रोध शमेना म्हणून शेवटी बाणाने
लढितमधुर पद्याचा आश्रय केळा. त्याने तीन 'छोकचरण कसेबते रचले
आणि एकदम त्याचा कंठ दाटला. पुढे शब्दच फुटेना, ते पाहून मयूराची
कविवृत्ति एकदम उतळून आली.
' कुचप्रत्यासत्त्या हृदयमापे ते चण्डि कडढिनम_?
असा त्या कोकाचा चोथा चरण स्वतः पुरा करीत तो सरळ घरांत
घुसला, आपल्या एकांतांत ह्या प्राणी अचानक उगवलेला पाहून त्या चंडीन
त्याळा शाप दिला, ' तुझ्या अंगी महारोग जडेल ! ' तिळा वाक्सिद्वे होती
त्यामुळे तो लागलीच बाधला. मयूर पूर्योपासक होता. त्यानं आपल्या
आराध्यलिंगाला आळविण्यासाठीं ' सूर्यशतक ? नांवाचें काव्य रचळ॑ आणि
त्याच्या प्रभावाने मग तो निर्दोष झाला.
कृष्णदयार्णवाचा ' हृरिवरदा ! ह्या भव्य ग्रंथ आजमितीस छापलेला आहे.
पण खुद्द कवीच्या हातची दइस्तलिखित प्रत पाहतांना एक निराळाच आनंद
मिळतो. जणु त्या रूपानं साक्षात् कवीच आपल्याला मेटतो. मी हलक्या
हातानें पोर्थाचें वेष्टण सोडलें आणि तिची वरची फळी उळटून ठेवळी, आतां
वाचू तरी किती आणि काय? शेवटी प्राचीन पंडितांच्या शलाकापरीक्षेचा
अवलंब केला आणि दोन्ही आंगठ्यांनी उचळतां आली तेवढी पार्ने एकदम
उचलली. उघडलेल्या प्रष्ठावर दृष्टि टाकतो ता तिर्थे यशोदेचे घुसळण मांड-
लेळें. ल्या प्रसंगावर कवीच प्रस्न सुढाळ वर्णन चाललं होते.
१२० तीथरूप महाराष्ट
“ [जिचे कटिभार रम्य पूथुळ | बरी अमोल्य परिधान पट्टकुळ
सूघबद्ध कांची सोज्ज्वळ । रत्नसळाळ जडिताच
पदर खोविछा परवर्टी | कंचुकी बिरडा सुटली गांढी
कृष्णस्नेह दाटला पोटा । तेणं दृष्टी उन्मीळित
दोही हस्ती करितां मयन । तेणे सर्वांग कंपायमान
पुन्स्नेहं द्रवलं मन । दुग्धे स्तन पाझरती ”
या ग्रंथावरून दुसऱ्या दोन ग्रंथांचं स्मरण झाळें. पहिला एकनाथांनी
संशोधिलेली ज्ञानेश्वरी आणि दुसरा खुद्द नाथांच्या द्वातचे भागवत, हे दोन्ही
इस्ताठाखित ग्रंथ पैठणांत आणि विशेषतः नाथांच्या वाड्यांत मिळायला हवे
होते. पण महाराष्ट्राचे भाग्य या बाबतींत उरणे पडळ आहे. कोणी त्याबद्दल
विचारलें कीं नाथांच्या वंशजांना ' षडूविध नकार सांगावा लागतो. त्यांचें
& जुन ठेवणे ! त्यांनाच आजमितीस अगम्य आहे. पैठणला ' नाथवार्त्रयो-
पासक मंडळ ? स्थापन झालं आहे. त्यानें या दोन प्रतींचा जर शोध लावला
तर महाराष्ट्र त्याचा जयजयकार करील.
आणखी थोडं चालल्यावर श्री. नरहरिबुवांनीं आम्हांला बक्षी, लद,
वानोळे या मातबर सावकारांचे वाडे दाखवले. त्यांतळे कांही पडळे आहेत,
कांहीं त्या मार्गावर आहेत. लक्ष्मी तर गेलीच ; पण कांद्दींचा निर्वेशही झाला
आहे. पेशवाईच्या काळांतले हे कनकनारायण. राधोबादादाचा तळ इथे
पडला आणि त्याच्या कांखा वर झाल्या तेव्हां या वानोळ्यांनी रोजी सव्वा-
लक्ष रुपग्रे याप्रमाणे महिना-सव्वा महिना त्याच्या सेन्याचा खर्च चाल-
विला. त्यांच्या घरीदारी रुपयांची पात्यांवर पोती. पडलेली असत. बाया-
बापड्या जातां-येतां त्यांना आदळत आणि म्हणत, ' काय मेल्याची
संपदा--- बक्षी सावकाराचीही अश्नीच गोष्ट. पेशवे स्वारीत अततांना पैठ-
णास येऊन गोदातीरी उतरठे होते. त्यांना याने भोजनाचे निमंत्रण दिले.
नाना फडणिसान त्याला सांगितळे कीं, रुपयांवरून चालवीत नेढेंस तर
श्रीमंत तुझ्या घरी पायधूळ झाडतील. बक्षीरन॑ तस तर केलेच ; शिवाय
झपयांच्या राशीवर बसवून त्यांना पूजढं आणि तो सगळा द्रव्याचा डोंगर
त्यांच्या चरणी स मर्पिळा, पेशव्यांचे त्यावर उत्तरद्दी त्यांच्या दोळतीळा साजे-
' नाथांचे पेढण १२१
सॅच द्वोते. ' गोदावरीचा नागघाट नादुरुस्त झाला आहे. या द्रव्याने त्याचा
जीणौद्धार करा.
या घाटावर एका अंगाला जीणौद्धाराचा शिलालेख आहे आणि दुसऱ्या
अंगाला एका बुरुजावर ज्ञानेश्वरांनी उद्राच्या मुखानं वेद वदविले त्या रेड्याची
लहानशी कोरीव प्रतिमा आहे. घाट अरुंद पायऱ्यांचा खूप उतरता
न्यांधळेला आहे. पाणी त्याच्या अंगावरून खळाळत जातें आणि खालच्या
बाजूला वळता घेते. आम्ही तिथल्या नागप्रतिमेजवळ थोडा वेळ बसलॉ.
मनांत उत्साद्द होता; पण वातावरण कोंदलं होतें. सूर्यांचा प्रवास आतां
वांवभर उरला होता; पण ढगांचे निळे हत्ती तो त्याळा सुखाने पुरा करूं
देणार नव्हते. ते उडतद्दी नव्हते [ने पडतही नव्हते. उगाच तिथल्या तिथें
एकमेकांना ढोतण्या देत राहिले होते. पश्चिभेचें क्षितिज कुठे तरी लांब लांब
गेळं होते. समोरच्या वाळवंटांत कोणी दिसत नव्हतं. घाटावर कोण्या जान-
पद रमणीची घागर भरत नव्हती. उड्या मारायळा चांगली जागा असूनद्दी
मुळांचा तिथे पायरव नव्हता. आम्ही तीन माणते जणुं शून्यारण्यांत सांपडल
होतों. गोदामेय्याचें सानिध्य होतं ; पण संध्या आणि मेघ यांच्या संमिश्र,
सांद्र छायेनें तीद्दी दुर्मवल्यासारवी झाली होती. अशा स्थितींत पाठीमागची
रुक्ष, खडकाळ ' पालथी नगरी? या वळी किती उल्हसित दिसेळू याची
कोणींही कल्पना करावी.
पालथी नगरी म्हृणजे ' दे माय, धरणी ठाय ? म्हणून धरित्रीच्या उदरांत
गडप झालेलें शालिवाहनकालीन पैठण. देद्राबादच्या पुराणवस्तुसंशोधन-
खात्याने कांही वर्षोपूर्वी त्याचं उत्खनन केलें. त्यांत सांपडढेल्या कांही मूर्ती
आणि फुटकींतुटकी मातीची भांडी जवळच्याच एका वाड्यांत ठेवलेली
आहेत. मोल्यवान चिजा हैद्राबादच्या वस्तुसंग्रहालयांत जाऊन बसल्या आहेत.
तिथले ते खडे आणि चर तोंडं उघडून प्रेक्षकांना खायला उठल्यासारखे
दिसवात. जे नेतां आळे ते संशोधकांनी उचललं; पण घरांचे पाये, सांडपाणी
बाहेर घाळवण्यासाठी विटांनी बांधून काढळेळे नाळे आणि पाणी जमिनीत
मुरवण्यासाठी खोल खणलेल्या विहिरी या गोष्टी स्थावर असल्यामुळें जाग्यावर
राहिल्या आहेत. आपल्या पूर्वजांचे वास्तुशास्त्र कुठवर प्रगत झाले होतं याचे
वस्तुपाठ आजच्या स्थपतींना तिथें मिळूं शकतील. कऱ्हाड येथील उत्खननांत
१२२९ तीथरूप महाराष्ट
२९९-७७७७७* ७४ ? ४ ४४७४/ ४४४” 5४ ४४४४४शोक ४८४४१४४४४५ -/-<>/-*4>>>**>““./*“-४५/५न/५” “- “>€४८४” ५.४१.” ६.८९.” २.८४
श््€ '७€ ९४/१५/७५४१ ७४११०७१४०७ ७४ ७७ ७७४? १४ "क्ली
आणि नाक्षिकच्या टेकाडावरद्दी अशाच विहिरी आढळल्या आहेत. नदीकांठच्या
उंचवट्यांवर वसलेल्या शहरांची उमारणी त्या काळी एका विषदिष्ट पद्धतीने
होत असते याची त्यावरून कल्मना येते. पैठणच्या आसपास आणखीही
उल्खननयोग्य अशी कांहीं टेकाड आहेत आणि तां जर खोदली तर शात-
वाहनकालीन इतिहासावर अधिक प्रकाश पडेल असा इतिहासविदांचा
अंदाज आहे.
1 स्श्द र मी
१८०५५६”
॥॥॥॥॥॥॥)) स्ट
नाथांच्या पूजंतील बाळकृष्ण
हं सगळे भोवतालचे आम्ही आर्धी पाहून घेतलें. पहाणे झालें; आतां
: दर्शन ? उरले होते. “' आंतळे नाथ? आणि ' बाहेस्चे नाथ? या दोन्ही
स्थळांचे. दुसऱ्या दिवशी एकादशी होती आणि आम्हांला एक मोठा लाभ
घडणार द्दोंता. आंतल्या नाथांच्या मंदिरांत म्हणजे नाथांच्या रद्दात्या वाड्यां-
तल्या देवघरांत अनेक मूर्ती आद्देत. त्यांत सर्वोपरि विराजित अशी मूर्त
म्हणजे नाथांच्या पूर्जतळा बाळकृष्ण, रोज त्याला जिथल्या तिथे गंधादि
नाथांचं पेढण १२३
पंचोपचार होतात ; पण एकादशीला मात्र खाली काढून श्याची अभिषेकपूवक
पूजा केळी जाते. मी स्नान करून सोवळ्यानें गाभाऱ्यांत प्रविष्ट झाला
माझ्य़ा आर्धी दोघे पुजारी आंत जाऊन संकल्प म्हणूं लांगळे होते. अवतीं-
भोंवतीं समृद्ध पंचामृ्ते, मिठाई आणि फळें यांचा नेवेद्य आणि डोळे तृत
होतीळ असें पूजासाहित्य मांडलेळं द्दोते. बाळकृष्ण, ' भिंगाचें भिंगुळं खांध[-
वर आंगुलळें ' वगेरे पोषाख काढून मांगलिक स्नानाला सिद्ध झाला होता.
वीतमर उंचीच्या त्या पंचरसी घधातुमूर्तीकडे मी दृष्टि तट्थिर केली. ' दास
जेबूं घाळा, न घाला ! अशी अक्षरे उमटलेल्या विटेवर तो बाळकृष्ण उभा
होता. उजवा हात लोणीसाखर चाटून उताणा कटीवर ठेवलेला. डाव्या
हाती दक्षिणावर्त देख. पायांत सांखळ्या-वाळे. हातांत कर्डीतोडे. तुंदिळ
उदर. पाठीवर शिदोरी. काखेला कामघेनु म्हणजे झोळी, डाव्या खांद्यावर
श्रीखंड्याच्या रूपाने बारा वर्षे कावड वाहिल्याची खूण म्हणून घट्टा. गळां
रत्नद्वार. कपाळीं रत्नटिळा. मस्तकी शिवलिंगाच्या आकारा'चा मुकुट. मुकुटाला
खालची रांग रत्नांची, तें बाळध्यान माझ्या चित्तांत ठसले. मला वाटलें,
आत्तां हा गोधन चारण्यासाठी वृंदावनांत जायळा निघेळ. यशोदेचे मातृहुदय
व्याकुळेळ. आपले तान्हे नाजुक सुकुमार आणि वन तर काट्यांकुट्यांनी
भरळेळे, ती कळवळ्याने त्याच्या सवंगड्यांना म्हणेल,
“> * “४ -टीटारटीट-_“.*>->५-/-/-४/-//५८५/५८/६/४/-८-/
£ जवळीच खेळा नका जाऊ डरी
संभाळा मुरारा प्राण माझा ”
ह्री श्रीमूत॑ उज्जयिनीच्या एका सावकाराने आपल्या उपासनेसाठी घडवली
द्ोती. तो तिची आपल्या घरी स्थापना करणार होता ; पण त्याला रात्री स्वप्न-
दृष्टांत झाळा की, ' मळा पैठणळा नाथांच्या घरी पोचव ! !' देवाची आज्ञा
खरी ; पण त्यानें ती कशी मानावी ? मग त्याच्या भावभक्तीर्चे काय ! त्यानें
आइकनाइक केळे आणि स्थापनेची आइती आरंमेली. पुन्हां दुसर्या रात्री
देवाने आदेशा दिळा आणि तोही कठोर शब्दांत. ' माझी इच्छा अवमानू
नका. तुझं बरे मळ होणार नाहीं !--! सावकार घाबरला आणि तसाच्या तसा
देवाळा घेऊन पैठणळा आला, मनाजोगता देव आवडीची धणी पुरवायळा
घरी चाळून आठेळा पाहून नाथांना परमानंद झाला. मी विचार करूं लागला
२१२४ तीथरूप महाराष्ट्र
कीं, या देवाला पुजून नाथ धन्य झाले का नाथासारख्या परम भागवताच्या
इस्ते पूजा घेऊन देवच धन्य झाला ? पण मीं हा विकल्प काय म्हणून मनाला
रशवुं द्यावा ? देवच निजमुखार्ने बोलतो आहे ना !
' विचारितां आंतुवट' अर्थ । मी आणि भक्त एकचि !
नाथांचा जुना वाडा हेंच आतां मंदिर झाळे आहे. देवघर इंच गाभारा
बनले आहे. त्याचा जाणोद्धार झाळेला असला तरी महाद्वार आणि भिंती
नाथांच्या वेळच्याच आहेत आणि तो नाथदारींचा रांजणसुद्धा. रांजण म्हणजे
तांब्यालोखंडाचा नव्हे; तर भूमिगत होद. तिकडे त्यालाच रांजण म्हणायची
वहिवाट आहे. तिथल्या प्रत्येक जुन्या वाड्यांत पुढच्या बाजूला पाण्याच्या
ंठवणासार्ठी असे रांजण बांधलेले आहेत. नाथांच्या घरचा जरा अधिक खोल
आहे. कारण त्यांच्या घरी * येवा-जावा ? फार; त्यामुळे पाणी मुबळक
गायचे, तांडावर लांकडी फळ्या टाकून तो नेहमी बंद ठेवलेला असतो.
कोणीं पहायची इच्छा द्शीविळी तर फळ्या बाजूळा करतात आणि दोराला
गडू बांधून त्याचें पाणी काढतात.
जीणोद्वाराच्या वेळीं बाकीचे सगळे खांब निराळे घातळे असले तरी
गाभाऱ्यापुढचे दोन मात्र मूळचेच ठेवळेळे आहेत. त्यांना सांप्रदायिक मद्दत्त्व
आहे. देवासन्मुख उभे राहिल्यावर उजव्या हाताच्या खांबांत ' श्री खंड्या ! रूपी
भगवान् गुप्त झाला आहे आणि डावा खांब हद्दी नाथांची पुराणाळा बसण्याची
जागा, नाथांचे व्यासपीठ खांबाला टेकून असायचे. समोर भक्त-माविकांचा,
याळ्याभोळ्यांचा समाज कर्णीद्रेयांत पंचप्राण गोळा करून श्रवणाळा बसायचा.
नाथ त्यांना शुद्ध, स्नेह्ळ, रसभावफुलळीं बहरलेल्या वाणीने भागवतधर्म
विशद करून सांगायचे. त्यांना आत्मकल्याणाचा सुगम पंथ दाखवायचे.
“ माझे दृरीचे जनहो ! जन्मा आलियाचे फळ मिळवायर्चे आहे ना ! मग
भागवतधर्म आचरा. तोच एक सर्वसुळम तरणोपाय आहे. भवरोग दूर्
करण्यासाठी वनांत जायला नको. इंद्रिये कोंडायला नकोत. बायकापोरं
सोडायला नकोत. संसार सुखेनैव करा ; पण तो श्रीइरीचा म्हणून करा.
सकल इंद्रियांना हरिसवेची गोडी लावा. त्याचें प्रेम धरलळंत, सकळ कर्मे
त्याळा अर्पण केळींत, मनबुद्धींना तोच छंद ळावलात, कीं श्रीहरि तुमच्या
नाथांचे पेढण १२५
अंतरांत प्रगटेळ. मार्गे-पुर्ढ उमा राहून तुम्हांला सांमाळील, चक्राने तुमच्या
अभिमानाचा चंदा करील, गदेनें मोह-ममता छेदील. दोखाने निजबोध
जाग्रत करील आणि अशा रीतीनें तुम्ही भक्ति-ज्ञानांनी नि्वाळलांत की
आपल्या हातांतळं कमल तुमच्या मस्तकी ठेवून तो तुम्ह्ांढा पूर्जाळ. भागवत-
धर्माचें मुख्य सूत्र मी तुम्हांला सांगर्तो.
“ जु जे भेटे भूत । ते तं मानिजे भगवंत ”
सर्व प्राणिमात्रांत देव पद्वाणे आणि त्याच्या सेवेची आवडी धरणें हीच
खरी भक्ति. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. सर्वत्र जनींजनार्दन
भरून उरला आहे. त्याची प्रच्ीति घेतली पाहिजे, त्याच्याशीं अनन्य
झाले पाहिजे...... ”
जनता हाच जनार्दन आणि जनतेवा हीच र्भाक्त असं नाथांनी निःसंदिग्ध-
पणं प्रतिपादिले. नाथांची हवी नवी दृष्टि होती. नाथांनी गुरु आणि ईश्वर हे
एक केळे आणि जनतेच्या विराटू स्वरूपांत त्यांचा साक्षात्कार घेतला.
त्यांची भक्ति सेवावृत्तीने रंगठेली आहे. नाथ हे ज्ञानेधरीचे संशोधक तसेच
भाष्यकार, शानेश्वर ज॑ तृत्ररूपान सांगतात तेंच नाथ ' रसिकमुद्रे 'न॑ विशद
करतात. नाथांचा वाड्ययसंत्ार अफाट आहे. त्याला समुद्र म्हणायचे तर
। वीरसागर) हे नांव द्यावे लागेळ. कारण त्यांत दोषद्यायी भगवान् निद्रित
नव्हे; तर जाग्रत आहे. त्यांनीं महान् ग्रंथ स्वळे आणि ते कर्तृत्वाच्या
अभिमानासह जनार्दनचरणीं अर्पिळे. ते स्वतः निर्लेप, मोकळे. त्यांच्या
कोणत्याही ग्रंथांत अद्वेताची बैत्तका कुठेही सुटळेली नाद्दी. द्वैताची सावली-
सुद्धा त्यांना खपत नाद्दी. भागवताच्या टीकेला त्यांचे नांव एकाकार टीका ?
हें आहे. भावार्थ रामायणांत त्यांनीं राम द्वा पूर्ण त्रक्म आणि सीता हद्दी
चिच्छक्िति असें भावून सगळें अध्यात्म खेळविळं आहे. कृष्णरुक्मिणीरचे लय दं
जिवाश्िवांचं सामरस्य म्हणून ते वर्णितात. नाथांनी परमार्थ ग्रंथांतच ठेवला
नाह्दी तर तो जीवनांत आणून ओतला. ' अंत्यजतोक ? कडेवर घेऊन, भाद्वान
महारांना वाढून, निंदकांना “ आत्मारामाचे गडी ' समजूत, चोरांवरद्दी
प्रेमाची पांखर घालून, त्यांना अभेद आचरणांत दाखवला. त्यांची धर्मपट्नी
गिरिजा बाई हिने त्यांच्या संसारांत आणि परमा्थांतह्दी त्यांना अंगे-प्राणे पाथ
दिली, तिच्या जीवनाचा सोरभ नाथांच्या चरित्रांत तर्वत्र भरून राहिलेला
१२६ तीर्थरूप महाराष्र
आहि. भागवतधर्माच्या परंपरंत नाथ हिमाचलासारखे भव्योत्तुंग वाटतात
शानदेवांनीं रचलेल्या पायावर त्यांनीं विशाळ, सुंदर आणि कलाकुसरीचे
वाढ्ययमंदिर निर्मिले !
आज तीन-साडेतीनशें वर्षे पैठणची नाथषष्टी गाजते ती याचसाठी, नाथषष्टी
म्हणजे फाल्गुन वद्य षष्टी. पांच पर्वे या तिथीला एकत्र झालीं आहेत. .
जनार्दनस्वामी द्वे नाथांचे गुरू. त्यांच्या जन्माची आणि निर्याणाची तिथि
हीच. जनार्दनांना दत्ताचा आणि नाथांना जनार्दनाचा अनुग्रह झाला तोद्दी
याच तिथीळा. आणि पांचवें पर्व म्हणजे नाथांचे निर्याण,. दके १५२१ या
चर्षी नाथांनींही याच तिथीवर आपला देह विसजिला. षष्ठांचा हा उत्सव
नाथांनी गुरूची पुण्यतिथि म्हणून सुरू केला होता. तोच पुढे नाथांची
पुण्यतिथि म्हणून त्यांच्या वंशजांनी आणि वारकऱ्यांनी रूढ केला. गोदेचं
विस्तीर्ण वाळवंट पुरू नये अश्ली अलोट यात्रा दर वर्षी या तिथीला
इथे जमते.
या उत्सवाचा सांगोपांग कार्यक्रम श्री. नरद्दरिबुवांनी आम्हांला सांगितला.
वद्य द्वितीया ते अष्टमी एवढा उत्सवकाल अतततो. द्वितीयेला रांजण उघडा
करून त्याची पूजा होते. ' भ्रीखंड्या म्हृणून कोण्या तरी पाणक्याची पूजा
करतात. केशवस्वामीकृत नाथचरित्राचा पाठ चाळू द्वोतो. गोंदेच्या घागरी
आणून लोक रांजण भरूं लागतात. पंचमीला देवाची अक्षत निघते. पष्ठीच्या
दिवशी मध्यान्ही वाळवंटांतून दिंडी निघून मागच्या दाराने बादहदेरच्या नाथ-
मंदिरांत येते. मग निरूपण होते. ज्या अभंगावर नाथ स्वतः निरूपण करोत
तोच अभंग निरूपणाला घ्यायचा द्वे ठरळेळें आहे
“५ अवघेचि घेलोक्य आनंदचि आतां
चरणी जगन्नाथा चित्त ढेले
माये जगन्नाथ बाप जगक्षाय
अनाथाचा नाथ जनार्दन
फंका जनादूनीं एकपणे उभा
चैतन्याची शोभा शोभतसे ”
नाथांचे पेठण १२७
“४.४ १.४. १../%.” "२.५ "९.” ४.” ५.
१५४४५ ४. ५ ५.४ ४../४..५ ४.५ ४.” ४७५ ५.” ५.५ /१..7./ ५.४.” ९.५९...” ९.” ७.” ४-/-० ४७/४७/009०” क
नंतर वाड्यांत बाह्मणांची पाद्यपूजा होऊन लाह्यांचा कुटा आणि पीठ
यांचा महाप्रसाद ह्वोतो. सत्तमीच्या रात्री छबिना निघतो. अष्टमीस सूर्या-
स्ताला बाहेरच्या नाथांसमोर गोपाळकाला होतो. रात्रीं दिडी कृष्णकमला
तीर्थावर रह्मते आणि तिर्थे सेवेसाठी आलेल्या हरिदास-पुराणिकांची हजेरी
ठढांगते. आणि एवढें सगळें झाल्यावर उत्सव समाप्त होतो.
बाहेरचे नाथ
आम्ही संध्याकाळीं बाहेरच्या नाथाळा गेला. ते समाधिमंदिर गांवाच्या
कडेला वाळवंटाला ढागूनच आहे. वृक्षवेष्टित असल्यामुळें त्या बाजूला
पाहिळें तरी तिकडची ओढ लागते. मंदिर वेभवश्याळी नसू तरी प्रशस्त,
हवेशीर आहे. प्रदक्षिणेसाठी मोकळा मार्ग असून सर्मावती ओवऱ्या आहेत.
आंतली-बाहेरची स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. मंदिराच्या गर्भागारांत
मार्त नसून पादुका आहेत. “ एका-जनार्दन ' समरतंतेनें त्या पादुकांत
१२९८ तीर्थरूप महाराष्ट्र
४ /%/४% ८१% ” ४ /% “५९/४५/९४४७ “७ “0७ “ ७.४.” “% “..&४..१७. ४८-४४ ४ ४.५ ७. ४.” ४-”0%- ४१७ ७८-४४.” ७.” ४.7 १-१
अंतःप्रविष्ट आहेत. नाथांना स्तवनपूर्वक प्रणाम करायला माझी वाचा दुबळी
म्हणून मी हळूच मोरोपंतांच्या वार्णीत शिरला आणि ह्वात जोडले.
५ नमिला शमिलास्यप्रद् शांतिजलधि एकनाथ तो भावें
वोभावं ज्याचे यश विश्वी, ज्या देववंद लाभावे ”
माझ्या मार्गे-पुढे बरेच भक्तगण उभे होते. कपिला गाईचे धारोष्ण दूध
सुवर्णपात्रांतून पिण्याची इच्छा धरावी त्स स्वभावशुद्ध गोदाजल गुरु-
पादुकांच्या प्रक्षाळनांतून आपल्या शरीरावर शिंपडले जावें ही आस धरून ते
तिर्थे आले होते आणि येत राहिले होते. पुजारी सुस्नात होऊन समईच्या
प्रकाशांत त्या पादुका धूत द्वोता. त॑पायवणी कमंडलूंत धरून त्यानें
तिथूनच सर्व ल्री-पुरुषांच्या मस्तकावर सिंचिळें. त्यांतळे कांही तुषार
माझ्याही भाग्याला अलि. माझी काया एकदम मोहरून उठली. त्या क्षणा-
पुरतें तरी मन उन्मन झालें. नतमस्तक होऊन मी पुटपुटला,
“ आपः पादोवनेजनीर्द्िषन्तं निर्दहन्तु मे
: च्रणप्रक्षाळणाची हवी जळ माझ्या शत्रला निःशेष जाळोत.? ह्या शत्रु
कोण ! अहंकाराशिवाय दुसरा कोण असणार ! एकनाथमद्वाराजांनीं तर तोच
६ घुसळखांबा ? पहिल्या प्रथम उपटून टाकढा आहे. जोवर अइंकार तोंवर
माणते द्दी माणत्तंच दिसतील. त्यांचे गुण-दोष, विचार-विकार, सगळे प्रतीत
होतील. अद्दंकार सुटला की आपणांसकट सगळा ईश्वरच इश्वर! सगळाच
जनींजनारदैन ! !
९ “ धन्य देहू गांव-'
९ -7: 2२ “९ 22 २. > -:_.>_ »९_ २ >> >> २
श्रावणांतळी सकाळ आहि. पावसाने रिपरिप चाळवली आहे. दिशा
फांकण्याऐवरजी घेरून आल्या आहेत. अंधार उजळायच्या ऐवजीं अधिकच
काळवंडत आहि. ढगांनी डोक्यावर दाट मांडव घातला आहे. पुर्णे-मुंबई राज-
रस्त्यावर जागोजाग पाणी सांकळळं आहे. कडेने जाणाऱ्या लोकांच्या आधीच
गारठून गेलेल्या अंगांवर निर्दयपणे पाण्याचे फवारे उडवीत एस. टी. ची
गाडी घडघड चाळली आहे आणि यांच गाडीत बसून मी पुण्याहून वायव्येस
तीस मेलांवर असलेल्या देहूला जायला निघार्ला आई.
धरित्रीच्या कुशीतून नुकर्तेच वर डोक काढलेल्या सर्भावतींच्या शेतांतल्या
अंकुरांना पावसाची गरज होती ; तेव्हां त्याच्याबद्दह तक्रार करण्यांत अर्थ
नव्हता. माझ्यापुढे प्रश्न एवढाच होता की, हा पाऊस मोकळ्या अंगाने
मला देहुंत फिरू देईल कीं नाहीं £ पण मनांत आलें कीं, द्वा ' सकाळचा
पाहुणा आहे, तो बहुधा दुपारला रह्दायचा नाहीच. ' आणि झालंही तसेंच.
देहूरोड स्टेशनाजवळून आमच्या गाडीने उजवे वळण घेतळें आणि पूर्वेला
वावभर उंचीवर सवितानारायण ढगांच्या चक्रव्यूह्वांतून बाहेर पडत म्हणाला,
: अयमहमस्मि ! ?
ताबडतोब आसपासच्या ढगांच्या कडा रुपेरी झाल्या. अक्षरशः सोन्या-
सारखे किरण द्िरव्या धरित्रीवर पघळळे. देहूच्या रत्यावरची डाव्या-उजव्या
अंगांना असलेली लष्करी अधिकाऱ्यांची घरं उजळून निघाली, त्यांच्या
बार्गतलीं विलायती फुलं नाचून, डोलून आनंद व्यक्तवू लागळीं. क्षितिजा-
कडच्या गिरिशिखरांवर नेटाने चढणाऱ्या भुरक्या ओळपर ढगांत किरणांची
सुव्णछटा अशी कांही बेमालूम मिसळली कीं, जणुं एखाद्या सिद्ध योग्याची
किमयाच ! मीं म्हटलें, ज्ञानेधवरांचा ' सोनियाचा दिवस आपल्याला कधी
काळीं तरी ळाभेळ कीं नाह्वी देव जाणे ! पण हा अवचित जोडलेला सोन्याचा
क्षण तरी इर्षोत्फुळ मनाने भोगून ध्यावा.
ती. म....२-९
-- ><५-८-८/५८-५४८४१"७- “४४0११४१ 0 “४४१ ४0४४0५ 000 0 ४८
१३० तीथरूप महाराष्ट्
आज देहूचा परिसर हा एक लष्करी केंद्र बनला आहे. रणसाहित्याचें
आगर झाला आहे. तारांच्या वेटोळ्यांची दाट, दुर्गम कुंपणे, ठायी ठायी
चौक्या-पहारे, उंच उंच माचे, बंगळे, डेरे, राहुट्या, ध्वजस्तंभ, रानोमाळ
पडलेल्या अगाणित गाड्या, असंख्य खोकी असा सगळा अवाढव्य पसारा.
तीनशं वषोपूर्वी तुकोबा ' आवडीने भावे हरिनाम? घेत ज्या भूमीवरून
संचार करीत होते त्या भूमीचे आजचें स्वरूप हें अत गंभीर आणि बंदिस्त
आहे. तुकोबाही युद्धाला अपरिचत नव्हते.
क: चेंदिन आम्ह वद द्धाचा प्रसंग
अंतबाह्य जग मन
अस ते स्वमुखानें सांगतात. पण त्यांचे युद्धतंकेत वेगळे होते. पद्धति
भिन्न होती. परिणामही निराळा होता. आंतळें जग म्हणजे कामक्रोधादि शत्रू
नि संकल्प-विकल्पात्मक मन आणि बाहेरचे जग म्हृणजे त्यांच्या परमार्थ-
मागोत कांटे पसरणारी, निंदा-स्तुतीचे घाव घालणारी माणसें. या दोघांच्या
विरुद्ध त्यांना शस्त्रावांचून नि उघड्या अंगाने लढायचे होत. ते लढले;
रात्रेदिवस लढले. या युद्धांत त्यांना विजय मिळाला आणि ते अद्वेताच्या
सिंद्वासनावर पट्टाभिषिक्त झाले.
पुढचा रस्ता चिखलाचा असल्यामुळें आमची गाडी देहू गांवापासून अधो
मेळ मार्गे माळवाडी येथे उभी राहिली. विषयपंक अंगावर उडू न देतां
तुकोबा जशी परमार्थाची वाट चालले, तसाच मीही तो चिखल चुकवीत-
चुकवीत गांवाच्या शिवेवर आलो. तिर्थ एक ग्रहस्थ मेटले, त्यांनी सांगितलें,
: ग्रांवांतून देवळाकडे जाणारा रस्ता निसरडा आहे. तुम्ही डाव्या हद्वातानें
इंद्रायणीच्या तीराने वर या. मी त्यांची सूचना स्वीकारून निघाला तो
पहिळी भेट झाळी ती मंबाजीबुवाची, नदीकांठींच इनामदारांच्या वाड्याच्या
पिछाडीस त्याची बखळ आहे. मीं म्हटले, ' चला ; दुर्जनं प्रथम वन्दे! !
आज जिथे शंकराचे लहानसे मंदिर आणि सर्भावतीं शोत आहे तिथंच
त्या काळी मंब्राजीरने आपली मठी उभारली होती आणि देवतार्चन थाटले
होतें. जो येईल त्याला उपदेश द्यायला तो ' टिळाटोपी, माळा ? घाळून तयार
असे. तो जणुं सावज पकडायला सांपळा मांडून बसला होता. पण लोक
' धन्य देह गांव- १३१
देहूला येत ते मंबाजीच्या पार्या पडायला नव्हे; तर तुकोबांच्या दशनाळा
आणि त्यांचेच निवविते चार शब्द ऐकायला. त्यांना आस असे ती तुकोबांच्या
कृपाप्रतादाची. आपले बद्द नाणें देहूच्या बाजारांत चाळत नाहीं इं पाहून
मंबाली चडफडे, कावे आणि हात चोळी. तुकोबा असल्या िंडपोषक
दांमिकांची कोर्तनांत यथेच्छ खरवड काढीत, ती त्याला जळत, तापत
ऐकावी लागे.
“ तुका म्हणे ऐेसे मावेचे माविद
त्यांपाशी गोविद नाहीं नाहीं ”
म्हणून ते जनांना सावधानतेचा इषारा देत. ते कोणाचे नांव घेत नसत;
पण ती टोपी नेमकी मंबाजीच्या डोक्याला बसे. ज्यांना सत्याचा आणि
न्यायाचा आधार नाह त्यांनी शेवर्टी क्रोधाचा आसरा घ्यायचा हे ठरलेलेच.
अशाच रागाच्या भरांत त्याने एक दिवस तुकोबांच्या अंगावर हात टाकला
आणि त्यांना यथेच्छ झोडपले. तुकोबांच्या अंगावर वळ उठले खरे; पण
आंतली तितिक्षा तावून-सुलाखून निघाली, ' बरवे संचित होतं तेस जालें
२े! म्हणून ते अनाक्रोश राहिले.
इंद्रायणीला त्या दिवशी पूर नव्हता ; पण पाणी मात्र गढूळ होतं. तिला
तारुण्य आलें होते, पण मुसमूस नव्हती. ती तुकोबांचा कसला तरी सांगावा
घेऊन लगबगीने आळंदीकडे निघाली होती. लहानशीच नदी आणि तिच्या-
वर लहानसाच घाट. त्यावरची न्हाती-घु्ती माणसेही परिमितच. मी खाली
उतरून तिच्या जलाचं मा्जंन केळे आणि घाटाला लागूनच असलेल्या विडठळ-
मंदिराच्या महाद्वारांत दाखळ झाला. देहूळा आपण जातों तें तुकोबांचे दर्शन
व्यायला ; पण आपणांस तिथे दर्शन होतें त पांडुरंगाचे.
' भेद नाहीं सवात्मना । नारायणा तुज मज?
' तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योते '
हवी पारमार्थिक धारणा ठीक असली तरी व्यावहारिक दृष्टीने सागायचे
झाल्यास देहूंत तुकोबांचे मंदिर नाही. सदेह वैकुंठगमन केल्यामुळें कुठें
समाधीचा चिराही नाहीं. पण भाविकांना या गोष्टीचे शल्य बोचत नाही.
१३२९ तीथरूप महाराष्ट
त्यांचा विरस हात नाही. ते विड़ळाच्या आकारांतच तुकोबांना पहातात. ही
छशिकवण त्यांना संतांच्या भागवतधर्माने दिली आहे आणि ती त्यांच्या दार्डी-
मारी भिनढी आहे.
आ ब््स् व्यस्त व्वम्स््
तकी 0 त्स ््स्नस्े
तुकोबांच्या पूवजांचें विठ्ल-मंदिर
देवळाच्या प्राकारांत गेल्यावर समोरच गरुड-हनुमंत आहेत. तिर्थच दोन
दीपमाळा आहित. त्यापुढें मंदिरापासून किंचित् विलग, पण दुरून मंदिराचाच
भाग वाटणारा गरुडमंडप आहे. तिथे अषश्ेप्रहर वीणा उभा असतो. पुढे
मंदिराचा सभामंडप आणि त्यापुढे गाभारा आहे. तिथे विडठळ-रखुमाई जोडीने
उर्भी आहेत. देवळांत आणि प्राकारांत फरसबंदी आहे. सर्भावती ओवऱ्या
अद्देत. ह प्राकारबांधणीचं काम महाळुंगे येथील इंगळे पाटील आणि कल्याण
शिवाजी या दोघां तुकारामभक्तांनी केळं आहे. त्याच्या शोजारींच एक राम-
मंदिरह्दी आहे. या स्थळासंबंधी तुकोबांनाःच केढेला एक अभंग दिला कीं त्यांत
सगळा तपशील आला असे समजावे,
“ न्य देहू गांव पुण्यभूमि ठाव
तेथे नांदे देव पांडुरंग
धन्य क्षेत्वासी लोक ते देवाचे
उच्चारिती वाचे नामघोष
करकर्डा उभा विश्वाचा जनिता
वामांगी ते माता रखुमांदेवी
गरुड पारी उभा जोडोनेियां कर
अश्वत्य समोर उत्तरापुख
१
: चन्य देह गांव- ' १३३
दक्षिणे &ांकर लिंग हरेश्वर
शोभे गंगातीर इंद्रायणी
लक्ष्मीनारायण बलाळाचे बन
तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर
विपघ्वराज दारीं बाहिरव बाहेरी
हनुमंत शेजारी सहित दोघे
तेथे दास तुका करितो कीर्तन
हृदयीं चरण विठोबाचे ”
तुकोबांचे आठवे पूर्वज विश्वभरबावा यांनी द मंदिर प्रथम बांधलें. यांचें
आडनांव आंबिळे आणि कुळी मोरे असल्याचें नाशिक येथील क्षेत्रोपाथ्यांच्या
बाडांत नमूद आहे. तुकोबांच्या घराण्याकडे देहू येथील महाजनकीचे अधिकार
होते. घाजारेपेठेंत मद्दाजनकीचा वाडा होता आणि देवाच्या पूजेअचेसाठीं
पुरातन इनाम चालत होते. तुकोबांनी उदासीन वृत्तीमुळे या महाजनकीची
उपेक्षा केली; पण त्यांचे धाकटे चिरंजीव नारायणबोवा यांनीं शके १६००
मर्ध्ये शिवाजीमद्वाराजांना सदर वात्त आपल्या घराण्याकडे यथापूर्व चालू
ठेवावी म्हणून अर्ज केला आणि त्यावर छत्रपतींनी पुर्ण परगण्याच्या देशा-
धिकाऱ्यास पुढीलप्रमाणे आज्ञा दिली --' यांची महाजनकी मिरासी पहिले-
पासून चाळत आली आहे तेणेप्रमाण चालविणे ?
विश्वंभरबावा -- इरिबावा --विठोबा पदाजी -- शंकरबावा -- कान्हया
बोल्होबावा --आणि तुकाराम अशी त्यांची वंशवेल आहे. विश्वंभरबावा हे
विठ्ठलाचे भक्त आणि वारकरी. त्यांच्या प्रेमाला भुळून पंढरी नाथ देहूंत आळ.
६ तूं मजकडे येणे थांबव. मीच तुझ्या घरी येठॉ. जवळच्या आंबेवनांत
गेलास की तिथे तुला आम्हां दोघांच्या पाषाणमू्ती सांपडतील. त्या तूं घरांत
आणून पूजेळा लाव. ? या दृष्टान्ताप्रमाणें विश्वंभरबावांना मूर्ती गवसल्या.
द्वारकेचे केणे आपल्या बंदराला लागलं असे त्यांना वाटलें. त्यांनीं त्यांची
रीतसर प्रतिष्ठा करून पुढे मंदिरद्दी उभारलं. ' माझ्या वडिलांची मिरासी
म्हणून पुढे तुकोबांनी या देवाचे पाय हढ धरले.
ज्यांनी तुकोबांच्या अभंगांचे मनन केळं नाही ते त्यांना एक' साबडा भाबडा
प्राणी ' अर्से समजतात. चित्रकार त्यांची बावळट मुद्रेची चित्रे रेखाटून
१३४ तांथरूप महाराष्ट
>“ ४-/४५४५/ ४५४४७५५ ५९१४५ ४४
वास्तवदर्शी कला दाखवल्याचें समाधान मानतात. पण लोकांर्चा ह्वी समजूत
बिनबुडाची आहे. ' एथ चातुर्य शहाणे जाइल ? अद्या अधिकाराचे तुकोबा
होते. ते आपल वाणसवद्याचे दुकान उत्तम चालवीत. त्यांना जमाखचांची
चोख माहिती होती. अनेक व्यापारी पेठांशा त्यांचा संबंध होता. त्या
पेठांतून चाळू असलेल्या गुजराती, हिंदी या भाषांचादही त्यांनी कामचलाऊ
परिचय करून घेतला होता. तत्कालीन हिंदीतून त्यांनी पद्यरस्चनाहवि केली
आहे हे लक्षांत ठेवायला इवें. मुख्प धंद्यार्शी तंबद्ध अत्ते अनेक गोण धंदे ते
न्वालळवीत होते. त्या वेळीं निराळ्या अर्थानें ' पांडुरंग ! हा त्यांचा देव
ह्वोता. ते आपल्या व्यवसायांत बाराचे सोळा करण्यांत इतके गढून गेले होते
की, सबंघ दिवत्तांत एका क्षणाचीद्दी त्यांना उसंत मिळत नसे.
४५८ ४५८ ४ “८-४. ४-० ७-४ चट २४-४० ४-८ ४ 5८ क *-7 “४ “५-० ४-५ ५” १-0 १-€* - 7 आश स्टेट 0 पी
बाराव्या वर्षी त्यांच्या मस्तकावर पहिल्या मंगलाक्षता पडल्या.
बोल्होबावांना सून मिळाली, पण थोड्याच दिवसांत त्यांना कळून आलें
की, घराळा आणलेली पोरगी दमेकरीण आहे. ही मोठी होणार आणि आपल्या
तुक्याला सुख देणार हे मिथ्या, अर्से समजून त्यांनीं तुकोबांना पुन्हां
मंडावळ्या बांधायला लावल्या आणि पुण्याच्या अप्पाजी गुळव्यांची मुलगी
जिजाई द्दी पह्िळीवर दुसरी आणली. तुकोबा भोळसट असते तर त्यांच्या
गळ्यांत बांधायला त्या वधूपित्यांच्या मुली कांद्दी वर आल्या नव्हत्या.
देशावरून काकणांत मीठ विकायळा नेणें आणि कोंकणांतून मिरच्या
घाटावर चढवणे असला आचरटपणा त्यांच्यावर लादू पदह्वाणाऱ्या शह्वाण्यांना
तुकोबा स्पष्ट सांगतात की, ' मी व्यवद्वारांत पक्का होतो. अट्टळ ठकाचीसुद्धा
माझ्यापुढे हिकमत चालली नाही. आपल्या काळजाचा ठाव दुसऱ्याला लागूं
न देणं ही कला तर मला स्वभावसिद्ध होती. ' असा टुमटुमीत चाललेला
त्यांचा संसार कोसळळा तो त्यांच्या नाढायकीमुळें नव्हे; तर नियताीर्न
फांसा उलटा टाकल्यामुळे !
त्यांच्यावर एकामागून एक आपत्ती धावत येऊन आदळल्या. प्रथम
शिरावरचें आईबापांचें छत्र उडाले. बाळगोळीचा हा पहिला वळता त्यांना
चांगळाच झोंबळा. पुढे आलें अवर्षण आणि त्यांतून दुष्काळ, प्रथम द्रव्य
गेळे, नंतर मान गेळा आणि पुढ जगण्या पुरते अन्न मिळण्यार्चासुद्धा श्रांत
“ घन्य देहू गांब-? १३५
पडली. एक मुलगा खपला. पहिळी बायको अन्नाक्ञ करीत मेली. धंद्याचे
दिवाळें वाजले. सर्व बाजूंनीं पातेरा उडाला. जिजाईने कर्कशेचा वसा घेतला.
काठेण, विषम काळीं तिने तुकोबांच्या मनाची जपणूक केली नाही. त्यांच्या
आहाळलेल्या हृदयावर सद्ानुमवाची फुंकर घातली नाहीं. बाहेर
अपमान ; घरांत अप्रतिष्ठा अशी दुधारी सुरी लागून तुकोबा घायाळ झाले.
ते अनुतापानें कदूं लागले. त्यांना एकंदर प्रपंचाचाच वीट आला. त्यांचें मन-
पाखरू फडफड कर्रांत अधांतरी गिरगिरू ढागळे. संसाराची डद्दाळी मोडली ;
आतां बसायला जागा कोणती १
ऑकळयाकळककीळ $$ ७० &७ 80 /" ८” ४» “2 >
आणि याच वेळीं त्यांना निर्वाणीचा पांडुरंग आठवला. त्यांनीं त्याच्या
पार्यी मिठी धातली. त्यांना वाटले की, हाच आतां आपली तड ढावील. त्या
वेळीं ते देऊळ मोडकळीस आलें होते. विठ़लाकडे मन रुंतवण्यार्चे साघन
म्हणून त्यांनीं त्याचा स्वहस्ते जीणोद्वार करायचे ठरवले. आत्ततुहृदांना
त्यांचा हा उद्योग म्हणजे “ अव्यापारेषु व्यापार? वाटळा. पण त्यांनीं कोणा-
कडे लक्ष न देतां आपल्या घरच्या पांडुरंगाचा आसरा नीट केला. देवळांत
भजन चाले, त्यांत ते हळूहळू रस घेऊं लागले. त्यांनीं एकादशीचे उपोषण
घरले. ज्ञानेश्वरी-मागवतांतळे बरेच वेंचे कंठस्थ केले. त्यांची श्रद्धा इळूइळू
जीव धरू लागली. कुठेच कांडी नाहीं अते झाले होतें ते॑निजाचें विश्रांत-
स्थान मिळाल्याचा त्यांना प्रत्यय येऊं लागला. तंतांच्या कीर्तनांत ते
आवडीने ध्रुपद धरूं लागळे. वाढत्या मनोल्ह्यासानें त्यांनी संतसेवा आरंभली.
लोकांनीं याही बाबतींत नाके मुरडली. पण--
“ सत्य असत्यासी मन केले ग्वाही
मानियेले नाहीं बहुमता ”
या निर्णयावर येऊन त्यांनीं ढोकलाज ळढाथाडढळी आणि सर्वभावे देव
आपलासा केला. भक्तिसुखाची गोडी त्यांना अप्रूक वाटली. प्रपंचांत जे कर्धीच
भेटलें नव्हतं ते त्यांना परमार्थात गवसले, आपल्याप्रमार्णेंच आपल्या पत्नीनेह्ी
सुखी व्हावे अशी त्यांची इच्छा. ' तंताराचें हँ क्षुद्र सुख थुंकून टाक, आपला
गळा उगवून घे ! म्हणून ते तिला सारखं उपदेशीत. पण तुकोबांचा जसा
संसारावरचा विश्वास उडाला होता तसा तिचा परमार्थावस्चा. आपला नवरा
१३६ तीथरूप महाराष्ट
देवळसी झाळा, आपली आणि पोरांची कद्र करीनासा झाला हे पाहून ती
अगदी कावून गेली होती आणि तिच्या हातचा एकमेव उपाय म्हणून
तुकोबांवर दवे तसें तोंडसुख घेत द्दोती--
६ कोण मेला दावेदार होता तो या जल्मी वैर साधायला नवरा होऊन
आला आहे. किती आपदा काढायच्या मीं संसारांत ! काय घालूं या पोरांच्या
पानांत ? हई सगळी मरती तरी बर होतं. हा तर डोचके तिंबतो, माळा
घाळतो आणि देवळांत टाळ कुटीत बसतो. याच्याबरोबरीला आणखी काहीं
वेडे जमळे आहेत. सगळे मेळे लाजा कोळून प्याले आहेत. यांच्या * रांडा ?
घरांत तळमळतात त्यांची दखलगिरी आहे का यांना! या विठ्यानं माझ्या
संसाराचं वाह्टोळं केलं...... क
पुढें पुढे तुकोबांना एकांताचा नाद लागला. त्यांचीं एकांतस्थळे म्हणजे
गोराडा, भंडारा आणि भामनाथ द्दे डोंगर, देवळाच्या मार्ग पश्चिमाभिमुख उभं
राहिलें कीं डाव्या हाताळा देहूरोड स्टेशनच्या बाजूस सहा मेळांवर गोराडा
दिसतो. थेट पश्चिमेस दोन मेलांवर भंडारा आहे. त्याच्या शिखरावरचें विठठल-
मंदिर देहुंतून अस्पष्टत दिसते. उजव्या बाजूला डोहाच्या पलीकडे आठ
भेलांवर भामनाथ आहे.
तुकोबा लहर लागली कीं कर्धी या तर कधीं त्या डोंगरावर जाऊन बसत.
वृक्षांचा डोळ, वछरराचं लीलानृत्य, पाखरांची किर्लाबलळ, वर आकाशाचा
मंडप, खालीं पएथ्वीरचे सिंद्यासन या सर्वात त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार घडे.
तुकोबांचा हा अनुभव दुहेरी होता. वृक्षवली आणि वनचरे यांत ते विठठल
पहात आणि विठ्ठलाच्या व्यापकपणांत हीं सर्व भूतें अवलोकीत, तिथं त्यांचा
मनाशी संवाद होत असे. शास्त्रांचे सार आणि वेदांची मूर्त असा
पांडुरंग जिवाचा सखा होऊन तिथें त्यांना सोबत करी. सरुण-निर्गुण हीं
ज्याची अंगे तो विठ्ठल तिथें त्यांच्याशी क्रीडा मांडी. ते त्या निवांतपणांत
तहान-भूक विसरत असले तरी जिजाईला त्यांच्या भुकेचा क्धीद्दी वित्तर पडत
नसे. घर्री केलेला भाकरतुकडा फडक्यांत बांधून ती धर्मपत्नी त्यांना शोर्धात
डोंगर उरापोटावर घेई आणि त्यांच्या मुखीं ग्रास गेल्यानंतरच स्वतःचे पोट
पुजी. ती विठोबाला शिव्या देई; पण त्याळा त्या ओव्या वाटत. देहमान
धन्य देह गांव- १३७
कन केर अलल पह. १ नल क. हणन: गोकाक “५ 4४ »५-- "२... ९.८४ ८४ ५.५४...” ०2२ ॥/४-“५//५८/६./*८/%- ५” “१-४१- ५0
विसरलेल्या आपल्या भक्तराजाची काळजी घेणाऱ्या जिजाईचें देवाला मोठेच
कोतुक वाटत होते.
अशा रीतीनें एकांत तुकोबांच्या जिव्हारी जडला होता. तिथल्या अखंड
चिंतनानेंच त्यांच्या अभंगवाणीला ओज चढले. ते डोंगरावर आत्मानात्म -
विचार करीत आणि रात्री “ मथियेर्ळ सार नवनीत ? अभंगरूपार्ने श्रोत्यांच्या
मनींमुखीं घालीत. ते अभंग देवाला गोड घासासारखे वाटत. पूर्वी नामयाच्या
अभंगांनीं वेडापिसा झालेला देव आतां तुकोबांच्या अभंगांनी रिझे, रजे.
“ श्रोनामदेबव तुकया, तद्भंग प्रभास गोड घांस तसे
गाहंवरतसे परिसतां नाचतसे पांडुरंग हांसतसे ”
अश्शी मोरोपंत देवाची अवस्था वर्णितात.
नारदाप्रमार्णेच तुकोबांनींहि अखंड कीतनभक्ति गाजविली. कोतंन हा
त्यांचा नित्य नेम ह्वोता. श्रोते येवोत, न येवोत, यांचे आपले कीर्तन
व्ह्वायचेंच. त्या कीर्तनांत जनांना ' मेघवृष्टीने ' उपदेश चालायचा. जिजाईला,
गांवच्या पाटलाला, रामेश्वरमटटाालळा आणि मंबा्जीबुवालासुद्धा त्यांनीं एकाच
हरिनामाचा मंत्र सांगितला, नामरंगासाठीं “ या रे या रे हह्वान थोर म्हणून
सर्वांना हांकारळें. जिथं कथा करतील तिथं देव, भक्त आण नाम असा
त्रिवेणीसंगम उमा केला. कीतंनांत त्यांनी सवोना त्रह्मरसार्चे भोजन वाढलं
आणि आपल्याबरोबरच श्रोल्यांनादहदी ' देही विदेहृदशा ' अनुभवायला लावली.
“५ उघडी समाधि हरिकथा सोहळा
नरनारी बाळा लहानथोरा
तुकोबांची अभंगवाणी ही इंश्वरी प्रेरणा होती. पाडुरंगासद्द नामदेवाने
स्वप्नांत भेट देऊन त्यांना अभंगरचनेचा आदेळ दिला होता. नामदेवाला
आपला ' शतकोटि ' अभंगांचा अपुरा राहिलेला संकल्प तुकयाच्या द्वार
समासीला न्यायचा होता आणि देवाला त्या अभंगांचे अलंकार मिरवाय'चे
होते. अभंगाच्या शेवटी ' तुका ? हदी अक्षरं लाव, हीही त्यांचीच शिफारस.
तुकोबा त्या आदेशाला जागळे आणि मग त्यांच्या स्वेरकथाही अभंगरूप घेऊं
लागल्या. याच अभंगांच्या द्वारे तुकोबांनी परमार्थ गांवोगांव, घरोघर
१३८ तीर्थरूप महाराष्ट
आ“ >> नही “>>><><“>> शी 4444: “/-.-““““-
झोपडीझांपडींत पोंचविला. प्रत्येकाच्या जिमेवर ' तुका म्हणे ! ही अक्षरे नाचू
लागलीं. अभंगावांचून कोतन म्हृणजे सूयावांचूम दिवस असें झा. पण
ज्या कारणामुळें तुकोबा हवे भागवतधमाचे कळत ठरले त्याच कारणानें ते
वौदिक-पंडितांच्या हृदयांत शल्य झाले.
“ वेदांचा तो अर्थ आम्हासीच ढावा
इतरांनी बहाबा भार माथां ”
हे तुकोबांचे निधडे बोळ त्या वेदिक कर्मकांड्यांना कसे रुचावे ! तुका
वाणी श्रृतिस्मृतिप्रातिपादित गुरुगम्य अर्थ मराठींत आणतो आणि चवाठ्यावर
मांडतो हं त्यांच्या दृष्टीनं अन्रह्मण्यम् होते, सनातनधर्माळा सपशेल विरुद्ध
होतें. आणि ह्या अत्याचार शकय तितक्या लवकर थांबायलाच हवा होता.
मंबाजीवुवानें अशा लोकांचं धुरीणतल्व स्वीकारले. गांवचा पाटीलही अनुकूल
करून घेतला. दिवाणींत गाऱ्हाणे गेळं आणि शेवटीं तुकोबांना हुकूम मिळाला
तो हा, कीं ' अभंगांच्या वह्या इंद्रायणीत बुडव !
तुकोबा आलिया भोगासी सादर झाले. त्यांनीं चांगल्या वेष्टनांत बांधून
ठेवलेल्या त्या वह्या, तो ज्ञान-भक्तीचा अमोल परिपाक, तो मराठींत अवतर-
लेल्या देवी प्रतिभेचा कुवासा, तो त्यांचा ज्ञानमप प्राण, तो शब्दरूप विठ्ठल,
त्यांनीं स्वहस्ते इंद्रायणीच्या डोहांत वुडविळा. तो दारुण शिक्षाप्रसतंग पाहून
कोणी रडळे तर कोणी इंसले ! तुकोबांच्या अंतराची मात्र तळमळ सुरू झाली.
त्यांना कसंच आणि कुठेंच चेन पडेना. विचार करून करून मस्तक फुटायची
वेळ आली. ते म्हृणाळे, ' काय मिळवलं मीं जीवनांत ? काय उरलं आतां
माझ्या हातांत ? ' देव ना संसार | तुका दोहीकडे चोर!”
आणि मग त्यांनीं देवाचें ब्रीद पहायचे ठरवले. एका शिळेवर आसन
घालून त्यांनीं प्रायोपवेशन मांडलं. इतिद्दांसांतला पहिला सत्याग्रही पंचप्राण
इरेला घाळून बसला, एक देव तरी भेटो, नाही तर ह्वा भारभूत जीव तरी
जावो, असा त्यांनी निर्धार केला. उगवता सूर्य ज्या जागी त्यांना पाही,
त्याच जागीं मावळता सूर्यही. रात्री नक्षत्रे त्यांच्या अनशनत्रतार्ची साक्षी
होत. एक दिवस गेला, आश्वासन नाही. दोन दिवस उलटले, कुठूनही
कृपेची शीतळ झुळूक नाही. तीन...चार...पांच...असे तेरा दिवस संपळे ;
पण कुठेंच- कशाला पत्ता नाही. अखेरत्यांनी विठुरायाच्या नांबे टाहो फोडळा.
: घन्य देह गांव- १३९.
कला 2१०५४” १ “आक्शाध्श > टश
- “<< /“4€५//// £<"/-<-“£-“€4 /-<५४५*/-<५/-/६८€/// » ५५५५५ »> >
“ तेरा दिवस झाले निश्चक्र कारेता
न पवसी अनंता मायबापा
पाषाणाची खोळ घेऊन बेसलासी
काय हृषीकेशी झाले तुज
तुजवरी आतां प्राण मी त्यजीन
हत्या मी घालीन पांडुरंगा
फार विठाबाई धरिली तुझी आस
करीन जोवा नागा पांडुरंगा
तुका म्हणे आतां मांडिले निर्वाण
प्राण हा सांडीन चंद्रभागे ”
आणि दयावंत देवाने मायबापांवर ताण केली. पांडुरंग बालवेषानं
तुकोबांच्या पुढ घवघवीत उभा राहिला. त्यानें तुकोबांना सवोर्गी निववले.
जळांतल्या लाह्यांप्रमा्णे पाण्याचा बुंद न लागतां अभंगवह्या डोहावर तरेगू
लागल्या. भक्त ह्षीनि्भर झाळे. निंदक-छळकांच्या मुद्रा उतरल्या. तुकोबांचे
सत्त्व भगवंतानं राखले. त्यांची वाणी झुद्ध, सोज्ज्वळ ठरली.
देहूंत पांडुरंगाच्या मंदिराला ढागूनच तुकोबाची पहिली भार्या रुक्मिणी
हिचे वृंदावन आहे आणि ज्या शिळेवर तुकोबांनी तेरा दिवस * निश्चक्र '
केळे ती शिळा आजमितीत त्या वृंदावनाला टेकवून ठेवलेली आहे. तिथेच
रुक्मिणीची पाषाणमू्त भिंतीला टेकून उभी केळेळी असून जिजाबाईची
तसलीच मूर्त तुकोबांच्या जन्मस्थळाजवळ आहे. आणि हे जन्मस्था नहि पूर्व-
ह्वारांतून बाहेर आल्यावर उजव्या हाताला इनामदारांच्या वाड्याला लागूनच
पढीकडे आहे. शके १५३० या वर्षी ज्या जागी तुकोबांचे ळलाट धरणीला
ठढागळे तिथें विडठळरखुमाईच्या मूती स्थापिलेल्या आहेत. महापुरुषांच्या जन्मा-
भोवती एक काल्पनिक तेजोवळ्य आपोआप निर्माण होत असतें तर्से तं
तुकोबांच्या भोंवर्तीद्दी झाळे आहें. एक लोककवि त्याबद्दळ आपल्याला सांगतो.
५ र््वाकण-चोऱ्या यशी परगण्यांत देहू गांवी तुकोबा जल्मले तेव्हां स्वगीत
धंटा वाजल्या. बाराव्या दिवशी विठोबा साक्षात् देहूला आला आणि त्याने
तुकोषाची ' नांवरसी ? सांगितली. देवाचा शब्द ऐकून तुकोबा याजेवर
१४० तीथंरूप महाराष्ट
इंसला. सगळ्या आयाबायांना ' विपरीत झालं. योगी पुढूष जलमल्याची
खूण पटली. ”
हाच वामनकवि पुढें सांगतो की, तुकोबांच्या पितरांचा पक्ष वाढायचा
द्दोंता तर विठोबा-रखवमाई, तुकोबा-जिजाईची रूपं नटून देहूस आले.
रखुमाईनें षड्रस पक्कान्न रांघलीं, विठोबा देहूकर मंडळींना बोलवायला गेले;
पण ' तुक्या दरिद्री ; तो काय जेबूं घालणार ! ' म्हणून सवानी आवंतण्याची
उपेक्षा केली. देव म्हृणाळा, ' ठीक आहे. तुम्ही नाहीं तर तुमचे पितर
येतील. ? भग देवार्ने काय केळें--
५ दारवटे उघडुन स्वर्गलोकाला गेला
त्यांचे वडिल आणले जेवायाला
भोजन वाढितात पंगतिला
पाढीं आर्यास्छोकांचा गजर झाला
जेऊं घातलं वडलांला पोचवले ढिकाण्याला
भक्ताची लाज राखुन देव पंढरीला गेला
99
महाद्वारांतून बाहेर आल्यावर समोर तुकोबांच्या वंशजांच्या कांही समाध्या
एका'च ठिकाणीं दिसतात. त्यांतली सवोत मोठी तुकोबांचे धाकटे चिरंजीव
नारायणबावा यांची आहे. नारायणबावा हे ज्ञानेश्वरांचे अवतार आणि
त्यांनीही जिवंत समाधि घेतळी अशी एक आख्यायिका देहुंतच मला
ऐेकायळा मिळाली, तिथून सरळ इंद्रायणीच्या कांठाने उत्तरेला निघाळे की
कांही पावलांवर इंद्रायणींचा तो मेळ दीड मेळ लांबीचा डोह सुरू होतो.
तिर्थेही एक लद्दानसा घाट आहे. त्यावर उर्भे राहून चार शेंगा डोह्दांत
कंकल्या कीं भल्या मोठ्या माश्यांची झुंड एष्ठभागावर येऊन त्या आमिषावर
तुटून पडते. हे मासे म्हणजे स्वर्गातळे तेहतीस कोटी देव असें समजतात.
५ कालियाच्या आशे । देव जळी झाळे मासे॥ ' अज्ञी वारकऱ्यांची घारणा
आहे. देहूकर म्हणतात कीं, पावसाळ्यांत तें आळंदीला जातात आणि
भाद्रपद संपल्यावर परत उलटे स्वस्थानी येतात.
तिथून आणखी जरा पुढे गेळ॑ की गोपाळपूर लागतं. नांदरुखीच्या
झाडांनी तें सुंदर आणि छायामय झालं आहे. त्यांतल्याच एका झाडाखाली
' धन्य देह गांव- ' १४१
४५४७ ८५ “५८-४०” - “५ >>“ >>> > -“**<<-“-५/८८<4>/८/* /<“-“«>*<“£:<£><*>“«८/»६८/५८*-८».५८०.”०८./. ५:-८-/-/-“-/..“.“-/>/><>/> “>>> “<>/>“>“/>“>“>.“>“ .“€>/0./2/ॅ209/ टीच्या
लहानशा देवळींत तुकोबांची वीणाधारी पाषाणमूर्त आहे. शके १५७१
फाल्गुन वध द्वितीया या दिवशी तुकोबांचे इथच अखेरचे कीर्तन झाळें आणि
० काची : द
* नाला ही ॥॥ १४
५). 101000 1000010011
| की ॥। ।
”' १
भे । ढ
112441 ६1)। की 2. न्क््य यी टे प ';
जर्वण| क ॥
४ मो 1३३. पक ी धु 0):
00% च्या ५, क |
600॥किळत . | हन्कुकर 2, | र ट , त
ह” 4 | शि / 1 रह १ व शी | 1. कि
क) |!। (8 >> | | न 12.) | अ .-
र मळ /| 7 -.::४6--..........) धि
पट 7 शं ल्य “
तुकाराम इथून अट्श्य झाले
इथूनच ते सदेह वैकुंठाला गेले, जाण्याच्यापूर्वी त्यांनीं आपल्या श्रोत्यांचा आणि
टाळकऱ्यांचा निरोप घेतला.
“ आम्ही जातों आसुच्या गांवा
आमुचा रामराम घ्यावा ”
६ मला देवाचे आमंत्रण आलें. आतां मी माहेरास मोहरला, शेखचक्र
आणि पीतांबर धारण करणारा पांडुरंग मळा पैलतीरावरून पालवीत आहे.
गरुडहदी फडत्कारे आळा आहे. पद्दा ती मेघऱ्याम साजिररांगोजिरी भ्रीमूर्त !
त्याच्या तेजापुढें गमस्ति ळोपत आहे. आतां तुमची-आमची हीच गांठभेट !
यापुर्ढे सर्व इतिहासाचा पसारा ! देवाने मला अक्षयपद दिलें. कुपेच्या
सिंह्मसनीं पैठे केळे,
५“ याजसाढा केला होता अट्टहास
दोबटचा दिस गोड व्हावा
आणि तो आज झाला. शेवट गोड त॑ सर्व गोड! धमकर्माप्रमाणे तुमर्चे
कल्याण होवो, हा माझा तुम्हांला आशीर्वाद ! ' रामकृष्ण मुरवी बोला । तुका
जातो वैकुंठाला! ?
१४२ तीर्थरूप महाराष्ट्
“८ “ट्ट -“ “शशश ०५.७ जा ““-“-““/-€---“-< डे ता काळ
त्यासरसा नामाचा गजर सुरू झाला. श्रोत्यांच्या हृदयावर पडढेल दुःख-
शोकार्चे दडपण त्या नामघोषाने दूर झालं. सगळेच नामधुंद झाळे. काय घडत
आहे आणि काय घडणार आहि याची कोणालाच जाणीव उरली नाहीं. थोंह्या
वेळाने त्या तंद्रीतून भानावर येतात तों त्यांना काय दिसले १
“ कुडीसाहित झाला गुत्त ”
या नांदरुखींच्या शोजारींच एका झॉापडीवजा ओवरींत एक पाषाणप्रतिमा
आहे, ती तुकोबांची कन्या भागीरथी. आपला पुण्यळोक पिता आपल्याढा न
कळवितां न येण्याच्या वाटेला निघून गेळा हे समजतांच त्या लडिवाळ
मुळीच्या काळजानें ठाव सोडला. तिनें अन्नपाणी वर्ज्य केलें. जवळच्याच
गांवी तिचें सासर होतं. सून प्राणांत मांडून बसली हे पाहून सासरची
माणसें घाबरली. अखेर तुकोबांना तिच्या समाधानासाठी तिच्या घरीं प्रगट
व्हावे ळागळं. मुलीच्या हातची शेवयांची खीर खाऊन मग ते तिला
अदृदय झाले.
देहूला पद्दाण्याजोगें फार थोर्ड आहे; पण चिंतनाजोरगे पुष्कळच आहे.
एका महाभागवताचे समम्र चरित्र या भूमीवर घडलं आहे. तुकोबांनी संसार
फळकट मानला, भोगावर पाषाण घातला, विवेकवेराग्याची कास धरली
आणि ते इतके समर्थ झाले को, ' देवाहून बळी !? इंद्रायणीरने हा ' नराचा
नारायण? आपल्याला दिला. सुखाचा मार्ग, प्रेमाची जागा आणि जीवनाचे
श्रेय त्यांनी आपल्याला दाखवून दिळ आहे. देहूला कश्यासाठी जायचं तं
-मातामाउली आपल्याला सांगतात.
“ देहूला जाऊन । देह विसरावा
अंतरीं स्मरावा । तुकाराम ”
१० आळदाचा वारा
-२.<.२.५ “7५- ८” > “५८ “८ट- “” - *--- /“”/ “”
»८८८.-:--....““-“---_“- “-2- “>>>... >>>. >->_-:“
मी आळंदीच्या अनेक वाऱ्या केल्या आहेत. पुण्याहून आळंदी अवघी
१४ मैढांवर आणि सतत वाहती वाट ; त्यामुळे कोणालाही मनांत येईल तेव्हां
अल्प श्रमांत आणि अल्प खर्चीत ज्ञानेश्वरदर्शनाचा महान् लाहो घेणे शक्य
आहे. पण माझ्या चित्तावर ज्या एका खेपेचा ठसा वज़्ळेप होऊन राहिला
आहे, तो प्रसंग भारताच्या इतिहासांत अत्यंत पुण्यपावन आहि.
म. गांधींच्या रक्षाविसर्जनाचा तो दिवस होता. आसेतुद्दिमाचळ अवघ्या
भरतखंडामध्यें गंगायमुनादि लोकमातांच्या जळांत, पूर्व-पश्चिम सागरात
आणि अनेक पुण्य सरोवरांत त्या दिवशी बापूजींची रक्षा विसर्जित होणार
होती. आत्मतत्त्वाने विश्वमानव्याला कव घालून उरढेळे बापू रक्षारूप जड-
देहानेहि जगावर पसरणार होते. त्यांतळींच अंशमात्र रक्षा इंद्रायणीच्या
वांत्याळा आली होती. चक्रतीर्थीच्या घाटावर पुंडलिकाच्या मंदिराजवळ ती
रक्षा इंद्रायणीला लामायची होती. पुण्याहून आणि आजूबाजूच्या गांवांतून
फार मोठा जनसमह आपली चिऱ्यासारवी जड झाठेली अंतःकरणे घेऊन
तिथें जमला होता. भाग्यवद्यात् त्या विधीचे धार्मिक पोरोहित्य मजकडे आले
होते. ते सर्व झाल्यावर ती रक्षा इंद्रायणीच्या जल्पृष्ठावर तरंगली. अनेकांनी
त्यासरशी पाण्यांत बुढ्या मारल्या. अनेकांनी मार्जनं केलीं. सर्व लोक तारा-
वर गदी करून तो विसरजेनविधि पहात होते. मी मात्र त्या वेळीं वास्तवां-
तून कल्पनेच्या राज्यांत शिरलो होतो. एक निराळेच दिव्य, तेजोमय दृब्य
माझ्या मनश्रक्षूंपुढे उभे झालं होते--
इंद्रायणीच्या तळांतून महात्माजीची आत्मज्योत शानेश्वरांच्या समाधि
स्थानांत प्रवेशत आहे. चिरा न हाळवतां, दार न उघडतां. ज्ञानेश्वरांची
निष्कंप आत्मज्योत या नव्या ज्योतीच्या स्वागतासाठी समोर झोक देत आहे
दोन्ही ज्योतीमधळें अंतर हळूहळू कमी होत आहे. दोघीही एकमेकींच्या हृदयांत
आपले प्रतिथिब पद्दात. आहेत. दोघीद्दी गरीतामाऊळीच्य़ा कन्या, दोघीही
१४४ तीथरूप महाराष्ट्र
गीतार्थांच्या सोयऱ्या. टर्यपणें वेगळ्या ; पण अंतरीं अभिन्न. एक ' भावा थॅ-
दीपिका ? पाजळणारी, तर दुसरी अनासक्तियोग सांगणारी. दोघीही शुद्ध -
सत्त्वागळ्या. दोघीही तमाची काजळी फेडून राहिलेल्या. संकुचितपणाचा,
क्षुद्रतेचा, विषमतेचा, दोघींनाही तिटकारा. दोघींचाही विश्वाला' पोटाळून
घेण्याइतका व्यापकपणा
“ हु विश्वाचे माझें घर । ऐेसी माते जयाची स्थिर
किंबहुना चराचर । आपण जाहला ! ”
हे विचारबीज ज्ञानेश्वरांच्या ज्योतीने पेरले. बापूजींच्या ज्योतीने त्या
बीजार्चे ' तरु ) सगळ्या क्षेत्रांत लावले, वाढवले. आणि आतां त्या दोघी
पुनश्च एक होत होत्या. प्रेमाने उचंबळून एकमेकींना खेंब देत होत्या. आतां
आधींची कोण आणि नंतरची कोण हे बोलणें खुंटले होत. ' दो ओठी एक
बोलणें । दो पार्यी एक चालणे, ' तसा दोघींचा मिळून एकच ज्ञानप्रकाश
झाला होता. .
०
नाटे
अककककक १- मा
8. च. जब 1
डे - रन कबुहि', |... षा ॥॥
॥॥॥॥,॥ |
पुलावरून आळेंद्रीचे दर्शन
_ मळा वाटलें इंद्रायणीत महात्माजींची रक्षा विसर्जिण्यांत जे आध्यात्मिक
ओचेत्य साधले तें अन्यत्र कुठेंच साधणार नाहीं. ईं रक्षाविसर्जन नव्हे; तर
ज्योतिर्मीलनच झालें,
आळंदीला गेल्यावर इंद्रायर्णात स्नान करून शुचिर्भूत होऊन ज्ञानेश्वरांच्या
ण ढ् ढ
दशशनाळा जावें ह्या उत्तम पक्ष, पाण्यांत उतरून आळंदीकडे पुढा केला कीं
आळंदीची वारी १४५
«> २2० “ “-*
४ १ टीशडीटाडीटॉीटडाटडटा-/“€-“-:“/“€///८रा7//“/7““:“-:-:“/“““/“::”-“//2>“->-//->५०८८-८-/:.//>/:/->.>->:-_८----->“>“:--><>-->
प्रसन्नता धावून येते. एक सुंदर वळण घेऊन इंद्रायणी आळंदींत शिरली
आहे. ' नदी वेगेन शुद्धथाते हे जितके खरे तितकेंच ती वळते तेव्हां
अधिक शोभते इंद्दी खरे. त्यानंतर पुलाखाळून ती बऱ्याच लांबवर सरळ
गली आहे. हिचं ' इंद्रायणी ' हे नांवच दिव्य म्हणजे देवांशीं संबद्ध आहे.
इंद्राच्या तपाचे हे अयन म्हणजे स्थान. इंद्रच नव्हे; तर कुबेरसुद्धां इंद्रायणी -
विषयीं आदर बाळगीत होता. जवळच्याच धानुरें गांवी त्याने आपल्या-
जवळचा अतिरिक्त धनाचा सांठा धारित्रीच्या पेढीत ठेवला आणि तिथें
धनेश्वराची स्थापना केळी अशी लोककथा आहे. 'ज्ञानबा तुकाराम
हा मधुर महामंत्र इंद्रायणीच्या पाण्यांतूनच उठला. हिची काया छोटी;
पण करणी मोठी, हिच्या पंचक्रोश्ांत तीन वर्षांच्या अवधींत शानेश्वर-
तुकाराम हे दोघे संतांचे मेरुमणि गाजळे हे हिचे लोकोततरत्व.
इंद्रायणीचं पाणी ज्ञानाने पाचक आणि भक्तीने रोचक आहे असं पू. विनोबा
सांगतात. हिच्या पात्रांत माते आहेत, तशींच कासवेही आहेत. त्यांतले
एखाद खडकावर बसून लांब मानेने तुमच्याकडे पाहूं लागलें की ज्ञानेश्वरांची
कृपादृष्टि कशी असेल त्याची तुम्हांहा कल्पना येईल.
घाटावर एका ठिकाणीं ढह्ान लहान समाविवृंदावनांचे संमेलन आहे.
त्यांतच अलीकडच्या काळांतळे भागवतधर्मांचे निष्ठावंत प्रचारक विष्णुबुवा
जोग यांचीही समाधि आहि. पुण्यांतळा ह्या एक प्रधान मल ज्ञानेश्वरांच्या प्रेम-
घर्माचा पुरस्कर्ता आणि शांतीचा उपासक बनतो, ह्वा सकृद्दर्शनी तरी विरोधा-
ल॑कारच वाटतो. भगवंताचे आणि भागवतांचे द्वेष्टे चाणूर-मुष्टिक हवे मळ
मथुरेत निर्माण झाळे. भगवदूमक्त मळू आपल्याला आळंदीनें दाखवला.
ज्ञानेश्वरी, असुतानुभव द्दे म्हाताऱ्यांनी डोळे पुशीत वाचायचे ग्रंथ अशी
अजून बहुतेकांची समजूत ; पण ९ूव-प्रल्ह्मदाच्या पंथांतल्या या विष्णुबुवांनी
तरुणपर्णीच त्यांत बुडी दिली. साक्षात्कारासाठी ज्ञानेश्वरांच्या पायांशी बसून
निग्रही अनुष्ठान केळ॑ आणि अखेर शांतिप्रमदेचे कांत दह्वोऊन ते स्वरूपी
रमले. वारकरी शिक्षणसंस्था प्रथम त्यांनांच निर्माण केली आणि अजूनही
आळंदीत तिचे ज्ञानदान चालू आहे.
चक्रतीथाजवळूनच एक दगडी रस्ता वर जाऊन आपणांस ज्ञानेश्वरांच्या
ती. म.... २-१०
“१-८ :-/१ / ४-५
१४९६ तीर्थरूप मदाराष्ठू
मद्दाद्वारांत पोचवतो. तिथं माळा, फूलपत्री, नारळ, बुक्का हे पूजाताहत्य
आणि नेवेद्यासा्ठी मिठाई विकणारी दुकानें दुतर्फा हारीने बसठेलीं आहेत.
पंढरपुरांत मद्दाद्वारांतली पाहिली पायरी जशी नामदेवाची, तशी आळंदीच्या
महाद्वारांत हेबतरावबाबांची. तिथला मुंडासे घातलेला पितळी मुखवटा
पाहिल्यावर समजून येतें की, या मह्ामागाने इथं अखेरचा ठाव मागितला
आहे. त्यांच्या भाक्तयोगाळा आतींतून प्रारंम झाला आणि ते अखेर ' सवे
भागवतोत्तमः ' असे झाले. मोठी ऐकण्याजोगी कथा आहि ती.
सातारा जिल्ह्यांतलळ आरफळ ह बाबांचं मूळ गांव. ऐन तारुण्यांत नशीब
काढण्यासाठी ते घराबाहेर पडले आणि ग्वाल्हेरला पोचले. शिंद्यांच्या द्रबारांत
त्यांनी चाकरी धरली. चढत-वाढत ते सरदारकापर्यंत पोचळे. बऱ्याच वषीनी
त्यांना जन्मभूमीच्या दर्शनाची इच्छा झाली. बरीचशी संपत्ति आणि शिपाई
प्यादे समागर्मे घेऊन ते निघाले. वाटेंत सातपुड्याच्या पर्वतश्रेणींत मिललांनी
त्यांना गांठळं आणि त्यांच्याजवळचें सर्वस्व लुबाडले. प्रतिकाराला सिद्ध
होतांच मारले, झोडपलं. सगळ्यांची पांगापांग झाली. मिलांच्या नायकाने
बाबांना पकडून एका गुहेत नेऊन कोंडले, दारावर शिळा लावून परततांना
ततो म्हणाला, ' मर आतां इथें ! ?
बाबांना त्या वेळी ब्रह्मांड तर आठवलंच ; पण त्याबरोबस्च ब्रह्मांडना यकद्दी
आठवला. त्यांना ज्ञानेश्वरांचा हृरिपाठ मुखोद्गत होताच. त्याचें त्यांनी अखंड
पारायण सुरू केलं. ते “ हरिनामी संकल्प? घालून राइहले. अन्नपाण्यावेना
देहाचे काष्ठ होऊ लागळें ; पण ओंठ इरिपाठ पुटपुटतचच राहिले. कर्मघर्म-
संयोगाने त्यानंतर थोड्याच दिवसांत मिलनायकाची पत्नी पुत्ररत्न प्रसवली.
त्या आनंदाप्रीत्यर्थ तिने बाबांना सोडण्याबद्दह नवऱ्याला गळ घातली.
एकवीस दिवसांनंतर त्यांच्या गुहेच्या तांडावरची शिळा हालली. निषादपतीने
त्यांना बाहेर काढलं, त्यांचे शरीर अचेतन झाळें होते; पण ओठ हालत
होते, त्याचा त्याला अचंबा वाटला, त्यानें त्यांना त्तावघ केलें. ताकद येई-
पर्यंत त्यांची झुश्रूषा केली. नंतर लटलेळें द्रव्य परत देऊन त्यांची सन्मानाने
रवानगी केली. सुरक्षित रस्ता भेटेपथेत त्यांना सोबत करायलाही तो
चुकला नाही.
बाबांचा पुनर्जन्म झाळा होता आणि तो नामाच्या बळावर. ज्या
आळंदीची बारी १४७
ज्ञानेश्वरांची मूर्त त्यांनी आळवली, तिचे सामथ्ये त्यांना कळून चुकलं होतें
ज्यांना श्रद्धेचा साक्षात्कार घडला, ते संसाराकडे पाठ फिरवून संतांना सन्मुख
झाळे, तर त्यांत नवळ कसले ! बाबा आरफळला जाण्याच्याऐवजी सरळ
आळंदीला आले. पदरी होतें ते द्रव्य गोरगरिबांना वांटून केवळ भक्ति तेवढी
त्यांनी आपल्यासाठी ठेवली. पुढें बारा वर्षे त्यांनीं सिद्धबटांत अनुष्ठान केळे
आणि महाद्वारी उभे राहून भजन केलें. बाबांचे भजन रंगांत आलें कीं
ज्ञानेश्वरांची समाधि डोलत असे असे सांगत!त. महाराजांच्या पादुका गळ्यांत
बांधून प्रथम त्यांनी पंढरीची वारी सुरू केली. पुढें त्याच पादुका पाळखींतून
जाऊं लागल्या आणि त्यानंतर आळंदी संस्थानाने हे कार्य आपल्या शिरावर
घेतलें. या पालखीच्या सोइळ्याचे सर्व नियम बाबांनी बांधून दिळे आहेत.
मह्ाद्वारांत एक मोठी घंटा आहे. समोर जुनाटसा गरुडमंडप आहे. वर
नगारखाना आहे. आंत शिरल्यावर समोरच संगमरवरी फरसबंदीचा समा-
मंडप आहे. त्यापुढं आणखी एक लद्वान दालन असून त्याला लागूनच पुढे
गाभारा आहि. आंत दिव्यांचा मंदसा प्रकाश पसरून राहिला आहे.
उदबत्त्यांचा घमघमाट बाहेर येतो आहे. फूलपत्रीचा वासही त्यांतच मिसळत
आहे. दर्शनेच्छु लोकांची इथे वाण नाही. तुम्ही डाव्या बाजूळा रांगेंत उभे
रह्वा. आंतळे लोक उजव्या बाजूने बाद्देर येतील आणि तुम्हाला आंत
प्रवेश मिळेल.
आंत शिरल्यावर समोरच काळ्या पाषाणाची जी ठंगणीशी वेदी दिसते तीच
ज्ञानोबारायांची समाधि. तुम्ही खाली बसा आणि दोन्ही भुजा पसरून तिला
उराउरी भेटा. ' एथ भीड कवणाची घरूं। तूं माय आमुची ' असते म्हणा.
माउलीजवळ संकोचाळ तर वात्सल्याळा मुकाळ. नेणतं लेकरू होऊन, धनाचा,
ज्ञानाचा, वयाचा, कर्तृत्वाचा सगळा अभिमान फेंकून देऊन, तिच्या
पार्यी मिठी घाला. जो अद्देभाव सोडील त्यालाच माउली ओळखील. तोच
आल्याची दखळ घेईल. मस्तक ठेंगणा करायच्या वेळीं मोरापतांची पुढीळ
आर्या स्तुतीचा मंत्र म्हणन तुम्हांला उपयुक्त होईल.
“ ब्ानेश्या भगवंता ! भगवजञनवल़भा महासदय!
कलियुगवती जन जो देसी स्मरणेंचि पुक्तिचं पद या ”
१४८ तीर्थरूप महाराष्ट
>*./%./ ९.५ %./४../९./%-./४./१४..”४./४./९_/४./४. ९.५४.” "२४-४-४४५- ४५ ४५८ ४०४४-४५-४४” ४-५
तुमच्या आमच्या मोठेपणाचा काय पाड ! सकल संत त्यांच्या पदी लीन
झाळे आहेत. नामयाची जनी म्हणते की, “' मी. जन्मोजन्मी तुइग्रावरून
समाथे आणि तविठरल-रखुमाई
ओवाळून जाईन. ? एकनाथमहाराज या चेतन्याच्या जिव्हाळ्याला अंजाले-
संपुट जोडतांना म्हणतात कीं, ' तुम्ही बतोनि अंतर्री । मज जागवा निर्धारी,
तुकोबा * राखा पाय्रांपे किंकरा ? म्हणून त्यांना गळ घालतात. महाराष्ट्र-
झारदेचा तन्माणि मुक्तेब्र_ ' त्याचे चरण चिंतिळे मनी । तेणें पावन झालां
जनीं ? अशी निरभिमान कबुली देतो. मग आपण माउलीच्या पार्यी कसें
आणि किती जडायचें ह ज्याचे त्यानेच ठरवावे.
मंदिरापुढे उभ राहेल्यावर डाव्या-उजव्या हाताला दोन पिंपळपार दिसतील.
पेकी उजव्या हाताचा तो सोनपिंपळ.' जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ' तो
हाच. आज केक शतकेतो तिथं द्वारी तिष्ठत आहे. नवी त्वचा आंतून येते आणि
आळंदीची वारी १४९
"१२ /"४२/१ ५१ //१४ /१४ /% /'५_” २.९ “०७.४९ /४ /१ “५ २ ४ ४” ४८ ४५ “५५ ४७४४ ४४१ ५४%... ४४.”५ ४५४ १ ४४४४-५० ९.१५
बाहेरील सालीच्या खपल्या झडून जातात. जुनी पार्ने पिवळी होऊन गळतात न
गळतात तोंच नवी आरक्त पालवी वाऱ्यासंग झुलू लागते. पुन्हां आपला तो नवा
तरणा ! आज यात्रेकरू त्याच्या पाराला पाठ घांततात. सात शतकांपूर्वी
शञानेश्वरांची आई प्रदक्षिणा घाढून तो पार झिजवीत द्दोती. आपळे यजमान
विठ्ठलपंत कुठें बेपत्ता झाले आहेत ते परत येऊन संताराला लागूं देत, म्हणून
त्या अश्रत्थनारायणाला सांकडे घालीत होती.
विठ्ठलपंत हे अभिजात विरक्त, तीर्थे, क्षेत्रे हिंडावी, साधुसमागम कराव!
आणि आत्मकल्याण साघावे हाच त्यांना हव्यास. आळंदीचे कुलकर्णी
तिधोपंत यांनीं आपली मुलगी देऊन त्यांच्या पायांत सोनेरी शुंखला घालण्याचा
प्रयत्न केला; पण अडवलेला ओघ एक दिवस काशीच्या दिशेने
घावलाच. रामानंदस्वामीच्याकडे जाऊन त्यांनीं भगवी वस्त्रे घेतली, त्यांना
काय कल्पना की, हा नवा शिष्य आपल्या पत्नीची अनुज्ञा न घेतां, पितृ-
क्ण न फेडतां चतुर्थाश्रम स्वीकारायला आला आहे म्हणून !
देववशात् रामानंदस्वामी दक्षिण-यात्रेला निघाळे आणि एक दिवस
आळंदीस पोचले, त्या काळीं हं स्थान सिद्धेश्वरक्षेत्र म्हणून विश्रत होतं.
आदिनाथ शंकराची ही तपोभूमि. अगस्तिप्रमुख अनेक क्रषिमुनींचे द्वे तिडि-
क्षेत्र! पूर्वला मर्कळचा केशवराज, दक्षिणेला पुण्याचा पुण्येश्वर, पश्चिमेला
इंदुरीचा ब्रह्मेथ्वर आणि उत्तरेस भीमातीरी खेटकम्रामी सिद्धेधर अशी ही
पावन पंचक्रोशी त्या काळीं गाजत होती आणि म्हृणूनच रामानंद इथं
आले होते.
अनेक माणसं या परिव्राजकाच्या दर्शनाला आलीं तशी रुक्मिणीही
आली. कपाळीं कुंकुमातिळक पाहून त्यांनीं तिळा ठराविक आशीवाद दिला
कौ, ' पुत्रवती भव ! ! ता बिचारी देवदुर्विळासाला ददसली. स्वामींनी हृस-
ण्याचे कारण पुसलं. ' महाराज, जिचा पति परागंदा झाला आहे ती पुत्रवती
कशी होणार ! म्हणून हसू आलें, ! स्वामी जरा अधिक खोल पाण्यांत शिरले.
विठ्ठलपंतांच्या खाणाखुणा विचारतां त्यांची खात्री झाली को, आपला शिष्य
चैतन्य ) हाच हिचा पति असला पाहिजे. काशीस जाऊन त्यांनी त्यांना
छेडले आणि सर्व प्रकार त्यांच्या मुखार्ने वदवून घेतला. “जा; माझ्या
आज्ञेने पुन्हां ग्रहस्थ ह्यो ! म्हणून त्यांनीं त्यांना परत आळंदीस धाडले.
१५० तोथरूप महाराष्ट
संन्याद्यानें उलटून शिखासूच धारण करणें आणि ग्रहस्थाश्रम चालवणे द्दा
प्रकार ट्या काळांत अक्षम्य अधर्म होता. ब्राह्मणांनी या दांपत्याला ताबड-
तोब वाळींत टाकलें. साहजिकच आत्तवर्गानाहे उपेक्षिळ. सर्वतोमुखी निंदा
आणि अपमान. पण एकमेकांच्या प्रेमबळावर त्यांनी आला दिवस
साजरा केला.
संसारांत त्यांना एकंदर चार अपत्ये झालीं. तीन मुलगे आणि एक
मुलगी, निवृत्ति शके ११९५ त, ज्ञानेख्वर ११९७ त, सोपान ११९९ त
आणि मुक्ताबाई १२०१ त. चारी भावंडांत दोन दोन वरषोचे अंतर.
सोन्यासारखी, शहाणी सुंदर मुळ ; पण आळंदीकरांना त्यांचें काय कोतुक !
शब्दज्ञानी पंडित आणि मिक्षुक ब्राह्षण यांनी या लॅकरांचा परोपरी उप-
हासच केला. जिथें जातील तिथें एकच वाक्य त्यांच्या कानी पडायचे.
संन्याशाची मुळें ! ' आईवबाप्रांवरचा बहिष्कार मुलांनाही लागू झाला.
सानेश्वरांना मोंजीबंधन हर्व होतं. त्याद्वारे मिळणारे संस्कारयुक्त त्राह्मण्यद्दी
हवे होते. पण रूढिनिष्ठ समाज त्यांना त॑ द्यायला कषूल होईना. धर्माची
सत्ता ज्ञानेश्वरांना मान्य होती; पण धमच त्यांना आपंगीना. आपल्या
मुलांना त्राल्यस्थितींत आयुष्य घालवावे लागणार, त्यांचा जन्म केवळ
घरणीला भार होणार, म्हणून विठ्ठलपंत उदास झाले. त्यांनीं ब्रह्मवृंदाला कळ-
वळून प्रारथिळें की, मला प्रायश्चित्त सांगून पावन करा. रूढिपूजक शास्त्री-
पंडितांची वाणी वदली कीं, ' देह्वान्त प्रायाश्न्त! ' आणि मुलांचे जीवन
धर्स्य आणि श्रेयस्कर व्हावे म्हणून खरोखरच त्या करुणाघन मातापितरांनी
प्रयागाला जाऊन गंगा-यमुनांच्या संगमांत देह लोटून दिले. मुलांताठीं
स्वार्थत्याग करणारे पुष्कळ आईबाप भेटतील; पण स्वात्मल्याग करणारे हेच !
पण तरीही प्रश्न सुटला नाहीं तो नाहींच. संन्याशाच्या मुळांना मुंजीचा
अधिकार सांगायला आळंदीत एकाही ब्राह्मणाची पोथी पुढे झाली नाहीं.
आळंदीकरांनी या भावंडांना शासत्रनि्णयासाठी पैठणची वाट दाखवली. पण
तिथेही तंच. ज्ञानेश्वरांनी पैठणच्या नागघाटावर रेड्यामुखी वेद वदविलेले
पाहून पैठणकर चाकित झाले. त्यांना या मुळांचे अळौकिकपण कळून चुकर्ले.
ते म्हणाठळे, ' अशा लोकोत्तरांना आम्ही थुद्धिपत्र त॑ काय द्यायचे ! ” गंगेला
कोणी धुवावे आणि अस्नीला कोणी शुद्ध करावे! एतावता या ना त्या कार-
आळंदीची वारी १५१
णाने त्यांना शास्त्रार्थ मिळाला नाही तो नाहींच. त्यांचें उपनयन होऊं
शकले नाहीं आणि त्यामुळेच ते चहूं आश्रमांहून शेवटपर्यंत निराळेच राहिले.
आईइबापांची शिरावरची सावळी गेळी आणि ही भावंडं उघडी पडली.
निवृत्ति आठ वर्षांचे होते तरी आपोआपच त्यांच्याकडे वडीलपण आलें.
कोरान्न मागून तीं निर्वाह चालवीत. पण ते तरी सुखाने मिळत होतें का!
तोंडमर अपशब्द ऐकावे तेव्हां मूठमर दाणे झोळींत पडावे. ते अन्न खातांना
त्या कटु वचनांची जळजळ ज्ञानेश्वरांना बहुधा असह्य होत असावी. एक दिवप्त
ते मिक्षेहून आळे ते अपमानाच्या ष्वाळांनी अंतरीं जळत. कोणाचेही दर्शन
नको म्हणून ते खोपटांत शिरळे आणि ताटी लावून घेऊन आंत बसून
राहिले. पाठीमागून आली मुक्ता. ती मुळांतच मानापमानांतून ' मुक्ता '
होती. तिने ताटी बंद पाहिली. ज्ञानेश्वर जगावर रुसल्यारचें त्या ब्रह्माच्या
चित्कळेला उगमलें. जरा लद्वान तोंडी मोठा घासत घेऊन ती बोलली,
: ताटी उघडा ज्ञानेश्वरा ! '
6 हुं पहा, पावन मनाच्या योग्याने जनांचे अपराध पोटीं घालावे. विश्व
रागाने आग झालें अतेल तर संतान पाणी व्हावे... ” आणि या सगळ्या
विनवणीचा उद्देश ह्वा की, ' तुम्हि तरूनि विश्व तारा! ' एवढीशी चिमुरडी
मुक्ताबाई. पण तिची अध्यात्माची झेप पहातांना कल्पनेचेही डोळे थकतात.
आणि म्हणूनच चोदा वर्षे जगलेल्या योगसिद्ध चांगदेवाचें गुरुपद ती
भूषवूं शकली. खरें म्हणजे बाहुलीला मूल समजून खेळ खेळण्याचे तिचे ते
दिवतत. पण तिनं ह्वा जुनाट, जख्वड म्हातारा आपला मुलगा मानला. तिनें
निजबोधा'चा पाळणा हाळवल्यावर त्यानें उद्गार काढले आहेत की, ' चांगा
म्हणे आईंपोटी आल. ?
तुम्हांला जर त्या सोनापिंपळाची सळसळती भाषा समजणें शक्य असेळ तर
श्ञानेखरमंडळाचा सगळा बाळपणचचा वृत्तांत तो तुमच्या कर्णत्तंपुटांत घालील.
डाव्या हाताचा पिंपळपार ही एकनाथमहाराजांच्या ध्यानाची जागा.
६ अजानवृक्षाची मुळी माझ्य़ा कंठाला लागली आहे; ती तूं येऊन सोडव. ह्वा
ज्ञानेश्वरांचा दृष्टांत घेऊन ते आळंदीस आले. पण त्यांना समार्धीर्च द्वार
सांपडेना. दोवटा या पारावर बसून त्यांनीं ध्यान धरलं. त्या अवस्थेंत त्यांना
ह्वार सुस्पष्ट दिसले. मग ते चिरा काढून आंत गेळे. मुळीरचे कवळ निमित्त
१५२ तीथरूप महाराष्ट्र
होते. ज्ञानेश्वशंना नाथांशीं निजगूज बोलायचें होतें. ज्ञानेधरीचें संशोधन
आणि प्रसार दह्या आदेश घेऊन तिथून ते बाद्देर पडले. शुद्ध ज्ञानेश्वरी नाथांनी
आम्हांला दिली, तीनं वर्षोनंतर नाथांच्या काळीं ज्ञानेश्वरी जागी होऊन
उठली आणि महाराष्ट्र जनतेला अमृतरसाचा पान्हा पाजू लागळी, अजूनही
तिच्या त्या कार्यांत खंड नाहीं.
याच पिंपळपारासभोर सभामंडपाच्या डाव्या अंगाला ओळांनें दोन समाध्या
आहेत. डाव्या द्वाताची केसरीनाथांची आणि उजव्या हद्वाताची भोजलिंग-
बोवांची. केसरीनाथ हे नाथसंप्रदायांतळे अधिकारी पुरुष होते. भोजलिंगबोवा
हे जातीर्ने सुतार आणि वृत्तीने योगारूढ. हे ज्ञानेश्वरांचे समकालीन होते.
वयार्ने वडीळ असल्यामुळे ज्ञानेश्वर त्यांना काका म्हणत.
तिथून पुढें गेल्यावर गाभाऱ्याच्या पूर्वचाजूळा लागून एक गवाक्ष आहे;
त॑ यान्रेच्या गर्दीत स्त्रियांना दर्शन घेण्यास उपयुक्त होतं. तिथेच जवळ एक
सोळखांबी दवेमाडपंती मंडप दिसतो. याच्या दक्षिण अंगाला ज्ञानेश्वरांचे शेज-
घर आहे. इथें महाराजांच्या पादुका ठेवलेल्या अत्ततात. समार्धांच्या थेट पाठी-
मार्गे मुक्ताबाइईचे मंदिर आहे. तिथें कटेवर कर ठेवून मुक्ताबाई उभी आहे.
समाधीच्या पश्चिभ अंगाला सिद्धेश्वराचें मंदिर लागतं. गाभारा, मंडप आणि
नंदीची जागा असे याचे तीन भाग पडतात. गाभाऱ्यांत स्वयंभू शिवलिंग
अहि. या क्षेत्रांतळे आद्यस्थान तें द. या देवळाचे बांधकाम सुमारे तीनशे
वषांपूर्वा'चें आहे.
पाषाणनंदीच्या खालींच समाधीचे द्वार आहे अर्से सांगतात. एकनाथ
इथूनच खालीं गेळे आणि परत आल्यावर त्यांनीं ते. बुजवून टाकले, मी
तिथें उभा राहून त्या जागेवर टक लावलें, पण चर्मचक्षूंचे किरण आंत
शिरेनात. मज अभाग्याला ज्ञानचक्षु कुठळे ! मन केवळ कल्पना करूं
लागलें, ' इथे खालीं बेल-तुळशींच्या आस्तरणावर ज्ञानियांचे राजे तिद्धासन
घालून बसलेले असतील. दोन्ही करकमळें जानूंबर ठेवळेली असतील. डोळां
६ झीममुद्रा ' ढागळेली असेल. सर्भावती तेजोवलय स्फुरण पावत असेल आणि
त्याच्या मध्यभागी सच्चिदानंदस्वरूप ज्ञानेश्वर. ' निष्कलं निष्क्रिय श्ञान्तम् |?
आणि मला वाटलं की, नामदेवाचा त्या प्रसंगींचा तो टाहो अजूनही
इथल्या वातावरणांत सुदषमपर्णे घुमून राहिला आहे. कापूर जळून जावा आणि
आळंदीची वारी १५३
/"/“/-“-“/* €*४>*«* *€** *१४/१/१/४/*/४४४५/१*/४५५/५/१५/४/१/ ५८/१५४५/१ “४४/१४/४८४० ४८० ४/४/९ /४-/१४१/१ १ ४१८४८ ४ २.» ४४४.” ४.६९ ४४/४५/१४४४” “४४/४५/४४१४ ४४५४४५४ ४१ ८४४ ४४१५ ४५४-५५४४४४४-४* “ ४८९४४ ४ ४५१४७7
अव्यक्त असा वास तेवढा नाकाशी जाणवत असावा तसा. पाण्याचा लोंढा
निघून जावा आणि भूमीवर ओल्हासा तेवढा उरावा तसा, “ब्रह्मी ज्ञानराज
मेळविला त्या प्रसंगावर नामदेवाने अभंग रचले आहेत ते जणूं काळजाचा
गाभा पिळून निघालेल्या रसाने. नामदेवाचे तं विलापकाव्य आहे. अनलंकृत,
पण थेट हृदयाला मिडणारें. तो विलाप म्हणजे अजविलाप नव्हे. रतिविलापद्ी
नव्हे. त्याला पार्थिवतचा वारासुद्धा लागळेला नादीं. आपला भक्तिमार्गीतला
सखा, विठ्ठलाचा ज्ञानी भक्त, संतमंडळाचा मूर्त जिव्हाळा, आत्मप्रकाशानें
विश्व उजळणारा महात्मा आणि जगाचा कोवळा सद्गुरु समार्धीत कायमचा
डोळ्यांआड होतो म्हणून नामदेवाच्या वाणीचा तो काव्यमय आक्रोश आहे.
श्ञानेथवरांच्या वयाला अवघें बावितावें वर्ष; पण त्यांनीं तेवढ्या तरुण
वयांतच जीवत् समाधि घेण्याचें ठरवलं. शके १२१८ ची कार्तिक वद्य त्रयो-
दशी हा दिवस निश्चित केळा. शुद्ध एकादशीस पंढर्रीच्या वारीला जाऊन
त्यांनी देवाला आपला मनोदय कळवला. देवानें मन मारून संमाति दिली.
सगळ्या संतांना ही वार्ता कळली. ते उदास, अस्वस्थ झाले. पंढर्राीचा “पोहा !
त्यांच्यासंगं अळंकापुरी म्हणजे आळंदीस आला. इंद्रायणीच्या ' अल्प्ाड
पल्याड ? पताकांचे भार जमले. रखुमाइसह पांडुरंगही आला. आळंदीस भजन-
की्तनांची गर्दी उडाली. एकादशीला दृरिजागर झाला. द्वादशीला सर्वांनी
ज्ञानेश्वरांच्या पंक्तीला पारणं सोडले. त्रयोदशीच्या दिवशीं नामदेवाचे पुत्र
नारा आणि विठा यांनी, आधींच तयार करून ठेवलेल्या समाधिस्थानार्च
झाड-सारव केली. वर बेल-तुळशी आंथरल्या. ज्ञानेश्वर निरवानिरव करू
लागले. प्रथम त्यांनीं निदृत्तिनाथ-सद्गुरूंचे पदवदन केलं.
निवृत्ति म्हणजे हृषंशोकांच्य़ा पार गेलेला स्थितप्रज्ञ. गांमीर्यांचा सागर आणि
घेयांचा हिमाचल! पण तो ओसंडून ज्ञानेश्वरांना आळंगू लागला. बांघल्या
तळ्याचा पाट फुटावा आणि ओघ बारा वाटा मुरडावे, बांधल्या तृणाचा
आळा सुटावा आणि तणकाड्या रानोमाळ पांगाव्या, तशी निवृत्तीची
अवस्था झाली. ज्ञानेश्वर ल्याला कृतज्ञतेच्या भरानें म्हणाले,
५ चाळिल पोशिलं चालविला ठळा
द्या! माझ्या कपाळा निवृत्तिराजा !
१५४ तीथरूप महाराष्ट्र
६. ४४ ४ ४ ४. ४७ ४४ ४४४४ ४. ४/९/ ३.” १/४-// आळ “आळ. ७७७१५०७०५०००००/४५"-/५/५०>९०-/४/-*-०/५-/-.५/”>// >“: >/:/४/-/-”५<.*«./४/५-/५/५८४-९>”>५४/ ५८” /-/४/५/>-//५/५-/५-/५--/५-/५/०./५./" ०.९. ८५/५-/-०० ०८०५
त्या बोलांनीं निवृत्ति आणखी विरघळला. त्याने त्यांच्या मुवावरून हात
उतरला. शिष्याचे मुखमंडल नेत्रांत सांठवून घ्यायचे ; पण अश्रू ल्याला जागा
देईनात.दाटलेल्या जनसंमर्दाकडे पाहून तो बोलला, “माझे निधान आज चालले.
: वरिष्ठाच्या आधी कनिष्ठाचें जाणे) केळ॑ नारायणे उफराटे. ' याने माझी
कधी अमर्यादा केली नाहीं. माझे गुरुपण आणि आपलें शिष्यपण सिद्धीला
नेलें. याच्यासारखे आतां कोणी भेटायचे नाद्दी,
सोपान आणि मुक्ता प्राण कासावीस करूं लागलीं; तेव्हां देवानं पुढे होऊन
त्यांना पोटाशी धरले. नामदेवाला गावर फुटला तो आवरेना. पण वृत्ति पहा
कशी ती. आपण स्वतः आकुळ-्व्याकुळ झाला आहे; पण ' करा समाधान
निवर्त्तांचे ) म्हणून देवाला विनवतो आहे.
नेतर ज्ञानेश्वरांनी देवाला १०८ ओव्यांचे नमन केलें. सकळ संतांना
अष्टांगी नमस्कार घातला. अवघ्या संतांनी त्यांना वंदिले. पांडुरंगाने त्यांच्या
कपाळीं केशरी गंधाचा टिळा लावून गळ्यांत पुष्पद्दार घातला. ' फार केले
कष्ट जगासाठी * या शब्दांत देवाने त्यांचे उपकार दशेवले. त्यांचा एक हात
देवार्ने आणि दुसरा निवृत्तीने घरला, ज्ञानेश्वरांची रातोत्पलांसारखीं पाउले
समाधीच्या पायऱ्या उतरू लागलीं. त्यासरशी संतमंडळीला दुःखाचे कढ
आले. जनवन शोकाने कालवले, दाही दिशा, वरचे गगन जणुं ओस;
मिंगुळवाणें झाळं. देवाने त्यांना आसनस्थ केलें. समोर भावार्थदीपिका ठेवली.
ज्ञानेश्वरांनी देवाला तीन वेळां अंजलिप्तंपुट जोडला. देवाने विचारळें, ' काय
अखेरचे मागणे! !
£ भ्नानदेव म्हणे सुखी केलो देवा
पाद्पद्मी ठेवा निरंतर! ”
ऐन तारुण्यांत, देह्ापासून अळग होतेवेळचे ज्ञानेश्वरांचे धाढेपणाचे हे
उद्गार, त्यांच्याहून चौपट आयुष्य लामलेल्या जीवांना खाऊन पिऊन
त्यागून भोगूनद्दी अंतकाळी हे शब्द डच्चारतां येतील का! देहासक्तीत
गुरफटलेल्यांना, विषयपंकांत खोलवर रुतलेल्यांना ह भाग्य कुठळे ! ज्ञानेश्वरांना
देवाने सुखी केळे होतें आणि त॑सतुख त्यांच्या आत्म्यांत मरून ओसंडत
होते. देव त्यांना वरदान बोळला. ' यावचंद्रदिवाकरो तुझी समाधि
स्थिर राहो !
आळंदीची वारी १५५
देव आणि निवृत्ति बाहेर आळे. समाधीच्या दारावर त्यांनीं शिळा घातली.
संतांनी समार्धावर फुलें वाहिला. नामदेवानं प्रेमपाडिभराने पूजा केली.
अजूनही त्या तिथीला आळंदीस मद्दायाञ्रा मरते. कार्तिक शुद्ध एकादशी
पांडुरंगाची ; वद्य एकादशी ज्ञानेश्वरांची, भजने, निरूपण, नामघोष यांनी
त्या दिवशी आळंदी दुमदुम़न जाते.
अंतरांतळे बोलळायर्चे तर वारकऱ्यांना देवापेक्षांही ' माऊली 'चें प्रेम
अधिक. संतदशनांत पद्मनाभ सहजपणे जोडतो, हा त्यांचा दढ विश्वास.
पंढरीच्या वारीप्रमाणेंच आळंदीची वारी करण्याची प्रथा तुकोबांनी पाडली
आणि आळंदीहून पाळखी पंढरपुर्री नेण्याचा प्रघात हेबतरावबाबांनीं पाडला,
उय्ेष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून पालखी निघते आणि आषाढी एकादशीस
पंढरपूर गांठते, पालखीचा सरंजाम अंकली येथील सरदार शितोळे यांच्या
घराण्यांतून येत असतो. त्यांत दोन घोडे असतात. एक जरीपटक्यासाठीं
आणि दुसरा ज्ञानेश्वरांच्या स्वारीसाठीं, त्याला नटवून, सजवून मोकळा
मिरवीत नेतात. ' ज्ञानोबांचा घोडा? आळंदॉात शिरला की आबालवृद्ध
त्याच्या दर्शनासाठी गर्दी करतात. तो सवोच्याकडून पूजा नमस्कार घेतो
आणणि कोणालाही इजा करीत नाही.
माउलीच्या समागमे वारीला जाणाऱ्या मावुकांची सकाळपासून आळंदीत
रीघ लागते. या लोकगंगेला वाटेत दोवटपरयरेत अनेक जनप्रवाह मिळतच
रहातात. वाखरीस पोचेपर्यंत सारेतेला सिंधूर्चे स्वरूप येतें. खांदयावर शिधोरीची
पडशी, वर भगवी पताका, दुसऱ्या खांद्यावर कांबळ, गळ्यांत टाळ किंवा
वीणा, बायकांच्या डोक्यावर पितळेची छोटी छोटी तुळशीवृंदावर्ने, कंबर
घोतरानें आवळून बांधलेली आणि मुर्खा ' ज्ञानबा तुकाराम ह्वा मत्र.
वारकऱ्यांत उतार वयाच्या, दुबळ्या देहयष्टीच्या माणसांचा भरणा कांही
कमी नसतो. १ण आपल्याला प्रवास कसा झेपणार, आपली वारी कशी पूर्ण
होणार, याची काळजी कोणाच्याच मुखावर दिसत नाहीं. माउली सांगाती
असल्यावर त्यांनीं कशाला चिंता करावी ! शतकं लोटली तरी अजून या
भ्र्धषंत तिळमात्र उणेपणा आलेला नाहीं. समाजाच्या सर्व थरांत अशा प्रकार
चिरकालिक अखूट श्रद्धा निमाण करणाऱ्या संतांची थोरवी कोण वर्णील !
पालखीचे प्रस्थान निघण्यापूर्वी श्ञानियांच्या राजाचा दरबार भरतो.
ध/./-.>.>.““.
१५६ तीथरूप महाराष्ठ
*>/ी“-८४/ /५/१/१८/५/५-८/ ५८-८५ ////५-7/4/"/१४४१५४८५ ५4४५4 ह टश: “€“/“€€<€€“€८€-:८€<-:“<““<“€€€४
मानकऱ्यांना नारळ वांटळे जातात. ' जय शाब्दो नमः शब्दः? गर्जून
उठतो. त्या दिवशी ज्ञाने्धर आळंदीतच आजोळघरी पहिला मुक्काम
करतात. पूर्वेकडील गणपतिदरवाजाजवळच एक बेठें जुनाट घर आहे तें
आजोळघर समजतात. आषाढ वद्य दरर्मात पालवी परत आळंदीस
येते, तेव्हां शिणून-भागून आलेल्या वारकऱ्यांना चक्रांकितबुवांच्या घरी
भाकर-पिठले वाढतात.
सभामंडपाड्य़ा उजव्या अंगाला अजानवृक्षाचा कट्टा आहवे. मध्यम उंचीचे
रोपे तिथें दोन-तीन ठिकाणी वाढून वांकळेळे दिप्ततात, तिन्ही बाजूंना
भिंती उभारून तो भाग बंदिस्त केलेला आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या हातांतली
काठी समाधीच्या वेळीं जवळच उभी करून ठेवली तिचाच हा पुढें वृक्ष
झाला असें सांगतात. साक्षात्कारासाठी भुकेलेळे भक्त तिथे बसून ज्ञानेश्वरीची
पारायणे करतात. आळंदीला जायचं म्हणजे ज्ञानेधरी जवळ असणें उचित
आणि तिथें बसून एखादा अध्याय तरी वाचणे त्याहून उचित. गीता हद्दी
प्रभूची तशी ज्ञानेश्वरी द्दी महाराजांची वाडूमयी मार्त आहे. तिचे तुम्ही अंत-
रंग अधिकारी व्हावे अशी त्यांची आस आहे. त्याचा मुळारंभ अजानवृक्षाच्या
सावलींतच करावा आणि त्यामुळें होणारा चित्तप्रसाद घऊन परत यावे. एवढें
तरी सर्वोना सहज साध्य आहे.
अजानवृद्ष
आळंदीची वारी १५७
श'*२.» %./ ४.” ४.” ४.” ४.” ४. ४.” ४.” ४.” ९.” ४.” ४) ४.” ४. ४)” ४.४ ४. ९.” ९.” ४.५४ ४.” ४.” १५ ४.” ९.” ९.” ५.” ९ ४- ९. ४५ ४४ ४४ ४- ४ ४-४ ४ ४ ४-४" ४ ४-€४- ५/ ४८>€ * “ ५-४"-€ ४. ४५ ८ ५-€ ४-८ %०/ ४-४ ४७ 20७४७ ४७०५०”
आपलें मन भावप्रवण असेल, संसारचितेचं गाठोडं इंद्रायणीच्या पुलापली-
कडे टाकून तिर्थ गेळेळं अत्तेळ, तर या आवारांत प्रदाक्षणा करीत असतांना
एक प्रकारचा सर्वच भरळेडा सूक्ष्म सुगंध अनुभवाला येईल. हा महाराजांच्या
विकसित आत्म्याचा सुगंध आहे. त्यांनी आपल्या हृदयद्वारी लावळेला मोगर्रांचा
वेळ तिथे बद्दरून राहिला आहे.
“ इूबलसं रोप लाविलं दारी
त्याचा वेल गेला गगनावरी
मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुळे वेचितां आतिभारु काळियांसी आला ”
अमुक-तमुक स्थान जागत आहे असे आपण म्हणतो तेव्हां ती साक्ष आपल्या
भावाद्र अंतराला अशाच कोणत्या तरी प्रकारे प्टढेली असते. संतांच्या परम
उदार भागवतघर्मा्शी ज्यांचे थोडेबहुत आंतळं नातं आहे त्यांना आळंदी
कर्धीच जुनी वाटत नाहीं. अतिरपीरिचय होऊनही त्या स्थळाची अवज्ञा
होत नाही. भक्तीच्या डोळ्यांना इथें केवल्य बागडतांना आणि अद्वेत
खेळतांना दिसते.
प्रदाक्षिणा पुरी करून तुम्ही सोनपिंपळाखाळीं उभे रद्दा आणि पुन्हां एकदा
मंदिराकडे, कळसाकडे नजर टाका, या वेळीं एखादा इतिहासवेत्ता तुमच्या-
बरोबर असेल तर तो तुम्हाला पुढील माहिती ऐकवील. ' हे समाषि-
मंदिर शके १४९२ त पुरंदरच्या आंबेकर देदापांड्यांनी बांधळं. मंदिराचा
: कल्शाध्याय ? पुण्याच्या नंद्राम गवंड्यारन रचला. मुख्य सभामंडप तिंद्यांचे
दिवाण रामचंद्र मल्हार शेणवी यांनीं शके १६८२ त बांधला. समाधीमागचं
मुक्ताबाईचे मंदिर नरासेहसरस्वंतीस्वामींनीं शके १८०३ त निर्मल. महाद्वार,
दोही बाजूंचा तट आणि ओवऱ्या शके १६७२ त काशीराव शिंदे यांनी
बांधल्या. पश्चिमेचा पाणदरवाजा बाळाजी बाजीराव यांनीं वरील साढींच
थांधला. गरुडपाराच्या मार्गे भ्री. प्रसादे यांच्या वाड्याच्या आवारांत असलेली
दीपमाळ कान्होजी आंग्ऱ्यांची थोरली स्त्री लदमीबाई हिने शके १६६५ त
उभारली. गांवाजवळचा इंद्रायणीवरचा सेतुर्बंध पुण्याचे श्री. आगरवाला यांनी
शके १७४२ त केला.
तिथून बाहेर पडढांत कीं मागच्या बाजूला राममंदिर आणि विष्णुमंदिर
१९५८ तीथरूप महाराष्ठ्
हा. दोन सुंदर देवालय ओळीने पहा. समाधीच्या पाश्चमेत हरिद्दरद-
स्वामींचा मठ आहे तोही प्रेक्षणीय आहे. हे ख्वामी शके १७४१ त पैठणहून
आळेदीस आले आणि इंद्रायणीच्या पात्रांत वरच्या बाजूला तिद्धबेट आदे
तिथें दहपातापर्यंत त्यांनीं तप केलें. सिद्धदर्शतळा ' अमृतानुभव * घेण्याची
ज्ञानेश्वरांचीद्दी हीच जागा होती असें तांगतात. सिडबेटासमोर पलीकडच्या
तीराळा ह. भ. साखरेबुवा यांचा साधकाश्रम आहे. इरिहरेंद्रस्वामींच्या
मठाच्या पाश्चिभेला दत्तमंदिर आणि त्याच्या पलीकडे मल़ाप्पा वासकर या
चारकऱ्याची समाधि आद्दे. तिथून आणखी पुढे गेल्यावर नरसिंद्सरस्व्तीनीं
बांधलेळ विठ्ठल-रखुभाईचं मंदिर लागते. तिथल्या चोसोपीच्या वायव्य
कोणांत स्वार्मीनी समाधि घेतली आहि.
शिवाजीमहाराजांनी शके १५९३२ त एका सनदेच्या हारे एका जिराइत
जमिनींतून येणारे एक खंडी अडीच मण धान्य ज्ञानेश्वरांच्या नेवेद्यासाठी
अर्पण केळे आहे. त्यानंतर शके १६६१ त बाळाजी बाजीराव यांनी “ आळंदी
ह्वा गांव हक्कासुद्धां श्रीकडे इनाम करून दिला आहे. ' पेशवे आळंदीच्या
यात्रेस जात अतल्याचे कागदोपर्त्री उललेख आहेत. बाळाजी बाजीराव नाना
फडणिसांना एका पत्रांत लिहितात--
' तूत आळंदीची यात्रा भरत असेल. वाणी-उदमी यात्रेत येत असतील.
ट्यांची रववाळी जाळी पाहिजे. तरी कृष्णाजी महादेव यांजकडील वगेरे
जागाचे जे लोक जमा जाळे असतील त्यांपैकी दोनतीनर्शे॑ माणोस आळंदीचे
यात्रेचे रबवालीस पाठवून देणे.
आळंदीच्या राजरस्त्यानें जायला लांगळें कॉ जागोजाग प्रशस्त धर्मशाळा
दिसतात. नाना जातींच्या लोकांनीं आपल्या समाजाच्या सुखतोयीसाठी त्या
याघधलेल्या आहेत. बारा मास त्या मोकळ्य़ा असल्या तरी कातिकी यात्रेच्या
वेळीं मात्र गजबजून जातात. या रस्यानें प्रथम गोरोबाकाकांचे मंदिर लागते
आणि तेथून कांही पावळें चालल्यावर गांवाच्या ईशान्येला ज्ञानेश्वरांनी चाल-
विळेली भिंत दिसते. चांगदेव वाघावर बसून जेव्हां त्यांच्या भेटीला आले
तेव्हां ज्ञानेश्वर मिंत चालवून त्यांना सामोरे गेळे आणि इर्थ त्यांची भेट
झाली. चांगदेवारचे गर्वनिवाणद्दी इर्थेच झाले,
आळंदीला आलेला भक्त-भाविक गिंतीच्या दर्शनाला यायचा आणि
आळंदीची वारी १५९
प१तथलळी मूठभर माती घेऊन जायचा. होतां होतां भिंत तर संपढीच ; पण
तितक्याच उंचीचा तिथे चर पडला, आतां तिथं दगडी भिंत आहे आणि
ती चंद्रभागा नांवाच्या एका खानदेशी महिलेने बांधली आहे. तिच्यावर
एकामागे एक अश्या चारी भावंडांच्या संगमरवरी मूती असून समोरच्या
कोनाड्यांत चांगदेव ह्वात जोडून, माथा नमवून बसलेला आहे. खरे म्हणजे
या मार्त किज्लोरवयाच्या हव्या होत्या ; पण त्या चाळिशीच्या घरांतल्या
देसतात. मुक्ताबाई सवीत धाकटी ; पण ती तर चार मुलांच्या आईसारखी
पोक्त, स्थूल आहे. मिंतीशेजारींच भैरवाचे देऊळ आहे.
“* /"/ ">. -“/-/>“*“/““*“>-€£€ ८५८ ८: >. » /५/५
यै ह. ज्य
ह. र्टिशि ही? ठर ह. रि वै
वि डत (7-1- र्क,
॥ तात
___ ळा! ह. | । क श |
ज्ञानेधरानीं चालविलेली भिंत
एका वारीच्या वेळीं माझे मित्र कावे श्री. बोरकर माझ्या समागमे होते.
आम्ही भेरवाच्या सभामंडपांतल्या स्वच्छ फरशीवर दोन तास बसून
शानेश्वरांच्याविषर्यी सुखसंवाद केला होता.
ज्ञानेश्वर हृ रसेश्वरही होते. ज्ञानेश्वरीत सगळ्या रसांना त्यांनी शांतरसाच्या
घरी पाहुणेर दिला आहे आणि हे सगळें टीचभर ओवीवृत्तांत. एवढ्याद्या
साडेतीन चरणी वृत्तांत निकरार्चे तत्त्वज्ञान आणि परतत्त्वाला स्पर्श करणारे
अप्रतिम काव्य ओतून त्यांनीं त्या वृत्तावर ' ओवी ज्ञानेशाची ' असा छाप
उठवून ठेवला आहे. याच ओवीचा पुढें नाथ, मुक्तेश्वर, श्रीधर इत्यादि
संतकर्वांनी आधार घेतला आणि घरोघर स्त्रियांनीही. महारा ड्रची संस्काते
ओवींतून अभिव्यक्त झाली आहे अर्स म्हटल्यास ती अतिदायोक्ति नव्हे.
संस्कृतांत अनुष्टुमाळा जे प्राधान्य तंच मराठींत ओवीला.
१६० तोरथरूप महाराष्ट्र
ज्ञानेश्वरांनी मुमुक्ष साधकांसाठी ज्ञानेश्वरी लिहिली. स्वानुभवी परमहंतां-
साठी अमृतानुभव रचला आणि जाणते-अजाणते या सर्वोसाठी हारेपाठ
निर्मळा. अशा प्रकारे ज्ञानेश्वर सवांचे कल्याणकतं झाले. तत्त्ववेत्त्या पुरुषांनी
तर्काच्या बळावर अद्रैतापर्येत मजळ मारली ; पण तें अद्वैत शुष्क होतें, नीरस
होतें. ज्ञानेश्वरांनी त्यांत भक्ति-प्रेम ओतले. बुद्धि आणि हृदय दोघांचेंद्दी
त्यामुळें समाधान साधले. त्यांच्या चारेत्रांत काय, किंवा ग्रंथांत काय, विश्व-
प्रेमाचा महासागर भरलेला आहे. त्यांनीं ज्ञानाला द्राक्षारसांत बुडविले आणि
भक्तीला ज्ञानाचे डोळे जडवले. जग सत्य का मिथ्या असल्या शुष्क वादांत
ते पडले नाहींत. भूतमात्री एकच श्रीहरि नांदतो आहे आणि तोच सर्वभावे
सेव्य़ आहि ह त्यांनी आळवून सांगितळे आहे.
: भूतां परस्पर जडो । मेत जीवाचे
इंच विश्वधर्माचें रहस्य त्यांनी प्रगट केलें आहे.
आणि म्हणूनच त्यांची वाणी स्वादु, मधु झाली आहे. यांचें अळोकिकपण
दिसेपर्यंत समाजानं त्यांना अत्यंत तिरस्काराने वागवलं. समाजाकडून ज्यांचा
छळ द्दोतो त्यांची वाणी बहुधा तुसडी होते, विषमय बनते. पण ज्ञाने-
श्वरांच्या वाणीत तसल्या दुर्गुणांचा वास-वाराहदी नाहीं, ते शांत, प्रसन्न वृत्तीने
आपले तत्त्वज्ञान प्रतिपादितात. त्यांनी समाजाला क्षमा तर केलीच ; पण
ती केल्याची जाणीवसुद्धा उरू दिली नाही. ' अनाक्रोश क्षमा म्हणतात ते
हिलाच. जगांतळे कित्येक * धर्मस्थापनेचे नर 'ही क्रोधाला वश झालेले
दिसतात. मतप्रस्थापकही आदळआपट करतांना आढळतात. पण ज्ञानेश्वर
मात्र कोणाला “ दुवाळी ? होणार नाहीं, कोणाची ' भवई ' उचलणार नाही
अद्या मृदुतेन सर्वत्र बोळळे आहेत. जीवातळीं जीव आंथरून राहिळे आहेत.
इतरांनी शब्दचर्चा, अ्थंचर्चा केली. खंडन-मंडनासाठीं दंड थोपटले. पण
ज्ञानेश्वरीत असला खटाटोप नाह्दी. त्यांचे विवेचन भावार्द्र, निर्मळ आणि
अनुभवाचे आहे. म्हणूनच ते धमप्रवचन, धर्मसंकीर्तन वाटते. वारकरी तर
ज्ञानेथरीला “ माउंली ? म्हणून शिरी धरतातचच ; पण सुबुद्ध मद्वाराष्ट्रानेही
तिचा आदर करायला इवा. विवेचकपर्णे, तूद्ष्मपर्णे तिचा अम्यास करायला
हवा. ज्ञानेश्वरांना विसरणे म्हणजे आईला विसरण्यासारवें आहे आणि
आईला विसरणे म्हणजे माणुसकीला पारखे द्वोणें ह ओघानेच आले.
1